शहरं
Join us  
Trending Stories
1
"तीनवेळा 'अल्लाहू अकबर' ओरडून गोळीबार सुरू झाला"; व्हायरल व्हिडीओमधल्या व्यक्तीचा खुलासा
2
नो मॅजिक! क्रिकेटच्या देवाने सांगितले १४ वर्षाच्या पोराच्या वादळी शतकी खेळीत दडलेले 'लॉजिक'
3
पाकिस्तानवर मोठा प्रहार करा! पहलगाम हल्ल्यानंतर जगभरातील भारतीयांची निषेध आंदोलने
4
Vaibhav Suryavanshi : १४ वर्षांच्या पोराचा धुमाकूळ! सिक्सर मारत ठोकली IPL मधील विक्रमी सेंच्युरी
5
विद्यार्थ्यांच्या मनामनात रुजणार भारतीय संविधानाची मूल्ये; नागपूर विद्यापीठाने तयार केला अभ्यासक्रम
6
आनंदाच्या भरात पायाला लागलंय ते विसरला! वैभवच्या शतकी खेळीला द्रविडनं अशी दिली दाद (VIDEO)
7
वेटिंगवाल्या प्रवाशांचा चक्क लिनन बॉक्समधून प्रवास! रेल्वे पोलिसांनी सहा जणांना केली अटक
8
IPL 2025 : वैभव सूर्यंवशीच्या ऐतिहासिक खेळीच्या जोरावर २०० पारच्या लढाईत राजस्थानचा 'रॉयल' विजय
9
विविध रेल्वे गाड्यांमधून दारूच्या एकूण १० हजार बाटल्या जप्त! मद्य तस्करीविरोधात मोठी कारवाई
10
लातूर जिल्ह्यातील हाडोळती येथे युवकाच्या खून प्रकरणी न्यायालयाकडून दाेघांना पोलीस काेठडी
11
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
12
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
13
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
14
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
15
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
16
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
17
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
18
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
19
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
20
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय

बिकट परिस्थितीत मनपा तिजोरीतील २८ कोटी परत गेले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 11, 2021 04:10 IST

लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : बिकट आर्थिक परिस्थितीत मनपा प्रशासनाचे रडगाणे सुरू आहे. दुसरीकडे राज्य सरकारकडून विविध विभागाला मिळणारा ...

लोकमत न्यूज नेटवर्क

नागपूर : बिकट आर्थिक परिस्थितीत मनपा प्रशासनाचे रडगाणे सुरू आहे. दुसरीकडे राज्य सरकारकडून विविध विभागाला मिळणारा निधी खर्च करण्यात प्रशासनाला अपयश आले आहे. वर्ष २०११-१२ शिक्षण विभागाला २८ कोटीचा निधी प्राप्त झाला होता. परंतु मनपा प्रशासनाला हा निधी खर्चच करता आलेला नाही. निधी अखर्चित राहिल्याने तो शासनाकडे परत करावा लागला. विशेष म्हणजे, मागील आठ वर्षात या निधीची प्रशासनाने स्थायी समितीला चाहुलही लागू दिली नाही.

देवेंद्र फडणवीस यांच्या मुख्यमंत्रिपदाच्या कार्यकाळात तेव्हा दोन वर्षापूर्वी ३०० कोटीचा विशेष निधी मनपाला मिळाला होता. त्यातील १३१.१२ कोटी मनपाला खर्च करता आले नाही. या रकमेवर ५.१० कोटीचे व्याजही मिळाले. हा निधी ३१ मार्चपर्यंत खर्च करण्याला मुदत दिल्यानंतर मनपा प्रशासन खडबडून जागे झाले. अखेर निधी खर्च करण्याचा निर्णय घेतला. एकूण १३६.२२ कोटी रकमेऐवजी आयुक्तांनी १३ आवश्यक कामासाठी १५६.५९ कोटी खर्च करण्याचा प्रस्ताव सर्वसाधारण सभेत ठेवला होता. याला मंजुरी देण्यात आली.

यावरून मनपा प्रशासनाकडे निधीची कमी नाही. नियोजनाचा अभाव असल्याने शहरातील नागरिकांना अडचणींचा सामना करावा लागत आहे. नगरसेवकांना प्रभागातील सिवरेज, अंतर्गत रस्ते, पावसाळी नाल्या दुरुस्तीसाठी फाईल घेऊन भटकंती करावी लागत आहे. त्यानंतरही लाख-दोन लाखाची फाईल मंजूर होत नाही. शिक्षण विभागाने २८ कोटीचा निधी खर्च केला असता तर विद्यार्थ्यांना सुविधा उपलब्ध झाल्या असत्या. मनपाच्या वित्त विभागाच्या हलगर्जीपणामुळे हा निधी परत जात असल्याचा आरोप केला जात आहे.

...

प्रशासनाला जाब विचारणार : झलके

शिक्षण सेस स्वरूपात मिळालेले २८ कोटी राज्य सरकारला परत गेल्याबाबत माहिती मिळाली आहे. इतकी मोठी रक्कम परत जात आहे. यासंदर्भात स्थायी समितीला कळू दिले नाही. हा विषय गंभीर आहे. स्थायी समितीच्या बैठकीत याचा प्रशासनाला जाब विचारणार असल्याची माहिती स्थायी समितीचे अध्यक्ष विजय झलके यांनी दिली. वित्त विभागाच्या हलगर्जीपणामुळे मनपाला अडचणींना सामोरे जावे लागत आहे. हा प्रकार खपवून घेतला जाणार नाही, असा इशाराही त्यांनी दिला.

....

विद्यार्थ्यांना टॅब मिळाले नाही

लॉकडाऊन कालावधीत खासगी शाळातील विद्यार्थ्यांना ऑनलाईन शिक्षण मिळाले. परंतु मनपा शाळातील विद्यार्थी गरीब कुटुंबातील असल्याने मोबाईल व लॅपटॉपअभावी त्यांना ऑनलाइंन शिक्षण घेता आले नाही. १० ते १२ वी पर्यंतच्या विद्यार्थ्यांना ऑनलाईन शिक्षण घेण्यासाठी टॅब उपलब्ध करण्यासाठी तीन कोटीची गरज होती. मात्र आर्थिक स्थितीमुळे यावर वेळीच निर्णय घेतला नाही.