शहरं
Join us  
Trending Stories
1
इराण हल्ल्याचा तीव्र शब्दांत निषेध; कतारने क्षेपणास्त्रे हवेतच रोखली, जीवितहानी झाली नसल्याचा दावा
2
आखाती देशांत तणाव वाढण्याची चिन्हे, अनेक ठिकाणी एअरस्पेस बंद; एअर इंडिया, इंडिगोकडून सूचना जारी
3
इराणचा पलटवार...! कतारमधील अमेरिकेच्या सर्वात मोठ्या एअरबेसवर डागली 6 क्षेपणास्त्रे
4
IND vs ENG मालिके दरम्यान दु:खद बातमी! भारताच्या दिग्गज फिरकीपटूचं निधन; लंडनमध्ये घेतला अखेरचा श्वास
5
“त्रिभाषा सूत्रावर सर्व संबंधितांशी बोलूनच अंतिम निर्णय घेणार”; CM फडणवीसांनी केले स्पष्ट
6
ENG vs IND : फलंदाजांनी आपलं काम केलं! टीम इंडियानं हा मंत्र जपला तर विजय पक्का, पण...
7
“स्वसंरक्षणाचा इराणला पूर्ण अधिकार”; रशियाने स्पष्टच सांगितले, तणाव वाढण्याची चिन्हे
8
ठरले! महादेव बाबर NCPमध्ये करणार प्रवेश; DCM अजित पवार राहणार उपस्थित, पुण्यात ताकद वाढणार
9
कुर्ला-सायनदरम्यान ओव्हरहेड वायर तुटली; मध्य रेल्वेच्या जलद फेऱ्या ठप्प, प्रवाशांचे हाल
10
"...तेलाच्या किमती कमी ठेवा, मी बघतोय!" इराण-इस्रायल युद्धादरम्यान डोनाल्ड ट्रम्प यांचं मोठं विधान
11
ENG vs IND: KL राहुल-पंतच्या सेंच्युरीनंतर जड्डूची उपयुक्त खेळी! इंग्लंडसमोर ३७१ धावांचे टार्गेट
12
इस्रायलचा इराणवर मोठा हल्ला, ५० हून अधिक लढाऊ विमानांचा कहर; महत्त्वाच्या लष्करी तळांवर तुफान बॉम्बिंग
13
"२०२२ मध्ये केवळ वादळ होतं, २०२७ मध्ये....", पोटनिवडणुकीच्या निकालानं केजरीवाल खूश, केली मोठी भविष्यवाणी
14
खामेनेई पळून जाण्याच्या तयारीत! इराणच्या माजी युवराजांचा दावा, 'सुप्रीम लीडर'बद्दल काय म्हणाले?
15
२८ जुलैचा दावा खरा होणार? तिसरे महायुद्ध अटळ? बाबा वेंगा-नास्त्रेदमस यांची मोठी भविष्यवाणी
16
"तमीज से खेलने के चक्कर में..." कडक खेळी शिवाय पंतची 'मन की बात' चर्चेत (VIDEO)
17
राजाच्या पैशानेच बनली त्याच्या मृत्यूची योजना! लग्नाआधीच सुरू केलेलं नवं खातं, सोनमनं तेच पैसे वापरले अन्... 
18
रिषभ पंतला तोड नाय! सेंच्युरीसह रचला इतिहास; स्टेडियम स्टँडमधून गावसकरांचा 'कोलांटी उडी' मार असा इशारा
19
७६ लाख रहस्यमय मतांबाबतच्या याचिकेवर हायकोर्टात सुनावणी पूर्ण; प्रकाश आंबेडकरांनी मांडली बाजू
20
आषाढी वारीत काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ सहभागी होणार; दिवसभर दिंडीसोबत चालणार

जेल ब्रेक रोखण्यासाठी कारागृहात चाय पे चर्चा

By admin | Updated: November 2, 2016 02:23 IST

जेल ब्रेकच्या घटना रोखण्यासाठी राज्यातील सर्व मध्यवर्ती कारागृहात यापुढे मध्यरात्रीनंतर ‘चाय पे चर्चा’ केली जाणार आहे.

