शहरं
Join us  
Trending Stories
1
Air India Plane Crash : अहमदाबाद विमान अपघातावर मोठी अपडेट; सुप्रीम कोर्टाने केंद्र सरकारला नोटीस पाठवली, AAIB अहवालाबाबत सांगितली ही बाब
2
डीमार्टने जीएसटी दर कमी केले नाहीत? पहिल्याच दिवशी ८,८५७ रुपयांचे बिल, किती लावला GST?
3
भारतीय IT कंपन्यांवर नवं संकट! ट्रम्प यांच्या एका निर्णयामुळे दरवर्षी होणार कोट्यवधींचा खर्च, नोकऱ्यांवर गदा?
4
Lamborghini Accident: भरधाव लॅम्बोर्गिनी दुभाजकावर धडकली; कोस्टल रोडवरील अपघातात, कोण चालवत होतं कार?
5
हुंड्यासाठी जावयाची क्रूरता! जमिनीसाठी पत्नीची केली हत्या, सासऱ्यालाही दिला विजेचा झटका
6
चिमुकली आई... आई... करत राहिली, लिव्ह इन पार्टनरने गर्लफ्रेंडच्या मुलीची हत्या केली  
7
Navratri 2025: नवरात्र हा शक्ती उपासनेचा काळ, दुर्गा सप्तशती ग्रंथ वाचनाने कोणते लाभ होतात?
8
नवरात्री २०२५: ९ गोष्टी अजिबात करू नका, नवदुर्गांची वक्रदृष्टी-अवकृपा संभव; चूक घडलीच तर...
9
ऐकावं ते नवलच! शोधून शोधून थकली पण सापडलाच नाही नवरा; मग स्वत:शीच केलं लग्न अन्...
10
Asia Cup 2025: भारत-पाकिस्तानचे संघ पुन्हा एकदा भिडणार? समजून घ्या IND vs PAKचे गणित
11
मनसे-शिवसेना युतीत जागा वाटपाचा फॉर्म्युला ठरला; कोण किती जागा लढवणार? समोर आली माहिती
12
VIRAL VIDEO: चीनमधली खूप रील्स पाहिली असतील, पण भारतातील एअरपोर्टवर फूड डिलिव्हरी करणारा रोबो पाहिलात का?
13
Mumbai: सचिन तेंडुलकरच्या हस्ते दादरच्या शिवाजी पार्क जिमखान्याचे लोकार्पण!
14
Navratri 2025: नवरात्रीच्या पहिल्या दिवशी करूया स्मरण आणि मानसपूजन देवी शैलपुत्रीचे!
15
दुर्दैवी अंत! ज्याच्या इशाऱ्यावर 'वाघ' उठबस करायचा, त्याच मालकाला वाघाने टेन्शनमध्ये शिकार बनवलं
16
पाकिस्तानी सैन्याने त्यांच्याच देशात हवाई हल्ला केला, महिला मुलांसह ३० नागरिकांचा मृत्यू
17
ओबीसी आंदोलक नवनाथ वाघमारे यांची गाडी अज्ञात व्यक्तीने पेटवली; जालन्यातील घटना
18
"हो आम्ही पालक झालो आहोत", अखेर भूषणने उलगडलं केतकीसोबतच्या 'त्या' फोटोचं गुपित
19
पराभव दिसू लागताच पाकिस्तानी प्रेक्षक पळू लागले, भारतीय तरुणीने भर स्टेडियममध्ये डिवचले, म्हणाली...  

शाेषखड्ड्यातून सांडपाण्याची विल्हेवाट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 5, 2021 04:07 IST

लाेकमत न्यूज नेटवर्क कळमेश्वर : गावकऱ्यांचे सुदृढ आराेग्य राखायचे असेल तर गावातील सांडपाण्याचे याेग्य नियाेजन करणे गरजेचे आहे. याकरिता ...

