शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी: दहशतवादी हल्ल्यातील मृतांच्या कुटुंबीयांना ५० लाखांची मदत; राज्य सरकारचा निर्णय
2
कॅनडाचा निवडणूक निकाल भारतासाठी आहे खास; खलिस्तानी धुपले, पक्षाची मान्यताच गेली
3
छत्रपती संभाजीनगरचा जन्म, 'ही' मराठमोळी मुलगी थेट विजय देवरकोंडासोबत झळकणार
4
पाकिस्तानसोबत युद्ध झाल्यास भारताचा पराभव निश्चित; काँग्रेस नेत्याच्या पोस्टनं नवा वाद
5
'अल्लाह हू अकबर' म्हणणारा व्यक्ती एनआयएच्या रडारवर; व्हिडीओ समोर आल्यानंतर पाठवले समन्स
6
आयपीएलमध्ये विक्रमी शतक झळकावणाऱ्या वैभव सूर्यवंशीला राज्य सरकारकडून मोठं बक्षीस!
7
टाटा मिठाची कहाणी: छोट्या व्यवसायात का उतरले रतन टाटा? पैसा कामावणं नाही तर, 'हे' होतं कारण
8
सोलापूर पुन्हा हादरले! हात अन् गळा चिरून प्रशिक्षणार्थी डॉक्टरने केली आत्महत्या
9
क्रेडिट कार्ड UPI शी लिंक केल्यास मिळतात 'हे' फायदे; प्रत्येकवेळी खिशात बाळगण्याची गरज नाही
10
आयपीएलमध्ये विक्रमी शतक ठोकणारा वैभव सूर्यवंशी कितवीत शिकतो? कुठल्या शाळेत जातो? जाणून घ्या
11
"कारगिलमध्ये हरवलं होतं, जरा डोकं लावा..."; धवनने आफ्रिदीला सुनावले; अपमानाची करुन दिली आठवण
12
२६ निष्पाप लोकांना मारणारा हाशिम मुसा निघाला स्पेशल पॅरा कमांडो; हल्ल्यात पाकिस्तानी लष्कराचा सहभाग असल्याची शंका
13
भारताच्या प्रतिका रावलने एकदिवसीय क्रिकेटमध्ये रचला इतिहास, केली 'अशी' कामगिरी!
14
CMF Phone 2 Pro लाँच, किंमत एवढी स्वस्त की...; या रेंजमध्ये पहिल्यांदाच टेलिफोटो कॅमेरा सेटअप...
15
Akshaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला करतात चैत्र गौरीची पाठवणी; पण कशी? जाणून घ्या!
16
मोफत रेशनचा लाभ घेणाऱ्यांसाठी शेवटची संधी? हे काम आजच करा अन्यथा कार्डवरुन नाव वगळणार
17
प्रत्येक भारतीयाला संताप, संसदेचं विशेष अधिवेशन बोलवा; राहुल गांधी, खरगेंची मोदींकडे मागणी
18
मराठमोळ्या अभिनेत्रीने अमेरिकेत बनवलं पापड आणि कुरडई, व्हिडीओ केला शेअर
19
मुकेश अंबानींनी जगातील अब्जाधीशांना टाकलं मागे, एका दिवसात कमावले ₹४४,२९३ कोटी रुपये
20
Vaibhav Suryavanshi : "आई ३ तास ​​झोपायची, वडिलांनी नोकरी सोडली...", वैभव सूर्यवंशीने सांगितला IPL पर्यंतचा प्रवास

घोटाळेबाज वासनकर कंपनीची जमीन विकण्याविरुद्ध दाखल अपील खारीज

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 23, 2021 04:06 IST

नागपूर : शेकडो गुंतवणूकदारांची कोट्यवधी रुपयांनी फसवणूक करणाऱ्या वासनकर वेल्थ मॅनेजमेंट कंपनीची शेतजमीन विकण्याच्या आदेशाविरुद्ध दाखल अपील मुंबई उच्च ...

नागपूर : शेकडो गुंतवणूकदारांची कोट्यवधी रुपयांनी फसवणूक करणाऱ्या वासनकर वेल्थ मॅनेजमेंट कंपनीची शेतजमीन विकण्याच्या आदेशाविरुद्ध दाखल अपील मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने गुणवत्ताहीन ठरवून फेटाळून लावले. न्यायमूर्तीद्वय विनय देशपांडे व अमित बोरकर यांनी हा महत्त्वपूर्ण निर्णय दिला.

