शहरं
Join us  
Trending Stories
1
"हा अमेरिकेचा दुटप्पीपणाच, भारताने आता..."; शशी थरुर यांनी मोदी सरकारला काय दिला सल्ला?
2
"राष्ट्रहिताच्या रक्षणासाठी आम्ही..."; ५० टक्के टॅरिफनंतर भारताचे डोनाल्ड ट्रम्प यांना उत्तर
3
"अंधभक्तांना विनंती, राजकीय नियुक्तीचे समर्थन करु नका; कारण..."; रोहित पवारांनी काय दिला इशारा?
4
अहिल्यानगर: चौथीत शिकणाऱ्या मुलीवर शिक्षकाकडूनच अत्याचाराचा प्रयत्न, नेत्याने प्रकरण दाबले; पण...
5
डोनाल्ड ट्रम्प यांनी टाकला 'टॅरिफ' बॉम्ब! भारतावर लादला तब्बल ५० टक्के कर, आदेशावर केली स्वाक्षरी
6
'पंतप्रधानांना महादेवाची प्रतिमा भेट दिली, कारण...'; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे मोदींच्या भेटीनंतर काय बोलले?
7
कोल्हापुरकरांसाठी आनंदाची बातमी! वनताराच्या सीईओंनी केली मोठी घोषणा; महास्वामीही म्हणाले, अंबानींच्या भूमिकेला....
8
बापाचा दारु प्यायल्यामुळे मृत्यू, बारचालकांचा बदला घेण्यासाठी मुलगा बनला चोर; सगळं प्रकरण ऐकून पोलिसही चक्रावले
9
उद्धव ठाकरे-राज ठाकरेंची युती झाली! मुंबई पालिकेआधी 'या' निवडणुका एकत्र लढवणार...
10
Ankita Lokhande: मुंबई पोलिसांचे आभार... 'त्या' दोन बेपत्ता मुली सुखरूप; अंकिता लोखंडेने दिली माहिती
11
Mumbai Rape: प्रशिक्षणाच्या नावाखाली १३ वर्षाच्या मुलीवर लैंगिक अत्याचार, क्रिकेट प्रशिक्षकाला अटक
12
यंदा चिंचपोकळीच्या ‘चिंतामणी’चं आगमन कधी? गणेशभक्तांनो 'ही' तारीख ठेवा लक्षात!
13
डोनाल्ड ट्रम्प यांनी केली उत्तराधिकाऱ्याची घोषणा, जाहीर केलं या नेत्याचं नाव    
14
संघाचा शतकमहोत्सव थाटात साजरा होणार, कार्यक्रमांची रेलचेल, देशोदेशीच्या दूतावासांना निमंत्रण, पण...
15
Dharali Cloud Burst: उरले फक्त दगड आणि गाळ! ढगफुटीनंतरचा धरालीतील पहिला ड्रोन व्हिडीओ
16
Vaishnavi Patil : छोरियां छोरों से कम नहीं! कल्याणच्या ढाबा चालकाच्या लेकीची कुस्तीत मोठी झेप, दिग्गजांना केलं चितपट
17
मुंबईत भरणार 'क्रीडा महाकुंभ'! लेझीम, फुगडीसह शिवकालीन पारंपरिक खेळांना मिळणार पुनर्वैभव
18
गलवानमधील संघर्षानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी पहिल्यांदाच चीनच्या दौऱ्यावर जाणार, एससीओ संमेलनात सहभागी होणार
19
मोबाईलमध्ये नको ते व्हिडिओ सापडले, भीतीपोटी पतीला मारले; जीव वाचवण्यासाठी प्रियकराला अडकवले, पण...
20
विकेटची गॅरेंटी देणारा बुमराहच ठरतोय टीम इंडियासाठी 'पनौती'? भयावह आकडेवारीवर सचिन तेंडुलकर म्हणाला...

भटक्यांच्या विकासाची योजनाच भरकटली

By admin | Updated: October 17, 2016 02:43 IST

ताकदीच्या बळावर काही समाज आपल्या मागण्या पूर्ण करण्यासाठी रस्त्यावर उतरतो आणि सरकारही त्यांच्या मागण्यांना गांभीर्याने घेऊन, ताबडतोब निर्णय घेते.

