शहरं
Join us  
Trending Stories
1
"तुमचं वक्तव्य लाजिरवाणं, आम्ही हमासचे दहशतवादी मारले", प्रियंका गांधींच्या 'त्या' दाव्यामुळे इस्राइल संतप्त   
2
E10 च्या वाहनांमध्ये E20 पेट्रोल वापरू नका, नाहीतर...; टोयोटाचा वाहन मालकांना इशारा...
3
शुबमन गिलची हवा! इंग्लंड दौरा गाजवणाऱ्या टीम इंडियाच्या कॅप्टनला ICC कडून मिळालं मोठं गिफ्ट
4
आधारबाबत सुप्रीम कोर्टाचं सूचक विधान, बिहारमधील SIRवरून निवडणूक आयोगाला दिलासा 
5
व्हायरल होण्याचं भूत, मिठी मारुन कपलची कालव्यात उडी; Video पाहून वाढेल हृदयाची धडधड
6
"भावांनो, असं आयुष्य कोण जगेल..."; कौटुंबिक वादातून पतीनं संपवलं जीवन, मृत्यूपूर्वी दीड मिनिटांचा Video
7
खऱ्याखुऱ्या विराट कोहलीने पान टपरीवाल्याला केला कॉल, नंतर पोलीस त्याच्या घरी पोहचले अन्...
8
ट्रम्प यांच्या ५०% टॅरिफनं मुकेश अंबानींच्या 'या' कंपनीचा शेअर घसरला? ₹१७ वर आला भाव!
9
Janmashtami 2025: बाळाला कृष्णाचे नाव ठेवायचंय? ही घ्या १०८ नावांची यादी; अगदी मुलींचीह!
10
HDFC-ICICI बँकेच्या शेअर्समुळे बाजार गडगडला! पण, 'या' क्षेत्राने दिली साथ; कशात झाली वाढ?
11
माझा काही संबंध नाही, काँग्रेसने परवानगीशिवाय 'तो' व्हिडिओ वापरला; केके मेननचे स्पष्टीकरण
12
Maharashtra Police Bharti 2025: १५ हजार पोलीस भरतीस मंजुरी; मंत्रिमंडळाच्या बैठकीत ४ महत्त्वाचे निर्णय, वाचा
13
शाओमी YU7 च्या खरेदीसाठी ग्राहकांची झुंबड, अवघ्या दोन मिनिटांत ३ लाख बुकींग!
14
१९ वर्षे असते शनि महादशा, ‘या’ राशींना मिळतो अपार पैसा, भाग्योदय; भरभराट, भरघोस लाभच लाभ!
15
धक्कादायक! लोकोपायलटच्या जाग्यावर तिसराच व्यक्ती बसला, मोठा गोंधळ उडाला, अनेकांचा जीव धोक्यात; व्हिडीओ व्हायरल
16
"तिसरं मूल झाल्यास गाय अन् ५०००० रुपयांचं बक्षीस"; घोषणा करणाऱ्या खासदाराचं पंतप्रधान मोदींनी केलं कौतुक!
17
प्रेमविवाहानंतर अवघ्या १० दिवसांत पत्नीचा काटा काढला; पोलीस शिपाई का बनला गुन्हेगार?
18
पैशांचा पाऊस! अदानींच्या संपत्तीत एका दिवसात ५० हजार कोटींची वाढ, टॉप-२० श्रीमंतांच्या यादीत पुन्हा स्थान!
19
Video: एकाच महिलेचं ६ वेळा मतदार यादीत नाव, EPIC क्रमांक वेगळे...; महाराष्ट्रातील प्रकार व्हायरल
20
एका झटक्यात ₹४००० नं घसरला शेअरचा भाव; शेअर विकण्यासाठी गुंतवणुकदारांच्या रांगा, पाहा कोणता आहे स्टॉक?

जेल ब्रेक रोखण्यासाठी कारागृहात चाय पे चर्चा

By admin | Updated: November 2, 2016 02:23 IST

जेल ब्रेकच्या घटना रोखण्यासाठी राज्यातील सर्व मध्यवर्ती कारागृहात यापुढे मध्यरात्रीनंतर ‘चाय पे चर्चा’ केली जाणार आहे.

