शहरं
Join us  
Trending Stories
1
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
2
India T20 World Cup Squad Announced : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा! गिलचा पत्ता कट, ईशान किशनला संधी
3
२०×१२×२० SIP Rule ची कमाल, दर महिन्याची छोटी रक्कम बनवेल कोट्यधीश; सोप्या भाषेत समजून घ्या
4
तुमचे आरोग्य खऱ्याच गोष्टीस पात्र आहे! बनावट उत्पादनांविरोधात हर्बालाइफ इंडियाचा उपक्रम
5
एपस्टीन फाइल्स प्रकरण, मोदींचे नाव घेणाऱ्या पृथ्वीराज चव्हाणांना DCM शिंदेंचे उत्तर; म्हणाले…
6
"हा तोच अब्दुल रशीद खान उर्फ मामू आहे, ज्याच्यावर..."; उद्धव ठाकरेंना अमित साटमांनी घेरले
7
‘वंदे मातरम्’ हा राष्ट्र निर्माणाचा मंत्र बनवायचा आहे; प. बंगालमधून PM मोदींचे देशाला आवाहन
8
Menstrual Syndrome: फक्त पोटदुखीच नाही; पाळी येण्यापूर्वी शरीर देते 'हे' ५ संकेत, या बदलांकडे वेळीच लक्ष द्या
9
२०२६ मध्ये सोनं १.५० लाखांच्या पार जाणार, महिन्याभरात चांदीही ₹४८,००० नं महागली
10
नितीश कुमारांनी हिजाब ओढलेल्या डॉक्टर तरुणी सरकारी सेवेत रुजू होण्यासाठी आलीच नाही, कारण...
11
बांगलादेशात हिंदू तरुणाच्या मॉब लिंचिंग प्रकरणात 7 जणांना अटक; सर्वत्र टीकेची झोड उठल्यानंतर, अखेर मोहम्मद युनूस झुकले
12
कल्याणमध्ये ठाकरेंना मोठा धक्का, माजी आमदाराचा भाजपात प्रवेश; शिंदेसेनेची कोंडी करणार?
13
'धुरंधर'मुळे पालटले या टीव्ही कलाकारांचे नशीब; कोणी आयटम साँगने गाजवले, तर कोणी अभिनयाने जिंकली मने!
14
भाजपचा यू-टर्न! आमदार देवयानी फरांदेंच्या नियुक्तीनंतर नाराजीची लाट, भाजपने आमदार ढिकलेंबद्दल केला खुलासा
15
३ लाख पगार, सरकारी घर, हवी तिथे नोकरी; बुरखा प्रकरणातील डॉ. नुसरत यांना कुणी दिली मोठी ऑफर?
16
बॉक्स ऑफिस मॉन्स्टर 'धुरंधर'सोबत 'उत्तर' रिलीज झाला अन्.., क्षितिज पटवर्धनची लक्षवेधी पोस्ट
17
सरकारच्या तिजोरीत लोकांनी भरले १७ लाख कोटी; कॉर्पोरेट, वैयक्तिक करात मोठी वाढ
18
'धुरंधर'मध्ये अक्षय खन्नाचंच होतंय कौतुक, आर माधवनचा जळफळाट? म्हणाला, "तो नव्या घरात..."
19
BMC निवडणुकीपूर्वी महायुतीत ट्विस्ट! भाजपा-राष्ट्रवादी नेत्यांची बैठक, शिंदेसेनेला डच्चू?
20
“सावकारांचे रॅकेट विदर्भ-मराठवाड्यात सक्रिय, महायुती सरकार शेतकरी विरोधी”: विजय वडेट्टीवार
Daily Top 2Weekly Top 5

गावातील तंटे पोहोचताहेत ठाण्यात !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 14, 2021 04:11 IST

कुही : तंटामुक्त गाव समित्यांच्यामार्फत तंटे सुटत नसल्याने व प्रशासनाचे सहकार्य मिळत नसल्याने समित्यांनी विश्वासार्हता गमावली आहे. गावोगावच्या समित्या ...

