शहरं
Join us  
Trending Stories
1
राज ठाकरेंचे CM फडणवीसांना पत्र; सरकारला ५ महत्त्वाच्या सूचना, मदत-जाहिरातबाजीवरून टोचले कान
2
“शेतकऱ्यांना सर्व प्रकारची मदत, ड्रोनने केलेले पंचनामे मान्य करणार”; CM फडणवीसांची ग्वाही
3
सरकार शेतकऱ्यांचे आहे, चिंता करू नका! एकनाथ शिंदे यांनी नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना दिला धीर
4
“पूरग्रस्त प्रत्येक कुटुंबाला १० किलो गहू-तांदूळ, केंद्राची मदत १०० टक्के येईल”: छगन भुजबळ
5
"प्रत्येकाला स्वाभिमान असतो, त्याने..."; शाहीन शाह आफ्रिदीकडून हॅरिस रौफच्या कृतीचे समर्थन
6
“बॅगवरचा फोटो कसला पाहता, मदत पाहा”; एकनाथ शिंदे शेतकऱ्यांच्या बांधावर, केली नुकसानीची पाहणी
7
बापासमोरच दोन वर्षाच्या मुलाला जबड्यात धरून बिबट्या पसार; १५० जवानांकडून शोधमोहिम, मृतदेह सापडला
8
आपली मुलगी राजकारणात येणार? मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस स्पष्टच बोलले, म्हणाले...
9
लवकरच बाजारात येतेय Toyota ची Mini Fortuner! महाराष्ट्रातल्या 'या' शहरात होणार उत्पादन; किती असू शकते किंमत? जाणून घ्या
10
तंत्रज्ञानाची किमया! सॅमसंगने AI Home केलं लाँच; आता घर होईल स्मार्ट, फक्त एक क्लिक अन्...
11
तांत्रिक बिघाड की मोसादचा हात? संयुक्त राष्ट्रांत पॅलेस्टाईनवर चर्चा होताच ४ बड्या नेत्यांचा माईक बंद  
12
पद्मश्री ज्येष्ठ लेखक एस. एल. भैरप्पा काळाच्या पडद्याआड; पंतप्रधान मोदींसह राष्ट्रपतींनी वाहिली श्रद्धांजली
13
लडाखमधील आंदोलनाला हिंसक वळण, जाळपोळ, लेहमध्ये ४ जणांचा मृत्यू, ७० जण जखमी 
14
हलगर्जीपणाचा कळस! सरकारी रुग्णालयात दुसऱ्याच पायाची सर्जरी, ऑक्सिजन मास्क काढला अन्...
15
"फायनलमध्ये बघून घेऊ’’, दोन वेळा मार खाल्यानंतर शाहीन शाह आफ्रिदीचं भारताला आव्हान    
16
समस्या संपतील, स्वामी कायम सोबत असतील; ९ गुरुवार व्रताने बदल नक्की दिसतील, अशक्य शक्य होईल!
17
जीएसटीमुळे वाहनांच्या किंमतीच नाही, RTO Tax देखील कमी झाला; तिहेरी फायदा कोणालाच कळला नाही...
18
समृद्धी महामार्गावर दुहेरी उत्पन्नाचा स्रोत; सौरऊर्जा निर्मिती करणारा देशातील पहिला 'एक्सप्रेसवे' !
19
Swami Chaitanya Saraswati: 'माझ्या खोलीत ये, तुला...'; स्वामी चैतन्यानंद सरस्वतीचे 'अश्लील कारनामे', व्हॉटसअप चॅटमध्ये काय?
20
आयटी-मेटलसह 'या' क्षेत्रातील शेअर्समध्ये मोठी पडझड; गुंतवणूकदारांचे ३ लाख कोटी रुपये बुडाले

नक्षली हल्ल्यात शहीद पोलीस कुटुंबीयांचे दु:ख जाणले का ?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 27, 2018 12:52 IST

नक्षलवाद्यांचा पुळका घेणाऱ्या मानवाधिकार संघटनांनी कधी नक्षली हल्ल्यात शहीद झालेल्या पोलिसांच्या कुटुंबीयांचे दु:ख जाणले आहे का?

