शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतासोबत अतिशय घाणेरडा खेळ...! आसिम मुनीरच्या प्रेमात पडली अमेरिका, हे काय बोलले टॉप लष्करी कमांडर...?
2
महायुती अन् मविआच्याही एकसंधतेवर प्रश्नचिन्हच; पडघम वाजले, चित्र अस्पष्ट
3
शेअर बाजाराची सुस्त सुरुवात, ५६ अंकांच्या तेजीसह उघडला सेन्सेक्स; Infosys मध्ये घसरण, 'या' शेअर्समध्ये तेजी
4
RCB वर मोठी कारवाई होणार? BCCI बैठकीत काय निर्णय घेणार? समोर आली खास अपडेट
5
मुंबईत १६ वर्षाच्या मुलीवर अत्याचार, गर्भवती राहिल्यानंतर धक्कादायक प्रकार उघड, गुन्हा दाखल
6
Swami Samartha: राग, चिडचिड, नैराश्य घालवण्याचा रामबाण उपाय म्हणजे 'हा' स्वामी संदेश!
7
एक स्मार्ट डिसिजन EPFO कडून मिळवून देईल अधिक पेन्शन; वय आणि कमाईचं कनेक्शन बहुतेकांना माहीत नाही
8
हूल दिलेल्या मान्सूनची पुन्हा चाहूल; राज्यभर ऑरेंज अलर्ट, धो धो बरसणार
9
मराठा आरक्षणावरील सुनावणी १८ जुलैपासून, अंतिम निकालावरच भवितव्य अवलंबून
10
'महाभारत' सिनेमानंतर आमिर खान खरंच निवृत्ती घेणार? चर्चांवर म्हणाला, "आजकाल लोक..."
11
घटस्फोटानंतर दोन महिन्यातच एक्स पतीचं निधन, त्याच्या आठवणीत अभिनेत्री शुभांगी अत्रे भावुक
12
कोपरखैरणेत बेरोजगार पतीचं हादरवणारं कृत्य; पत्नीची मैत्रीण घरात शिरताच उडाला थरकाप
13
आजचे राशीभविष्य, १२ जून २०२५: आजचा दिवस यशदायी, पदोन्नती संभवते, मित्र भेटतील !
14
होमस्टेमध्ये सापडलेल्या 'त्या' गोष्टीमुळे पोलिसांना सोनमवर आला संशय; पुराव्याने हत्येचे गूढ उकले
15
अमेरिका आंदोलनाने पेटली, १२ राज्यांतील २५ शहरांत लोक उतरले रस्त्यावर; लॉस एंजिलिसमध्ये संचारबंदीनंतर आंदोलन चिरडून टाकण्याचा डोनाल्ड ट्रम्प यांचा प्रयत्न
16
सोनमचा भाऊ म्हणाला, तिला फाशीच द्या, कुटुंबाने नातेसंबंध तोडले; मिळाली पोलिस कोठडी
17
आंतरधर्मीय विवाह; कुटुंबांच्या संमतीने विवाह, तुम्ही आक्षेप कशाला घेता? सर्वोच्च न्यायालयाचा सवाल
18
काश्मीरसाठी थेट रेल्वे सुरू अन् पर्यटनाची गाडी येतेय रुळावर; १० दिवसांचे बुकिंग फुल्ल
19
शू रॅकवर बसल्याने मांजराला नवव्या मजल्यावरून फेकले, आरोपी शेजाऱ्याविरोधात गुन्हा दाखल
20
लोकल लेट का होते? ते शोधा, तरच अपघात कमी होतील, मुंब्रा दुर्घटनेच्या पार्श्वभूमीवर प्रवासी संघटनांचे मत

‘मतभेद’ असणाऱ्या साहित्यिक-संस्थांचे ‘मनभेद’ चव्हाट्यावर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 28, 2019 11:47 IST

विदर्भ संशोधन मंडळाचे द्विदिवसीय राष्ट्रीय अन्य मराठी साहित्य संमेलन २३ व २४ नोव्हेंबर रोजी पार पडले, तर मूर्तिजापूर येथील सृजन साहित्य संघाच्या नागपूर शाखेद्वारे एकदिवसीय मराठी साहित्य संमेलन २४ नोव्हेंबर रोजी पार पडले.

