शहरं
Join us  
Trending Stories
1
Delhi blast: हाडे तुटली, आतडी फाटली अन्...; दिल्ली स्फोटातील मृतकांचे भयावह पोस्टमोर्टम रिपोर्ट
2
Parvez Ansari: की-पॅड मोबाईल, आंतरराष्ट्रीय सीमकार्ड अन्...; अन्सारीच्या घरात 'एटीएस'ला काय काय मिळाले?
3
दहशतवाद्यांचा स्लीपर सेल...! मुंब्र्यातून उर्दू शिक्षकाला अटक; अल कायदाशी संबंध, एटीएसला मोठा सुगावा लागला...
4
Munbai Local: धावत्या लोकलमध्ये ३० वर्षीय महिलेसोबत घृणास्पद प्रकार, प्रवाशांमध्ये संताप!
5
Crime News : सांगलीत ‘मुळशी पॅटर्न’सारखी हत्या! वाढदिवसाच्या दिवशीच रक्तरंजित शेवट; धक्कादायक कारण आले समोर
6
दिवाळीदरम्यानच करणार होते ब्लास्ट, पण...; दिल्ली बॉम्बस्फोट प्रकरणात धक्कादायक खुलासा!
7
हळव्या मनाचा कणखर बाप! लेकीसाठी ९०० किमीचा प्रवास, युनिव्हर्सिटीबाहेर लावला 'घरच्या जेवणा'चा स्टॉल
8
एकेकाळी दूरसंचार क्षेत्रात होतं वर्चस्व! आता २ लाख कोटी रुपये थकीत; सरकारकडे मदतीसाठी याचना
9
एका रात्रीत 'नॅशनल क्रश' बनली मराठमोळी गिरीजा ओक, निळ्या साडीतील फोटो व्हायरल, अभिनेत्रीचं वय ऐकून बसेल धक्का
10
Vastu Tips: पोपटाला आकर्षून घेणे म्हणजे धन-सुखाला आमंत्रण; तो नियमित यावा म्हणून खास टिप्स!
11
"तुम्हा दोघांना टीम इंडियात खेळायचं असेल तर..." रोहित-विराटला BCCIनी दिली शेवटची 'वॉर्निंग'
12
गुप्त दौरा... अन डील पक्की...! इस्रायल भारताला दोन शक्तिशाली क्षेपणास्त्रे देणार; पाकिस्तान, चीन सगळेच टप्प्यात...
13
Delhi Blast : "मला डिस्टर्ब करू नका, महत्त्वाचं काम करतोय..."; कुटुंबाशी अनेक महिने बोलायचा नाही उमर
14
६ हजार तपासणी मोहिमा, २ लाख प्रवाशांवर कारवाई; कोकण रेल्वेने वसूल केला १५ .२१ कोटींचा दंड
15
गाड्या पुढे सरकल्या अन्....; दिल्ली कार स्फोटाचा 'तो' भीषण VIDEO पहिल्यांदाच समोर, CCTV पडले बंद
16
IPL 2026 : विराटच्या RCB वर बंगळुरुकरांना निरोप देण्याची वेळ; पुणेकर पाहुणचारासाठी नटले!
17
३० हजारांपेक्षा कमी आहे सॅलरी तरी, SIP द्वारे बनवू शकता १ कोटींचा फंड; महिन्याला किती करावी लागेल गुंतवणूक?
18
"सकाळी मुलीला शाळेत सोडायला गेली अन् पतीसह एकाने बंधक बनवले, मग..."; IAS पत्नीचा खळबळजनक दावा
19
Accident:पोलीस व्हॅनच्या धडकेत एकाच कुटुंबातील तिघांचा मृत्यू, परिसरात हळहळ!
20
२३ नोव्हेंबरपर्यंत कोकण रेल्वेवर मेगा ब्लॉक; सेवांवर मोठा परिणाम, तुमचं तिकीट याच वेळेत आहे?

फरक हेअर स्टाईलमध्येच!