राज्यातील सर्व मध्यवर्ती कारागृहात मध्यरात्री होणार प्रयोग : पुनरावृत्ती टळणार का ?नरेश डोंगर नागपूरजेल ब्रेकच्या घटना रोखण्यासाठी राज्यातील सर्व मध्यवर्ती कारागृहात यापुढे मध्यरात्रीनंतर ‘चाय पे चर्चा’ केली जाणार आहे. होय, काहीसा अफलातून वाटत असला तरी हा प्रयोग मध्यरात्रीनंतर होणाऱ्या जेल ब्रेकच्या घटना थांबविण्यासाठी प्रभावी ठरू शकतो, अशी पक्की खात्री राज्य कारागृह प्रशासनाला आहे. भोपाळ जेल ब्रेकने देशभरात खळबळ उडवून दिली आहे. सिमीचे आठ खतरनाक दहशतवादी सोमवारी पहाटे कारागृहातील सुरक्षा रक्षक रमाशंकर सिंग यांची हत्या करून पळून गेले. देशातील सुरक्षित समजल्या जाणाऱ्या कारागृहापैकी एक असलेल्या भोपाळ कारागृहात ही घटना घडल्याने देशभरात खळबळ उडाली आहे. देशाचे हृदयस्थळ असलेल्या नागपूर कारागृहात ३१ मार्च २०१५ ला अशीच एक घटना घडली होती. येथील मध्यवर्ती कारागृहाची सुरक्षा व्यवस्था भेदून पाच खतरनाक कैदी पळून गेले होते. अनेक महिने पोलिसांशी लपंडाव खेळल्यानंतर त्यातील चौघांना गुन्हे शाखेच्या पथकाने जेरबंद करण्यात यश मिळवले. मात्र, नागपुरातील ‘जेल ब्रेक’ने राज्याच्या कारागृह प्रशासनाला जबर हादरा दिला होता. या हादऱ्यातून सावरण्याच्या तयारीत असलेल्या कारागृह प्रशासनाला ‘भोपाळ जेल ब्रेक’च्या घटनेने पुन्हा एकदा धक्का दिला आहे. नागपूर ‘जेल ब्रेक’ची पुन्हा राज्यात कुठेच पुनरावृत्ती होऊ नये म्हणून खबरदारीच्या कोणत्या उपाययोजना करायच्या, त्याबाबत राज्य सरकार, कारागृह प्रशासन आणि सुरक्षा यंत्रणांच्या शीर्षस्थांचे प्रदीर्घ मंथन झाले. त्यानंतर राज्यातील कारागृहांमध्ये सुरक्षेच्या कोणत्या उपाययोजना करायच्या त्यासाठी इस्रायलचे सुरक्षा तज्ज्ञही येऊन गेले. त्यांनी राज्यातील सर्वच मोठ्या कारागृहांची सुरक्षा व्यवस्था तपासली आणि आणखी काय करायचे, त्याबाबतचा सविस्तर अहवालही सरकारला सादर केला. या अहवालानुसार राज्यातील कारागृहांना आत-बाहेर सुरक्षा कवच दिले जाणार आहे. त्याबाबतच्या हालचाली प्रशासकीय पातळीवर सुरू असतानाच ‘भोपाळ जेल ब्रेक’ घडल्याने तातडीने कोणत्या उपाययोजना करायच्या, ते पुन्हा एकदा चर्चेला आले. त्याच पार्श्वभूमीवर, कारागृहात मध्यरात्रीनंतर ‘चाय पे चर्चा’ करायची, असा उपाय समोर आला आहे. ‘जेल ब्रेक’च्या घटना रोखण्यासाठी ‘चाय पे चर्चा’चे समीकरण समजून घेण्याचा प्रयत्न केला असता, एका वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सांगितले. नागपूर, भोपाळ, खंडवा आणि जेथे कुठे जेल ब्रेकच्या घटना घडल्या त्या सर्व पहाटे २ ते ३ नंतरच घडल्या. रात्रपाळीत कर्तव्यावर असलेल्यांना या वेळेत ‘डुलकी’ येते.