शहरं
Join us  
Trending Stories
1
निवडून आलेल्याला २ कोटी मात्र आमदार नसतानाही मला २० कोटी मिळतात; सदा सरवणकरांचं वादग्रस्त विधान
2
पंतप्रधान मोदी आज देशवासियांना संबोधित करणार; पाच वाजता कोणत्या विषयावर बोलणार?
3
हुंड्यासाठी सुनेला मारहाण, खोलीत कोंडून विषारी साप सोडला; सासरच्यांनी गाठला क्रूरतेचा कळस
4
स्वप्नातील एसयूव्ही खरेदीची संधी! महिंद्रा स्कॉर्पिओ झाली ₹२.१५ लाखांनी स्वस्त; जाणून घ्या नवीन किंमत
5
Nagpur Crime: घरातून बाहेर पडला अन् कारमध्ये मिळाला व्यावसायिकाचा मृतदेह; मृत्यू की हत्या?
6
युद्ध युरोपच्या दाराशी! रशियन ड्रोनची नाटो देशांच्या हद्दीत घुसखोरी, तिसऱ्या महायुद्धाचा धोका वाढला?
7
नवरात्रीपासून GST चे नवे दर लागू होणार; कोणी टाळाटाळ केल्यास 'इथे' करा तक्रार; हेल्पलाइन नंबर जारी
8
नेपाळचे जेन-झी माजी पंतप्रधान ओलींचा पिच्छा सोडेनात! आता केली 'अशी' मागणी, म्हणाले...
9
पंतप्रधान नरेंद्र मोदींशी पहिली भेट कधी झाली? अमित शाहांनी सांगितला सगळा किस्सा
10
'बगराम हवाई तळ परत करा, अन्यथा परिणाम खूप वाईट होतील'; डोनाल्ड ट्रम्प यांची अफगाणिस्तानला धमकी
11
पत्नीचा 'तो' नातेवाईक पाहून संताप अनावर झाला; चिडलेल्या पतीने चाकूने वार केला! थराराने परिसर हादरला
12
H-1B व्हिसासाठी ८८ लाख रुपये फक्त 'या' लोकांनाच भरावे लागणार; व्हाइट हाउसचे स्पष्टीकरण
13
Poonam Pandey: रामायणात पूनम पांडे रावणाच्या पत्नीच्या भूमिकेत, रामलीला कमिटी म्हणते- "तिला सुधरायचं आहे..."
14
पगार फक्त ५३,०००, तरी ९ वर्षांत झाला करोडपती! कॉर्पोरेट कर्मचाऱ्याने सांगितलं गुंतवणुकीचं गुपित
15
इतर देशांवर अवलंबित्व हाच आपला खरा शत्रू; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिली स्वयंपूर्णतेची हाक
16
आजचे राशीभविष्य, २१ सप्टेंबर २०२५: आर्थिक निर्णय टाळा, भावनेच्या भरात मोठी चूक होण्याची शक्यता
17
एच-१ बी कर्मचाऱ्यांनो तातडीने अमेरिकेत परत या, अन्यथा मार्ग बंद; भारतीय आयटी कंपन्यांची धावपळ
18
नवरात्रीच्या मराठी शुभेच्छा, Messages,Images, Whatsapp Status ला शेअर करुन करूया जागर शक्तीचा!
19
डोनाल्ड ट्रम्प यांच्या निर्णयानं आता अमेरिकेत नोकरी करणे महाग; भारतीयांना बसणार फटका
20
युरोपातील विमानतळांवर सायबर हल्ला; उड्डाणे विस्कळीत, वेळापत्रकावर परिणाम

खुलाशांनी संमेलन स्थळाच्या वादावर पडदा!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 9, 2021 04:07 IST

- कौतिकरावांच्या दिलगिरीमुळे मनभेद चव्हाट्यावर लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : गेल्या सात-आठ दिवसांपासून सुरू असलेल्या ९४व्या अ. भा. मराठी ...