By admin | Updated: July 27, 2014 01:27 IST

कनक आणि कस्तुरी म्हणजे जुळ्या मुली. या दोघींच्या सारख्या दिसण्याने अनेकांचा गोंधळ उडतो. नेमकी कनक कोण आणि कस्तुरी कोण, याचा पेच लोकांना पडताना पाहून आई-वडिलांची हसून हसून तारांबळ उडते.

शेजारी आणि नातेवाईकांची तरीही फसगत ठरलेलीच नागपूर : कनक आणि कस्तुरी म्हणजे जुळ्या मुली. या दोघींच्या सारख्या दिसण्याने अनेकांचा गोंधळ उडतो. नेमकी कनक कोण आणि कस्तुरी कोण, याचा पेच लोकांना पडताना पाहून आई-वडिलांची हसून हसून तारांबळ उडते. आता दोघीही मोठ्या झाल्या आहेत आणि त्यांना एकमेकांसारखे दिसायला आवडत नाही. त्यामुळेच त्यांच्या दिसण्यातही थोडा फरक झाला आहे. पण साधारणत: जुळ्या बहिणींचे स्वभाव सारखे असतात तसे मात्र कनक - कस्तुरीचे नाही. कनकला जोक्स आवडतात आणि कस्तुरीला कसलाच जोक्स केलेले आवडत नाहीत. श्याम आणि अंजली निसाळ हे सुरेल दाम्पत्य कनक- कस्तुरीचे आई-वडील आहेत. घरातच संगीत असल्याने आणि घरीच संगीत विद्यालय असल्याने दोघींनाही संगीताची आवड आहे. दोघींची एक सवय मात्र सारखी आहे. दोघी एकमेकींशी खूप भांडतात पण झोपतात एकत्रच आणि उठायची वेळ सारखी. संगीताची आवड दोघींनाही असल्याने दोघीही गिटार आणि सतार तसेच तबलाही शिकत आहेत. यातली कनक जरा मॉड आहे. तिला आधुनिक पेहराव आवडतो तर कस्तुरीला भारतीय -पाश्च्यात्त्य यांचे फ्युजन असलेले वस्त्र आवडतात. कनक भिडस्त, बडबड करणारी, मोकळीढाकळी तर कस्तुरी लाजाळूचं झाड, नेमकेपणानेच बोलणारी. पण कस्तुरी न बोलताही आपले काम काढून घेते, असे कनकचे मत आहे. दोघींनाही स्पोर्ट्सची आवड आहे. अ‍ॅथ्लेटिक्स, लाँग जम्प, खो-खो आणि एनसीसीत दोघीही सोबत होत्या. नुकत्याच त्या उत्तराखंडला ट्रेकिंग कॅम्पसाठी गेल्या होत्या. दोघींच्या भांडणाने कॅम्प मधले सारेच हैराण झाले होते. त्यांचे भांडण होऊ नये दोघींना वेगवेगळ्या खोलीत ठेवले होते.आई अंजली म्हणाल्या, लहानपणी कस्तुरीने बदमाशी केली आणि बाबांचा मार कनकला खावा लागला होता. त्यावेळी बाबांनाच फरक कळला नव्हता. लहानपणी दोघींना औषध देताना तारांबळ उडायची. तेव्हा कनकच्या पायाला ओळखीसाठी लाल रिबिन बांधून ठेवली होती. दोघींनीही यंदाच आर. एस. मुंडले शाळेतून दहावी उत्तीर्ण केले आहे. यात कनकला ८८ टक्के तर कस्तुरीला ८६ म्हणजे जवळपास सारखेच गुण मिळाले. दोघींच्याही मैत्रिणी वेगवेगळ्या आहेत. एकमेकींच्या ग्रुप्समध्ये त्या जातच नाही, त्यामुळे मैत्रिणींचा गोंधळ होण्याचा धोकाच नाही. सध्या दोघीही अकरावीत पं. बच्छराज व्यास विद्यालयात संगणक विज्ञान शिकत आहेत. पूर्वी होणारी फसगत मात्र आता होत नाही.