शहरं
Join us  
Trending Stories
1
संपूर्ण यादीच आली, सर्वपक्षीय शिष्टमंडळाचे सदस्य ठरले, प्रत्येक टीममध्ये किती अन् कोण नेते?
2
पाकची नवी चाल! भारताच्या ‘डिप्लोमॅटिक स्ट्राइक’ला ‘शांतीदूता’ने उत्तर; जगाला सांगणार काय?
3
"विराट कोहलीला क्रिकेटमधील योगदानासाठी 'भारतरत्न' द्या"; स्टार माजी क्रिकेटपटूने केली मागणी
4
तुम्हीही एकापेक्षा जास्त क्रेडिट कार्ड वापरता? मग फायद्यासोबत हे तोटे माहिती आहे का?
5
कोण आहे पाकिस्तानी अधिकारी, ज्याच्या जाळ्यात अडकली ज्योती?; भारताने देशाबाहेर काढले होते
6
हैदराबादमधील गुलजार हाऊसजवळ भीषण आग, ९ जणांचा होरपळून मृत्यू; अनेक जण गंभीर जखमी
7
Video: "असा धडा शिकवणार, की..."; सैन्यानं जारी केला 'ऑपरेशन सिंदूर'चा आणखी एक व्हिडिओ
8
केरळात मान्सून वाऱ्याच्या वेगाने दाखल होणारा, ढग भरभरून पाऊस देणार
9
करण जोहरच्या 'तख्त' सिनेमाचं पुढे काय झालं? पहिल्यांदाच प्रतिक्रिया देत म्हणाला, "तो सिनेमा..."
10
ज्योती मल्होत्रा पाकिस्तानी ISI अधिकाऱ्यासोबत बालीलाही गेलेली; वडील कारपेंटर, मुलीची लक्झरी लाईफ, नेमके करायची तरी काय...
11
टेरिफ वॉरची खुमखुमी अन् अमेरिकेचा तिळपापड! मूडीजने क्रेडिट रेटिंग घटविताच...
12
२५ लाख दे, नाहीतर मरून जा; पत्नीने दिली धमकी! शिक्षक पतीने उचलले दुर्दैवी पाऊल
13
सुसाइड नोटमध्ये मराठीत सही कशी?; डॉ. वळसंगकर आत्महत्या प्रकरणी वेगळाच संशय
14
"तेव्हा विराट कोहलीने मला लाथ मारली होती अन् म्हणाला होता..."; इशांत शर्माने सगळंच सांगून टाकलं
15
इस्रोचे १०१ वे मिशन अयशस्वी; तांत्रिक अडचणीमुळे रॉकेट तिसऱ्या टप्प्यावरच अडकले
16
भारत-पाकिस्तानमधील युद्धविरामाचा आज अखेरचा दिवस? पुढे काय होणार? भारतीय सेनेनं सांगूनच टाकलं!
17
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना पैसाच पैसा, धनसंचयात यश; पदोन्नती, गुंतवणुकीत मोठा फायदा!
18
बाळासाहेबांवर निष्ठा नसल्याने राऊतांवर पुस्तक काढण्याची वेळ : एकनाथ शिंदे
19
Ashish Ubale: 'गार्गी'चे दिग्दर्शक आशिष उबाळे यांची आत्महत्या, नागपूरमधील रामकृष्ण मठात घेतला गळफास
20
Income Tax Return : 'सहज' आणि 'सुगम' फॉर्म म्हणजे काय? आयटीआर भरण्यापूर्वी जाणून घ्या

मुख्यमंत्र्यांशी चर्चेचे आश्वासन प्रकल्पग्रस्तांचे आंदोलन मागे

By admin | Updated: March 18, 2016 03:12 IST

मुख्यमंत्री आणि एमएडीसीचे अध्यक्ष देवेंद्र फडणवीस आणि उपाध्यक्ष व एमडी विश्वास पाटील यांच्याशी चर्चेच्या लेखी आश्वासनानंतर

