शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रवाशांच्या जीवाशी खेळ! वंदे भारतचं जेवण घेताय? अहमदाबाद-मुंबई प्रवासात प्रवाशाच्या ताटात काय आढळलं पाहा
2
होर्मुझचा इतिहास: ज्या जागेसाठी अमेरिका-इराण भिडलेत, तिथले मूळ रहिवासी कोण होते? टोलही होता...
3
सोन्याची किंमत ३३६४ रुपयांनी, तर चांदी ८४०१ रुपयांनी झाली स्वस्त; पटापट चेक करा आजचे लेटेस्ट दर
4
दुसऱ्या पायलटबाबत इराणला माहितीच नव्हती, लीक करणाऱ्याला शोधणार ट्रम्प; रेस्क्यू मोहिमेवर मोठा गौप्यस्फोट
5
कोण आहे ५ कोटींचे बक्षीस असलेला मिसिर बेसरा? ज्याच्या खात्म्यासाठी ३ हजार जवानांचा जंगलाला वेढा
6
३,००० कोटींचे कंत्राट मिळताच डिफेन्स शेअरमध्ये ५%ची उसळी; वर्षात गुंतवणूकदारांना १७७०% परतावा
7
तामिळनाडू, केरळ, आसाम, बंगालमध्ये समीकरणे बदलली, कोण बाजी मारणार? धक्कादायक ओपिनियन पोल
8
Anjali Damania : अजित पवारांच्या अपघातादिवशी भोंदू खरातच्या मोबाईलवर १९ मेसेज; अंजली दमानिया यांचा दावा
9
१ घर, एक कर्मचारी अन् AI ची जादू; १८ लाख गुंतवून तब्बल २८ कोटींची कमाई करतोय 'हा' युवक
10
नव्या कामगार कायद्यानं ग्रॅच्युईटी वाढणार; काय आहे नवा फॉर्म्युला, कोणावर किती होणार परिणाम?
11
"किडनी दे, नाहीतर ३० लाख आण!"; थार गाडी अन् ८ लाख देऊनही छळ; लग्नानंतर उघड झालं पतीचं भयानक गुपित!
12
मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! एअर इंडियाचा प्रवास महागला; प्रवाशांच्या खिशाला कात्री...
13
इस्रायलचे पहिले टार्गेट ठरले! इराणच्या रेल्वे उडविणार, नागरिकांना रेल्वेमार्गांपासून दूर राहण्याचा इशारा...
14
किंमती गगनाला भिडल्या तरीही पायलटनं कोट्यवधीचं तेल समुद्रात ओतले; कारण ऐकून कराल कौतुक
15
सर्व नागरिकांनी ऊर्जा प्रकल्पांना घेराव घाला...! ट्रम्प यांच्या धमकीवर इराणची नवी चाल, वाटाघाटी नाजूक वळणावर...
16
दिल्ली विधानसभेत का घुसवली कार? पोलिसांच्या चौकशीत सरबजीतने केला धक्कादायक खुलासा! म्हणाला..
17
मरीन ड्राइव्ह अपघात निष्काळजीपणामुळेच, सदोष मनुष्यवधाचा गुन्हा वगळला: उच्च न्यायालय
18
भारतातील राजदूताला व्हाईट हाऊसमध्ये स्पेशल आमंत्रण; इराणची डेडलाइन तेव्हाच संपणार, योगायोग की...
19
Bonus Share News: पहिल्यांदाच मिळणार बोनस शेअर्सचं गिफ्ट; मिळणार ५ शेअर्स, २८५९% वाढलाय शेअर
20
Health Tips: कंबर, मान आणि खांदे दुखीने हैराण? उशीचा 'असा' वापर करा, वेदनांपासून कायमची सुटका मिळवा!
Daily Top 2Weekly Top 5

‘समता वर्ष’ व बौद्धांच्या प्रश्नावर चर्चा व्हावी

By admin | Updated: September 6, 2015 02:52 IST

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची १२५ वी जयंती ही समता व न्याय वर्ष म्हणून साजरी करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

