शहरं
Join us  
Trending Stories
1
Asia Cup 2025: मोहसीन नक्वी टीम इंडियाला ट्रॉफी द्यायला झाले तयार, पण आता ठेवली 'ही' एक अट
2
तब्बल २२ वाहने चोरणाऱ्या आंतरराज्य चोरट्याला सांगलीत अटक; १६ लाखांचा मुद्देमाल जप्त
3
चांदी दीड लाख रूपये किलो, सप्टेंबरमध्ये २१,५२७ रुपयांची झेप; सोन्याचीही ११ हजारांची उडी
4
भरधाव ट्रकच्या धडकेत दुचाकीस्वार पती-पत्नी जागीच ठार; कोहमारा-वडसा मार्गावरील घटना
5
भाजपा पदाधिकाऱ्याची पत्नीसह ३ ठिकाणी मतदारयादीत नावे, एका दुकानावर २५ नावे- काँग्रेसचा आरोप
6
पंतप्रधान मोदी करणार ‘मुख्यमंत्री अल्पमुदतीचे रोजगारक्षम अभ्यासक्रम’ कार्यक्रमाचे उद्घाटन
7
'या' दिवसापर्यंत गपचूप ट्रॉफी भारताला द्या नाहीतर...; BCCIचे मोहसीन नक्वी यांना 'अल्टीमेटम'
8
दहिसर टोलनाका वाहतूककोंडी दूर करण्यासाठी मंत्री प्रताप सरनाईक यांनी सुचवल्या उपाययोजना
9
१०० वर्षांनी हंस महालक्ष्मी योग: ८ राशींचे कल्याण, कल्पनेपलीकडे लाभ; अपार यश, भरघोस भरभराट!
10
“शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान, भरीव मदत सरकार देईल, उद्या मंत्रिमंडळ बैठकीत...”: संजय शिरसाट
11
"दुसऱ्याच महिन्यात रंगेहाथ पकडलं...!" धनश्री वर्माचा खळबळजनक खुलासा, युजवेंद्र चहलनं लग्नाच्या पहिल्याच वर्षात दिला होता धोका?
12
अंधेरी क्रीडा संकुल महापालिकेने स्वतः उभारावे; गोपाळ शेट्टी यांची पालिका आयुक्तांकडे मागणी
13
"ही सगळी नाटकं, पाकिस्तानसोबत खेळायलाच नको होतं"; भारत-पाक सामन्यावरुन आदित्य ठाकरेंनी सुनावलं
14
भाजप कार्यालय आमच्यासाठी इमारत नाही, मंदिर आहे; पंतप्रधान मोदींनी व्यक्त केल्या भावना...
15
डोनाल्ड ट्रम्प यांचा मोठा निर्णय! आता 'या' उद्योगावर लादला १००% कर; भारताला सर्वाधिक फटका...
16
“दसरा मेळाव्याबाबत सदसद्विवेकबुद्धीला स्मरून निर्णय घ्यावा”; अजित पवारांचा रोख कुणाकडे?
17
१० वर्षांपासून सत्ता असलेल्या राज्यात भाजपाला जबर धक्का, निवडणुकीत मिळाल्या ४० पैकी केवळ ५ जागा   
18
कुठलाही क्रिकेट सामना हे सत्य बदलू शकत नाही; PM मोदींच्या ट्विटवर मोहसीन नक्वींची दर्पोक्ती
19
विघ्नहर्ता बाप्पा संकटात धावला! श्री सिद्धीविनायक मंदिर अतिवृष्टीबाधितांसाठी १० कोटी देणार
20
IND vs PAK Final : "ते स्वतः स्ट्राइकवर येऊन..." PM मोदींसंदर्भात नेमकं काय म्हणाला सूर्यकुमार यादव?

विदर्भातील लहान विमानतळाचा विकास रखडला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 16, 2022 07:30 IST

Nagpur News महाराष्ट्रासह विदर्भातील काही लहान विमानतळाचे विकास कार्य अजूनही आटोपलेले नाही. परवानगी मिळालेल्या विमानतळाच्या कामांना सुरुवातही झालेली नाही.

