शहरं
Join us  
Trending Stories
1
आयकर विभागाची मोठी कारवाई! १०५० पोलिसांना नोटीस; महाराष्ट्र पोलिस दलात खळबळ
2
काँग्रेस प्रशिक्षण शिबिरात राहुल गांधी उशिरा पोहोचले, शिक्षा म्हणून त्यांना पुश-अप्स काढायला लावले
3
तीन दिवस झाले, लिंगनिहाय आकडेवारी कुठे आहे? तेजस्वी यादव यांनी निवडणूक आयोगावर डेटा लपवल्याचा आरोप केला
4
विखे पाटलांनी उद्धव ठाकरेंना डिवचले, आजारी संजय राऊत संतापले; म्हणाले, 'तुम्ही...'
5
मावळतीच्या सुवर्णकिरणांनी अंबाबाईच्या कानांना केले स्पर्श, पारंपरिक दक्षिणायन किरणोत्सवाचे हजारो भाविक ठरले साक्षीदार
6
Gold-Silver Rate : सोन्या-चांदीचे दर आणखी कमी होणार? जाणून घ्या पुढचा अंदाज
7
पुण्यात बिबट्याची दहशत, स्वरक्षणासाठी गळ्यात टोकदार खिळ्यांचा पट्टा घालण्याची वेळ, ग्रामस्थांची नवी शक्कल
8
बिहारमध्ये शेवटच्या क्षणी NDA चा मास्टर स्ट्रोक...! नीतीश फ्रंटफुटवर, पंतप्रधान सोबत, महिलांच्या 10 हजारी स्कीमसंदर्भात मोठी घोषणा
9
Photo: कोण होणार मिस युनिव्हर्स? मनिका विश्वकर्माचा 'अनारकली' लूक व्हायरल...
10
लहान बहिणीसोबत अनेकवेळा जबरदस्ती शरीरसंबंध, कुटुंबीयांना सांगायला गेली, तर म्हणाला, 'मी जीव देईन'
11
रशिया शांतपणे कशाची तयारी करतंय? पाश्चात्य देशांनी इशारा दिला; जगासाठी धोक्याची घंटा
12
बिहार निवडणुकीचा प्रचार संपला; दुसऱ्या टप्प्यासाठी ३.७ कोटी मतदार, मतदान, मतमोजणी कधी?
13
Mhada: ९० लाखांचा फ्लॅट २८ लाखांमध्ये, खरं की खोटं? 'म्हाडा'ने लोकांना केलं सावध, काय म्हटलं आहे?
14
Mumbai Weather: शीत वाऱ्यांमुळे पारा घसरला! मुंबईकरांना थंडीचा फील घेता येणार; आठवडाभर कसे राहणार हवामान?
15
धक्कादायक! रुग्णालयात उपचारासाठी आला, अचानक धारदार शस्त्राने डॉक्टरांची हत्या केली, नेमकं काय घडलं?
16
अक्कलकुवाजवळ शालेय बस दरीत कोसळली; अमलीबारी येथे भीषण अपघात, एका विद्यार्थ्याचा मृत्यू, १५ गंभीर
17
मामाची पोरगी पटवली! सूरज चव्हाण कधी करणार लग्न? तारीख आणि ठिकाण आलं समोर
18
बारामतीच्या नगराध्यक्षपद निवडणुकीबाबतच्या जय पवारांच्या चर्चेला अजित पवारांकडून पुर्णविराम
19
रवींद्र चव्हाणांच्या खेळीनं शिंदेसेना संतापली; "भाजपाला युती नको तर स्पष्ट सांगावे, आम्हीही..."
20
RSS मध्ये मुस्लीम सहभागी होऊ शकतात का? मोहन भागवतांनी दिलं असं उत्तर, सभागृहात टाळ्यांचा एकच कडकडाट झाला!

कोरोनाने मरेन पण गावभर फिरेन !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 8, 2021 00:19 IST

Die by Corona but wandering village! किराणा, भाजीपाला, फळे, दूध डेअरी, बेकरी आदी दुकाने सकाळी ११ वाजेपर्यंत सुरू ठेवण्याचे निर्बंध असल्याने लोकांची खरेदीसाठी सकाळपासूनच गर्दी दिसून येत आहे. यादरम्यान अनेकजण मास्कचा उपयोग करीत नाहीत. त्यामुळे कोरोना महामारीचे संकट दिवसेंदिवस वाढतच आहे. काही नागरिक काम नसतानाही फेरफटका मारण्यासाठी घराबाहेर पडत आहेत. कोरोनाने मरेन पण गावभर फिरेन, असे काहीसे चित्र दिसून येत आहे.

