शहरं
Join us  
Trending Stories
1
"चीनने भारताची जमीन बळकावली हे तुम्हाला कसं कळलं? तुम्ही खरे भारतीय असता तर…’’, सुप्रीम कोर्टाचे राहुल गांधींना खडे बोल  
2
बीएसएनएलने आणला १ रुपयांत फ्रिडम प्लॅन! ३० दिवस डेटा, कॉलिंग अन्... मोफत...
3
“सप्टेंबरमध्ये देशात मोठ्या राजकीय घडामोडी”; संजय राऊतांचे भाकित, म्हणाले, “RSS बैठकीत...”
4
'तो' खेळणार नाही असं इंग्लंडनेच सांगितलं होतं, पण आता बॅटिंग करणार; असं कसं? ICC नियमांत बसतं?
5
पाणी पाकिस्तानची पाठ सोडेना! उन्हाळ्यात पाणी प्यायला मिळेना, पावसाळ्यात महापूर
6
"मी स्किन व्हाइटनिंग सर्जरी केलेली नाही तर...", काजोलने सांगितलेलं तिच्या फेअरनेसचं रहस्य
7
"२० वर्षांनी आम्ही भाऊ एकत्र येऊ शकतो, मग..."; मनसे मेळाव्यात राज ठाकरेंचा कार्यकर्त्यांना कानमंत्र
8
Video - बँड-बाजा अन् शेवटचा निरोप! गाव रडलं पण 'तो' मित्राच्या अंत्ययात्रेत आनंदाने नाचला, कारण...
9
Lunchbox Recipe: परवलाचं चमचमीत भरीतही होऊ शकतं, कधी ट्राय केलंय का? पहा सोप्पी रेसिपी
10
रेपो दराच्या बैठकीपूर्वी सोन्या-चांदीच्या दरात वाढ, तुमच्या शहरात २४ कॅरेट सोन्याचा भाव काय?
11
१० हजारांत भारतीय थायलंडमध्ये काय काय करू शकतात? भारताच्या रुपयाची 'बाथ'मध्ये किती किंमत?
12
"माझ्या नादी लागू नका, पुराव्यासह फाईल्स उघडू..."; भाजपात प्रवेश करताच शिंदेसेनेच्या नेत्याला इशारा
13
"मुंबईत जो येईल त्याचं स्वागत करू..."; निशिकांत दुबेंबाबत देवेंद्र फडणवीस काय म्हणाले?
14
रॉयल एनफिल्डने चीनचे रेअर अर्थ मटेरिअल टाळले! नवीन धातू वापरला, ऑटो कंपन्या चकीत झाल्या...
15
काहीही करा, ‘हम नही सुधरेंगे’; CM देवेंद्र फडणवीसांचा क्लास वाया, वादग्रस्त विधाने सुरूच!
16
AI घेणार तुमच्या नोकरीची जागा? गुंतवणूकदार विनोद खोसला यांचा इशारा, म्हणाले यातून वाचायचं असेल तर..
17
‘झुकेगा नही’! ट्रम्प यांची धमकी, पण सरकार ठाम; अमेरिकेला भारताचं स्वतंत्र धोरण का खुपतंय?
18
मराठी अभिनेत्याचं साउथ इंडस्ट्रीत काम करण्याचं होतं स्वप्न, लॉकडाऊननंतर हैदराबाद गाठलं अन्...
19
चहा करताना 'ही' छोटीशी चूक कराल तर आयुष्याला मुकाल, योग्य पद्धत कोणती एकदा बघाच
20
ऑपरेशन महादेवमध्ये मारले गेलेले सगळे दहशतवादी पाकिस्तानीच! 'त्या' एका पुराव्याने समोर आली कुंडली

खुलाशांनी संमेलन स्थळाच्या वादावर पडदा!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 9, 2021 04:07 IST

- कौतिकरावांच्या दिलगिरीमुळे मनभेद चव्हाट्यावर लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : गेल्या सात-आठ दिवसांपासून सुरू असलेल्या ९४व्या अ. भा. मराठी ...

