शहरं
Join us  
Trending Stories
1
हिजाब वादानंतर मुख्यमंत्री नितीश कुमार यांची सुरक्षा वाढवली, पोलिसांनी व्यक्त केली भीती
2
माणिकराव कोकाटेंना कधी डिस्चार्ज मिळणार? नाशिक पोलिसांचा फौजफाटा रुग्णालयात तैनात; काय आहे अपडेट?
3
"निवडणूक आयोग बेईमान, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस 'गजनी"; हर्षवर्धन सपकाळ यांची बोचरी टीका
4
माणिकराव कोकाटेंना आजच रात्री अटक होणार? नाशिक पोलिसांची टीम लिलावती रुग्णालयात दाखल
5
Shilpa Shetty: बॉलिवूड अभिनेत्री शिल्पा शेट्टीला दणका! मुंबईतील घरावर आयकर विभागाचा छापा
6
महसूल अधिकारी, कर्मचाऱ्यांचा संप अखेर मागे; चंद्रशेखर बावनकुळे यांच्याशी चर्चेनंतर निर्णय
7
SMAT 2025 Final : नवा गडी नव राज्य! ईशानच्या कॅप्टन्सीत झारखंडच्या संघानं पहिल्यांदा उंचावली ट्रॉफी
8
ठाकरेंचा शिलेदार भाजपामध्ये... संजोग वाघेरेंचा राजीनामा, पिंपरी-चिंचवडच्या राजकारणात भूकंप
9
'लाडक्या बहिणी' निवडणूक लढवण्यासाठी तुफान उत्साही; शिवसेनेत मुलाखतींसाठी इच्छुकांची गर्दी
10
“ही त्यांची शेवटची निवडणूक, भविष्यात तर...”; ठाकरे बंधूंच्या युतीवर भाजपा नेत्यांनी डिवचले
11
एकीकडे भाजप-शिवसेनेची युती, दुसरीकडे राष्ट्रवादी प्रदेशाध्यक्षांचे महायुतीबाबत मोठे विधान
12
काँग्रेसमध्ये 'इनकमिंग' जोरात, भाजपाच्या भुलथापांना बळी पडू नका; प्रदेशाध्यक्षांचा दावा
13
शाहबाज सरकार पुन्हा तोंडावर आपटलं; सौदी अरेबियाने 50,000 पाकिस्तानी भिकाऱ्यांना हाकलून लावलं
14
"ये 21वीं सदी का भारत है…!"; ओमानमधील भारतीयांना पंतप्रधान मोदींचा संदेश, मिळाला सर्वोच्च सन्मान
15
“दोन्ही NCP एकत्र येणार असतील, तर शरद पवार गटासोबत जाणार नाही”; उद्धवसेनेने स्पष्टच सांगितले
16
SMAT Final 2025 : विराट फेल! बाकी सर्वांच्या २०० प्लस स्ट्राइक रेटसह धावा अन् झारखंडनं रचला इतिहास
17
माणिकराव कोकाटे मंत्रिमंडळातून बाहेर! अजित पवारांनी CM फडणवीसांकडे पाठवला राजीनामा
18
डॉलर नाही तर हे आहे जगातील सर्वात शक्तिशाली चलन, मोजावे लागतात तब्बल २९४ रुपये
19
185 रुपयांच्या शेअरमध्ये 5881% ची आश्चर्यचकित करणारी तेजी; आता BSE ची अ‍ॅक्शन, व्यवहार बंद!
20
Ishan Kishan Century : ईशान किशनची विक्रमी सेंच्युरी! सर्वाधिक षटकारांचाही सेट केला नवा रेकॉर्ड
Daily Top 2Weekly Top 5

प्रभाग पद्धतीविरुद्धची याचिका खारीज

By admin | Updated: September 17, 2016 03:12 IST

राज्यातील महानगरपालिका व नगर परिषदांच्या निवडणुका बहुसदस्यीय प्रभाग पद्धतीने घेण्याला आव्हान देणारी

