शहरं
Join us  
Trending Stories
1
या सुंदर प्रदेशावर हिंसाचाराची सावली पडलेली; पंतप्रधान नरेंद्र मोदी मणिपूरमध्ये, म्हणाले...
2
Aishanya Dwivedi : Video - "BCCI पहलगाम हल्ला, ऑपरेशन सिंदूर विसरलं; आपण पाकिस्तानला ही संधी का देतोय?"
3
यामाहाची FZ किती रुपयांनी स्वस्त झाली? जुना काळ आठवला..., फसिनो, आर१५ वर किती जीएसटी कमी झाला...
4
१० टक्के पगारवाढ, लॉयल्टी बोनस अन् समायोजन...! एनएचएम कर्मचाऱ्यांचा बेमुदत संप अखेर मागे
5
जगातला 'असा' एकमेव देश, जिथे घरात पाळल्या जातात मगरी; विकून होते कोटी रुपयांची कमाई!
6
Sade Sati Upay: एकच रास, तरी साडेसातीचा काळ प्रत्येकाचा वेगळा; ३ महिन्यापूर्वी लागते चाहूल!
7
GST कपातीनंतर 4 लाखांपेक्षाही स्वस्तात मिळतेय ही मारुती SUV; देते 34 km पर्यंत मायलेज; बघा, व्हेरिअँट निहाय सूट...
8
अर्शद वारसी नव्हे, तर 'जॉली एलएलबी'साठी या मराठमोळ्या अभिनेत्याला होती पहिली पसंती, आता होतोय त्याला पश्चाताप
9
"आदित्य ठाकरे बुरख्यात लपून भारत-पाकिस्तान मॅच पाहतील"; मंत्री नितेश राणेंची बोचरी टीका
10
'या' देशाने मंत्रिमंडळात आणला AI मंत्री ! राजकारणाच्या इतिहासात पहिल्यांदाच असा प्रयोग
11
"देशापेक्षा व्यापार मोठा, भारत-पाक सामन्यातून कमवायचाय पैसा"; उद्धव ठाकरेंचा भाजपावर हल्लाबोल
12
वर्गमित्रांचा प्रताप! झोपेत असताना डोळ्यात टाकलं फेविक्विक; ८ विद्यार्थ्यांचे चिकटले डोळे अन्...
13
शुबमन गिलच्या फोटोपेक्षा हातातल्या घड्याळ्याची रंगली चर्चा, किंमत ऐकाल तर अवाक् व्हाल...
14
पत्नीला ५ गोळ्या घातल्या, क्राइम सीनवरून फेसबुक लाईव्ह केलं; पती म्हणाला, "हिचे बॉयफ्रेंड पळून गेले..." 
15
क्रूरतेचा कळस! मिठाई ताजी नाही हे ऐकताच दुकानदार संतापला; १० वर्षांच्या मुलाला बेदम मारहाण
16
पितृपक्ष २०२५: पितृपक्षात जन्मलेल्या बाळांचे भविष्य कसे असते? शुभ की? ज्योतिष शास्त्राने केला उलगडा!
17
४०००० कोटींचे उत्पन्न, ७० लाख नोकऱ्या; नितीन गडकरींनी दिला कमाईचा नवा मंत्र, कुणाला फायदा?
18
उमेश सहकलाकार नसता तर मी हा सिनेमा केला नसता, प्रिया बापटने सांगितलं कारण
19
२, ३, ४BHK घर बांधायचेय? जीएसटीचा किती फायदा होणार? सिमेंट, सळ्या, टाईल्स कितीने स्वस्त झाल्या
20
गर्लफ्रेंडने ब्लॉक केलं, प्रेमभंग जीवावर बेतला, तरुणाने उचलले टोकाचे पाऊल; उपचारादरम्यान मृत्यू

‘समता वर्ष’ व बौद्धांच्या प्रश्नावर चर्चा व्हावी

By admin | Updated: September 6, 2015 02:52 IST

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची १२५ वी जयंती ही समता व न्याय वर्ष म्हणून साजरी करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

