शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
2
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
3
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
4
राहुरीत शरद पवार गटाचा उमेदवार ठरला, गोविंद मोकाटे निवडणूक लढवणार, प्राजक्त तनपुरेंची माघार?
5
७ दिवसांत दुप्पट झाला 'हा' शेअर; १००% पेक्षा अधिक वाढली किंमत, IPL टीमची मालक आहे कंपनी
6
इराण-इस्रायल संघर्षाचा भारतीय PMI वर परिणाम! सर्व्हिस सेक्टरची गती मंदावली; महागाईने कंबरडे मोडणार?
7
सलग तीन पराभवनानंतर CSK साठी गुड न्यूज, धोनी आणि ब्रेव्हिस ‘या’ सामन्यातून करणार पुनरागमन 
8
Petrol Price In US: ट्रम्प यांच्या निर्णयाचा अमेरिकेच्या लोकांनाच फटका; पेट्रोलच्या दरात जून २०२२ नंतरची सर्वात मोठी वाढ
9
लग्नाच्या पहिल्याच रात्री नववधूला...! नवरदेवाने थेट गाठले पोलीस स्टेशन; आग्र्यातील धक्कादायक घटना
10
बंगळुरू-चेन्नई लढतीत पाण्याच्या बाटलीवरून वाद, RCBचा कर्णधार पंचावर भडकला, नेमकं घडलं काय?
11
अमेरिका-इराणमध्ये आजच युद्धविराम?, ४८ तास महत्त्वाचे; पाकिस्तानचा पुढाकार, रातोरात सूत्रे हलली
12
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातच्या 'तृप्तबाला'वर लक्ष ठेवण्यासाठी समर्थकांची खतरनाक 'मोडस ऑपरेंडी'
13
सोन्या-चांदीच्या दरात मोठी तेजी; Gold २ हजारांपेक्षा, तर Silver ६ हजारांपेक्षा अधिकनं महागलं; टेक करा नव्या किमती
14
गोरेगावात तुफान राडा, पोलिसांची थेट बुलडोझर कारवाई; सोमय्या घटनास्थळी 'हनुमान चालीसा' पठण करणार
15
टोयोटा 'इनोव्हा क्रिस्टा' कायमची बंद होणार? डिझेल MPV प्रेमींना मोठा धक्का; खरेदीसाठी शेवटची संधी!
16
हात-पाय गमावले, जिद्द सोडली नाही; 18 वर्षीय पायल नागने वर्ल्ड पॅरा आर्चरी सीरिजमध्ये जिंकले 'गोल्ड'
17
राष्ट्रवादी काँग्रेस विलीनीकरणाच्या चर्चांना पूर्णविराम! खासदार अमर काळे यांनी स्पष्ट केली भूमिका; विलीनीकरणाचा विषय आता बंद?
18
"तू फक्त माझाच आहेस, पत्नीला घटस्फोट दे"; प्रेयसीचा हट्ट, कंटाळून शिक्षकाने केली आत्महत्या
19
Ashok Kharat : राजकारण तापलं! भोंदू अशोक खरातचे कॉल डिटेल्स कसे काय बाहेर आले?
20
Reliance Industries च्या शेअर्समध्ये जोरदार घसरण, गुंतवणूकदारांना ३५ हजार कोटींचा फटका; कारण काय?
Daily Top 2Weekly Top 5

कोरोनाने मरेन पण गावभर फिरेन !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 8, 2021 00:19 IST

Die by Corona but wandering village! किराणा, भाजीपाला, फळे, दूध डेअरी, बेकरी आदी दुकाने सकाळी ११ वाजेपर्यंत सुरू ठेवण्याचे निर्बंध असल्याने लोकांची खरेदीसाठी सकाळपासूनच गर्दी दिसून येत आहे. यादरम्यान अनेकजण मास्कचा उपयोग करीत नाहीत. त्यामुळे कोरोना महामारीचे संकट दिवसेंदिवस वाढतच आहे. काही नागरिक काम नसतानाही फेरफटका मारण्यासाठी घराबाहेर पडत आहेत. कोरोनाने मरेन पण गावभर फिरेन, असे काहीसे चित्र दिसून येत आहे.

लोकमत न्यूज नेटवर्क

नागपूर : किराणा, भाजीपाला, फळे, दूध डेअरी, बेकरी आदी दुकाने सकाळी ११ वाजेपर्यंत सुरू ठेवण्याचे निर्बंध असल्याने लोकांची खरेदीसाठी सकाळपासूनच गर्दी दिसून येत आहे. यादरम्यान अनेकजण मास्कचा उपयोग करीत नाहीत. त्यामुळे कोरोना महामारीचे संकट दिवसेंदिवस वाढतच आहे. काही नागरिक काम नसतानाही फेरफटका मारण्यासाठी घराबाहेर पडत आहेत. कोरोनाने मरेन पण गावभर फिरेन, असे काहीसे चित्र दिसून येत आहे.