यशवंतराव चव्हाण मुक्त वसाहत योजनेचे टार्गेट शून्य : राज्यात सात वर्षात केवळ चार वसाहती बांधल्यामंगेश व्यवहारे  नागपूरताकदीच्या बळावर काही समाज आपल्या मागण्या पूर्ण करण्यासाठी रस्त्यावर उतरतो आणि सरकारही त्यांच्या मागण्यांना गांभीर्याने घेऊन, ताबडतोब निर्णय घेते. परंतु भटके विमुक्त हा समाज अतिवंचित घटकातील असून अतिशय दुरावस्थेत जगत आहे. त्यांनी कधीही सरकारची अडवणूक केली नाही. रस्त्यावर उतरून कधी आक्रमक भूमिका घेतली नाही. असे असतानाही सरकार त्यांच्यासाठीच्या योजना राबविण्यात अपयशी ठरते आहे. भटक्यांना स्थायी करण्यासाठी सामाजिक न्याय विभागाने २०११ मध्ये यशवंतराव चव्हाण मुक्त वसाहत योजना राबविली. दरवर्षी बजेटमध्ये योजनेसाठी निधीचीही तरतूद करण्यात आली. परंतु योजनेचे टार्गेट सरकारला पूर्ण करता आले नाही. राज्यात भटक्यांच्या विकासाच्या योजनेचीच आज भटकंती झाल्याचे चित्र आहे. सरकारने राबविलेल्या यशवंतराव चव्हाण मुक्त वसाहत योजनेत भटक्या समाजाला ५ गुंठे जमीन उपलब्ध करून देऊन, त्यावर २६९ चौ. फुटाची घरे बांधून द्यायची होती. उर्वरित जागेवर स्वयंरोजगाराची संधी उपलब्ध करून देण्याचा उद्देश होता. राज्यातील प्रत्येक जिल्ह्यांमध्ये भटक्यांची लोकसंख्या असलेली ३ गावे निवडून त्या गावातील २० कुटुंबांसाठी वसाहत तयार करून योजनेचा लाभ देण्यात येणार होता. २०११ ला योजना सुरू झाली असली तरी, २०१२-१३ पासून बजेटमध्ये योजनेसाठी निधीची तरतूद करण्यात आली. दरवर्षी किमान ५ ते १० कोटींची सरकार तरतूद करीत होते. असे असतानाही ७ वर्षात केवळ राज्यात ४ वसाहती बांधण्यात आल्या. नियमानुसार आतापर्यंत कि मान ५०० वसाहती बांधणे अपेक्षित होते. लातूरमध्ये २०१२-१३ मध्ये २ वसाहती बांधण्यात आल्या. एक वसाहत यवतमाळातील आर्णी येथे बांधली व एक वसाहत सोलापूर येथील परग्गे येथे मंजूर झाली. याव्यतिरिक्त इतर कुठल्याही जिल्ह्यात वसाहती झाल्या नाही. विशेष म्हणजे प्रशासनाने या योजनेसाठी साधे सर्वेक्षण सुद्धा केले नाही. माहितीच्या अधिकारात या योजनेसंदर्भात राज्यातील संपूर्ण जिल्ह्यातून आलेल्या माहितीनुसार योजनेकडे झालेले दुर्लक्ष लक्षात येते. सर्वे संदर्भात मागितलेल्या माहितीत बहुतांश जिल्ह्यांनी निरंक असेच पाठविले. एका जिल्ह्याने तर ही आमची जबाबदारी नाही, असे उत्तर दिले. नागपूर, वर्धा, भंडारा, सिंधुदूर्ग, अहमदनगर या जिल्ह्यांनी सर्वे केला.मात्र, त्याचे प्रस्ताव संबंधित विभागाकडे पाठविले नाही. ही योजना सामाजिक न्याय विभागाबरोबरच वन, महसूल, गृहनिर्माण, ग्रामविकास, नियोजन आणि वित्त विभाग या सर्वांना मिळून राबवायची होती. परंतु योजनेची महत्त्वाची जबाबदारी सामाजिक न्याय विभागाची होती. परंतु कुठल्याच विभागाने भटक्यांची दखल घेतली नाही. त्यामुळे भटक्यांची भटकंती काही थांबली नाही.