शहरं
Join us  
Trending Stories
1
आधी सिंधू करार थांबवला, आता पाकिस्तानच्या वरिष्ठ राजदूताला बोलावले, आणखी एक मोठी कारवाई
2
पहलगाममधील दहशतवादी हल्ल्यामुळे २१,००० कोटी पणाला, काश्मीरच्या अर्थव्यवस्थेची मोठी हानी, देशाला होणार हे १० तोटे 
3
पहलगाम दहशतवादी हल्ला : मृत जगदाळेंच्या कुटुंबीयांनी शरद पवारांना सांगितली आपबिती; संसदेत मुद्दा उचलण्याची केली मागणी
4
भाच्यासोबतच अनैतिक संबंध अन् पतीची हत्या, दोन तुकडे करून मृतदेह ट्रॉली बॅगमध्ये टाकला; पण...
5
Stock Market Today: ७ दिवसांच्या तेजीनंतर शेअर बाजार सुस्तावला, Sensex मध्ये १४० अंकांची घसरण; Tata Consumer, Eternal, ONGC टॉप लूझर्स
6
सिंधू पाणी करार थांबवल्याने पाकिस्तानचं टेन्शन वाढलं! भारताला जोरदार प्रत्युत्तर देण्याच्या तयारीत
7
'माझ्या मुलाला कसं सांगू की त्याचे वडील आता परत येणार नाहीत', महिलेने विमानतळावर पोहोचताच फोडला टाहो
8
ना अदानी, ना अंबानी; 'या' भारतीय अब्जाधीशानं आतापर्यंत केली सर्वाधिक कमाई
9
"गेल्या महिन्यात काश्मीरला जायचा विचार करत होतो...", पहलगाममधील दहशतवादी हल्ल्यानंतर प्रसाद खांडेकरची पोस्ट
10
धर्म विचारून गोळी झाडण्याची ही काही पहिलीच वेळ नाही; याआधी कधी घडली होती घटना?
11
पहलगाम हल्ल्यानंतर भारताचा पाकवर कायदेशीर स्ट्राईक; पाकिस्तानची आज बैठक
12
Ather Energy चा IPO येणार, निश्चित झाला प्राईज बँड; 'या' तारखेपासून करता येणार गुंतवणूक, पाहा डिटेल्स
13
आजचे राशीभविष्य, २४ एप्रिल २०२५: नोकरदारांना आजचा दिवस शुभ आहे
14
जम्मू-काश्मिरात अडकलेल्या पर्यटकांचे पहिले विमान आज मुंबईत येणार; ८३ जणांमध्ये कोणा-कोणाचा समावेश?
15
१५,००० जणांनी कॅन्सल केलं काश्मीरचे विमान तिकीट; पहलगाम हल्ल्यानंतर पर्यटनाचा बेत रद्द
16
Pahalgam Terror Attack: भारत झुकणार नाही, कुणालाही सोडणार नाही; गृहमंत्री अमित शाह यांचा इशारा
17
हादरलेल्या काश्मीरमध्ये आजही महाराष्ट्र, गुजरातचे २०,००० पर्यटक; हॉटेलमध्ये मुक्काम
18
धर्मादाय रुग्णालयांवर आता तपासणी पथकाचा वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे निर्देश
19
आम्ही आमच्या देशात सुरक्षित आहोत का?; डाेंबिवलीकरांचा संंतप्त सवाल
20
अजूनही पर्यटकांची पहिली पसंती काश्मीरलाच; हल्ल्याचा परिणाम तात्पुरता, सर्व सुरळीत होण्याची आशा

नागपूर विभागात आता धावणार नाही डिझेल इंजिन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 19, 2020 20:20 IST

आता मध्य रेल्वेच्या नागपूर विभागात एकही डिझेल इंजिन रेल्वे रुळावर धावताना दिसणार नाही.

ठळक मुद्देमध्य रेल्वेच्या नागपूर विभागात १०० टक्के विद्युतीकरण

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : एकेकाळी वाफेवर रेल्वे इंजिन धावत होते. त्यानंतर डिझेल इंजिनाचा शोध लागला. परंतु त्यामुळे होणारे प्रदूषण पाहता इलेक्ट्रिक इंजिनाचा पर्याय समोर आला. परंतु मध्य रेल्वेच्या नागपूर विभागात बहुतांश ठिकाणी डिझेल इंजिन धावत होते. हळूहळू विद्युतीकरणाचे काम हाती घेण्यात आले. बहुप्रतीक्षित वणी- पिंपळखुटी मार्गावरही विद्युतीकरण करण्यात आल्यामुळे आता मध्य रेल्वेच्या नागपूर विभागात एकही डिझेल इंजिन यापुढे रुळावर दिसणार नाही.मध्य रेल्वेच्या नागपूर विभागात यवतमाळ जिल्ह्यातील वणी-पिंपळखुटी या एकमेव मार्गावर डिझेल इंजिन धावत होते. परंतु अलीकडेच या मार्गाचे विद्युतीकरण करण्यात आले आहे. यापूर्वी या मार्गावर वीज नसल्याने वणी रेल्वेस्थानकावर रेल्वेगाडीला डिझेल इंजिन जोडण्यात येत होते. डिझेल इंजिनामुळे रेल्वेगाड्यांचा वेग खूपच कमी राहत असल्यामुळे प्रवास कंटाळवाणा वाटत होता. नागपूर रेल्वेस्थानकावरून गाडी सुटल्यानंतर सेवाग्राम, माजरी, वणी, पिंपळखुटी, आदिलाबाद या मार्गाने तेलंगणात जात होती. आता या मार्गावर विद्युतीकरण झाल्यामुळे रेल्वेगाडीचा वेग वाढला असून प्रवाशांना वेळेत आपल्या गावाला पोहोचता येणार आहे. मध्य रेल्वेच्या नागपूर विभागाचे कार्यक्षेत्र पिंपळखुटीपर्यंत आहे. पिंपळखुटी ते आदिलाबाद हा भाग दक्षिण-मध्य रेल्वेच्या अंतर्गत येतो. या मार्गावरही विद्युतीकरणाचे काम युद्धपातळीवर सुरू आहे. वणी-पिंपळखुटी या मार्गावर विद्युतीकरण झाल्यामुळे आता मध्य रेल्वेच्या नागपूर विभागात एकही डिझेल इंजिन रेल्वे रुळावर धावताना दिसणार नाही.मध्य रेल्वेच्या नागपूर विभागात १०० टक्के विद्युतीकरणाचे काम पूर्ण झाले आहे. त्यामुळे यानंतर रेल्वे रुळावर एकही डिझेल इंजिन धावताना दिसणार नाही.- सोमेश कुमार, विभागीय रेल्वे व्यवस्थापक, मध्य रेल्वे, नागपूर विभाग.

 

टॅग्स :Indian Railwayभारतीय रेल्वे