कार्यालय दोन दिवस प्रकल्पग्रस्तांच्या ताब्यात : मागण्यांवर तातडीने निर्णय घ्यानागपूर : मुख्यमंत्री आणि एमएडीसीचे अध्यक्ष देवेंद्र फडणवीस आणि उपाध्यक्ष व एमडी विश्वास पाटील यांच्याशी चर्चेच्या लेखी आश्वासनानंतर शिवणगावातील प्रकल्पग्रस्तांनी गुरुवारी रात्री १० वाजता ठिय्या आंदोलन मागे घेतले. महाराष्ट्र विमानतळ विकास कंपनीच्या मुंबई येथील कार्यालयातील वरिष्ठ उपजिल्हाधिकारी जयश्री कटरे यांनी दुपारी नागपूर गाठून प्रकल्पग्रस्तांशी प्रदीर्घ चर्चा केली. १९ मार्चला दुपारी १ वाजता विश्वास पाटील प्रकल्पग्रस्तांशी चर्चा करतील, तर मुख्यमंत्री नागपूर दौऱ्यात पहिली बैठक प्रकल्पग्रस्तांसोबत घेणार असल्याचे लेखी आश्वासन कटरे यांनी दिले. त्यानंतरच जवळपास ५० महिला आणि पुरुषांनी एमएडीसीच्या मध्यवर्ती इमारतीतील मुख्य सल्लागार चहांदे यांच्या ताब्यातील कार्यालय सोडले.प्रकल्पग्रस्तांशी थेट भेटसदर प्रतिनिधीने दुपारी प्रकल्पग्रस्तांची भेट घेतली आणि त्यांच्या व्यथा जाणून घेतल्या. एमएडीसीचे अध्यक्ष मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस असल्यामुळे त्यांनी घेतलेल्या निर्णयाचीच अंमलबजावणी होते. पूर्वीचा अनुभव पाहता यावेळी शासनाच्या फसव्या घोषणांना शेतकरी फसणार नाही. पूर्वी दोन तारखा दिल्यानंतरही मुख्यमंत्र्यांनी प्रकल्पग्रस्तांच्या व्यथा ऐकल्या नाही. यावेळीही हीच स्थिती आहे. शासन आणि पोलिसांच्या दंडुकेशाहीसमोर नमते घेणार नाही, असे मत प्रकल्पग्रस्तांनी व्यक्त केले. आंदोलनकर्त्यांमध्ये सर्वाधिक महिलाआंदोलनकर्त्यांमध्ये ३० पेक्षा जास्त महिला आणि पुरुष आहेत. त्यात ७५ वर्षे वयस्क महिलेचा समावेश आहे. शासनाने आम्हाला देशोधडीला लावल्याचा आरोप या महिलेने केला. आंदोलनकर्त्या महिलांमध्ये प्रामुख्याने कमला गिऱ्हे, मीरा राऊळ, लक्ष्मी ताजने, ताई ठाकरे, शेवंता हिवराळे, नलिनी आंभोरे, पुष्पांजली डवरे, गीता तायवाडे, विजया वैद्य, रेखा डवरे, शोभा आंभोरे, शोभा मानकर, निशा चौधरी, पुष्पा खोब्रागडे, पुष्पा भोयर, सुशीला हिवराळे, प्रमिला इंगोले, चंद्रकला भोयर यांच्यासह रवी गुडधे, रमेश सुरणकर, रंगराव ठाकरे, उमाकांत बोडे यांचा सहभाग होता. पोलिसांची दडपशाहीयापूर्वी हक्कासाठी केलेल्या आंदोलनात पोलिसांनी डोक्यावर लाठ्यांनी प्रहार केल्याचा आम्हाला अनुभव आहे. त्यामुळे यावेळचे आंदोलन अहिंसेने आणि गांधीगिरीने सुरू आहे. पण बुधवारी आंदोलनात पोलिसांनी दडपशाहीचा अवलंब करीत आंदोलन चिरडून टाकण्याचा प्रयत्न केला. महिला पोलिसांनी महिलांना मारहाणीचा प्रयत्न करून कार्यालयातून हुसकावून लावण्याचा प्रयत्न केला, तर पोलीस निरीक्षक जगताप यांनी ‘तुमचे आंदोलन खतम करू’ अशी धमकी दिली. इमारतीबाहेर बसलेल्या प्रकल्पग्रस्तांना पोलिसांनी गाडीत बसवून धमकाविल्याचा आरोप शेतकऱ्यांनी लोकमतशी बोलताना केला. इमारतीच्या मुख्य गेटमधून प्रकल्पग्रस्त कार्यालयात येऊ नये म्हणून गेटवर ३० ते ४० पोलिसांचा ताफा लावला होता. कार्यालयातील वीज बंद केलीमुख्य सल्लागार चहांदे यांच्या कार्यालयात ठिय्या मांडून बसलेल्या प्रकल्पग्रस्तांमध्ये बहुतांश महिला होत्या. त्यानंतरही या इमारतीतील वीज रात्री १०.३० च्या सुमारास जाणीवपूर्वक बंद केली. कार्यालयात काळोख तर रस्त्यावर उजेड होता. शासनाच्या अशा कृतीला आम्ही घाबरणार नाही, अशी प्रतिक्रिया महिलांनी दिली.