शहरं
Join us  
Trending Stories
1
'ते विधान राहुल गांधींचे नाही, मी परस्परच..."; वकिलाचा यू-टर्न, जिवाला धोका असल्याच्या वक्तव्याबद्दल काय बोलले?
2
Arjun Tendulkar Engagement :अर्जुन तेंडुलकरची होणारी बायको, साराची खास मैत्रिण; सानिया चांडोकचे फोटो पाहा
3
Arjun Tendulkar Engagement : चांडोकांची लेक होणार सचिन तेंडुलकरची सून; मुंबईत पार पडला अर्जुन सानियाचा साखरपुडा
4
कबुतरखाने प्रकरणात राज ठाकरेंना साकडे; पण बाळा नांदगावकर स्पष्टच बोलले, कुणाला सुनावले?
5
धक्कादायक! जमिनीच्या वादातून भर चौकात नवरा-बायकोला संपवले; कोयत्याने वार
6
महायुतीत समन्वय समितीच्या बैठका वेळेवर होत नाही, महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे नी दिली कबुली
7
'आमचे कोणतेही लष्करी मित्र नाहीत, फक्त भारतीय नौदलाकडे धाडस'; फिलिपिन्सच्या राजदूतांची पाश्चात्य देशांवर टीका
8
Fatehpur Tomb Controversy: ज्यांच्या मकबऱ्यामध्ये मंदिर असल्याचा दावा, ते नवाब अब्दुल समद कोण?
9
RR नं संजूच्या बदल्यात जड्डू अन् ऋतुराजला मागितले! CSK ला ते अजिबात नाही पटलं; ट्रेड डील फिस्कटली
10
सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांनी 'ऑपरेशन सिंदूर' आणि 'स्वदेशी' विषयी जनजागृती करावी - CM देवेंद्र फडणवीस
11
Video: राहुल गांधींची 'मृत' लोकांसोबत 'चाय पे चर्चा', निवडणूक आयोगाने मारल्याचा आरोप...
12
गणेशोत्सवासाठी कोकणवासीयांना खुशखबर! मुंबई-गोवा महामार्गाबाबत धडक कारवाईचे आदेश
13
"हा वादाचा नव्हे, समाजाचा विषय; आरोग्य अन् आस्था..."; CM फडणवीसांचे कबुतरखाना वादावर विधान
14
Trump's Tariff Policy : ट्रम्प यांचा डाव उलटला! टॅरिफमुळे भारत अन् चीन एकत्र आले; अमेरिकेने स्वतःच्या पायावर कुऱ्हाड मारली?
15
निशिकांत दुबेला भाजपा नेत्यानेच कशी दिली मात?; कॉन्स्टिट्यूशन क्लब निवडणुकीत तोंडावर पाडले
16
Palghar Crime: धक्का लागला म्हणून कुऱ्हाडीने केले वार, लोकांनी झाडाला बांधून आरोपी चोपला
17
चहलला जळवण्यासाठी बिग बॉस विनरसोबत थिरकली धनश्री? व्हायरल व्हिडिओ मागची गोष्ट
18
"आम्हाला नाही माहीत, पाकिस्तानला...!"; ऑपरेशन सिंदूर दरम्यान एफ-१६ लढाऊ विमान पाडलं गेलं? अमेरिकेनं दिलं असं उत्तर
19
सावरकरांवरील विधानांमुळे माझ्या जीवितास धोका, राहुल गांधींचा दावा, महात्मा गांधींचा उल्लेख करत म्हणाले... 
20
Kabutar Khana: 'तुम्ही असा आदेश कसा काढू शकता?', उच्च न्यायालयाने मुंबई महापालिकेला झापले; काय घडलं?

फरक हेअर स्टाईलमध्येच!

