शहरं
Join us  
Trending Stories
1
व्हाईट हाऊसचे सल्लागार बनले २ जिहादी; एक लश्कर ए तोयबा तर दुसरा अल कायदाशी लिंक
2
केवळ ठाकरे गटाला नाही, मनसेलाही धक्का; दादरा नगर हवेलीसह ७ ठिकाणचे पदाधिकारी शिंदेसेनेत
3
PM मोदींचा एअरबेस दौरा, डेलीगेशन अन् चॅनेल बॅन...शहबाज शरीफ करताहेत भारताची नक्कल
4
Ayodhya Temple : राम मंदिराच्या सुरक्षेत मोठा बदल, २५० सुरक्षा रक्षकांना कामावरून कमी केले! करण काय?
5
“मोदी २०० देश फिरले, पण एकही पाठिशी नाही; शिष्टमंडळाच्या वऱ्हाडावर बहिष्कार टाकला पाहिजे”
6
संपूर्ण यादीच आली, सर्वपक्षीय शिष्टमंडळाचे सदस्य ठरले, प्रत्येक टीममध्ये किती अन् कोण नेते?
7
ज्या गर्लफ्रेंडशी गुलूगुलू बोलायचा ती निघाली त्याचीच पत्नी, रंगेल पतीची झाली अशी फजिती, त्यानंतर...
8
पीएमपीएमएलच्या ईलेक्ट्रीक बसची रेंज किती; कालच पाहिली, १,२४,००० किमी एवढे प्रचंड रनिंग झालेली बस...
9
अमेरिकेने ४ कोटी रुपये किमतीचे भारतीय आंबे का नष्ट केले? एक चूक सर्वांना महागात पडली
10
मिथुन चक्रवर्ती अडचणीत, BMC कडून सात दिवसांची 'डेडलाइन', काय आहे संपूर्ण प्रकरण?
11
बारावी शिकलेली रिसेप्शनिस्ट ज्योती पाकिस्तानपर्यंत पोहोचली कशी? 'या' देशांचीही केलीय वारी
12
मेकर्ससोबतच्या क्रिएटिव्ह मतभेदांमुळे सोडला 'हेरा फेरी ३'? परेश रावल ट्वीट करत म्हणाले...
13
पोखरणच्या जमिनीवर 'असा' झाला स्फोट, अमेरिकाही हादरली; आजच्या दिवशी भारताची दखल जगानं घेतली
14
पाकची नवी चाल! भारताच्या ‘डिप्लोमॅटिक स्ट्राइक’ला ‘शांतीदूता’ने उत्तर; जगाला सांगणार काय?
15
गिलख्रिस्टच्या IPL संघात विराटला स्थान नाही, Mumbai Indiansचे ५ जण, कर्णधार कोण?
16
पाकिस्तानसोबतच्या तणावादरम्यान भारत आणि अफगाणिस्तानमधील व्यापार पुन्हा सुरू
17
सोलापूरलगत बाळे ओढ्यावर ट्रक पलटी; सोलापूर-हैदराबाद-पुणे महामार्गावरील वाहतुकीला अडथळा
18
आयडियाची कल्पना झाली फेल! बेपत्ता झालेला गुरुग्रामचा आयटी मॅनेजर पकडला गेला अन् समोर आलं खरं कारण
19
अटकेत पाकिस्तानी स्पाय? ज्योती मल्होत्राची कमाई किती? कोरोनात नोकरी गेली अन्... पाकिस्तानही फिरून आली...
20
Hyundai ने आखली मोठी योजना! भारतात लॉन्च करणार 20 पेट्रोल-डिझेल अन् 6 EV कार

आपत्ती व्यवस्थापन उपाययोजना सार्वजनिक कराव्यात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 17, 2021 04:08 IST

नागपूर : कोरोनासारख्या महामारीच्या काळात नागरिकांच्या प्राणाचे संरक्षण करण्यासाठी राष्ट्रीय आराखडा, राज्याचा आराखडा आणि जिल्ह्यास्तरीय आराखडा तयार करण्याची तरतूद ...

नागपूर : कोरोनासारख्या महामारीच्या काळात नागरिकांच्या प्राणाचे संरक्षण करण्यासाठी राष्ट्रीय आराखडा, राज्याचा आराखडा आणि जिल्ह्यास्तरीय आराखडा तयार करण्याची तरतूद आपत्ती व्यवस्थापन कायद्यात आहे. या तरतुदीची अंमलबजावणी करण्यासाठी कोणकोणत्या उपाययोजना करण्यात आल्या याची माहिती सरकारने सार्वजनिक करावी असे आवाहन ज्येष्ठ विधिज्ञ अ‍ॅड. फिरदोस मिर्झा यांनी केले.

संविधान फाऊंडेशनच्या ‘संविधानाची शाळा’ उपक्रमांतर्गत रविवारी ‘संविधानाच्या परिप्रेक्ष्यातून आपत्ती व्यवस्थापन कायदा’ या विषयावर अ‍ॅड. मिर्झा यांच्याशी संवाद साधण्यात आला. त्यावेळी त्यांनी सदर आवाहन केले. आपत्ती व्यवस्थापन कायदा केवळ नागरिकांसाठी नाही तर, तो राबवणाऱ्यांसाठीसुद्धा आहे. परंतु, दुर्दैवाने आपल्या सरकारजवळ कोणताही आराखडा दिसून आला नाही. सरकारने राज्यघटनेचे उल्लंघन केल्यास संपूर्ण देश संकटात येईल हे लक्षात घेणे गरजेचे आहे असे अ‍ॅड. मिर्झा यांनी सांगितले.

कोरोनासारखे विषाणू जात-धर्म पहात नाही. मग, आपण सरकार निवडताना जात-धर्माचा विचार का करतो? आपण नेहमी राज्यघटनेवर निष्ठा असणाऱ्या व्यक्तीची निवड केली पाहिजे. कायद्यापुढे सर्व समान आहेत, या तत्त्वाचे पालन व्हायला पाहिजे. या महामारीच्या काळातही भ्रष्टाचार आणि शोषण करण्याचे वर्तन राज्यघटनेचा अवमान आहे असे मतही अ‍ॅड़ मिर्झा यांनी व्यक्त केले. प्रा. महेंद्रकुमार मेश्राम यांनी अ‍ॅड. मिर्झा यांच्याशी संवाद साधला. याप्रसंगी फाऊंडेशनचे संस्थापक इ. झेड. खोब्रागडे आदी उपस्थित होते.