शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
IND vs PAK U19 Asia Cup Final Live Streaming: भारत-पाक महामुकाबला कुठे आणि कसा पाहता येईल?
4
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
5
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
6
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
7
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
8
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
9
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
10
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
11
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
12
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
13
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
14
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
15
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
16
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
17
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
18
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
19
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
20
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
Daily Top 2Weekly Top 5

नुकसान भरपाईपासून शेतकरी वंचित

By admin | Updated: May 14, 2014 01:29 IST

अवकाळी पाऊस व वादळाच्या तडाख्याने हवालदिल झालेल्या शेतकऱ्यांना शासनाने मदतीचा हात दिला. १५ एप्रिल २0१४ पर्यंंत नुकसानभरपाई देण्याचे शासनाने परिपत्रक काढले.

बाबा टेकाडे - सावनेर

अवकाळी पाऊस व वादळाच्या तडाख्याने हवालदिल झालेल्या शेतकर्‍यांना शासनाने मदतीचा हात दिला. १५ एप्रिल २0१४ पर्यंंत नुकसानभरपाई देण्याचे शासनाने परिपत्रक काढले. याबाबत अधिकार्‍यांना बजविण्यात आले. मात्र, प्रशासन आणि बँकेच्या हलगर्जीपणामुळे अद्यापही शेकडो शेतकर्‍यांना नुकसानभरपाईचा मोबदला मिळाला नाही. त्यामुळे शेतकर्‍यांत संताप व्यक्त होत आहे.

सावनेर तालुक्यात अवकाळी व वादळासह गारपीट झाली. त्यामुळे शेतकर्‍यांच्या संत्रा, मोसंबी, कापूस, सोयाबीन, तूर, भाजीपाला, गहू, हरभरा आदी पिकांचे अतोनात नुकसान झाले. लाखो रुपयांचे हातचे पीक गेल्याने शेतकर्‍यांचे कंबरडे मोडले. कर्जबाजारी शेतकरी अधिकच आर्थिक अडचणीत सापडला.

अशा परिस्थितीत आदर्श आचारसंहिता लागू असतानाही शासनाने निवडणूक आयोगाकडून विशेष परवानगी घेऊन नुकसानभरपाई देण्याचे जाहीर केले. त्यामुळे शेतकर्‍यांना दिलासा मिळाला. शेतकर्‍यांच्या खात्यात १५ एप्रिलपावेतो नुकसानभरपाई जमा करण्यात यावी, असे स्पष्ट आदेश देण्यात आले. अन्यथा रक्कम परत करावी, असाही परिपत्रकात उल्लेख आहे. परंतु शासनाच्या आदेशाला केराची टोपली दाखवली. त्यामुळे शेतकरी तहसील कार्यालय व बँकेच्या चकरा मारत आहेत.

विशेष म्हणजे ४२0 लाभार्थ्यांंचा २७ लाख रुपयांचा धनादेश बँकेच्या हलगर्जीपणामुळे गहाळ झाला. याबाबत एचडीएफसी बँकेने काहीच गंभीरतेने दखल घेतली नाही. तद्वतच तहसील कार्यालयासही कळविले नाही. शेतकरी बँकेचे हेलपाटे मारत होते. अद्याप नुकसानभरपाईची रक्कम खात्यात जमा का झाली नाही, अशी ओरडही झाली. त्यामुळे खळबळ माजली. तहसील कार्यालयातून एचडीएफसी बँकेत वारंवार फोनने संपर्क करण्याचा प्रयत्न झाला. परंतु, कुणीही प्रतिसाद दिला नाही. त्यामुळे तहसील कार्यालयातील संबंधित कर्मचारी नागपूर येथील बँकेत गेले. त्यावेळी नुकसानभरपाईचा २७ लाख रुपयांचा धनादेश गहाळ झाल्याची बाब निदर्शनात आली.

त्यानंतर १५ एप्रिल २0१४ ला पुन्हा दुसरा धनादेश तयार करून बँकेला दिला. तरीदेखील शेतकर्‍यांना रक्कम मिळाली नाही. परिणामी शेतकर्‍यांचे बँक व तहसील कार्यालयातील हेलपाटे सुरूच आहेत.