ठळक मुद्दे द्विदिवसीय साहित्य संमेलनात खुर्च्या रिकाम्याएकतेचे धडे देणारेच गिरवीत आहेत ‘एकला चलो रे’ची भूमिका

प्रवीण खापरे।लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : शृंगार, सामाजिक जाणिवा, क्रांती, इतिहास आणि प्रबोधनाचे डोज पाजणाºया साहित्यिकांमध्ये कायम मतभेद असतात, हे सिद्ध करण्याची गरज नाही. वैचारिकदृष्ट्या भिन्न प्रवाहांचे उद्गाते आणि अशा गटांचे नेतृत्व साहित्यिकच करीत असतात. त्यामुळे मतभेदासोबतच त्यांच्यात कमालीचे मनभेद असतात, हे स्पष्टच आहे. आपल्या विचारांना जाहीरपणे प्रकट करण्याचे व्यासपीठ असणाºया संमेलनाला हे सगळे एकत्र येत असतात, हेही तेवढेच खरे आहे. असे असतानाही, संमेलनात खुर्च्या रिकाम्या असल्याने, त्यांच्यातील मनभेद तीव्र झाल्याचे संकेत मिळत आहेत. ही खदखद नागपुरात नुकत्याच पार पडलेल्या एक आणि द्विदिवसीय साहित्य संमेलनातून उघडकीस आली आहे. विशेष म्हणजे, ही दोन्ही संमेलने राज्यस्तरीय होती.महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळाकडून प्राप्त झालेल्या अनुदानातून नागपुरात दोन राज्यस्तरीय साहित्य संमेलने पार पडली. विदर्भ संशोधन मंडळाचे द्विदिवसीय राष्ट्रीय अन्य मराठी साहित्य संमेलन धरमपेठेतील वनामतीच्या सभागृहात २३ व २४ नोव्हेंबर रोजी पार पडले, तर मूर्तिजापूर येथील सृजन साहित्य संघाच्या नागपूर शाखेद्वारे एकदिवसीय मराठी साहित्य संमेलन २४ नोव्हेंबर रोजी राजाबाक्षा येथील पं. बच्छराज व्यास विद्यालयाच्या सभागृहात पार पडले. या दोन्ही साहित्य संमेलनाला साहित्यिकांच्या सृजनशीलतेचा झरा आटलेलाच दिसून आला. जणू ही संमेलने केवळ संस्थात्मक सदस्यांसाठीचीच होती की काय, असा संशय निर्माण होत होता. या दोन्ही संमेलनात जुने साहित्य संचित आणि नवी साहित्यनिर्मिती या विषयांना केंद्रस्थानी ठेवण्यात आले होते. साहित्य निर्मितीचा झरा आटलेला आहे, त्याचे आधुनिक कारण आणि लोकसाहित्याकडे होत असलेले दुर्लक्ष... हे विषय या दोन्ही संमेलनातील विविध चर्चासत्रांतून विशेषत्वाने उल्लेखित झाले. मात्र, हे चर्चासत्र होते कुणासाठी? या प्रश्नाचे उत्तर दोन्ही साहित्य संमेलनात असलेल्या रिकाम्या खुर्च्यांवरून कुठलाही आटापिटा न करता सहजच मिळत होते. समाजातील सामान्य घटकांप्रमाणे साहित्यिकांमधील दुसऱ्यांचे ऐकण्याची वृत्ती, संयम खुंटत असल्याचेच ‘रिकाम्या खुर्च्या’ हे प्रतीक ठरले.अनेकांनी मारली दांडीया दोन्ही साहित्य संमेलनाला अनेक ज्येष्ठ आणि श्रेष्ठ साहित्यिकांनी दांडीच मारली. नागपूर आणि विदर्भात राष्ट्रस्तरावर नावाजलेले अनेक साहित्यिक आहेत. काही जणांनी महामंडळांसारख्या संस्थांचे नेतृत्वही केले आहे, तर काहींचा शब्द सर्वांसाठी प्रमाण असतो, अशीही मान्यवर मंडळी आहे. मात्र, दांडी मारण्याचे पातक त्यांच्याकडून झाले आणि साहित्य क्षेत्रात याबाबत नव्या दमाच्या युवकांमध्ये उदासीनता पसरली गेली आहे.साहित्यिकांना संशोधनात रस नाहीविदर्भ संशोधन मंडळाच्या द्विदिवसीय साहित्य संमेलनात लोकसाहित्य आणि ललितसाहित्य या विषयांना केंद्रस्थानी घेतले गेले होते. मात्र, साहित्यिकांना लोकसाहित्यात रस नसल्यानेच या संमेलनाकडे त्यांनी पाठ फिरवली असल्याचे अनेकांच्या अनुपस्थितीवरून स्पष्ट झाले.मग, यांना बोलण्याचा अधिकार आहे का?लहान साहित्य संमेलनात मोठ्यांनी येऊ नये आणि याच मोठ्यांना ऐकण्यासाठी गर्दी होत नसल्यावरच हेच मोठे मान्यवर अनुपस्थितांच्या नावाने बोटे मोडत असल्याचे अनेकदा जाहीर व्यासपीठावरून दिसून आले आहे. आता स्वत:च अशा संमेलनाला दांडी मारत असतील, तर मग यांना बोलण्याचा अधिकार तरी कुठला, असा प्रश्न उपस्थित होत आहे.

टॅग्स :literatureसाहित्य