ठळक मुद्दे बेलोरा, राजुरा विमानतळाचे कार्य अडकले

 

वसीम कुरैशी

नागपूर : चार वर्षांपूर्वी केंद्राने ‘उडान’ योजनेंतर्गत लहान विमानतळाच्या विकासाचे कार्य सुरू केले. मात्र, महाराष्ट्रासह विदर्भातील काही लहान विमानतळाचे विकास कार्य अजूनही आटोपलेले नाही. परवानगी मिळालेल्या विमानतळाच्या कामांना सुरुवातही झालेली नाही. आतापर्यंत तरी नागपुरातून आरसीएस फ्लाईटचे संचालन सुरू झालेले नाही.

२००७ मध्ये अमरावती येथे बेलोरा विमानतळाचा प्रस्ताव होता. या कामाची सुरुवातही झाली. परंतु, अद्याप काम पूर्ण झालेले नाही. सत्तापरिवर्तन होत गेले. मात्र, कार्यपूर्ती झालेली नाही. चार वर्षांपूर्वी या विमानतळाच्या रनवे व बाऊंड्री वॉलचे काम मंदगतीने सुरू झाले. मात्र, अडीच वर्षांपासून ते काम ठप्प पडले आहे. त्यामुळेच येथे टर्मिनल बिल्डिंगचे काम सुरू होऊ शकलेले नाही.

चंद्रपूर येथील राजुरा येथे नव्या विमानतळाच्या प्रस्तावाला मंजुरी मिळाली आहे. त्यासाठी अडीच वर्षांपूर्वी येथे ५३० एकर जमीन घेण्यात आली. शिवाय, १५० एकर जमीन आणखी हवी आहे. राजुरा विमानतळासंदर्भात अद्याप कोणताच आराखडा तयार झालेला नाही. त्यामुळे, विमानतळासंदर्भातील डिझाईनही बनलेले नाही. या विमानतळासाठी केंद्राकडून मंजूर झालेल्या ५२ कोटी रुपये निधीपैकी ६.५ कोटी निधी प्राप्त झाल्याने कामास सुरुवात होणार असल्याचे सूत्रांकडून प्राप्त माहितीनुसार स्पष्ट होत आहे. यासोबतच राज्य शासनाकडून २३ कोटी रुपयेही उपलब्ध केले जाणार आहे. यासोबतच अमरावती एअरपोर्टवरून नोव्हेंबर महिन्यापासून फ्लाईटचे संचालन होणार असल्याचा दावा केला जात आहे.

२५० पॅसेंजर हॅण्डलिंगसाठी प्रस्तावित विमानतळ

अमरावती येथील बेलोरा व चंद्रपूरमध्ये प्रस्तावित राजुरा विमानतळ एटीआर ७२ सीटर विमानाच्या संचालनाच्या अनुषंगाने तयार केले जाणार आहेत. यासाठी तयार करण्यात येणारी टर्मिनल बिल्डिंग एकावेळी २५० प्रवाशांचे नियोजन करू शकणार असल्याचे सूत्र सांगत आहे. मात्र, अजूनही पायाभूत कामे सुरू झाली नसल्याने हे दावे केवळ स्वप्नवत ठरत आहेत.

लहान विमानतळाचा विकास व्हावा

वर्तमानात कोणत्याही उद्योगासाठी व क्षेत्राच्या विकासासाठी विमानसेवा आवश्यक असून, त्याच दिशेने जिल्हास्तरावर विमानाचे संचालन व्हावे, असे आमचे प्रयत्न आहेत. ज्या जिल्ह्यात विमानतळ नाहीत, तेथे किमान लहान विमानाच्या संचालनाच्या दृष्टीने विकास होणे गरजेचे आहे.

- ललित गांधी, प्रदेश अध्यक्ष : महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स

.......

टॅग्स :Airportविमानतळ