शहरं
Join us  
Trending Stories
1
पर्यावरणप्रेमींच्या तीव्र विरोधासमोर केंद्र सरकार झुकलं, ‘अरवली’ला वाचवण्यासाठी घेतला मोठा निर्णय   
2
बीडच्या ‘सह्याद्री देवराई’ला भीषण आग; अभिनेते सयाजी शिंदे यांनी जोपासलेली हजारो झाडे संकटात
3
थायलंड-कंबोडिया सीमेवरील विष्णूची मूर्ती बुलडोझरने पाडली, भारताने घेतला तीव्र आक्षेप  
4
बांगलादेशमध्ये हिंसाचार सुरूच, पेट्रोल बॉम्ब हल्ल्यानंतर आता मध्यरात्री ढाका विद्यापीठात मोडतोड
5
नाताळाच्या पूर्वसंध्येला बांगलादेशची राजधानी हादरली, पेट्रोल बॉम्बच्या स्फोटात एकाचा मृत्यू
6
नवीन वर्षात बदलणार काँग्रेसचं 'पॉवर' समीकरण; प्रियांका गांधींना मिळणार महत्त्वाची जबाबदारी
7
IPL 2026 आधीच RCBच्या स्टार खेळाडूला होणार अटक? तब्बल ५ कोटी मोजून घेतलंय संघात
8
पोलिसांवर गुन्हा दाखल करण्याच्या मागणीसाठी सक्षम ताटेची आई व प्रेयसीचा आत्मदहनाचा प्रयत्न, दिला निर्वाणीचा इशारा...
9
‘प्लॅन २०४९’, चीनची भारताच्या अरुणाचल प्रदेशवर नजर, लष्करी बळावर कब्ज्याची तयारी
10
"आम्हाला मतदान केलं तर प्रश्न सोडवू, पण दुसरीकडे केलं तर..."; नितेश राणेंचा मतदारांना इशारा
11
VIDEO: धावत्या ट्रेनमध्ये WWE स्टाईल राडा! 'इंटरसिटी'मध्ये प्रवाशांमध्ये तुफान हाणामारी
12
Sukesh Chandrashekhar : "माय लव्ह, हे तेच घर आहे जे..."; जेलमध्ये असलेल्या सुकेशने जॅकलिनला गिफ्ट केला आलिशान बंगला
13
Vijay Hazare Trophy: ४०० हून अधिक धावांचं लक्ष्य ४७.३ षटकांतच गाठलं, कर्नाटकच्या संघाची इतिहासात नोंद!
14
'मला पंतप्रधान मोदींना भेटायचे आहे', उन्नाव बलात्कार पीडिता राहुल गांधींना म्हणाली...
15
प्रेमविवाह फसला; लग्नाच्या दुसऱ्या दिवसापासून जोडपे झाले वेगळे, ८ दिवसांत घटस्फोट
16
Smartphones: २०२५ मधील 'टॉप ५' पैसा वसूल स्मार्टफोन, यादीत मोठ्या ब्रँड्सचा समावेश!
17
रेल्वे प्रवासादरम्यान माजी मंत्र्यांच्या बॅगवर चोरांचा डल्ला, फोन, रोख रक्कम आणि दागिने लंपास
18
इंडिगोच्या वर्चस्वाला धक्का; केंद्र सरकारकडून ‘या’ दोन नव्या विमान कंपन्यांना मान्यता
19
Prashant Jagtap Resignation: २७ वर्षांची साथ सोडली; प्रशांत जगतापांचा राष्ट्रवादी शरद पवार पक्षाला रामराम
20
“राहुल गांधींसारखे पार्ट टाइम राजकारणी होऊ नका, कठोर मेहनत घेत राहा”; नितीन नबीन यांचा संदेश
Daily Top 2Weekly Top 5

बिकट परिस्थितीत मनपा तिजोरीतील २८ कोटी परत गेले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 11, 2021 04:10 IST

लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : बिकट आर्थिक परिस्थितीत मनपा प्रशासनाचे रडगाणे सुरू आहे. दुसरीकडे राज्य सरकारकडून विविध विभागाला मिळणारा ...