- कौतिकरावांच्या दिलगिरीमुळे मनभेद चव्हाट्यावर

लोकमत न्यूज नेटवर्क

नागपूर : गेल्या सात-आठ दिवसांपासून सुरू असलेल्या ९४व्या अ. भा. मराठी साहित्य संमेलनाच्या स्थळाच्या वादावर पडदा टाकण्याचे प्रयत्न दोन्ही गटाकडून प्रसारित करण्यात आलेल्या खुलाशांवरून झाले आहे. मात्र, अ.भा. मराठी साहित्य महामंडळाचे अध्यक्ष कौतिकराव पाटील यांनी व्यक्त केलेल्या ‘दिलगिरी’वरून या दोन्ही गटात वाढलेले मनभेद चव्हाट्यावर आले आहेत.

महामंडळाने आधीच स्पष्ट केलेल्या निर्देशावरून ७ जानेवारीला संमेलनस्थळ म्हणून नाशिकची पाहणी केल्यानंतर शुक्रवारी नाशिकलाच मार्च अखेरीस संमेलन होणार असे जाहीर केले. नाशिकलाच संमेलन होणार, हे कौतिकराव ठाले-पाटील यांच्या एकूणच धोरणावरून आधीपासूनच स्पष्ट होते. गुरुवारी केवळ त्यावर अधिकृत शिक्कामोर्तब करण्यात आले. मात्र, संमेलन स्थळावरून निर्माण झालेल्या नाशिक विरुद्ध दिल्ली वादावर पडदा टाकणारा खुलासा जाहीर करताना कौतिकराव पाटील यांनी मोदी व गडकरी यांच्यासंदर्भात जो ‘दिलगिरी’ हा शब्द वापरला आहे, त्यावर सरहद संस्थेचे अविनाश चोरडिया व डॉ. अमोल देवळेकर यांनी आक्षेप घेतला आहे. महामंडळ अध्यक्षांनी सरहद संस्थेबद्दल जो अविश्वास व्यक्त केला आणि संस्थेच्या धोरणावर प्रश्नचिन्ह निर्माण करून आपलेच बोललेले शब्द फिरवले, याबद्दलही दिलगिरी व्यक्त करणे अपेक्षित होते, अशी भावना देवळेकर व चोरडिया यांनी आपल्या खुलाशावरून व्यक्त केले. ‘आमच्या सरळ, स्पष्ट व सद्हेतूबद्दल शंका घेण्याचा सन्माननीय ठाले पाटील यांचा हा प्रकार मात्र खचितच ‘कौतुकास्पद’नाही, असे आम्हाला खेदाने नमूद करावे लागत आहे’ अशा एका वाक्यात कौतिकराव ठाले-पाटील यांच्याबाबत नाराजी व्यक्त केली गेली आहे.

दिल्लीकरांसाठी विशेष संमेलन दिले होते. मात्र, पुण्यातील सरहदचे निमंत्रक संजय नहार यांनी महामंडळाचा प्रस्ताव नाकारला आणि दिल्लीकरांची विशेष अ.भा. मराठी साहित्य संमेलनाची संधी हुकवली.

- कौतिकराव पाटील, अध्यक्ष - अ.भा. मराठी साहित्य महामंडळ

नाशिक हे स्थळ आधीपासूनच निश्चित हाेते, हे आता स्पष्ट झाले आहे. स्थळाची घोषणा होताच आमच्या लेखी हा वाद संपला आहे. मात्र, इतिहासात या घटनाक्रमाचे मूल्यांकन होईल, तेव्हा कोण खरे नि कोण खोटे हे स्पष्ट होईल. ठाले-पाटील वारंवार दिल्लीला विशेष संमेलन दिले पण सरहदनेच नाकारले, असे सांगतात. मात्र, महामंडळाने आम्हाला त्याबाबत कधीच लेखी पत्र का दिले नाही, हे स्पष्ट नाही.

- संजय नहार, संस्थापक, सरहद

.........