हायकोर्ट : राज्यघटनेतील तरतुदींचे उल्लंघन होत नसल्याचे निरीक्षणनागपूर : राज्यातील महानगरपालिका व नगर परिषदांच्या निवडणुका बहुसदस्यीय प्रभाग पद्धतीने घेण्याला आव्हान देणारी रिट याचिका मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने शुक्रवारी फेटाळून लावली. बहुसदस्यीय प्रभाग पद्धतीने निवडणुका घेतल्यामुळे राज्यघटनेतील कोणत्याही तरतुदीचे उल्लंघन होत नाही असे निरीक्षण न्यायालयाने निर्णयात नोंदविले.न्यायमूर्तीद्वय भूषण गवई व विनय देशपांडे यांनी हा निर्णय दिला. आंबेडकराईट पार्टी आॅफ इंडियाने महासचिव विद्या भिमटे यांच्यामार्फत ही रिट याचिका दाखल केली होती. राज्य शासनाने महानगरपालिका व नगर परिषदांच्या निवडणुका बहुसदस्यीय प्रभाग पद्धतीने घेण्यासाठी महाराष्ट्र महानगरपालिका कायदा आणि महाराष्ट्र नगर परिषद, नगर पंचायत व औद्योगिक वसाहत कायद्यात दुरुस्ती केली आहे. यासंदर्भात अध्यादेश जारी करण्यात आला आहे. यानुसार महानगरपालिकेच्या प्रभागात किमान तीन व कमाल चार तर, नगर परिषदेच्या प्रभागात किमान दोन व कमाल तीन उमेदवार उभे राहू शकतात. प्रत्येक प्रभागात नियमानुसार आरक्षण राहील. तसेच, प्रभागातील नागरिकांना प्रत्येक उमेदवाराला एक मत देता येईल. बहुसदस्यीय प्रभाग पद्धतीमुळे एक व्यक्ती एक मत व एक मत एक मूल्य हे तत्त्व बाधित होत असल्याचे व धर्मनिरपेक्षतेला धक्का पोहोचत असल्याचे याचिकाकर्त्याचे म्हणणे होते. हे दावे न्यायालयाने फेटाळून लावले. या निवडणुकीत कोणत्याही जाती, धर्म व पंथातील नागरिक दुसऱ्या कोणत्याही जाती, धर्म व पंथातील उमेदवारांना मतदान करू शकतात. तसेच, सर्व जाती-धर्मातील व्यक्ती ही निवडणूक लढवू शकते. यामुळे धर्मनिरपेक्षतेला काहीच धोका नाही. तसेच, एका प्रभागात चार उमेदवार उभे राहिले तरी त्या प्रत्येकाला एकच मत देण्याचा अधिकार नागरिकांना आहे. एक नागरिक एका उमेदवाराला चार मते देऊ शकत नाही. यामुळे एक व्यक्ती एक मत व एक मत एक मूल्य हे तत्त्व कायम राहते असे निरीक्षण न्यायालयाने निर्णयात नोंदविले. याचिकाकर्त्यातर्फे अ‍ॅड. नितीन सोनारे तर, शासनातर्फे प्रभारी महाधिवक्ता रोहित देव यांनी बाजू मांडली.(प्रतिनिधी)राजकीय दृष्टिकोनातून विरोध नकोन्यायालयामध्ये कोणताही कायदा व अध्यादेशाला राजकीय दृष्टिकोनातून विरोध करता येणार नाही. यासाठी कायदे मंडळाने कोणताही कायदा आणि राष्ट्रपती व राज्यपालांनी कोणताही अध्यादेश अवैधपणे पारित केलाय हे पाहणे आवश्यक आहे. शिवाय, संबंधित कायदा व अध्यादेशामुळे राज्यघटनेतील तरतुदींचे उल्लंघन झाले पाहिजे. या प्रकरणात असे काहीच झालेले नाही असे मत न्यायालयाने निर्णयात व्यक्त केले.अध्यक्षाची निवड, आव्हान फेटाळलेनगर परिषद अध्यक्षाची निवड निवडणुकीतून करण्यात येणार आहे. या पद्धतीलाही याचिकाकर्त्याने आव्हान दिले होते. ही पद्धत राज्यघटनेतील तरतुदींच्या विरोधात असल्याचे याचिकाकर्त्याचे म्हणणे होते. न्यायालयाने हे आव्हान फेटाळून लावले. अशा पद्धतीने अध्यक्षाची निवड करता येणार नसल्याचे राज्यघटनेत कुठेही म्हटलेले नाही. यामुळे ही पद्धत अवैध ठरवता येणार नाही असे न्यायालयाने स्पष्ट केले.