- कौतिकरावांच्या दिलगिरीमुळे मनभेद चव्हाट्यावर

लोकमत न्यूज नेटवर्क

नागपूर : गेल्या सात-आठ दिवसांपासून सुरू असलेल्या ९४व्या अ. भा. मराठी साहित्य संमेलनाच्या स्थळाच्या वादावर पडदा टाकण्याचे प्रयत्न दोन्ही गटाकडून प्रसारित करण्यात आलेल्या खुलाशांवरून झाले आहे. मात्र, अ.भा. मराठी साहित्य महामंडळाचे अध्यक्ष कौतिकराव पाटील यांनी व्यक्त केलेल्या ‘दिलगिरी’वरून या दोन्ही गटात वाढलेले मनभेद चव्हाट्यावर आले आहेत.

महामंडळाने आधीच स्पष्ट केलेल्या निर्देशावरून ७ जानेवारीला संमेलनस्थळ म्हणून नाशिकची पाहणी केल्यानंतर शुक्रवारी नाशिकलाच मार्च अखेरीस संमेलन होणार असे जाहीर केले. नाशिकलाच संमेलन होणार, हे कौतिकराव ठाले-पाटील यांच्या एकूणच धोरणावरून आधीपासूनच स्पष्ट होते. गुरुवारी केवळ त्यावर अधिकृत शिक्कामोर्तब करण्यात आले. मात्र, संमेलन स्थळावरून निर्माण झालेल्या नाशिक विरुद्ध दिल्ली वादावर पडदा टाकणारा खुलासा जाहीर करताना कौतिकराव पाटील यांनी मोदी व गडकरी यांच्यासंदर्भात जो ‘दिलगिरी’ हा शब्द वापरला आहे, त्यावर सरहद संस्थेचे अविनाश चोरडिया व डॉ. अमोल देवळेकर यांनी आक्षेप घेतला आहे. महामंडळ अध्यक्षांनी सरहद संस्थेबद्दल जो अविश्वास व्यक्त केला आणि संस्थेच्या धोरणावर प्रश्नचिन्ह निर्माण करून आपलेच बोललेले शब्द फिरवले, याबद्दलही दिलगिरी व्यक्त करणे अपेक्षित होते, अशी भावना देवळेकर व चोरडिया यांनी आपल्या खुलाशावरून व्यक्त केले. ‘आमच्या सरळ, स्पष्ट व सद्हेतूबद्दल शंका घेण्याचा सन्माननीय ठाले पाटील यांचा हा प्रकार मात्र खचितच ‘कौतुकास्पद’नाही, असे आम्हाला खेदाने नमूद करावे लागत आहे’ अशा एका वाक्यात कौतिकराव ठाले-पाटील यांच्याबाबत नाराजी व्यक्त केली गेली आहे.

दिल्लीकरांसाठी विशेष संमेलन दिले होते. मात्र, पुण्यातील सरहदचे निमंत्रक संजय नहार यांनी महामंडळाचा प्रस्ताव नाकारला आणि दिल्लीकरांची विशेष अ.भा. मराठी साहित्य संमेलनाची संधी हुकवली.

- कौतिकराव पाटील, अध्यक्ष - अ.भा. मराठी साहित्य महामंडळ

नाशिक हे स्थळ आधीपासूनच निश्चित हाेते, हे आता स्पष्ट झाले आहे. स्थळाची घोषणा होताच आमच्या लेखी हा वाद संपला आहे. मात्र, इतिहासात या घटनाक्रमाचे मूल्यांकन होईल, तेव्हा कोण खरे नि कोण खोटे हे स्पष्ट होईल. ठाले-पाटील वारंवार दिल्लीला विशेष संमेलन दिले पण सरहदनेच नाकारले, असे सांगतात. मात्र, महामंडळाने आम्हाला त्याबाबत कधीच लेखी पत्र का दिले नाही, हे स्पष्ट नाही.

- संजय नहार, संस्थापक, सरहद

.........