शहरं
Join us  
Trending Stories
1
हे काश्मीरच्या शत्रूंना पहावले नाही; पंतप्रधान नरेंद्र मोदींचे मन की बातमध्ये न्याय देण्याचे आश्वासन
2
"मी वडील गमावले, पण माझे २ भाऊ काश्मीरमध्ये..."; आरतीने सांगितली डोळे पाणावणारी घटना
3
नरेश म्हस्के यांची ज्ञानपीठच्या दिशेने वाटचाल होत आहे, सावधान..!
4
अनंत अंबानींना रिलायन्स इंडस्ट्रीजमध्ये मिळाली मोठी जबाबदारी; आकाश आणि ईशा अंबानी काय करतात?
5
पहलगामनंतर काश्मीरमध्ये कडक सुरक्षा, कुपवाडामध्ये सामाजिक कार्यकर्त्यावर दहशतवादी हल्ला
6
तुम्ही मराठी सिनेसृष्टीत आजवर असं कधीच पाहिलं नसेल! 'माझी प्रारतना'चा विलक्षण ट्रेलर रिलीज
7
पाकिस्तानने पीओकेमध्ये इमरजन्सी घोषित केली, आरोग्य कर्मचाऱ्यांच्या सुट्या रद्द; काय घडतेय...
8
WhatsApp मध्ये सीक्रेट चॅटसाठी आलं नवं फीचर; आता प्रायव्हसीचं टेन्शन होणार छूमंतर
9
घरी आणि ऑफिस दोन्ही ठिकाणी Wi-Fi? मग 'हे' रिचार्ज प्लॅन तुमच्यासाठी बेस्ट; कोण देतंय चांगली ऑफर?
10
Pahalgam Terror Attack : हृदयस्पर्शी! गोळीबार सुरू असताना काश्मिरी मुलाने वाचवला चिमुकल्याचा जीव; Video व्हायरल
11
Pahalgam Terror Attack : "माझ्या पतीला शहीद दर्जा द्यावा, त्याने अनेकांचा जीव वाचवला"; शुभमच्या पत्नीची सरकारकडे मागणी
12
जिल्हाधिकारी पैसे घेतात, अधिकारी २% शिवाय फाइल काढत नाहीत, खासदार, आमदारांचा आरोप
13
TCS की इन्फोसिस, कोणी वाढवला सर्वाधिक पगार? आयटी क्षेत्रात कोणती कंपनी देणार जास्त नोकऱ्या?
14
अरे बापरे! प्लास्टिकच्या बॉटलमध्ये पाणी पिणाऱ्यांनो सावधान; हार्ट ॲटॅकचा मोठा धोका
15
घर खरेदीदारांच्या नुकसान भरपाईसाठी अधिकाऱ्यांची होणार नियुक्ती; राज्यभरात १२ जिल्हा नियंत्रक अधिकारी, महसूल वसुली अधिकारी
16
Pahalgam Terror Attack : Video- मोठी कारवाई! पहलगाम हल्ल्यानंतर सुरक्षा दलांनी ९ दहशतवाद्यांची घरं केली उद्ध्वस्त
17
इराणच्या बंदरावर भीषण स्फोट की घातपात? १४ जणांचा मृत्यू तर ७५० लोक जखमी 
18
गुजरात पोलिसांची मोठी कारवाई! अहमदाबाद, सुरतमध्ये १ हजार बांगलादेशी ताब्यात
19
पर्यटकांवरील गोळीबाराच्या व्हिडीओंमुळे बेचैनी, अस्वस्थता वाढली, देशभरात नागरिकांमध्ये चिंता
20
पहिलाच प्रकार! बँक अकाऊंट सांभाळता सांभाळता डीमॅट अकाऊंट खाली झाले; रातोरात ५ लाखांचे शेअर वळते केले

भटक्यांच्या विकासाची योजनाच भरकटली

By admin | Updated: October 17, 2016 02:43 IST

ताकदीच्या बळावर काही समाज आपल्या मागण्या पूर्ण करण्यासाठी रस्त्यावर उतरतो आणि सरकारही त्यांच्या मागण्यांना गांभीर्याने घेऊन, ताबडतोब निर्णय घेते.

