शहरं
Join us  
Trending Stories
1
Asia Cup 2025: मोहसीन नक्वी टीम इंडियाला ट्रॉफी द्यायला झाले तयार, पण आता ठेवली 'ही' एक अट
2
तब्बल २२ वाहने चोरणाऱ्या आंतरराज्य चोरट्याला सांगलीत अटक; १६ लाखांचा मुद्देमाल जप्त
3
चांदी दीड लाख रूपये किलो, सप्टेंबरमध्ये २१,५२७ रुपयांची झेप; सोन्याचीही ११ हजारांची उडी
4
भरधाव ट्रकच्या धडकेत दुचाकीस्वार पती-पत्नी जागीच ठार; कोहमारा-वडसा मार्गावरील घटना
5
भाजपा पदाधिकाऱ्याची पत्नीसह ३ ठिकाणी मतदारयादीत नावे, एका दुकानावर २५ नावे- काँग्रेसचा आरोप
6
पंतप्रधान मोदी करणार ‘मुख्यमंत्री अल्पमुदतीचे रोजगारक्षम अभ्यासक्रम’ कार्यक्रमाचे उद्घाटन
7
'या' दिवसापर्यंत गपचूप ट्रॉफी भारताला द्या नाहीतर...; BCCIचे मोहसीन नक्वी यांना 'अल्टीमेटम'
8
दहिसर टोलनाका वाहतूककोंडी दूर करण्यासाठी मंत्री प्रताप सरनाईक यांनी सुचवल्या उपाययोजना
9
१०० वर्षांनी हंस महालक्ष्मी योग: ८ राशींचे कल्याण, कल्पनेपलीकडे लाभ; अपार यश, भरघोस भरभराट!
10
“शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान, भरीव मदत सरकार देईल, उद्या मंत्रिमंडळ बैठकीत...”: संजय शिरसाट
11
"दुसऱ्याच महिन्यात रंगेहाथ पकडलं...!" धनश्री वर्माचा खळबळजनक खुलासा, युजवेंद्र चहलनं लग्नाच्या पहिल्याच वर्षात दिला होता धोका?
12
अंधेरी क्रीडा संकुल महापालिकेने स्वतः उभारावे; गोपाळ शेट्टी यांची पालिका आयुक्तांकडे मागणी
13
"ही सगळी नाटकं, पाकिस्तानसोबत खेळायलाच नको होतं"; भारत-पाक सामन्यावरुन आदित्य ठाकरेंनी सुनावलं
14
भाजप कार्यालय आमच्यासाठी इमारत नाही, मंदिर आहे; पंतप्रधान मोदींनी व्यक्त केल्या भावना...
15
डोनाल्ड ट्रम्प यांचा मोठा निर्णय! आता 'या' उद्योगावर लादला १००% कर; भारताला सर्वाधिक फटका...
16
“दसरा मेळाव्याबाबत सदसद्विवेकबुद्धीला स्मरून निर्णय घ्यावा”; अजित पवारांचा रोख कुणाकडे?
17
१० वर्षांपासून सत्ता असलेल्या राज्यात भाजपाला जबर धक्का, निवडणुकीत मिळाल्या ४० पैकी केवळ ५ जागा   
18
कुठलाही क्रिकेट सामना हे सत्य बदलू शकत नाही; PM मोदींच्या ट्विटवर मोहसीन नक्वींची दर्पोक्ती
19
विघ्नहर्ता बाप्पा संकटात धावला! श्री सिद्धीविनायक मंदिर अतिवृष्टीबाधितांसाठी १० कोटी देणार
20
IND vs PAK Final : "ते स्वतः स्ट्राइकवर येऊन..." PM मोदींसंदर्भात नेमकं काय म्हणाला सूर्यकुमार यादव?

