शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी घडामोड, रशियाकडून युद्धविरामाची घोषणा; २ दिवस युक्रेन हल्ले नाही, अचानक नेमके काय घडले?
2
“शशिकांत शिंदे हे मूळचे शिवसैनिक, शिवसेनेत आल्यास पहिले स्वागत मी करेन”; कुणी दिली ऑफर?
3
आजचे राशीभविष्य, १० एप्रिल २०२६: कोणताही महत्त्वाचा निर्णय घेणे टाळा; प्रवास संभवतो
4
शेअर बाजाराची दमदार सुरुवात, Sensex ५०० अंकांनी वधारला; Bank Nifty मध्ये ७०० अंकांची जोरदार तेजी, मात्र IT Stocks मध्ये विक्री
5
STचा सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा; मोफत प्रवास पाससोबत डिजिटल NCMC प्रणालीची जोड
6
TCS Salary Hike 2026: टीसीएस जवळपास ६ लाख कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! सॅलरी वाढीवर आली मोठी अपडेट, जाणून घ्या
7
विशेष लेख: बारामती पोटनिवडणुकीत काँग्रेसने माघार घेतली तर आधी अट्टाहास का केला?
8
‘घोस्ट मर्मर’! ६४ किमीवरून ओळखली धडधड.. अमेरिकेच्या इतिहासातील सर्वांत धाडसी शोध
9
मध्यस्थीच्या नादात पाकिस्तान तोंडघशी! मध्यस्थी करताना निष्पक्ष राहा म्हणत इस्रायलने सुनावले खडेबोल
10
“हे सगळे लगेचच थांबवा, आमचा करार...”; होर्मुझवर टोल आकारणीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
11
अग्रलेख: कुंभमेळा श्रद्धेचा, संघर्षाचा नव्हे! ‘नवे नाशिक’ उभे राहताना ‘आपले नाशिक’ हरवतंय..?
12
फोन ४०% महागले, किंमत आणखी वाढणार? विक्रीत १० टक्क्यांपर्यंत घट होण्याची शक्यता
13
न्यू इंडिया बँक १२२ कोटींचा घाेटाळा: माजी महाव्यवस्थापक हितेश मेहता यांना जामीन नाकारला
14
भारतात मुलांच्या मृत्यूचे १० वे कारण ठरतोय ‘कॅन्सर’; वर्षभरात १७ हजार बालकांचा मृत्यू
15
पुढील ४ आठवडे उन्हाच्या झळा; पूर्वेकडील वाऱ्यांचा प्रभाव, पारा चाळिशी पार जाण्याचा अंदाज
16
केवळ घर नव्हे, उद्योगही चालवणार! महिलांकडील कर्ज ७६ लाख कोटींवर, २०१७पेक्षा पाचपट वाढ
17
सुरुंग पेरलेला होर्मुझचा नकाशा जारी; इराणने पुन्हा भरवली जगाला धडकी; अमेरिकेवर दबाव
18
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
19
पंथ, संप्रदायांच्या आधारे मंदिरांमध्ये प्रवेश दिल्यास हिंदू धर्मावर नकारात्मक परिणाम: सुप्रीम कोर्ट
20
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
Daily Top 2Weekly Top 5

खुलाशांनी संमेलन स्थळाच्या वादावर पडदा!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 9, 2021 04:07 IST

- कौतिकरावांच्या दिलगिरीमुळे मनभेद चव्हाट्यावर लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : गेल्या सात-आठ दिवसांपासून सुरू असलेल्या ९४व्या अ. भा. मराठी ...

- कौतिकरावांच्या दिलगिरीमुळे मनभेद चव्हाट्यावर

लोकमत न्यूज नेटवर्क

नागपूर : गेल्या सात-आठ दिवसांपासून सुरू असलेल्या ९४व्या अ. भा. मराठी साहित्य संमेलनाच्या स्थळाच्या वादावर पडदा टाकण्याचे प्रयत्न दोन्ही गटाकडून प्रसारित करण्यात आलेल्या खुलाशांवरून झाले आहे. मात्र, अ.भा. मराठी साहित्य महामंडळाचे अध्यक्ष कौतिकराव पाटील यांनी व्यक्त केलेल्या ‘दिलगिरी’वरून या दोन्ही गटात वाढलेले मनभेद चव्हाट्यावर आले आहेत.

महामंडळाने आधीच स्पष्ट केलेल्या निर्देशावरून ७ जानेवारीला संमेलनस्थळ म्हणून नाशिकची पाहणी केल्यानंतर शुक्रवारी नाशिकलाच मार्च अखेरीस संमेलन होणार असे जाहीर केले. नाशिकलाच संमेलन होणार, हे कौतिकराव ठाले-पाटील यांच्या एकूणच धोरणावरून आधीपासूनच स्पष्ट होते. गुरुवारी केवळ त्यावर अधिकृत शिक्कामोर्तब करण्यात आले. मात्र, संमेलन स्थळावरून निर्माण झालेल्या नाशिक विरुद्ध दिल्ली वादावर पडदा टाकणारा खुलासा जाहीर करताना कौतिकराव पाटील यांनी मोदी व गडकरी यांच्यासंदर्भात जो ‘दिलगिरी’ हा शब्द वापरला आहे, त्यावर सरहद संस्थेचे अविनाश चोरडिया व डॉ. अमोल देवळेकर यांनी आक्षेप घेतला आहे. महामंडळ अध्यक्षांनी सरहद संस्थेबद्दल जो अविश्वास व्यक्त केला आणि संस्थेच्या धोरणावर प्रश्नचिन्ह निर्माण करून आपलेच बोललेले शब्द फिरवले, याबद्दलही दिलगिरी व्यक्त करणे अपेक्षित होते, अशी भावना देवळेकर व चोरडिया यांनी आपल्या खुलाशावरून व्यक्त केले. ‘आमच्या सरळ, स्पष्ट व सद्हेतूबद्दल शंका घेण्याचा सन्माननीय ठाले पाटील यांचा हा प्रकार मात्र खचितच ‘कौतुकास्पद’नाही, असे आम्हाला खेदाने नमूद करावे लागत आहे’ अशा एका वाक्यात कौतिकराव ठाले-पाटील यांच्याबाबत नाराजी व्यक्त केली गेली आहे.

दिल्लीकरांसाठी विशेष संमेलन दिले होते. मात्र, पुण्यातील सरहदचे निमंत्रक संजय नहार यांनी महामंडळाचा प्रस्ताव नाकारला आणि दिल्लीकरांची विशेष अ.भा. मराठी साहित्य संमेलनाची संधी हुकवली.

- कौतिकराव पाटील, अध्यक्ष - अ.भा. मराठी साहित्य महामंडळ

नाशिक हे स्थळ आधीपासूनच निश्चित हाेते, हे आता स्पष्ट झाले आहे. स्थळाची घोषणा होताच आमच्या लेखी हा वाद संपला आहे. मात्र, इतिहासात या घटनाक्रमाचे मूल्यांकन होईल, तेव्हा कोण खरे नि कोण खोटे हे स्पष्ट होईल. ठाले-पाटील वारंवार दिल्लीला विशेष संमेलन दिले पण सरहदनेच नाकारले, असे सांगतात. मात्र, महामंडळाने आम्हाला त्याबाबत कधीच लेखी पत्र का दिले नाही, हे स्पष्ट नाही.

- संजय नहार, संस्थापक, सरहद

.........