लाेकमत न्यूज नेटवर्क

कळमेश्वर : गावकऱ्यांचे सुदृढ आराेग्य राखायचे असेल तर गावातील सांडपाण्याचे याेग्य नियाेजन करणे गरजेचे आहे. याकरिता शाेषखड्ड्यांच्या माध्यमातून सांडपाण्याची विल्हेवाट लावण्याचा स्तुत्य उपक्रम घोराड ग्रामपंचायतने सुरू केला असून, आतापर्यंत गावात सार्वजनिक १४ तर ४० वैयक्तिक शोषखड्डे तयार करण्यात आले आहे.

घरासभाेवताल, रस्त्यात आणि गटारीत तुंबलेले सांडपाणी आरोग्यास घातक असते. त्याचा घाण वास येतो. या पाण्याने रस्त्यावर चिखल हाेऊन घसरण निर्माण होते. शिवाय, डासांना अंडी घालायला जागा मिळून त्यांची पैदास वाढते. डासांमुळे मलेरियासारखे आजार होतात. त्यामुळे सांडपाण्याची याेग्य विल्हेवाट लावण्यासाठी जमिनीत सांडपाणी जिरविण्यासाठी शोषखड्डा महत्त्वपूर्ण ठरतो.

सध्या सांडपाण्याची विल्हेवाट नालीच्या माध्यमातून होत असते. परंतु नाली बांधकाम केल्यानंतर जर ती तुंबली तर उपसा करायला ग्रामपंचायतकडे पैसे नसताे. विशेष म्हणजे प्रत्येक ठिकाणी नाली बांधकाम होऊ शकत नाही. नाली आणि सिमेंट रोडमुळे पाणी जमिनीत मुरण्याचे प्रमाण अतिशय कमी झाले आहे. नुसते पाणी उपसा करण्याचे काम सुरू आहे. अशा परिस्थितीत शोषखड्डे हे जमिनीत पाणी मुरविण्याचे उत्तम माध्यम आहे. प्रत्येक ग्रामपंचायतने असे उपक्रम घेणे गरजेचे झाले आहे.

घरातील सांडपाणी मुद्दाम तयार केलेल्या शोषखड्ड्यात सोडल्याने ते जमिनीत मुरते. आंघोळीच्या मोरीतील, धुण्याभांडीच्या पाण्याचीही विल्हेवाट शोषखड्ड्याद्वारे होऊ शकते. वाळू असलेल्या, मुरमाड जमिनीत या पाण्याचा चांगला निचरा होतो. पण चिकणमाती असलेल्या जमिनीत मात्र याचा फारसा उपयोग होत नाही. अशावेळी चर खणून पाण्याला दूर न्यावे लागते. त्यामुळे रस्त्यावरून वाहणाऱ्या पाण्यास आळा बसतो व त्यापासून रोगराई टाळण्यास मदत होते. त्यामुळे शोषखड्डे तयार करणे उपयोगाचे ठरते, असे सरपंच मंगेश गोतमारे यांनी सांगितले.

...

शोषखड्ड्याजवळ झाडे लावल्याने निसर्गाचा समतोल राखला जातो. सांडपाण्याची योग्य विल्हेवाट लावली जाते. त्यामुळे डासांचे प्रमाण कमी होते व त्रासही कमी होतो. डासांपासून मलेरियासारखे पसरणारे आजार होत नाहीत व आरोग्य सुदृढ राहते.

- महेश्वर डोंगरे, खंडविकास अधिकारी, पंचायत समिती, कळमेश्वर

...

सध्या शासनातर्फे जलशक्ती अभियान सुरू आहे. या माध्यमातून प्रत्येक कुटुंबामागे एक शोषखड्डा आणि प्रत्येक घरी छतावरील पाणी जमिनीत मुरविण्याचे काम केल्यास खऱ्या अर्थाने पाणी जमिनीत मुरू शकते आणि पाण्याची पातळीसुद्धा वाढू शकते. म्हणजेच सद्यस्थितीत जमिनीतील पाण्याचा उपसा जास्त प्रमाणात असल्याने भूजल पातळी कमी होत आहे. त्यावर हा शोषखड्ड्याचा सर्वात रामबाण उपाय होऊ शकतो.

- संदीप गाेडशलवार, खंडविकास अधिकारी (मनरेगा), जि. प. नागपूर