राज्यातील सर्व मध्यवर्ती कारागृहात मध्यरात्री होणार प्रयोग : पुनरावृत्ती टळणार का ?नरेश डोंगर नागपूरजेल ब्रेकच्या घटना रोखण्यासाठी राज्यातील सर्व मध्यवर्ती कारागृहात यापुढे मध्यरात्रीनंतर ‘चाय पे चर्चा’ केली जाणार आहे. होय, काहीसा अफलातून वाटत असला तरी हा प्रयोग मध्यरात्रीनंतर होणाऱ्या जेल ब्रेकच्या घटना थांबविण्यासाठी प्रभावी ठरू शकतो, अशी पक्की खात्री राज्य कारागृह प्रशासनाला आहे. भोपाळ जेल ब्रेकने देशभरात खळबळ उडवून दिली आहे. सिमीचे आठ खतरनाक दहशतवादी सोमवारी पहाटे कारागृहातील सुरक्षा रक्षक रमाशंकर सिंग यांची हत्या करून पळून गेले. देशातील सुरक्षित समजल्या जाणाऱ्या कारागृहापैकी एक असलेल्या भोपाळ कारागृहात ही घटना घडल्याने देशभरात खळबळ उडाली आहे. देशाचे हृदयस्थळ असलेल्या नागपूर कारागृहात ३१ मार्च २०१५ ला अशीच एक घटना घडली होती. येथील मध्यवर्ती कारागृहाची सुरक्षा व्यवस्था भेदून पाच खतरनाक कैदी पळून गेले होते. अनेक महिने पोलिसांशी लपंडाव खेळल्यानंतर त्यातील चौघांना गुन्हे शाखेच्या पथकाने जेरबंद करण्यात यश मिळवले. मात्र, नागपुरातील ‘जेल ब्रेक’ने राज्याच्या कारागृह प्रशासनाला जबर हादरा दिला होता. या हादऱ्यातून सावरण्याच्या तयारीत असलेल्या कारागृह प्रशासनाला ‘भोपाळ जेल ब्रेक’च्या घटनेने पुन्हा एकदा धक्का दिला आहे. नागपूर ‘जेल ब्रेक’ची पुन्हा राज्यात कुठेच पुनरावृत्ती होऊ नये म्हणून खबरदारीच्या कोणत्या उपाययोजना करायच्या, त्याबाबत राज्य सरकार, कारागृह प्रशासन आणि सुरक्षा यंत्रणांच्या शीर्षस्थांचे प्रदीर्घ मंथन झाले. त्यानंतर राज्यातील कारागृहांमध्ये सुरक्षेच्या कोणत्या उपाययोजना करायच्या त्यासाठी इस्रायलचे सुरक्षा तज्ज्ञही येऊन गेले. त्यांनी राज्यातील सर्वच मोठ्या कारागृहांची सुरक्षा व्यवस्था तपासली आणि आणखी काय करायचे, त्याबाबतचा सविस्तर अहवालही सरकारला सादर केला. या अहवालानुसार राज्यातील कारागृहांना आत-बाहेर सुरक्षा कवच दिले जाणार आहे. त्याबाबतच्या हालचाली प्रशासकीय पातळीवर सुरू असतानाच ‘भोपाळ जेल ब्रेक’ घडल्याने तातडीने कोणत्या उपाययोजना करायच्या, ते पुन्हा एकदा चर्चेला आले. त्याच पार्श्वभूमीवर, कारागृहात मध्यरात्रीनंतर ‘चाय पे चर्चा’ करायची, असा उपाय समोर आला आहे. ‘जेल ब्रेक’च्या घटना रोखण्यासाठी ‘चाय पे चर्चा’चे समीकरण समजून घेण्याचा प्रयत्न केला असता, एका वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सांगितले. नागपूर, भोपाळ, खंडवा आणि जेथे कुठे जेल ब्रेकच्या घटना घडल्या त्या सर्व पहाटे २ ते ३ नंतरच घडल्या. रात्रपाळीत कर्तव्यावर असलेल्यांना या वेळेत ‘डुलकी’ येते.