लोकमत न्यूज नेटवर्क

नागपूर : किराणा, भाजीपाला, फळे, दूध डेअरी, बेकरी आदी दुकाने सकाळी ११ वाजेपर्यंत सुरू ठेवण्याचे निर्बंध असल्याने लोकांची खरेदीसाठी सकाळपासूनच गर्दी दिसून येत आहे. यादरम्यान अनेकजण मास्कचा उपयोग करीत नाहीत. त्यामुळे कोरोना महामारीचे संकट दिवसेंदिवस वाढतच आहे. काही नागरिक काम नसतानाही फेरफटका मारण्यासाठी घराबाहेर पडत आहेत. कोरोनाने मरेन पण गावभर फिरेन, असे काहीसे चित्र दिसून येत आहे.

नागपुरातील इतवारी, मस्कासाथ, गोळीबार चौक, गांधीबाग, सक्करदरा, नंदनवन या परिसराची पाहणी केली असता या भागातील दुकानांमध्ये ग्राहकांची सर्वाधिक गर्दी पाहायला मिळाली. इतवारी ठोक किराणा बाजारात सकाळी ७ वाजेपासून किरकोळ किराणा दुकानदार आणि नागरिक खरेदीसाठी येतात. हीच स्थिती शहरातील विविध भागातील किराणा दुकानांची आहे. आधी वस्तू मिळाव्यात म्हणून नागरिक सोशल डिस्टन्सिंगचे पालन करीत नाही. याशिवाय दूध डेअरी व बेकरींमध्येही हीच परिस्थिती पाहायला मिळते. दुकाने ११ वाजता बंद होत असल्याने लोक खरेदीसाठी तुटून पडतात. यावेळी सर्वजण मास्क, सॅनिटायझर आणि सोशल डिस्टन्सिंगच्या नियमांचे पालन करीत नाहीत. याकडे प्रशासन आणि पोलिसांचे दुर्लक्ष असल्याने नागरिकांसह दुकानदारही बेफिकिरीने वागत आहेत. कोरोनाची रुग्णसंख्या वाढू लागल्याने पुन्हा लॉकडाऊनचे नवे संकट उभे ठाकले आहे. लॉकडाऊन प्रशासन आणि सामान्य नागरिकांपैकी कुणालाही परवडणारे नसल्याने नागरिकांनी मास्क व सामाजिक दुराव्याचे पालन करणे हा एकमेव उपाय आहे.

भाजी बाजारात खरेदीसाठी गर्दी

सकाळी सक्करदरा, रमणा मारोती व नंदनवन परिसरातील भाजी बाजारात ग्राहकांची मोठ्या प्रमाणात गर्दी होती. विक्रेत्यांनीही सोशल डिस्टन्सिंगचे पालन न करता जवळजवळ दुकाने थाटली होती. त्यामुळे विक्रेत्यांकडे जास्त गर्दी होती. अशा गर्दीमुळे कोरोनाचा संसर्ग वाढण्याची जास्त शक्यता दिसून आली. अशावेळी विक्रेत्यांना सांगायला मनपाचे कर्मचारी येत नाहीत. ११ वाजले की पोलीस दुकाने बंद करण्यासाठी फेऱ्या मारतात. एवढेच काम पोलीस करतात. प्रशासनाने लॉकडाऊन तर लावले, पण नियमांचे पालन आणि लोकांना शिस्त लावायला कुणीही पुढे येत नाहीत. शासकीय यंत्रणाही कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्याकरिता आणि व्यापारी, व्यावसायिकांचे नुकसान टाळण्यासाठीच उपाययोजना करीत आहे. पण, नागरिकांना त्याचे महत्त्व कळत नसल्याचे दिसून येत आहे.

कळमना व कॉटन मार्केटमध्ये नियमांचे उल्लंघन

कळमना व कॉटन मार्केट भाजी बाजारात सकाळी दररोज शेकडो ग्राहक आणि किरकोळ विक्रेते येतात. गर्दीमुळे कळमना बाजारात लॉकडाऊन असल्याचे दिसून येत नाही. या बाजारात सकाळी जवळपास ५ ते ६ हजार लोक एकत्र असतात. या बाजारातून कोरोनाचा संसर्ग मोठ्या प्रमाणात होत असल्याच्या तक्रारी आहेत. कळमन्यात प्रशासक केबिनबाहेर पडत नसल्याने गर्दीवर कोण नियंत्रण मिळविणार, हा गंभीर प्रश्न आहे. हीच स्थिती फळे बाजाराची आहे. फळांच्या लिलावादरम्यान शेकडो ग्राहक व व्यापाऱ्यांची गर्दी पाहायला मिळते. लोक लॉकडाऊनचे उल्लंघन करीत नेहमीच्या सवयीनुसार वागत आहेत. कळमना बाजार १५ दिवसांसाठी बंद करावा, अशी मागणी अडतिया आणि व्यापाऱ्यांची आहे.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याMarketबाजार