ठळक मुद्देशहीद पोलीस कुटुंबीयांचा सवाल नक्षलवादच वेदनांना कारणीभूत

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : नक्षलवाद्यांचा पुळका घेणाऱ्या मानवाधिकार संघटनांनी कधी नक्षली हल्ल्यात शहीद झालेल्या पोलिसांच्या कुटुंबीयांचे दु:ख जाणले आहे का? कुणाचा तरुण मुलगा, कुणाचा पती, भाऊ, बहीण नक्षलवाद्यांच्या हिंसक मोहिमेत शहीद झाले आहेत. त्यांच्या जाण्याने कुटुंबाला दु:ख सहन करून आठवणीत जीवन जगावे लागत आहे. नक्षलवादामुळे वेदनांचा भार सहन करावा लागतो आहे. रक्तपात आम्हालाही नको आहे. मात्र नक्षलवाद्यांचा पुळका घेणाऱ्या मानवाधिकार संघटनांनी त्यांना आत्मसमर्पण करण्यास प्रोत्साहित करून विकासाच्या प्रवाहात सहभागी करावे, असे आवाहन गडचिरोली येथील शहीद पोलीस कुटुंबीयांनी गुरुवारी पत्रपरिषदेत केले.गडचिरोली भागात नक्षलवादी हल्ल्यात शहीद झालेल्या पोलिसांच्या कुटुंबीयांना शाश्वत बळ देण्यासाठी जानकी शहीद पोलीस परिवार विविध वस्तू आणि सेवा सहकारी संस्था, गडचिरोलीची स्थापना करण्यात आली आहे. संस्थेच्या माध्यमातून शहीद पोलीस कुटुंबीयांनी नागपुरात पत्रपरिषद घेऊन आपल्या भावना व्यक्त केल्या. या आठवड्यात पोलीस आणि नक्षलवाद्यांच्या चकमकीत ३९ नक्षलवादी ठार झाले. पोलीस दलातील सी-६० जवानांचे हे मोठे यश असून, गेल्या कित्येक वर्षांपासून नक्षलवाद्यांच्या कारवाईदरम्यान विविध घटनांमध्ये शहीद झालेल्या पोलिसांना ही एकप्रकारे श्रद्धांजली ठरली असल्याची भावना शहीद पोलीस कुटुंबीयांनी यावेळी व्यक्त केली. संस्थेच्या अध्यक्षा व शहीद चंद्रशेखर वाघाडे यांच्या पत्नी हेमलता वाघाडे म्हणाल्या, नक्षलवादामुळे गडचिरोलीचा पूर्ण विकास खुंटला असून, आदिवासींना त्यांच्या जगण्याच्या मूलभूत हक्कापासून हिरावून घेत आहेत. शहरात नक्षलवादाला खतपाणी घालणाºयांची मुले परदेशात शिक्षण घेत आहेत, मात्र सामान्य आदिवासींच्या दारात अंधार आहे. आदिवासींच्या अल्पवयीन मुलामुलींना बळजबरीने घरातून उचलून दलामध्ये भरती करून घेतात. दलात मुलींवर लैंगिक अत्याचार केले जातात. त्यामुळे पोलिसांनी या आठवड्यात केलेली कारवाई योग्यच असल्याचे त्या म्हणाल्या. हे चित्र बदलायचे असेल तर नक्षलवाद्यांनी हिंसाचाराचा मार्ग सोडून विकासाच्या मूळ प्रवाहात यायला हवे. यासाठी सरकार विविध योजना नक्षलवाद्यांसाठी योग्यप्रकारे राबवून आत्मसमर्पित नक्षलवाद्यांना पुढील आयुष्यासाठी त्यांचे पुनर्वसन करीत आहे. या योजनांचा त्यांनी लाभ घ्यावा. नक्षलवाद जोपर्यंत संपणार नाही तोपर्यंत गडचिरोली जिल्ह्याचा विकास होणार नाही, अशी भावना संस्थेच्या सचिव व शहीद अविनाश रणदिवे यांच्या पत्नी अल्का रणदिवे यांनी व्यक्त केले. यावेळी शहीद तुषार बंडेवार यांची आई रेणू बंडेवार, शहीद विलास मांदोडे यांच्या पत्नी संगीता मांदोडे, शहीद नुरुद्दीन हकीम यांचा भाऊ मेहराज, शहीद जवानांचे नातेवाईक पत्रपरिषदेत उपस्थित होते.

टॅग्स :naxaliteनक्षलवादी