शहरं
Join us  
Trending Stories
1
"७५ टक्के नगराध्यक्ष महायुतीचे, ४८ टक्के नगरसेवक एकट्या भाजपाचे; एवढा मोठा विजय...," CM फडणवीसांनी आकड्यांसह सांगितली ताकद
2
"कुटुंब आणि लग्न हे केवळ शारीरिक संतुष्टीचे माध्यम नाही तर...", 'लिव्ह-इन रिलेशनशिप'वर मोहन भागवत स्पष्टच बोलले
3
“नगरपालिका निकालाने विरोधकांचे पानिपत, आता मनपासाठी एक दिलाने कामाला लागा”: DCM शिंदे
4
"जर व्हेनेझुएला विरोधात कुठल्याही प्रकारची लष्करी कारवाई झाली तर..."; ब्राझीलच्या राष्ट्राध्यक्षांची अमेरिकेला थेट धमकी!
5
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
6
प्रियकरासोबत मिळून पतीची हत्या, पण एक चूक नडली अन पोलिसांनी ठोकल्या बेड्या  
7
"पक्षाने जे प्रवेश दिले त्याचा फायदाच झाला"; मुनगंटीवारांच्या नाराजीवर CM फडणवीसांचे भरपाई देण्याचे आश्वासन
8
IND vs PAK : मैदानात फुल राडा! आयुष म्हात्रे–वैभव सूर्यवंशीचा पाक गोलंदाजाशी वाद; VIDEO व्हायरल
9
धावत्या ट्रेनमध्ये प्रेमीयुगुलाचा रोमान्स, VIDEO व्हायरल; नेमका कुठे घडला 'हा' लज्जास्पद प्रकार?
10
‘हा महायुतीचा सामूहिक विजय, आम्ही जिथे लढलो तिथे…”, निकालांनंतर अजित पवारांचं मोठं विधान          
11
'हिंदूंनी एकजुटीने...', बांगलादेशातील हिंदू अत्याचारांवर RSS प्रमुख मोहन भागवतांचे मोठे वक्तव्य
12
भाजपाचे ५ आमदार असतानाही काँग्रेसने दिली मात! चंद्रपुरात विजय वडेट्टीवार ठरले किंगमेकर
13
Daund Local Body Election Result 2025: दौंडला दोन्ही गट सत्तेत; नगराध्यक्षपदी राष्ट्रवादी काँग्रेसच्या दुर्गादेवी जगदाळे
14
एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील दोन बालेकिल्ल्यांना भाजपाकडून सुरुंग, अंबरनाथ, बदलापूरमध्ये फुललं कमळ
15
“नगरपालिका निवडणुकीतील महायुतीचा विजय निवडणूक आयोगाच्या आशिर्वादाने”: हर्षवर्धन सपकाळ
16
Nagpur Election News: CM फडणवीसांच्या जिल्ह्यात कोणाचे किती नगराध्यक्ष, भाजपने कुठे-कुठे उधळला गुलाल?
17
४० वर्षांची काँग्रेसची सत्ता उलथवली; धुळ्यात भाजपाचा ऐतिहासिक विजय, ३२ पैकी ३१ जागा आल्या
18
Sanjay Raut : "'तेच' आकडे, 'तेच' मशीन, १२०-१२५..."; संजय राऊतांचा वेगळाच तर्क! संपूर्ण निकालावरच प्रश्नचिन्ह
19
वीज बिल वसुलीसाठी गेलेल्या टीमवर लाठ्या-काठ्यांनी हल्ला; जीव वाचवण्यासाठी कर्मचाऱ्यांची पळापळ
20
IND vs PAK U19 Asia Cup Final : अपराजित युवा टीम इंडियाला फायनलमध्ये पराभवाचा धक्का! पाकनं १३ वर्षांनी उंचावली ट्रॉफी
Daily Top 2Weekly Top 5

शाेषखड्ड्यातून सांडपाण्याची विल्हेवाट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 5, 2021 04:07 IST

लाेकमत न्यूज नेटवर्क कळमेश्वर : गावकऱ्यांचे सुदृढ आराेग्य राखायचे असेल तर गावातील सांडपाण्याचे याेग्य नियाेजन करणे गरजेचे आहे. याकरिता ...

