शहरं
Join us  
Trending Stories
1
ब्लॅकमेल करणाऱ्या प्रेयसीचा खून, मृतदेह दौलताबाद घाटात फेकून प्रियकर पोलिस ठाण्यात हजर
2
"आम्ही ओबीसींच्या हिताचं रक्षण करू शकलो नाही", राहुल गांधींनी चूक मान्य केली; आता दिलं मोठं आश्वासन
3
चालत गेली अन् शाळेच्या चौथ्या मजल्यावरून मारली उडी; दहावीतील विद्यार्थिनीचा व्हिडीओ आला समोर
4
गिलनं ज्याला वेटिंगवर ठेवलं तोच कामी आला! ओली पोप पाठोपाठ ब्रूकही वॉशिंग्टनच्या 'सुंदर' चेंडूवर फसला
5
दोन रुग्णवाहिका घेऊन सासरी पोहोचला जावई, २०-२५ जण उतरले, मारहाण, तुफान राडा, कारण काय?
6
Mhada Lottery 2025: म्हाडाच्या लॉटरीत लागलेले घर भाड्याने देऊ शकतो का? जाणून घ्या नियम!
7
Sarzameen Movie Review: देशभक्तीच्या पार्श्वभूमीवरील पिता-पुत्राची भावनिक कथा 'सरजमीं'
8
"नरेंद्र मोदी मोठी समस्या नाहीत, त्यांच्यात ..."; विरोधी पक्ष नेते राहुल गांधी यांचा मोठा हल्ला!
9
मुंबई लोकलमध्ये ६२ कोटी रुपयांचे मोबाईल चोरीला; किती लोकांना परत मिळाले? 
10
चीनचा Bajaj ला मोठा धक्का; ऑगस्टपासून बंद होऊ शकते EV चे उत्पादन, कारण काय..?
11
‘५६ लाख घुसखोर आले कसे? तुम्ही राजीनामाच द्या’, महुआ मोईत्रांनी अमित शाहांना सुनावले  
12
Bank Job 2025: बँक ऑफ बडोदामध्ये मॅनेजर, सिनियर मॅनेजर पदांसाठी भरती; संधी सोडू नका!
13
'एक नंबर'! 'लोकमत डॉट कॉम'सोबत वाचकांची 'महायुती'; ६,२१,५३,००० 'लोकमतां'सह घेतली 'महाआघाडी'
14
फहाद फासिलनं सांगितले त्याचे आवडते '५' चित्रपट, तुम्ही पाहिलेत का?
15
पक्ष देईल ती जबाबदारी स्वीकारायला तयार; मंत्रि‍पदाच्या चर्चांवर राहुल नार्वेकरांचे सूचक विधान
16
एक दोन नाही तर २५००० कर्मचाऱ्यांची कपात होणार, एप्रिलनंतर आता पुन्हा एकदा Intel च्या कर्मचाऱ्यांवर संकट
17
"...हे विरोधी पक्ष ठरवू शकत नाही"; लोकसभेत प्रचंड गोंधळ, कोणत्या मुद्द्यावर केंद्रीय मंत्री भडकले?
18
'माझ्या मनावर ओझं पण...' ९००० कर्मचाऱ्यांना काढल्यानंतर सत्या नाडेला यांनी अखेर मौन सोडले; म्हणाले...
19
सरकार आता आमची गेलेली मुलं परत आणून देऊ शकतं का? शाळा दुर्घटनेनंतर पालकांचा आक्रोश
20
31 जुलैपासून सुरू होणार 'या' कंपनीचा कार प्लांट, दर वर्षी बाहेर पडणार 1.50 लाख इलेक्ट्रिक कार!

विकास आराखड्याला पर्यावरण मंजुरीची आवश्यकता नाही

By admin | Updated: February 4, 2016 02:54 IST

नागपूर महानगर क्षेत्राचा आराखडा, मेट्रो रिजनचा विकास कशा पद्धतीने व्हावा. याचे प्रारूप तयार करण्याच्या अनुषंगाने प्रस्तावित केलेला आहे.

उपसंचालक नगररचना : २० हजार चौरस मीटरवरील बांधकामांना मंजुरीची गरजनागपूर : नागपूर महानगर क्षेत्राचा आराखडा, मेट्रो रिजनचा विकास कशा पद्धतीने व्हावा. याचे प्रारूप तयार करण्याच्या अनुषंगाने प्रस्तावित केलेला आहे. यामुळे नियोजित विकासाला मदत होणार आहे. या आराखड्याला पर्यावरण विषयक मंजुरीची आवश्यकता नसल्याचे नासुप्रच्या उपसंचालक नगररचना सुजाता कडू यांनी स्पष्ट केले आहे.विकास आराखडा बनविताना लोकसंख्या, संभावित निवासी व औद्योगिक क्षेत्र विकास तसेच कृषी आदी बाबींचा विचार करण्यात आला आहे. या विकास आराखड्यानुसार क्षेत्रीय विकास करताना रस्ते, ड्रेनेज सिस्टीम, पाणीपुरवठा, इत्यादी पायाभूत सुविधा पुरविण्याचे काम नागपूर महानगर क्षेत्र विकास प्राधिकरण (नासुप्र) करणार आहे. प्रत्यक्ष इमारत किंवा बांधकाम निर्मिती ही वैयक्तिक किंवा व्यावसायिक डेव्हलपर्स योग्य त्या परवानगी घेऊन व आराखड्यास अनुसरून करणार आहेत. नासुप्र स्वत: इमारत वा तत्सम बांधकामाचे प्रकल्प करणार नाही. पर्यावरण मंत्रालयाच्या ईआयए सूचनेनुसार बांधकामाची योजना तयार झाल्यानंतर पर्यावरण विभागाची मंजुरी घेणे आवश्यक आहे. विकास आराखड्यात बांधकामाचा समावेश नसल्याने याला या विभागाच्या मंजुरीची गरज नाही. २० हजार चौरस मीटरवरील बांधकाम योजनांना पर्यावरण विषयक मंजुरी असल्याशिवाय नासुप्रकडून मंजुरी दिली जात नाही. विकास आराखड्यात पर्यावरण विषयक बाबींचे नियम विकासाच्या वेळी अमलात आणले जावे यासाठी त्याचा समावेश करण्यात आला आहे.तज्ज्ञांच्या मार्गदर्शनात पर्यावरण विषयक बाबींचा अभ्यास करून अंतिम आराखड्यात याचा समावेश केला जाणार असल्याची माहिती सुजाता कडू यांनी दिली. त्यामुळे विकास आराखडा बनविताना नासुप्रने पर्यावरण विषयक कुठल्याही बाबींचे उल्लंघन केलेले नाही. काही संस्थाकडून जनतेची दिशाभूल केली जात असल्याचा आरोपही त्यांनी केला. (प्रतिनिधी)