प्रभाग पद्धतीविरुद्धची याचिका खारीज

By admin | Updated: September 17, 2016 03:12 IST

राज्यातील महानगरपालिका व नगर परिषदांच्या निवडणुका बहुसदस्यीय प्रभाग पद्धतीने घेण्याला आव्हान देणारी

हायकोर्ट : राज्यघटनेतील तरतुदींचे उल्लंघन होत नसल्याचे निरीक्षणनागपूर : राज्यातील महानगरपालिका व नगर परिषदांच्या निवडणुका बहुसदस्यीय प्रभाग पद्धतीने घेण्याला आव्हान देणारी रिट याचिका मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने शुक्रवारी फेटाळून लावली. बहुसदस्यीय प्रभाग पद्धतीने निवडणुका घेतल्यामुळे राज्यघटनेतील कोणत्याही तरतुदीचे उल्लंघन होत नाही असे निरीक्षण न्यायालयाने निर्णयात नोंदविले.न्यायमूर्तीद्वय भूषण गवई व विनय देशपांडे यांनी हा निर्णय दिला. आंबेडकराईट पार्टी आॅफ इंडियाने महासचिव विद्या भिमटे यांच्यामार्फत ही रिट याचिका दाखल केली होती. राज्य शासनाने महानगरपालिका व नगर परिषदांच्या निवडणुका बहुसदस्यीय प्रभाग पद्धतीने घेण्यासाठी महाराष्ट्र महानगरपालिका कायदा आणि महाराष्ट्र नगर परिषद, नगर पंचायत व औद्योगिक वसाहत कायद्यात दुरुस्ती केली आहे. यासंदर्भात अध्यादेश जारी करण्यात आला आहे. यानुसार महानगरपालिकेच्या प्रभागात किमान तीन व कमाल चार तर, नगर परिषदेच्या प्रभागात किमान दोन व कमाल तीन उमेदवार उभे राहू शकतात. प्रत्येक प्रभागात नियमानुसार आरक्षण राहील. तसेच, प्रभागातील नागरिकांना प्रत्येक उमेदवाराला एक मत देता येईल. बहुसदस्यीय प्रभाग पद्धतीमुळे एक व्यक्ती एक मत व एक मत एक मूल्य हे तत्त्व बाधित होत असल्याचे व धर्मनिरपेक्षतेला धक्का पोहोचत असल्याचे याचिकाकर्त्याचे म्हणणे होते. हे दावे न्यायालयाने फेटाळून लावले. या निवडणुकीत कोणत्याही जाती, धर्म व पंथातील नागरिक दुसऱ्या कोणत्याही जाती, धर्म व पंथातील उमेदवारांना मतदान करू शकतात. तसेच, सर्व जाती-धर्मातील व्यक्ती ही निवडणूक लढवू शकते. यामुळे धर्मनिरपेक्षतेला काहीच धोका नाही. तसेच, एका प्रभागात चार उमेदवार उभे राहिले तरी त्या प्रत्येकाला एकच मत देण्याचा अधिकार नागरिकांना आहे. एक नागरिक एका उमेदवाराला चार मते देऊ शकत नाही. यामुळे एक व्यक्ती एक मत व एक मत एक मूल्य हे तत्त्व कायम राहते असे निरीक्षण न्यायालयाने निर्णयात नोंदविले. याचिकाकर्त्यातर्फे अ‍ॅड. नितीन सोनारे तर, शासनातर्फे प्रभारी महाधिवक्ता रोहित देव यांनी बाजू मांडली.(प्रतिनिधी)राजकीय दृष्टिकोनातून विरोध नकोन्यायालयामध्ये कोणताही कायदा व अध्यादेशाला राजकीय दृष्टिकोनातून विरोध करता येणार नाही. यासाठी कायदे मंडळाने कोणताही कायदा आणि राष्ट्रपती व राज्यपालांनी कोणताही अध्यादेश अवैधपणे पारित केलाय हे पाहणे आवश्यक आहे. शिवाय, संबंधित कायदा व अध्यादेशामुळे राज्यघटनेतील तरतुदींचे उल्लंघन झाले पाहिजे. या प्रकरणात असे काहीच झालेले नाही असे मत न्यायालयाने निर्णयात व्यक्त केले.अध्यक्षाची निवड, आव्हान फेटाळलेनगर परिषद अध्यक्षाची निवड निवडणुकीतून करण्यात येणार आहे. या पद्धतीलाही याचिकाकर्त्याने आव्हान दिले होते. ही पद्धत राज्यघटनेतील तरतुदींच्या विरोधात असल्याचे याचिकाकर्त्याचे म्हणणे होते. न्यायालयाने हे आव्हान फेटाळून लावले. अशा पद्धतीने अध्यक्षाची निवड करता येणार नसल्याचे राज्यघटनेत कुठेही म्हटलेले नाही. यामुळे ही पद्धत अवैध ठरवता येणार नाही असे न्यायालयाने स्पष्ट केले.