शंकरनगर येथील प्रदीप बालपांडे यांनी हे अपील दाखल केले होते. कंपनीने २९ लाख रुपये ठेवीच्या मोबदल्यात संबंधित जमीन बालपांडे यांना विकण्यासाठी नोंदणीकृत करार केला आहे. त्यामुळे ती जमीन विकण्याचा आदेश अवैध आहे असा दावा अपीलमध्ये करण्यात आला होता. घोटाळ्याचा मास्टरमाईंड असलेला वासनकर कंपनीचा संचालक प्रशांत वासनकर याच्यासह इतर आरोपींविरुद्ध अंबाझरी पोलिसांनी एफआयआर नोंदवला आहे. या घोटाळ्याचा खटला एमपीआयडी कायद्याच्या विशेष सत्र न्यायालयात प्रलंबित आहे. दरम्यान, एमपीआयडी कायद्यांतर्गत या प्रकरणात सक्षम अधिकारी म्हणून कार्य करीत असलेल्या उप-विभागीय अधिकाऱ्यांनी पीडित गुंतवणूकदारांचे पैसे परत करण्यासाठी वासनकर कंपनीची मालमत्ता जप्त केली आणि ती मालमत्ता लिलावात विकण्यासाठी विशेष सत्र न्यायालयात अर्ज दाखल केला. तो अर्ज १ जुलै २०१७ रोजी मंजूर करण्यात आला. त्यानंतर ३१ ऑक्टोबर २०१७ रोजी वर्तमानपत्रांमध्ये मालमत्ता लिलावाची नोटीस प्रसिद्ध करण्यात आली. त्यात संबंधित शेतजमिनीचाही समावेश होता. बालपांडे यांनी त्याविरुद्ध सुरुवातीला विशेष सत्र न्यायालयात अर्ज दाखल केला होता. तो अर्ज ३१ जानेवारी २०१८ रोजी खारीज करण्यात आला. परिणामी, त्यांनी उच्च न्यायालयात धाव घेतली होती. त्यांना उच्च न्यायालयानेही दणका दिला.

------------------

असे होते प्रकरण

मुदत ठेवीत गुंतवलेले २९ लाख रुपये परत करण्यासाठी वासनकर वेल्थ मॅनेजमेंट कंपनीने २८ फेब्रुवारी २०१४ रोजी दिलेला धनादेश बाऊन्स झाला. त्यामुळे बालपांडे यांनी कंपनीला कायदेशीर नोटीस बजावली. त्यानंतर प्रशांत वासनकरने ही रक्कम देण्यास असमर्थता दर्शवून त्या मोबदल्यात कंपनीची शेतजमीन देण्याचा प्रस्ताव ठेवला. बालपांडे यांच्या मंजुरीनंतर २८ मार्च २०१४ रोजी जमिनीचा नोंदणीकृत विक्री करारनामा करण्यात आला. परंतु, त्याचे पालन करण्यात न आल्याने बालपांडे यांनी वरिष्ठ स्तर दिवाणी न्यायालयात दावा दाखल केला आहे. तो दावा प्रलंबित आहे. या परिस्थितीत संबंधित जमिनीवर बालपांडे यांचा अधिकार असल्याचे अपीलमध्ये नमूद करण्यात आले होते.

--------------

ठोस पुरावे सादर केले नाही

बालपांडे यांनी गुंतवणुकीसंदर्भात ठोस पुरावे सादर केले नाही. त्यांनी एकूण किती रक्कम जमा केली, संबंधित रक्कम कोणत्या तारखेला जमा केली, सर्व रक्कम रोख स्वरुपात जमा केली की, धनादेश दिला, सर्व रक्कम एकाचवेळी दिली की, विविध तारखांना दिली यासह इतर महत्त्वपूर्ण माहिती त्यांनी न्यायालयाच्या रेकॉर्डवर सादर केली नाही. तसेच, रक्कम जमा केल्याची पावती, प्राप्तिकर विवरण व इतर आवश्यक कागदपत्रेही रेकॉर्डवर आणली नाहीत. परिणामी, उच्च न्यायालयाने त्यांना दिलासा देण्यास नकार दिला.