शहरं
Join us  
Trending Stories
1
CA नगराध्यक्ष सगळ्यांचा हिशेब ठेवतील अन् काहींचा 'हिशोब करतील'...; फडणवीसांचे सूचक विधान
2
माणिकराव कोकाटे यांना अखेर मोठा दणका; त्यांच्याकडची मंत्रिपदाची सर्व खाती अजित पवारांकडे!
3
U19 Asia Cup 2025 : ...तर आशिया कप जेतेपदासाठी भारत-पाक यांच्यात रंगणार फायनल!
4
महागाईचा ‘रॉकेट’ वेग! चांदी २ लाखांच्या पार, तर सोने १.३७ लाखांवर... आतापर्यंत सर्व विक्रम मोडले
5
Lokmat Parliamentary Award 2025: सुधा मूर्ती ते दिग्विजय सिंह... 'लोकमत पार्लिमेंटरी अवार्ड २०२५'ने ८ प्रतिभावान खासदारांचा गौरव
6
IND vs SA T20I: पहिल्यांदाच असं घडलं! धुक्यामुळे भारत-दक्षिण आफ्रिका यांच्यातील चौथा सामना रद्द
7
मुंबई: कोस्टल रोड प्रवेशद्वारावर अचानक लागली भीषण आग; वाहनांच्या लांब रांगा, प्रवाशांचे हाल
8
धनंजय मुंडे परत मंत्री झाले तर...; अंजली दमानियांकडून भाजपा लक्ष्य; 'तो' फोटोही केला शेअर
9
"पंडित नेहरूंची पत्रे अजूनही सोनिया गांधींकडेच"; केंद्राचा खळबळजनक दावा; म्हणाले, 'हा देशाचा वारसा'
10
“मी माझ्या पक्षाचा पर्मनंट चिफ, कुणी बायपास करणार नाही, तसा प्रयत्न झाला तर…”: रामदास आठवले
11
IND vs SA 4th T20I : शुभमन गिल 'आउट'; टॉसला उशीर! जाणून घ्या त्यामागचं कारण
12
गुरुवारी मार्गशीर्ष शिवरात्रि २०२५: ‘असे’ करा व्रत, शिवाचे विशेष पूजन; काही कमी पडणार नाही!
13
"मला कधीच वाटलं नव्हतं की इतकी पर्सनल..."; MMS लीक प्रकरणावर Payal Gaming चे स्पष्टीकरण
14
“माणिकराव कोकाटेंना वाचवण्याचा सरकारकडून प्रयत्न, २४ तास झाले अद्याप अटक का नाही?”: सपकाळ
15
वांद्रे-वरळी सी लिंकवर २५२ किमी प्रतितास वेगाने पळवली लॅम्बॉर्गिनी, पोलिसांनी केली अशी कारवाई  
16
आवळा कँडी ते च्यवनप्राश... आरोग्यासाठी ठरू शकतं घातक; न्यूट्रिशनिस्टने सांगितले साइड इफेक्ट
17
"शिक्षा देण्यापेक्षा माफ करण्यातच कायद्याचा मोठेपणा"; बूट फेक प्रकरणावर माजी सरन्यायाधीश गवईंचे रोखठोक भाष्य
18
Maruti Suzuki ने लॉन्च केली नवीन WagonR; वृद्ध आणि दिव्यांगांसाठी मिळणार खास 'स्विव्हल सीट'
19
प्रियंका आणि राहुल गांधी यांच्यात वाद, कुटुंबीयांशी भांडून परदेशात गेले; केंद्रीय मंत्र्याचा मोठा दावा
20
“SIR प्रक्रिया निरर्थक, ५०० परदेशींसाठी ८ कोटी लोकांचा छळ”; माजी निवडणूक आयुक्त थेट बोलले
Daily Top 2Weekly Top 5

मुख्यमंत्र्यांसाठी दिली डाळ, गहू, तांदूळ भेट

By admin | Updated: October 29, 2016 02:22 IST

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या जिल्ह्यात शेतकऱ्यांच्या आत्महत्या सुरू आहेत. एकेकाळी शेतकऱ्यांच्या प्रश्नांसाठी

महिला अध्यक्ष अलका कांबळे यांच्या नेतृत्वात जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शनेनागपूर : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या जिल्ह्यात शेतकऱ्यांच्या आत्महत्या सुरू आहेत. एकेकाळी शेतकऱ्यांच्या प्रश्नांसाठी रस्त्यावर उतरून आंदोलन करणाऱ्या मुख्यमंत्र्यांचे शेतकऱ्यांच्या प्रश्नाकडे लक्ष वेधण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे शुक्रवारी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर अभिनव आंदोलन करण्यात आले. महिला अध्यक्ष अलका कांबळे यांच्या नेतृत्वातील महिला पदाधिकाऱ्यांच्या शिष्टमंडळाने डाळ, गहू, तांदूळ, ज्वारी,आलू-वांगे, टमाटर आदी अन्नधान्य मुख्यमंत्र्यांसाठी भेट म्हणून निवासी उपजिल्हाधिकाऱ्यांकडे सोपविले. यावेळी अलका कांबळे यांनी सांगितले की, डाळ एवढी महाग झाली असल्याने आता दिवाळीला फराळासाठी चकल्या, शेव आणि इतर पदार्थ बनविणे गोरगरिबांच्या आटोक्याच्या बाहेर गेले आहे. हे भाजपचे अच्छे दिन आहेत. मुख्यमंत्र्यांच्या जिल्ह्यातील कोंढाळी येथील मूर्ती गावातील खवसे परिवार तर याच महिन्यात नरखेड येथील एका शेतकऱ्याने गळफास घेऊन आत्महत्या केली. भरघोस पाऊस पडूनही नापिकी आणि कर्जबाजारीपणाला कंटाळून विदभार्तील तीन शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या. शेतकऱ्यांची आर्थिक परिस्थिती उंचावण्यासाठी सरकारने कोणतेही प्रयत्न केले नाही, असा आरोप त्यांनी केला. आंदोलनात शोभा भगत, लता माटे, सुषमा बाभळे, शांता हाडके, सुशीला ढाकणे, शालिनी सव्वालाखे, सूर्यकांता नाचणे, विमलताई बसेश्वर, तुळसा हिवराळे, मनीषा जेगरे आदींचा समावेश होता. (प्रतिनिधी)