नागपुरातील इतवारी, मस्कासाथ, गोळीबार चौक, गांधीबाग, सक्करदरा, नंदनवन या परिसराची पाहणी केली असता या भागातील दुकानांमध्ये ग्राहकांची सर्वाधिक गर्दी पाहायला मिळाली. इतवारी ठोक किराणा बाजारात सकाळी ७ वाजेपासून किरकोळ किराणा दुकानदार आणि नागरिक खरेदीसाठी येतात. हीच स्थिती शहरातील विविध भागातील किराणा दुकानांची आहे. आधी वस्तू मिळाव्यात म्हणून नागरिक सोशल डिस्टन्सिंगचे पालन करीत नाही. याशिवाय दूध डेअरी व बेकरींमध्येही हीच परिस्थिती पाहायला मिळते. दुकाने ११ वाजता बंद होत असल्याने लोक खरेदीसाठी तुटून पडतात. यावेळी सर्वजण मास्क, सॅनिटायझर आणि सोशल डिस्टन्सिंगच्या नियमांचे पालन करीत नाहीत. याकडे प्रशासन आणि पोलिसांचे दुर्लक्ष असल्याने नागरिकांसह दुकानदारही बेफिकिरीने वागत आहेत. कोरोनाची रुग्णसंख्या वाढू लागल्याने पुन्हा लॉकडाऊनचे नवे संकट उभे ठाकले आहे. लॉकडाऊन प्रशासन आणि सामान्य नागरिकांपैकी कुणालाही परवडणारे नसल्याने नागरिकांनी मास्क व सामाजिक दुराव्याचे पालन करणे हा एकमेव उपाय आहे.

भाजी बाजारात खरेदीसाठी गर्दी

सकाळी सक्करदरा, रमणा मारोती व नंदनवन परिसरातील भाजी बाजारात ग्राहकांची मोठ्या प्रमाणात गर्दी होती. विक्रेत्यांनीही सोशल डिस्टन्सिंगचे पालन न करता जवळजवळ दुकाने थाटली होती. त्यामुळे विक्रेत्यांकडे जास्त गर्दी होती. अशा गर्दीमुळे कोरोनाचा संसर्ग वाढण्याची जास्त शक्यता दिसून आली. अशावेळी विक्रेत्यांना सांगायला मनपाचे कर्मचारी येत नाहीत. ११ वाजले की पोलीस दुकाने बंद करण्यासाठी फेऱ्या मारतात. एवढेच काम पोलीस करतात. प्रशासनाने लॉकडाऊन तर लावले, पण नियमांचे पालन आणि लोकांना शिस्त लावायला कुणीही पुढे येत नाहीत. शासकीय यंत्रणाही कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्याकरिता आणि व्यापारी, व्यावसायिकांचे नुकसान टाळण्यासाठीच उपाययोजना करीत आहे. पण, नागरिकांना त्याचे महत्त्व कळत नसल्याचे दिसून येत आहे.

कळमना व कॉटन मार्केटमध्ये नियमांचे उल्लंघन

कळमना व कॉटन मार्केट भाजी बाजारात सकाळी दररोज शेकडो ग्राहक आणि किरकोळ विक्रेते येतात. गर्दीमुळे कळमना बाजारात लॉकडाऊन असल्याचे दिसून येत नाही. या बाजारात सकाळी जवळपास ५ ते ६ हजार लोक एकत्र असतात. या बाजारातून कोरोनाचा संसर्ग मोठ्या प्रमाणात होत असल्याच्या तक्रारी आहेत. कळमन्यात प्रशासक केबिनबाहेर पडत नसल्याने गर्दीवर कोण नियंत्रण मिळविणार, हा गंभीर प्रश्न आहे. हीच स्थिती फळे बाजाराची आहे. फळांच्या लिलावादरम्यान शेकडो ग्राहक व व्यापाऱ्यांची गर्दी पाहायला मिळते. लोक लॉकडाऊनचे उल्लंघन करीत नेहमीच्या सवयीनुसार वागत आहेत. कळमना बाजार १५ दिवसांसाठी बंद करावा, अशी मागणी अडतिया आणि व्यापाऱ्यांची आहे.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याMarketबाजार