संविधान फाऊंडेशन : ई. झेड. खोब्रागडे यांचे मुख्यमंत्र्यांना निवेदन नागपूर : डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची १२५ वी जयंती ही समता व न्याय वर्ष म्हणून साजरी करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. तेव्हा जयंती साजरी करीत असतांना आवश्यक योजना व कार्यक्रमांची अंमलबजावणी आणि अनुसूचित जाती व बौद्धांच्या शैक्षणिक, सामाजिक, आर्थिक प्रश्नांवर चर्चा करण्यासंदर्भात बैठक आयोजित करण्यात यावी, अशी मागणी संविधान फाऊंडेशनतचे संस्थापक माजी सनदी अधिकारी ई. झेड. खोब्रागडे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना एका निवेदनाद्वारे केली आहे. मुख्यमंत्र्यांना पाठविलेल्या निवेदनात म्हटले आहे की, डॉ. बाबासाहेब आंबेडकरांची १२५ वी जयंती साजरी करीत असतांना आवश्यक योजना व कार्यक्रमांची अंमलबजावणी केली तरच अनुसूचित जाती व बौद्धांच्या कल्याणकारी योजनांचा व विकास कार्यक्रमांचा लाभ मिळण्यास मदत मिळेल. राज्य शासनाने १२५ वी जयंती साजरी करण्यासाठी १२५ कोटी रुपयांच्या बजेटला मंजुरी व काही योजना, कार्यक्रम मान्य केल्याची माहिती आहे. १२५ कोटीचे बजेट हे सामाजिक न्याय विभागाकडील अनुसूचित जाती उपयोजनेमधून खर्च करण्यात येऊ नये. सर्वसाधारण बजेटमधून हा निधी उपलब्ध व्हावा. १२५ व्या जयंतीच्या कार्यक्रमाचे आयोजन, समन्वय व संनियंत्रण राज्य शासनाच्या सामान्य प्रशासन विभागामार्फत करण्यात यावे. जिल्हा व विभागीय स्तरावर कार्यक्रम अंमलबजावणीसाठी अनुक्रमे जिल्हाधिकारी, विभागीय आयुक्त यांच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन व्हावी. सामान्य प्रशासन विभागाचे प्रधान सचिव यांनी संनियंत्रण करावे. जयंतीचा कार्यक्रम हा केवळ सामाजिक न्याय विभागाचा होऊ नये व त्यांच्यापुरताच सीमित राहू नये. या वर्षात सामान्य प्रशासन विभागाने २४ नोव्हेंबर २००८, ४ फेब्रुवारी २०१३ व २१आॅक्टोबर १९८८ च्या शासन निर्णयानुसार भारतीय संविधानाच्या जागृतीचे अभियानसुद्धा राबवावे. तेव्हा या सर्व कार्यक्रमांबाबत सविस्तर चर्चा करण्यासाठी आपण बैठक आयोजित करावी, अशी विनंती ई. झेड. खोब्रागडे यांनी मुख्यमंत्र्यांना निवेदनाद्वारे केली आहे.(प्रतिनिधी)‘संविधान दिवस’ देशभर साजरा होणारसंविधान फाऊंडेशनतर्फे देशाच्या पंतप्रधानांकडे जून २०१४ पासून संविधान दिवस साजरा करण्याबाबत पाठपुरावा करण्यात येत आहे. परिणामत: या वर्षापासून भारतभर २६ नोव्हेंबर हा दिवस संविधान दिवस म्हणून साजरा होणार असल्याचा निर्णय घेण्यात आल्याची माहिती आहे. या दिवशी देशभरातील शाळा, महाविद्यालये व कार्यालयातून संविधानाच्या प्रास्ताविकेचे वाचन होणार असून संविधान जागृतीचे विविध कार्यक्रम देशपातळीवर राबविले जाणार आहेत. हा ऐतिहासिक निर्णय लक्षात घेता महाराष्ट्र सरकारने राज्यातील सर्व कार्यालयात, सर्व शाळा, महाविद्यालयांमध्ये, ग्रामपंचायतीपासून तर मंत्रालयात संविधानाच्या प्रास्ताविका दर्शनी भागात लावण्याचे आदेश काढावेत व संविधान जागृतीचे अभियान २६ नोव्हेंबरपासून २६ जानेवारीपर्यंत राबवावे, अशी विनंतीसुद्धा या पत्राद्वारे करण्यात आली आहे.