शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

आधुनिक भारत निर्मितीसाठी धम्म हवा

By admin | Updated: February 20, 2017 02:07 IST

डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना माणुसकीची मूल्ये पाळणारा समाज अपेक्षित होता. मानवी समाजात माणुसकी अत्यंत महत्त्वाची आहे.

सुधीर गव्हाणे यांचे प्रतिपादन : डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मृती व्याख्यान नागपूर : डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना माणुसकीची मूल्ये पाळणारा समाज अपेक्षित होता. मानवी समाजात माणुसकी अत्यंत महत्त्वाची आहे. माणुसकी नसेल तर असा समाज आणि प्राणी यांच्यात कोणताच भेद राहणार नाही. म्हणून आधुनिक भारताची जडणघडण करण्यासाठी डॉ. आंबेडकरांनी बुद्ध धम्माचा स्वीकार केला, असे विचार डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठातील जनसंवाद विभागाचे प्रमुख आणि विचारवंत डॉ. सुधीर गव्हाणे यांनी व्यक्त केले. राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर विचारधारा पदव्युत्तर विभागाच्यावतीने विद्यापीठाच्या दीक्षांत सभागृहात आयोजित डॉ. आंबेडकर स्मृती व्याख्यानमालेचा समारोप झाला. यावेळी ‘बुद्ध धम्म आणि सामाजिक परिवर्तन’ या विषयावर डॉ. गव्हाणे बोलत होते. अध्यक्षस्थानी कुलगुरू डॉ. सिद्धार्थविनायक काणे होते. प्र-कुलगुरु डॉ. प्रमोद येवले, व्याख्यानमालेचे आयोजक व डॉ. आंबेडकर विचारधारा विभागाचे प्रमुख डॉ. प्रदीप आगलावे व्यासपीठावर होते. डॉ. गव्हाणे म्हणाले, जातीविरहीत समाजाच्या उभारणीसाठी आणि समताधिष्ठित देशाच्या निर्मितीकरिता डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी बुद्ध धम्माची दीक्षा घेतली. आर्थिक आणि राजकीय गुलामगिरीतून मुक्त होणे सोपे असते. मात्र, मानसिक गुलामीच्या विळख्यातून मुक्त होणे सहज शक्य नसते. या मानसिक परिवर्तनाचे आव्हान डॉ. आंबेडकरांनी स्वीकारले होते. त्यांच्या विचारातील आधुनिक भारत घडविण्यासाठी त्यांनी धम्माला अधिष्ठान मानले. डॉ. आंबेडकरांनी धम्मदीक्षेतून बुद्धकालीन भारत आमच्या हाती दिला. स्वातंत्र्य, समता, बंधुता आणि न्याय ही तत्त्वे दिलीत. प्रज्ञा-शील-करुणेचे संस्कार दिले. हे संस्कार आमच्या आचरणातील अंतिम ध्येय आहे. केवळ धर्मांतरित बौद्धांनी बाबासाहेब स्वीकारल्याने त्यांची प्रगती झाली. अनुसूचित जातीतील तसेच जमातीमधील आणि इतर मागास जातींनी बाबासाहेबांच्या विचारांना स्वीकारले नाही. त्यामुळे हा समाज आजही मागासलेला आहे. त्यांची वैचारिक उंची वाढू शकली नसल्याची खंत डॉ. गव्हाणे यांनी व्यक्त केली. कुलगुरू डॉ. काणे आपल्या अध्यक्षीय भाषणात म्हणाले, डॉ. आंबेडकरांचे या देशाच्या सामाजिक परिवर्तनात विशेष योगदान आहे. या देशात आमूलाग्र परिवर्तन घडवून आणण्यासाठी डॉ. आंबेडकरांच्या विचारांची नितांत आवश्यकता आहे. प्रास्ताविक डॉ. प्रदीप आगलावे यांनी केले. संचालन डॉ. रमेश शंभरकर यांनी केले. डॉ. एस.के. गजभिये यांनी आभार मानले. (प्रतिनिधी)