लोकमत न्यूज नेटवर्क

नागपूर : बिकट आर्थिक परिस्थितीत मनपा प्रशासनाचे रडगाणे सुरू आहे. दुसरीकडे राज्य सरकारकडून विविध विभागाला मिळणारा निधी खर्च करण्यात प्रशासनाला अपयश आले आहे. वर्ष २०११-१२ शिक्षण विभागाला २८ कोटीचा निधी प्राप्त झाला होता. परंतु मनपा प्रशासनाला हा निधी खर्चच करता आलेला नाही. निधी अखर्चित राहिल्याने तो शासनाकडे परत करावा लागला. विशेष म्हणजे, मागील आठ वर्षात या निधीची प्रशासनाने स्थायी समितीला चाहुलही लागू दिली नाही.

देवेंद्र फडणवीस यांच्या मुख्यमंत्रिपदाच्या कार्यकाळात तेव्हा दोन वर्षापूर्वी ३०० कोटीचा विशेष निधी मनपाला मिळाला होता. त्यातील १३१.१२ कोटी मनपाला खर्च करता आले नाही. या रकमेवर ५.१० कोटीचे व्याजही मिळाले. हा निधी ३१ मार्चपर्यंत खर्च करण्याला मुदत दिल्यानंतर मनपा प्रशासन खडबडून जागे झाले. अखेर निधी खर्च करण्याचा निर्णय घेतला. एकूण १३६.२२ कोटी रकमेऐवजी आयुक्तांनी १३ आवश्यक कामासाठी १५६.५९ कोटी खर्च करण्याचा प्रस्ताव सर्वसाधारण सभेत ठेवला होता. याला मंजुरी देण्यात आली.

यावरून मनपा प्रशासनाकडे निधीची कमी नाही. नियोजनाचा अभाव असल्याने शहरातील नागरिकांना अडचणींचा सामना करावा लागत आहे. नगरसेवकांना प्रभागातील सिवरेज, अंतर्गत रस्ते, पावसाळी नाल्या दुरुस्तीसाठी फाईल घेऊन भटकंती करावी लागत आहे. त्यानंतरही लाख-दोन लाखाची फाईल मंजूर होत नाही. शिक्षण विभागाने २८ कोटीचा निधी खर्च केला असता तर विद्यार्थ्यांना सुविधा उपलब्ध झाल्या असत्या. मनपाच्या वित्त विभागाच्या हलगर्जीपणामुळे हा निधी परत जात असल्याचा आरोप केला जात आहे.

...

प्रशासनाला जाब विचारणार : झलके

शिक्षण सेस स्वरूपात मिळालेले २८ कोटी राज्य सरकारला परत गेल्याबाबत माहिती मिळाली आहे. इतकी मोठी रक्कम परत जात आहे. यासंदर्भात स्थायी समितीला कळू दिले नाही. हा विषय गंभीर आहे. स्थायी समितीच्या बैठकीत याचा प्रशासनाला जाब विचारणार असल्याची माहिती स्थायी समितीचे अध्यक्ष विजय झलके यांनी दिली. वित्त विभागाच्या हलगर्जीपणामुळे मनपाला अडचणींना सामोरे जावे लागत आहे. हा प्रकार खपवून घेतला जाणार नाही, असा इशाराही त्यांनी दिला.

....

विद्यार्थ्यांना टॅब मिळाले नाही

लॉकडाऊन कालावधीत खासगी शाळातील विद्यार्थ्यांना ऑनलाईन शिक्षण मिळाले. परंतु मनपा शाळातील विद्यार्थी गरीब कुटुंबातील असल्याने मोबाईल व लॅपटॉपअभावी त्यांना ऑनलाइंन शिक्षण घेता आले नाही. १० ते १२ वी पर्यंतच्या विद्यार्थ्यांना ऑनलाईन शिक्षण घेण्यासाठी टॅब उपलब्ध करण्यासाठी तीन कोटीची गरज होती. मात्र आर्थिक स्थितीमुळे यावर वेळीच निर्णय घेतला नाही.