शहरं
Join us  
Trending Stories
1
“राज ठाकरे यांना जवळ करणे राजकीय सोय, ठाकरे गटाचे ७५ नगरसेवक शिंदेंकडे गेले”: चंद्रकांत पाटील
2
पाऊस थांबला! लगेच आकाश दीपचा 'हमला'! बॅक टू बॅक ओव्हरमध्ये दोन विकेट्स अन् इंग्लंडचा अर्धा संघ तंबूत (VIDEO)
3
मतदारयाद्यांतील गैरप्रकार रोखण्यास काँग्रेसची समिती; अध्यक्ष पृथ्वीराज चव्हाण अहवाल देणार
4
अंत्यसंस्कारासाठी मृतदेह घेऊन निघाले अन् घरी जिवंत सापडली 'ती' व्यक्ती; जळगावातील प्रकार
5
“जीवनात ही घडी अशीच राहू दे”; फोटो शेअर करत बाळा नांदगावकरांची पांडुरंगाकडे प्रार्थना
6
मनातलं सगळंच सांगितलं; प्रताप सरनाईकांचं उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना ३ पानी खुलं पत्र
7
बर्मिंगहॅमच्या मैदानात पावसाची बॅटिंग! इंग्लंडच्या ७ विकेट्स घेण्यासाठी टीम इंडियाला किती षटके मिळणार?
8
“एकाचं भाषण अपूर्ण अन् दुसऱ्याचं अप्रासंगिक, तर पूर्ण कार्यक्रम अवास्तव”; भाजपाची टीका
9
१६ वर्षे अत्याचार झालेल्या मुलींच्या मृतदेहाची लावत होता विल्हेवाट; एका घटनेमुळे केला खुलासा
10
आधी कॅब चालकांची करायचे हत्या, दऱ्यांमध्ये फेकायचे मृतदेह; सीरियल किलरला अखेर अटक
11
शेतकऱ्यांसाठी खुशखबर! पीएम किसानचा २०वा हप्ता 'या' दिवशी खात्यात येणार? आत्ताच यादी तपासा!
12
राज्यात सुरू असलेल्या भाषा वादावर बाबा रामदेव यांची पहिली प्रतिक्रिया, स्पष्टच बोलले; दिला असा सल्ला
13
सोलापूर : 'तुझ्यामुळेच माझी बायको...'; सावत्र दिराने भावजयीच्या मानेवर कुऱ्हाडीने केला वार, जागेवरच गेला जीव
14
“विठ्ठला...! सरकारला कर्जमाफी देण्याची सद्बुद्धी दे...”; आषाढी एकादशीला बच्चू कडूंची पोस्ट
15
ऐकवं ते नवलंच! पोलिसात भरती झाला, पण १२ वर्षे ड्युटीवरच गेला नाही; तरीही मिळाली ₹२८ लाख पगार
16
हाफिज सईद आणि मसूद अजहर भारताकडे सोपवू, पण...; बिलावल भुट्टो यांची 'ती' मागणी काय?
17
ENG vs IND : इंग्लंड टेस्ट मॅच ड्रॉ करण्यासाठी खेळणार? कोच म्हणाला, आम्ही एवढेही मूर्ख नाही की,...
18
'देशात गरीब वाढत चाललेत आणि काही श्रीमंताच्या हातात संपत्ती चाललीये'; नितीन गडकरींनी व्यक्त केली चिंता
19
"२० कोटी दिले तरी ...", बिग बॉस १९ मध्ये सहभागी होण्याच्या चर्चांवर राम कपूरने सोडलं मौन
20
ज्या घटनेमुळे बापाने केली हत्या, त्यात आईचा होता सहभाग; कोल्हापुरातील प्रकरणात काय आले समोर?

दीक्षाभूमी कोविंद यांची प्रेरणाभूमी

By admin | Updated: June 20, 2017 01:43 IST

राष्ट्रपतिपदासाठी राष्ट्रीय लोकशाही आघाडीचे उमेदवार असलेले बिहारचे राज्यपाल रामनाथ कोविंद यांची कर्मभूमी बिहार ...

नागपूरशी वैचारिक नाते : बाबासाहेबांच्या विचारांवर चालणारे व्यक्तिमत्त्वलोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : राष्ट्रपतिपदासाठी राष्ट्रीय लोकशाही आघाडीचे उमेदवार असलेले बिहारचे राज्यपाल रामनाथ कोविंद यांची कर्मभूमी बिहार आणि उत्तर प्रदेश ही राज्ये असली तरी त्यांच्या व्यक्तिमत्त्वाला घडविण्यात नागपूरचादेखील मौलिक वाटा आहे. महामानव डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांवर चालणारे कोविंद यांचे नागपूरशी भावनिक आणि वैचारिक नाते जुळले आहे. बाबासाहेबांच्या पदस्पर्शाने पवित्र झालेल्या दीक्षाभूमीला कोविंद प्रेरणाभूमी मानतात. मागील वर्षीच्या धम्मचक्र प्रवर्तनदिन सोहळ्याला कोविंद प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होते हे विशेष.आयुष्याच्या सुरुवातीपासूनच कोविंद यांच्यावर बाबासाहेबांचा प्रभाव राहिलेला आहे. त्यांच्याच प्रेरणेतून त्यांनी उच्चशिक्षण घेतले. विशेष म्हणजे राजकारणात आल्यानंतर त्यांनी शिक्षणाच्या विकासावर जास्तीत जास्त भर देण्याचा प्रयत्न केला. बाबासाहेबांचा ‘शिका व संघटित व्हा’ हा मंत्र त्यांनी कृतीत उमटविला. उत्तर प्रदेश व उत्तराखंडमधील ग्रामीण भागातील मुलांना शिक्षणाच्या प्रवाहात आणण्यासाठी त्यांनी मौलिक कार्य केले. नागपुरात मागील वर्षी आले असताना त्यांनी याबाबत भावनादेखील व्यक्त केल्या होत्या. बिहारचे माजी राज्यपाल रा.सू.गवई यांनी शिक्षणाचा दर्जा उंचाविण्याचे काम केले होते. त्यांचेच काम मी पुढे चालवत आहे, असे त्यांनी सांगितले होते.राष्ट्रहित सर्वोच्च रामनाथ कोविंद हे राष्ट्रहिताला सर्वोच्च प्राधान्य देणारे नेते मानले जातात. नागपुरात याचे प्रत्यंतर आले होते. दीक्षाभूमीवर धम्मचक्रप्रवर्तन दिनानिमित्त बोलताना रामनाथ कोविंद यांनी बाबासाहेबांच्या विचारांचा जागर केला होता. बाबासाहेबांनी शेवटच्या घटकाला न्याय देण्याचे कार्य केले. यालाच सर्व अनुयायांनी समोर नेण्याची गरज आहे. बाबासाहेबांप्रमाणेच सर्वांनी विविध सामाजिक जबाबदाऱ्या स्वीकारताना राष्ट्रहित सर्वोच्च मानले पाहिजे, असे त्यांनी आवाहन केले होते. भाजपा कार्यकर्त्यांनादेखील केले होते मार्गदर्शनरामनाथ कोविंद यांच्यासाठी नागपूर नवीन नाही. याअगोदर त्यांनी अनेकदा नागपूरला भेट दिली आहे. अगदी विधानसभा निवडणुकांच्या अगोदरदेखील ते नागपुरात आले होते.भाजप अनुसूचित जाती मोर्चाच्या प्रदेश कार्यकारिणीची आॅगस्ट २०१४ मध्ये बैठक झाली होती. यावेळी रामनाथ कोविंद यांनी कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केले होते.