शहरं
Join us  
Trending Stories
1
Devayani Farande: डोळ्यात पाणी, आवाजही गहिवरला...! नाशिकमधील पक्षप्रवेशानंतर भाजपा आमदार देवयानी फरांदे भावूक
2
"चीन भारतासोबतचे संबंध विकसित करण्यावर भर देतो, कोणत्याही तिसऱ्या देशाला..."; अमेरिकेच्या अहवालावरून चीन भडकला
3
‘मी स्नेहाची हत्या केलेली नाही…’, पँटवर लिहून प्रियकरानं संपवलं जीवन, पोलिसांवर गंभीर आरोप
4
श्रीमंत व्हायचंय? 'रिच डॅड पुअर डॅड'च्या लेखकाचा गुंतवणुकीचा नवा 'मंत्र', चांदी विषयी केलं मोठं भाकित
5
मुंबईतील उत्तर भारतीयांना OBC आरक्षण मिळणार?: शिंदेसेनेचे नेते संजय निरुपम यांनी दिले संकेत
6
"हिंदू वेळीच एकवटला नाही तर भारतात गल्लोगल्ली बांगलादेशसारखा..."; धीरेंद्र शास्त्रींचा इशारा
7
“महानगरपालिकांमध्ये ‘वंचित’बरोबर आघाडी करण्यासाठी प्रामाणिक प्रयत्न सुरू”: हर्षवर्धन सपकाळ
8
नवीन वर्षात करा नवीन भाषा शिकण्याचा संकल्प, मिळेल आयुष्याला कलाटणी; पाहा सोप्या टिप्स
9
३१ डिसेंबरला अयोध्येतील राम मंदिर खरोखरच बंद राहणार का? महत्त्वाची माहिती आली समोर
10
विधानसभेला संधी हुकली कृष्णराज महाडिक आता महापालिका निवडणूक लढवणार, प्रभागही ठरला!
11
धक्कातंत्र! कार्यालयाबाहेर निष्ठावंतांची घोषणाबाजी; आतमध्ये मविआ-मनसतील ५ बड्या नेत्यांचा भाजपात प्रवेश
12
ना पोस्ट, ना लाइक, ना कमेंट...; आता जवानांना केवळ इंस्टाग्राम बघण्याचीच परवानगी
13
गुंतवणूकदारांनो लक्ष द्या! नवीन वर्षात शेअर बाजाराला १५ दिवस सुट्टी; एनएसईकडून कॅलेंडर प्रसिद्ध
14
नाताळाला गालबोट; महाराष्ट्र, केरळसह काही राज्यांत तोडफोड अन् झटापटीच्या घटना...
15
Crime: धक्कादायक! आयटी कंपनीच्या महिला मॅनेजरवर धावत्या कारमध्ये सामूहिक बलात्कार
16
“मी खरा वाघ आहे, त्यांच्यासारखा कागदी नाही”; रावसाहेब दानवेंचे ठाकरे बंधूंना प्रत्युत्तर
17
टीव्ही अभिनेत्याला झालेली खुलेआम मारहाण; म्हणाला, "तो अजूनही मोकाट...", मुंबई आता असुरक्षित?
18
कर्क राशीसाठी नवीन वर्ष 2026 कसं असेल? स्वप्नपूर्ती आणि मानसन्मानाचे वर्ष; पण आरोग्याबाबत राहा सतर्क!
19
शेख हसीना यांना परत बांग्लादेशात न पाठवून भारताने..; शशी थरुर यांचे मोठे वक्तव्य
20
गृहकर्ज घेण्याचा विचार करताय? कोणती बँक देतेय सर्वात स्वस्त होम लोन? पाहा संपूर्ण यादी
Daily Top 2Weekly Top 5

आपत्ती व्यवस्थापन उपाययोजना सार्वजनिक कराव्यात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 17, 2021 04:08 IST

नागपूर : कोरोनासारख्या महामारीच्या काळात नागरिकांच्या प्राणाचे संरक्षण करण्यासाठी राष्ट्रीय आराखडा, राज्याचा आराखडा आणि जिल्ह्यास्तरीय आराखडा तयार करण्याची तरतूद ...

नागपूर : कोरोनासारख्या महामारीच्या काळात नागरिकांच्या प्राणाचे संरक्षण करण्यासाठी राष्ट्रीय आराखडा, राज्याचा आराखडा आणि जिल्ह्यास्तरीय आराखडा तयार करण्याची तरतूद आपत्ती व्यवस्थापन कायद्यात आहे. या तरतुदीची अंमलबजावणी करण्यासाठी कोणकोणत्या उपाययोजना करण्यात आल्या याची माहिती सरकारने सार्वजनिक करावी असे आवाहन ज्येष्ठ विधिज्ञ अ‍ॅड. फिरदोस मिर्झा यांनी केले.

संविधान फाऊंडेशनच्या ‘संविधानाची शाळा’ उपक्रमांतर्गत रविवारी ‘संविधानाच्या परिप्रेक्ष्यातून आपत्ती व्यवस्थापन कायदा’ या विषयावर अ‍ॅड. मिर्झा यांच्याशी संवाद साधण्यात आला. त्यावेळी त्यांनी सदर आवाहन केले. आपत्ती व्यवस्थापन कायदा केवळ नागरिकांसाठी नाही तर, तो राबवणाऱ्यांसाठीसुद्धा आहे. परंतु, दुर्दैवाने आपल्या सरकारजवळ कोणताही आराखडा दिसून आला नाही. सरकारने राज्यघटनेचे उल्लंघन केल्यास संपूर्ण देश संकटात येईल हे लक्षात घेणे गरजेचे आहे असे अ‍ॅड. मिर्झा यांनी सांगितले.

कोरोनासारखे विषाणू जात-धर्म पहात नाही. मग, आपण सरकार निवडताना जात-धर्माचा विचार का करतो? आपण नेहमी राज्यघटनेवर निष्ठा असणाऱ्या व्यक्तीची निवड केली पाहिजे. कायद्यापुढे सर्व समान आहेत, या तत्त्वाचे पालन व्हायला पाहिजे. या महामारीच्या काळातही भ्रष्टाचार आणि शोषण करण्याचे वर्तन राज्यघटनेचा अवमान आहे असे मतही अ‍ॅड़ मिर्झा यांनी व्यक्त केले. प्रा. महेंद्रकुमार मेश्राम यांनी अ‍ॅड. मिर्झा यांच्याशी संवाद साधला. याप्रसंगी फाऊंडेशनचे संस्थापक इ. झेड. खोब्रागडे आदी उपस्थित होते.