शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानसोबत युद्ध झाल्यास भारताचा पराभव निश्चित; काँग्रेस नेत्याच्या पोस्टनं नवा वाद
2
सोलापूर पुन्हा हादरले! हात अन् गळा चिरून प्रशिक्षणार्थी डॉक्टरने केली आत्महत्या
3
२६ निष्पाप लोकांना मारणारा हाशिम मुसा निघाला स्पेशल पॅरा कमांडो; हल्ल्यात पाकिस्तानी लष्कराचा सहभाग असल्याची शंका
4
भारताच्या प्रतिका रावलने एकदिवसीय क्रिकेटमध्ये रचला इतिहास, केली 'अशी' कामगिरी!
5
CMF Phone 2 Pro लाँच, किंमत एवढी स्वस्त की...; या रेंजमध्ये पहिल्यांदाच टेलिफोटो कॅमेरा सेटअप...
6
Akshaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला करतात चैत्र गौरीची पाठवणी; पण कशी? जाणून घ्या!
7
मोफत रेशनचा लाभ घेणाऱ्यांसाठी शेवटची संधी? हे काम आजच करा अन्यथा कार्डवरुन नाव वगळणार
8
प्रत्येक भारतीयाला संताप, संसदेचं विशेष अधिवेशन बोलवा; राहुल गांधी, खरगेंची मोदींकडे मागणी
9
मराठमोळ्या अभिनेत्रीने अमेरिकेत बनवलं पापड आणि कुरडई, व्हिडीओ केला शेअर
10
मुकेश अंबानींनी जगातील अब्जाधीशांना टाकलं मागे, एका दिवसात कमावले ₹४४,२९३ कोटी रुपये
11
Vaibhav Suryavanshi : "आई ३ तास ​​झोपायची, वडिलांनी नोकरी सोडली...", वैभव सूर्यवंशीने सांगितला IPL पर्यंतचा प्रवास
12
काश्मीरमध्ये ४८ पर्यटन स्थळे बंद; दहशतवाद्यांची घरे पाडल्यामुळे स्लिपर सेलकडून मोठ्या हल्ल्याची शक्यता
13
'फॅमिली मॅन' फेम अभिनेत्याची हत्या? मित्रांसोबत गेला होता पिकनिकला, कुटुंबियांनी व्यक्त केला संशय
14
पाकिस्तानने भारतासाठी हवाई क्षेत्र बंद केले, परंतू भारताचे वापरतोय; ते ही बंद करण्याचा विचार...
15
आप पदाधिकाऱ्याच्या मुलीचा कॅनडामध्ये संशयास्पद मृत्यू; आठवडाभरापासून होती बेपत्ता
16
"गावातल्या मुलाला आपण स्वीकारणारच नाही का?"; 'झापुक झुपूक'च्या ट्रोलिंगबद्दल केदार शिंदे स्पष्टच बोलले
17
'भालू' फेम अभिनेते, निर्माते आणि दिग्दर्शक प्रकाश भेंडे यांचं निधन
18
कॅनडामध्ये ट्रम्प विरोधाने निवडणूक फिरली; ट्रुडोंच्या पक्षाचे मार्क कार्नी नवे पंतप्रधान होणार
19
Akshaya Tritiya 2025: सोने खरेदी शक्य नाही? मग अक्षय्य तृतीयेला घरी आणा कामधेनुची मूर्ती!
20
वैभव सूर्यवंशीच्या तुफान फटकेबाजीवर बॉलिवूडकरही फिदा! युवा क्रिकेटपटूवर केला कौतुकाचा वर्षाव

विदर्भातील लहान विमानतळाचा विकास रखडला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 16, 2022 07:30 IST

Nagpur News महाराष्ट्रासह विदर्भातील काही लहान विमानतळाचे विकास कार्य अजूनही आटोपलेले नाही. परवानगी मिळालेल्या विमानतळाच्या कामांना सुरुवातही झालेली नाही.