कुही : तंटामुक्त गाव समित्यांच्यामार्फत तंटे सुटत नसल्याने व प्रशासनाचे सहकार्य मिळत नसल्याने समित्यांनी विश्वासार्हता गमावली आहे. गावोगावच्या समित्या अकार्यक्षम असल्याच्या निदर्शनास येत आहे. घरातले भांडण उंबऱ्याबाहेर जाऊ नये, अशी ताकीद पूर्वी घरातील मोठी मंडळी द्यायची. हाच धागा पकडून तत्कालीन गृहमंत्री दिवंगत आर. आर. पाटील यांनी महात्मा गांधी तंटामुक्त गाव अभियानला १५ ऑगस्ट २००७ रोजी राज्यात सुरुवात केली.

गावातील भांडणाचा निपटारा गावातच व्हावा, हा या अभियानाचा मुख्य उद्देश होता. मात्र आता तंटामुक्त समित्याच अकार्यक्षम झाल्याने हे अभियान थांबलेले आहे. दरवर्षी ज्या ग्रामपंचायतीने उत्कृष्ट कार्य केले त्या ग्रामपंचायतीला पारितोषिक मिळायचे. त्यामुळे गाव समित्याही उत्तमरीत्या कार्य करायच्या. महिन्याला ग्रामपंचायत येथे तंटामुक्त समित्यांची सभा व्हायची. यात दोन्ही पक्षकार आमनेसामने उभे राहून तंटा सोडविला जायचा. परंतु आता हे होताना दिसत नाही. काही गावात आजही या समित्यांमार्फत वाद सोडविले जातात. परंतु गुन्ह्याच्या स्वरूपात फारसा बदल व योग्य न्याय मिळत नसल्याने नागरिकांचा या समित्यांवरील विश्वास ढासळत चाललेला आहे.

कुही तालुक्यात ५९ ग्रामपंचायती अंतर्गत १८४ गावांचा कारभार चालतो. तालुक्यात दोन पोलीस स्टेशन आहेत. यात कुही पोलीस स्टेशनअंतर्गत ३७ तर वेलतूर पोलीस स्टेशनअंतर्गत ३६ तंटामुक्त गाव समित्या अस्तित्वात आहेत. या समित्यांपैकी काही मोजक्याच समित्या सक्रिय कार्य करीत आहेत, तर बऱ्याचशा समित्या केवळ नावालाच आहेत. या समित्यांना अपेक्षित असे मार्गदर्शन मिळत नाही. सक्रिय समित्यांची नावेसुद्धा प्रशासनाकडे नाहीत.

पोलीस प्रशासन तंटामुक्त समित्यांकडे लक्ष देत नसल्याने समित्यांचे महत्त्वच कमी झाले. त्यामुळे गावातही त्यांना फारसे महत्त्व दिले जात नाही. त्यामुळे गावातील लहान-मोठे तंटे आता थेट पोलीस ठाण्यात पोहोचायला लागले आहेत.

मांढळ येथील समिती सक्रिय

तालुक्यातील मांढळ येथील तंटामुक्त समिती सक्रिय आहे. येथील ग्रामस्थ व समिती पदाधिकाऱ्यांशी संवाद साधला असता, वादविवाद असल्यास समितीला अर्ज करावा लागतो. त्यानंतर दोन्ही पक्षकाराला आमनेसामने बसवून सामंजस्याने प्रकरण सोडविले जाते. या वर्षात २० तंट्यांचे प्रकरण समितीसमोर आले. त्यातील १४ प्रकरणे सामंजस्याने सोडविण्यात आल्याची माहिती समितीचे अध्यक्ष विनोद ठवकर व निमंत्रक पोलीस पाटील खुशाल डहारे यांनी दिली. तालुक्यात वेलतूर, किन्ही, वग, पारडी, वीरखंडी येथेही तंटामुक्त समित्या सक्रिय आहेत.

तालुक्यात बऱ्याच ठिकाणी समित्यांचे कार्य थंडबस्त्यात आहे. काही ठिकाणी आजही समित्या सक्रिय असून, अनेक प्रकरणे निकाली निघाली आहेत. किरकोळ स्वरूपाच्या गुन्ह्याविषयी गाव तंटामुक्त समितीने सामंजस्याने सोडवून नागरिकांचे समाधान करून द्यावे. यासाठी तंटामुक्त समित्या पुन्हा सक्रिय होणे गरजेचे आहे.

चंद्रकांत मदने, ठाणेदार, कुही.