शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
4
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
7
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
8
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
9
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
10
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
11
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
12
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
13
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
14
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
15
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
16
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
17
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
18
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
19
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
20
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
Daily Top 2Weekly Top 5

आधुनिक भारत निर्मितीसाठी धम्म हवा

By admin | Updated: February 20, 2017 02:07 IST

डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना माणुसकीची मूल्ये पाळणारा समाज अपेक्षित होता. मानवी समाजात माणुसकी अत्यंत महत्त्वाची आहे.

सुधीर गव्हाणे यांचे प्रतिपादन : डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मृती व्याख्यान नागपूर : डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना माणुसकीची मूल्ये पाळणारा समाज अपेक्षित होता. मानवी समाजात माणुसकी अत्यंत महत्त्वाची आहे. माणुसकी नसेल तर असा समाज आणि प्राणी यांच्यात कोणताच भेद राहणार नाही. म्हणून आधुनिक भारताची जडणघडण करण्यासाठी डॉ. आंबेडकरांनी बुद्ध धम्माचा स्वीकार केला, असे विचार डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठातील जनसंवाद विभागाचे प्रमुख आणि विचारवंत डॉ. सुधीर गव्हाणे यांनी व्यक्त केले. राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर विचारधारा पदव्युत्तर विभागाच्यावतीने विद्यापीठाच्या दीक्षांत सभागृहात आयोजित डॉ. आंबेडकर स्मृती व्याख्यानमालेचा समारोप झाला. यावेळी ‘बुद्ध धम्म आणि सामाजिक परिवर्तन’ या विषयावर डॉ. गव्हाणे बोलत होते. अध्यक्षस्थानी कुलगुरू डॉ. सिद्धार्थविनायक काणे होते. प्र-कुलगुरु डॉ. प्रमोद येवले, व्याख्यानमालेचे आयोजक व डॉ. आंबेडकर विचारधारा विभागाचे प्रमुख डॉ. प्रदीप आगलावे व्यासपीठावर होते. डॉ. गव्हाणे म्हणाले, जातीविरहीत समाजाच्या उभारणीसाठी आणि समताधिष्ठित देशाच्या निर्मितीकरिता डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी बुद्ध धम्माची दीक्षा घेतली. आर्थिक आणि राजकीय गुलामगिरीतून मुक्त होणे सोपे असते. मात्र, मानसिक गुलामीच्या विळख्यातून मुक्त होणे सहज शक्य नसते. या मानसिक परिवर्तनाचे आव्हान डॉ. आंबेडकरांनी स्वीकारले होते. त्यांच्या विचारातील आधुनिक भारत घडविण्यासाठी त्यांनी धम्माला अधिष्ठान मानले. डॉ. आंबेडकरांनी धम्मदीक्षेतून बुद्धकालीन भारत आमच्या हाती दिला. स्वातंत्र्य, समता, बंधुता आणि न्याय ही तत्त्वे दिलीत. प्रज्ञा-शील-करुणेचे संस्कार दिले. हे संस्कार आमच्या आचरणातील अंतिम ध्येय आहे. केवळ धर्मांतरित बौद्धांनी बाबासाहेब स्वीकारल्याने त्यांची प्रगती झाली. अनुसूचित जातीतील तसेच जमातीमधील आणि इतर मागास जातींनी बाबासाहेबांच्या विचारांना स्वीकारले नाही. त्यामुळे हा समाज आजही मागासलेला आहे. त्यांची वैचारिक उंची वाढू शकली नसल्याची खंत डॉ. गव्हाणे यांनी व्यक्त केली. कुलगुरू डॉ. काणे आपल्या अध्यक्षीय भाषणात म्हणाले, डॉ. आंबेडकरांचे या देशाच्या सामाजिक परिवर्तनात विशेष योगदान आहे. या देशात आमूलाग्र परिवर्तन घडवून आणण्यासाठी डॉ. आंबेडकरांच्या विचारांची नितांत आवश्यकता आहे. प्रास्ताविक डॉ. प्रदीप आगलावे यांनी केले. संचालन डॉ. रमेश शंभरकर यांनी केले. डॉ. एस.के. गजभिये यांनी आभार मानले. (प्रतिनिधी)