शहरं
Join us  
Trending Stories
1
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
2
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
3
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
4
फी भरण्यासाठी नाही, तर एअर होस्टेस गर्लफ्रेंडसाठी आयुषने विकली १० एकर जमीन; 'किडनी' कथेमागचे वास्तव ऐकून हादराल...
5
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
6
टाटापासून मारुतीपर्यंत 'या' आहेत देशातील टॉप ५ स्वस्तात मस्त कार! ५ लाखांच्या आत घरी आणा; मायलेजही खास
7
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
8
Manipur Violence : रॉकेट हल्ल्यात २ मुलांचा मृत्यू, मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार; बिष्णुपूरमध्ये कर्फ्यू, ५ जिल्ह्यांत इंटरनेट बंद
9
"डॉलर वर असो किंवा खाली..." राजपाल यादवला पैशांवरुन टोमणा मारणाऱ्यांना सलमानने सुनावलं
10
Feng shui: समृद्धीचं प्रतीक की पर्यावरणाचा रक्षक? बेडूक घराजवळ दिसणं तुमच्यासाठी किती शुभ आहे?
11
"एका मिनिटात १०० स्फोट" होर्मुझच्या सामुद्रधुनीतून परतलेल्या भारतीय अधिकाऱ्यानं सांगितला थरारक अनुभव
12
प्रवाशांच्या जीवाशी खेळ! वंदे भारतचं जेवण घेताय? अहमदाबाद-मुंबई प्रवासात प्रवाशाच्या ताटात काय आढळलं पाहा
13
"आम्ही देशाला ६ सनातनी मुलं दिली, प्रत्येक हिंदूला ३ मुलं तर असायलाच हवीत", पाकिस्तानातून आलेल्या सीमा हैदरचा सल्ला
14
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
15
होर्मुझचा इतिहास: ज्या जागेसाठी अमेरिका-इराण भिडलेत, तिथले मूळ रहिवासी कोण होते? टोलही होता...
16
अनंत अंबानींची मोठी घोषणा; केरळमधील मंदिरांना ₹१८ कोटींची देणगी, हत्तींच्या देखभालीसाठी करणार मदत
17
Leopard In Dindoshi : दिंडोशीत बिबट्याची दहशत! रहिवाशांमध्ये पसरले भीतीचे वातावरण
18
Vastu Shastra: साध्या वाटणाऱ्या 'या' ७ गोष्टी तुमच्या देवघरातील सकारात्मक ऊर्जा नष्ट करत आहेत का?
19
सोन्याची किंमत ३३६४ रुपयांनी, तर चांदी ८४०१ रुपयांनी झाली स्वस्त; पटापट चेक करा आजचे लेटेस्ट दर
20
Ram Bhajan Kumar : संघर्षगाथा! दगड फोडणारा झाला मोठा अधिकारी; ७ वेळा अपयश, आता नेत्रदीपक भरारी
Daily Top 2Weekly Top 5

राज्यातील पदविका-प्रमाणपत्रधारक पशुवैद्यकांची पदोन्नती अडचणीत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 1, 2021 04:07 IST

नागपूर : राज्यातील पदविका-प्रमाणपत्रधारक पशुवैद्यकांना पदोन्नती देताना कोटा निर्धारित करण्यात आला आहे. मात्र प्रत्यक्ष ही प्रकिया राबविताना हा कोटाच ...

नागपूर : राज्यातील पदविका-प्रमाणपत्रधारक पशुवैद्यकांना पदोन्नती देताना कोटा निर्धारित करण्यात आला आहे. मात्र प्रत्यक्ष ही प्रकिया राबविताना हा कोटाच रद्द करण्यात आला. यामुळे राज्यभरातील पदविका-प्रमाणपत्रधारक पशुवैद्यकांमध्ये असंतोष पसरला आहे. दरम्यान, १० जूनपर्यंत या संदर्भात योग्य निर्णय झाला नाही तर, आंदोलन करण्याचा इशारा पशुचिकित्सा व्यवसायी संघटनेने दिला आहे.

सहायक आयुक्त पशुसंवर्धन व पशुधन विकास अधिकारी (गट-अ) पदाच्या सेवा प्रवेश नियमात सुधारणा सुरू आहे. यात पदोन्नती देताना पदविका प्रमाणपत्रधारकांचा कोटा अस्तित्वात आहे. त्यामुळे पदाचे सेवा प्रवेश नियम तयार करताना समितीमध्ये संघटनेला स्थान मिळावे, अशी मागणी होती. यासाठी संघटनेसोबत ८ जानेवारीला ऑनलाइन बैठक ठरली होती. मात्र बैठक लांबणीवर पडली. ती अद्याप झाली नसताना दरम्यान पशुसंवर्धन आयुक्तांच्या अध्यक्षतेखाली एक बैठक झाली. यात पदविका-प्रमाणपत्रधारकांचा पदोन्नती कोटा रद्द करण्यात आला. एवढेच नाही तर, पशुधन अधिकारी पदाच्या सुधारित सेवाप्रक्रियेत प्रमाणपत्रधारकांसाठी असलेला १५ टक्के कोटा रद्द करून औरंगाबाद खंडपीठाच्या निरीक्षणाचा आधार घेत पाच टक्के कोटा पशुधन पर्यवेक्षक संवर्गातील पदविधारकांसाठी शिफारस करण्यात आली. ही तरतूद पक्षपाती व अनपेक्षित असल्याचा संघटनेचा आरोप आहे.

ही प्रक्रिया राबविताना पशुधन विकास अधिकारी (विस्तार) गट-अ पंचायत समिती स्तरावरील पदनामात बदल करून तालुका पशुसंवर्धन अधिकारी करण्याचा घाट घालण्यात आल्याचा संघटनेचा आरोप आहे. ही पदे अतांत्रिक असल्याने राज्यातील ३५७ तालुकास्तरांवरील पशुधन विकास अधिकारी (विस्तार) ही पदे पशुधन विकास अधिकारी गट ब साठी निश्चित आहे. संघटनेच्या विरोधामुळे याला स्थगिती देण्यात आली होती. ती उठविण्यात यावी, अशीही मागणी आहे. यासोबतच, वेतनस्तर सुधारणा, प्रवास भत्ता अशा अनेक मागण्यांचा यात समावेश आहे.

संघटनेच्या ११ मागण्या असून, त्यासाठी २०१७मध्ये आंदोलन करण्यात आले होते. मागण्या निकाली काढण्याचे आश्वासन तत्कालीन पशुसंवर्धन मंत्र्यांनी दिल्याने आंदोलन मागे घेण्यात आले होते. मात्र साडेतीन वर्षांनंतरही प्रश्न निकाली निघाले नाही, असे संघटनेचे म्हणणे आहे.