ठळक मुद्दे बेलोरा, राजुरा विमानतळाचे कार्य अडकले

 

वसीम कुरैशी

नागपूर : चार वर्षांपूर्वी केंद्राने ‘उडान’ योजनेंतर्गत लहान विमानतळाच्या विकासाचे कार्य सुरू केले. मात्र, महाराष्ट्रासह विदर्भातील काही लहान विमानतळाचे विकास कार्य अजूनही आटोपलेले नाही. परवानगी मिळालेल्या विमानतळाच्या कामांना सुरुवातही झालेली नाही. आतापर्यंत तरी नागपुरातून आरसीएस फ्लाईटचे संचालन सुरू झालेले नाही.

२००७ मध्ये अमरावती येथे बेलोरा विमानतळाचा प्रस्ताव होता. या कामाची सुरुवातही झाली. परंतु, अद्याप काम पूर्ण झालेले नाही. सत्तापरिवर्तन होत गेले. मात्र, कार्यपूर्ती झालेली नाही. चार वर्षांपूर्वी या विमानतळाच्या रनवे व बाऊंड्री वॉलचे काम मंदगतीने सुरू झाले. मात्र, अडीच वर्षांपासून ते काम ठप्प पडले आहे. त्यामुळेच येथे टर्मिनल बिल्डिंगचे काम सुरू होऊ शकलेले नाही.

चंद्रपूर येथील राजुरा येथे नव्या विमानतळाच्या प्रस्तावाला मंजुरी मिळाली आहे. त्यासाठी अडीच वर्षांपूर्वी येथे ५३० एकर जमीन घेण्यात आली. शिवाय, १५० एकर जमीन आणखी हवी आहे. राजुरा विमानतळासंदर्भात अद्याप कोणताच आराखडा तयार झालेला नाही. त्यामुळे, विमानतळासंदर्भातील डिझाईनही बनलेले नाही. या विमानतळासाठी केंद्राकडून मंजूर झालेल्या ५२ कोटी रुपये निधीपैकी ६.५ कोटी निधी प्राप्त झाल्याने कामास सुरुवात होणार असल्याचे सूत्रांकडून प्राप्त माहितीनुसार स्पष्ट होत आहे. यासोबतच राज्य शासनाकडून २३ कोटी रुपयेही उपलब्ध केले जाणार आहे. यासोबतच अमरावती एअरपोर्टवरून नोव्हेंबर महिन्यापासून फ्लाईटचे संचालन होणार असल्याचा दावा केला जात आहे.

२५० पॅसेंजर हॅण्डलिंगसाठी प्रस्तावित विमानतळ

अमरावती येथील बेलोरा व चंद्रपूरमध्ये प्रस्तावित राजुरा विमानतळ एटीआर ७२ सीटर विमानाच्या संचालनाच्या अनुषंगाने तयार केले जाणार आहेत. यासाठी तयार करण्यात येणारी टर्मिनल बिल्डिंग एकावेळी २५० प्रवाशांचे नियोजन करू शकणार असल्याचे सूत्र सांगत आहे. मात्र, अजूनही पायाभूत कामे सुरू झाली नसल्याने हे दावे केवळ स्वप्नवत ठरत आहेत.

लहान विमानतळाचा विकास व्हावा

वर्तमानात कोणत्याही उद्योगासाठी व क्षेत्राच्या विकासासाठी विमानसेवा आवश्यक असून, त्याच दिशेने जिल्हास्तरावर विमानाचे संचालन व्हावे, असे आमचे प्रयत्न आहेत. ज्या जिल्ह्यात विमानतळ नाहीत, तेथे किमान लहान विमानाच्या संचालनाच्या दृष्टीने विकास होणे गरजेचे आहे.

- ललित गांधी, प्रदेश अध्यक्ष : महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स

.......

टॅग्स :Airportविमानतळ