By admin | Updated: July 27, 2014 01:27 IST

कनक आणि कस्तुरी म्हणजे जुळ्या मुली. या दोघींच्या सारख्या दिसण्याने अनेकांचा गोंधळ उडतो. नेमकी कनक कोण आणि कस्तुरी कोण, याचा पेच लोकांना पडताना पाहून आई-वडिलांची हसून हसून तारांबळ उडते.

शेजारी आणि नातेवाईकांची तरीही फसगत ठरलेलीच नागपूर : कनक आणि कस्तुरी म्हणजे जुळ्या मुली. या दोघींच्या सारख्या दिसण्याने अनेकांचा गोंधळ उडतो. नेमकी कनक कोण आणि कस्तुरी कोण, याचा पेच लोकांना पडताना पाहून आई-वडिलांची हसून हसून तारांबळ उडते. आता दोघीही मोठ्या झाल्या आहेत आणि त्यांना एकमेकांसारखे दिसायला आवडत नाही. त्यामुळेच त्यांच्या दिसण्यातही थोडा फरक झाला आहे. पण साधारणत: जुळ्या बहिणींचे स्वभाव सारखे असतात तसे मात्र कनक - कस्तुरीचे नाही. कनकला जोक्स आवडतात आणि कस्तुरीला कसलाच जोक्स केलेले आवडत नाहीत. श्याम आणि अंजली निसाळ हे सुरेल दाम्पत्य कनक- कस्तुरीचे आई-वडील आहेत. घरातच संगीत असल्याने आणि घरीच संगीत विद्यालय असल्याने दोघींनाही संगीताची आवड आहे. दोघींची एक सवय मात्र सारखी आहे. दोघी एकमेकींशी खूप भांडतात पण झोपतात एकत्रच आणि उठायची वेळ सारखी. संगीताची आवड दोघींनाही असल्याने दोघीही गिटार आणि सतार तसेच तबलाही शिकत आहेत. यातली कनक जरा मॉड आहे. तिला आधुनिक पेहराव आवडतो तर कस्तुरीला भारतीय -पाश्च्यात्त्य यांचे फ्युजन असलेले वस्त्र आवडतात. कनक भिडस्त, बडबड करणारी, मोकळीढाकळी तर कस्तुरी लाजाळूचं झाड, नेमकेपणानेच बोलणारी. पण कस्तुरी न बोलताही आपले काम काढून घेते, असे कनकचे मत आहे. दोघींनाही स्पोर्ट्सची आवड आहे. अ‍ॅथ्लेटिक्स, लाँग जम्प, खो-खो आणि एनसीसीत दोघीही सोबत होत्या. नुकत्याच त्या उत्तराखंडला ट्रेकिंग कॅम्पसाठी गेल्या होत्या. दोघींच्या भांडणाने कॅम्प मधले सारेच हैराण झाले होते. त्यांचे भांडण होऊ नये दोघींना वेगवेगळ्या खोलीत ठेवले होते.आई अंजली म्हणाल्या, लहानपणी कस्तुरीने बदमाशी केली आणि बाबांचा मार कनकला खावा लागला होता. त्यावेळी बाबांनाच फरक कळला नव्हता. लहानपणी दोघींना औषध देताना तारांबळ उडायची. तेव्हा कनकच्या पायाला ओळखीसाठी लाल रिबिन बांधून ठेवली होती. दोघींनीही यंदाच आर. एस. मुंडले शाळेतून दहावी उत्तीर्ण केले आहे. यात कनकला ८८ टक्के तर कस्तुरीला ८६ म्हणजे जवळपास सारखेच गुण मिळाले. दोघींच्याही मैत्रिणी वेगवेगळ्या आहेत. एकमेकींच्या ग्रुप्समध्ये त्या जातच नाही, त्यामुळे मैत्रिणींचा गोंधळ होण्याचा धोकाच नाही. सध्या दोघीही अकरावीत पं. बच्छराज व्यास विद्यालयात संगणक विज्ञान शिकत आहेत. पूर्वी होणारी फसगत मात्र आता होत नाही.