लाेकमत न्यूज नेटवर्क

कळमेश्वर : गावकऱ्यांचे सुदृढ आराेग्य राखायचे असेल तर गावातील सांडपाण्याचे याेग्य नियाेजन करणे गरजेचे आहे. याकरिता शाेषखड्ड्यांच्या माध्यमातून सांडपाण्याची विल्हेवाट लावण्याचा स्तुत्य उपक्रम घोराड ग्रामपंचायतने सुरू केला असून, आतापर्यंत गावात सार्वजनिक १४ तर ४० वैयक्तिक शोषखड्डे तयार करण्यात आले आहे.

घरासभाेवताल, रस्त्यात आणि गटारीत तुंबलेले सांडपाणी आरोग्यास घातक असते. त्याचा घाण वास येतो. या पाण्याने रस्त्यावर चिखल हाेऊन घसरण निर्माण होते. शिवाय, डासांना अंडी घालायला जागा मिळून त्यांची पैदास वाढते. डासांमुळे मलेरियासारखे आजार होतात. त्यामुळे सांडपाण्याची याेग्य विल्हेवाट लावण्यासाठी जमिनीत सांडपाणी जिरविण्यासाठी शोषखड्डा महत्त्वपूर्ण ठरतो.

सध्या सांडपाण्याची विल्हेवाट नालीच्या माध्यमातून होत असते. परंतु नाली बांधकाम केल्यानंतर जर ती तुंबली तर उपसा करायला ग्रामपंचायतकडे पैसे नसताे. विशेष म्हणजे प्रत्येक ठिकाणी नाली बांधकाम होऊ शकत नाही. नाली आणि सिमेंट रोडमुळे पाणी जमिनीत मुरण्याचे प्रमाण अतिशय कमी झाले आहे. नुसते पाणी उपसा करण्याचे काम सुरू आहे. अशा परिस्थितीत शोषखड्डे हे जमिनीत पाणी मुरविण्याचे उत्तम माध्यम आहे. प्रत्येक ग्रामपंचायतने असे उपक्रम घेणे गरजेचे झाले आहे.

घरातील सांडपाणी मुद्दाम तयार केलेल्या शोषखड्ड्यात सोडल्याने ते जमिनीत मुरते. आंघोळीच्या मोरीतील, धुण्याभांडीच्या पाण्याचीही विल्हेवाट शोषखड्ड्याद्वारे होऊ शकते. वाळू असलेल्या, मुरमाड जमिनीत या पाण्याचा चांगला निचरा होतो. पण चिकणमाती असलेल्या जमिनीत मात्र याचा फारसा उपयोग होत नाही. अशावेळी चर खणून पाण्याला दूर न्यावे लागते. त्यामुळे रस्त्यावरून वाहणाऱ्या पाण्यास आळा बसतो व त्यापासून रोगराई टाळण्यास मदत होते. त्यामुळे शोषखड्डे तयार करणे उपयोगाचे ठरते, असे सरपंच मंगेश गोतमारे यांनी सांगितले.

...

शोषखड्ड्याजवळ झाडे लावल्याने निसर्गाचा समतोल राखला जातो. सांडपाण्याची योग्य विल्हेवाट लावली जाते. त्यामुळे डासांचे प्रमाण कमी होते व त्रासही कमी होतो. डासांपासून मलेरियासारखे पसरणारे आजार होत नाहीत व आरोग्य सुदृढ राहते.

- महेश्वर डोंगरे, खंडविकास अधिकारी, पंचायत समिती, कळमेश्वर

...

सध्या शासनातर्फे जलशक्ती अभियान सुरू आहे. या माध्यमातून प्रत्येक कुटुंबामागे एक शोषखड्डा आणि प्रत्येक घरी छतावरील पाणी जमिनीत मुरविण्याचे काम केल्यास खऱ्या अर्थाने पाणी जमिनीत मुरू शकते आणि पाण्याची पातळीसुद्धा वाढू शकते. म्हणजेच सद्यस्थितीत जमिनीतील पाण्याचा उपसा जास्त प्रमाणात असल्याने भूजल पातळी कमी होत आहे. त्यावर हा शोषखड्ड्याचा सर्वात रामबाण उपाय होऊ शकतो.

- संदीप गाेडशलवार, खंडविकास अधिकारी (मनरेगा), जि. प. नागपूर