यशवंतराव चव्हाण मुक्त वसाहत योजनेचे टार्गेट शून्य : राज्यात सात वर्षात केवळ चार वसाहती बांधल्यामंगेश व्यवहारे  नागपूरताकदीच्या बळावर काही समाज आपल्या मागण्या पूर्ण करण्यासाठी रस्त्यावर उतरतो आणि सरकारही त्यांच्या मागण्यांना गांभीर्याने घेऊन, ताबडतोब निर्णय घेते. परंतु भटके विमुक्त हा समाज अतिवंचित घटकातील असून अतिशय दुरावस्थेत जगत आहे. त्यांनी कधीही सरकारची अडवणूक केली नाही. रस्त्यावर उतरून कधी आक्रमक भूमिका घेतली नाही. असे असतानाही सरकार त्यांच्यासाठीच्या योजना राबविण्यात अपयशी ठरते आहे. भटक्यांना स्थायी करण्यासाठी सामाजिक न्याय विभागाने २०११ मध्ये यशवंतराव चव्हाण मुक्त वसाहत योजना राबविली. दरवर्षी बजेटमध्ये योजनेसाठी निधीचीही तरतूद करण्यात आली. परंतु योजनेचे टार्गेट सरकारला पूर्ण करता आले नाही. राज्यात भटक्यांच्या विकासाच्या योजनेचीच आज भटकंती झाल्याचे चित्र आहे. सरकारने राबविलेल्या यशवंतराव चव्हाण मुक्त वसाहत योजनेत भटक्या समाजाला ५ गुंठे जमीन उपलब्ध करून देऊन, त्यावर २६९ चौ. फुटाची घरे बांधून द्यायची होती. उर्वरित जागेवर स्वयंरोजगाराची संधी उपलब्ध करून देण्याचा उद्देश होता. राज्यातील प्रत्येक जिल्ह्यांमध्ये भटक्यांची लोकसंख्या असलेली ३ गावे निवडून त्या गावातील २० कुटुंबांसाठी वसाहत तयार करून योजनेचा लाभ देण्यात येणार होता. २०११ ला योजना सुरू झाली असली तरी, २०१२-१३ पासून बजेटमध्ये योजनेसाठी निधीची तरतूद करण्यात आली. दरवर्षी किमान ५ ते १० कोटींची सरकार तरतूद करीत होते. असे असतानाही ७ वर्षात केवळ राज्यात ४ वसाहती बांधण्यात आल्या. नियमानुसार आतापर्यंत कि मान ५०० वसाहती बांधणे अपेक्षित होते. लातूरमध्ये २०१२-१३ मध्ये २ वसाहती बांधण्यात आल्या. एक वसाहत यवतमाळातील आर्णी येथे बांधली व एक वसाहत सोलापूर येथील परग्गे येथे मंजूर झाली. याव्यतिरिक्त इतर कुठल्याही जिल्ह्यात वसाहती झाल्या नाही. विशेष म्हणजे प्रशासनाने या योजनेसाठी साधे सर्वेक्षण सुद्धा केले नाही. माहितीच्या अधिकारात या योजनेसंदर्भात राज्यातील संपूर्ण जिल्ह्यातून आलेल्या माहितीनुसार योजनेकडे झालेले दुर्लक्ष लक्षात येते. सर्वे संदर्भात मागितलेल्या माहितीत बहुतांश जिल्ह्यांनी निरंक असेच पाठविले. एका जिल्ह्याने तर ही आमची जबाबदारी नाही, असे उत्तर दिले. नागपूर, वर्धा, भंडारा, सिंधुदूर्ग, अहमदनगर या जिल्ह्यांनी सर्वे केला.मात्र, त्याचे प्रस्ताव संबंधित विभागाकडे पाठविले नाही. ही योजना सामाजिक न्याय विभागाबरोबरच वन, महसूल, गृहनिर्माण, ग्रामविकास, नियोजन आणि वित्त विभाग या सर्वांना मिळून राबवायची होती. परंतु योजनेची महत्त्वाची जबाबदारी सामाजिक न्याय विभागाची होती. परंतु कुठल्याच विभागाने भटक्यांची दखल घेतली नाही. त्यामुळे भटक्यांची भटकंती काही थांबली नाही.