संविधान फाऊंडेशन : ई. झेड. खोब्रागडे यांचे मुख्यमंत्र्यांना निवेदन नागपूर : डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची १२५ वी जयंती ही समता व न्याय वर्ष म्हणून साजरी करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. तेव्हा जयंती साजरी करीत असतांना आवश्यक योजना व कार्यक्रमांची अंमलबजावणी आणि अनुसूचित जाती व बौद्धांच्या शैक्षणिक, सामाजिक, आर्थिक प्रश्नांवर चर्चा करण्यासंदर्भात बैठक आयोजित करण्यात यावी, अशी मागणी संविधान फाऊंडेशनतचे संस्थापक माजी सनदी अधिकारी ई. झेड. खोब्रागडे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना एका निवेदनाद्वारे केली आहे. मुख्यमंत्र्यांना पाठविलेल्या निवेदनात म्हटले आहे की, डॉ. बाबासाहेब आंबेडकरांची १२५ वी जयंती साजरी करीत असतांना आवश्यक योजना व कार्यक्रमांची अंमलबजावणी केली तरच अनुसूचित जाती व बौद्धांच्या कल्याणकारी योजनांचा व विकास कार्यक्रमांचा लाभ मिळण्यास मदत मिळेल. राज्य शासनाने १२५ वी जयंती साजरी करण्यासाठी १२५ कोटी रुपयांच्या बजेटला मंजुरी व काही योजना, कार्यक्रम मान्य केल्याची माहिती आहे. १२५ कोटीचे बजेट हे सामाजिक न्याय विभागाकडील अनुसूचित जाती उपयोजनेमधून खर्च करण्यात येऊ नये. सर्वसाधारण बजेटमधून हा निधी उपलब्ध व्हावा. १२५ व्या जयंतीच्या कार्यक्रमाचे आयोजन, समन्वय व संनियंत्रण राज्य शासनाच्या सामान्य प्रशासन विभागामार्फत करण्यात यावे. जिल्हा व विभागीय स्तरावर कार्यक्रम अंमलबजावणीसाठी अनुक्रमे जिल्हाधिकारी, विभागीय आयुक्त यांच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन व्हावी. सामान्य प्रशासन विभागाचे प्रधान सचिव यांनी संनियंत्रण करावे. जयंतीचा कार्यक्रम हा केवळ सामाजिक न्याय विभागाचा होऊ नये व त्यांच्यापुरताच सीमित राहू नये. या वर्षात सामान्य प्रशासन विभागाने २४ नोव्हेंबर २००८, ४ फेब्रुवारी २०१३ व २१आॅक्टोबर १९८८ च्या शासन निर्णयानुसार भारतीय संविधानाच्या जागृतीचे अभियानसुद्धा राबवावे. तेव्हा या सर्व कार्यक्रमांबाबत सविस्तर चर्चा करण्यासाठी आपण बैठक आयोजित करावी, अशी विनंती ई. झेड. खोब्रागडे यांनी मुख्यमंत्र्यांना निवेदनाद्वारे केली आहे.(प्रतिनिधी)‘संविधान दिवस’ देशभर साजरा होणारसंविधान फाऊंडेशनतर्फे देशाच्या पंतप्रधानांकडे जून २०१४ पासून संविधान दिवस साजरा करण्याबाबत पाठपुरावा करण्यात येत आहे. परिणामत: या वर्षापासून भारतभर २६ नोव्हेंबर हा दिवस संविधान दिवस म्हणून साजरा होणार असल्याचा निर्णय घेण्यात आल्याची माहिती आहे. या दिवशी देशभरातील शाळा, महाविद्यालये व कार्यालयातून संविधानाच्या प्रास्ताविकेचे वाचन होणार असून संविधान जागृतीचे विविध कार्यक्रम देशपातळीवर राबविले जाणार आहेत. हा ऐतिहासिक निर्णय लक्षात घेता महाराष्ट्र सरकारने राज्यातील सर्व कार्यालयात, सर्व शाळा, महाविद्यालयांमध्ये, ग्रामपंचायतीपासून तर मंत्रालयात संविधानाच्या प्रास्ताविका दर्शनी भागात लावण्याचे आदेश काढावेत व संविधान जागृतीचे अभियान २६ नोव्हेंबरपासून २६ जानेवारीपर्यंत राबवावे, अशी विनंतीसुद्धा या पत्राद्वारे करण्यात आली आहे.