शहरं
Join us  
Trending Stories
1
२० वर्षांचा ईएमआय १५ वर्षांत संपणार, घर-वाहन कर्ज झाले आणखी स्वस्त, ‘आरबीआय’कडून रेपो दरात कपात
2
इंडिगो नव्हे, इंडि-नो-गो! दिवसभरात १ हजार उड्डाणे, ३ दिवसांत २ हजारांपेक्षा जास्त विमानसेवा रद्द
3
इंडिगो विमान संकट, रेल्वेने मोर्चा सांभाळला, ३७ ट्रेनमध्ये वाढवले ११६ डबे, या दोन स्टेशनदरम्यान धावणार विशेष ट्रेन
4
RBI नं रेपो दरात कपात करताच 'या' दोन सरकारी बँकांनी कर्ज केली स्वस्त; पाहा काय आहेत नवे दर?
5
आजचे राशीभविष्य, ०६ डिसेंबर २०२५: कुटुंबात मतभेदाचे प्रसंग उद्भवतील, नवीन कामात अपयशी होण्याची शक्यता
6
रशिया भारताला अखंड तेलपुरवठा करत राहणार; आर्थिक सहकार्याचा ५ वर्षांचा आराखडा निश्चित
7
अजबच! अचानक खेळपट्टीने गिळला चेंडू आणि सामनाच करावा लागला रद्द, WBBL मध्ये नेमकं काय घडलं?   
8
आरक्षण देणाऱ्या मुख्यमंत्र्यांप्रति अनाथ कृतज्ञ होतात तेव्हा...; वर्षा निवासस्थानी पार पडला भावुक सोहळा
9
विशेष लेख: ‘आधी, नंतर आणि शेवटीही फक्त भारतीयच!’  
10
वर्षात चार वेळा ईएमआय झाला कमी!घर, कार घेणे स्वस्त; आरबीआयचा सर्वसामान्यांना दिलासा
11
मध्य रेल्वे मनी लाँड्रिंग: ‘क्लोजर रिपोर्ट’ विशेष न्यायालयाने स्वीकारला, आठ अधिकाऱ्यांचे प्रकरण काय?
12
‘नगरां’च्या निवडणुकीची २१ डिसेंबरलाच मतमोजणी; खंडपीठाचा निर्णय सुप्रीम कोर्टाकडून कायम
13
पुतीन परतले, पुढे...?
14
शाकाहारी असाल तरच तुम्हाला फ्लॅट देणार! मराठी माणसाला नाकारले घर?
15
“४० वर्षीय तरुणाला लाजवणारी कार्यक्षमता, २०२९ ला मोदीच PM असतील”; CM फडणवीसांनी केले स्पष्ट
16
शिक्षकांचे संच मान्यता निकष, टीईटी सक्तीविरोधात आंदोलन; मुंबईमध्ये शाळा बंदला संमिश्र प्रतिसाद
17
कामगार युनियनवरून ठाकरेंची शिवसेना-भाजपमध्ये राडा, वरळीत तणाव; पोलिसांचा कार्यकर्त्यांवर लाठीचार्ज
18
दोन दिवसीय भारत दौऱ्याची सांगता, पुतिन रशियाला जाण्यासाठी रवाना; PM मोदींचे मानले विशेष आभार
19
‘मतचोरी’विरोधात काँग्रेसची रॅली; मातोश्रीवर येऊन दिले निमंत्रण, उद्धव ठाकरे दिल्लीला जाणार?
20
सेवा-समर्पणाच्या वाटेवरच्या ध्येयनिष्ठ प्रवाशाची कहाणी
Daily Top 2Weekly Top 5

विदर्भातील लहान विमानतळाचा विकास रखडला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 16, 2022 07:30 IST

Nagpur News महाराष्ट्रासह विदर्भातील काही लहान विमानतळाचे विकास कार्य अजूनही आटोपलेले नाही. परवानगी मिळालेल्या विमानतळाच्या कामांना सुरुवातही झालेली नाही.

ठळक मुद्दे बेलोरा, राजुरा विमानतळाचे कार्य अडकले

 

वसीम कुरैशी

नागपूर : चार वर्षांपूर्वी केंद्राने ‘उडान’ योजनेंतर्गत लहान विमानतळाच्या विकासाचे कार्य सुरू केले. मात्र, महाराष्ट्रासह विदर्भातील काही लहान विमानतळाचे विकास कार्य अजूनही आटोपलेले नाही. परवानगी मिळालेल्या विमानतळाच्या कामांना सुरुवातही झालेली नाही. आतापर्यंत तरी नागपुरातून आरसीएस फ्लाईटचे संचालन सुरू झालेले नाही.

२००७ मध्ये अमरावती येथे बेलोरा विमानतळाचा प्रस्ताव होता. या कामाची सुरुवातही झाली. परंतु, अद्याप काम पूर्ण झालेले नाही. सत्तापरिवर्तन होत गेले. मात्र, कार्यपूर्ती झालेली नाही. चार वर्षांपूर्वी या विमानतळाच्या रनवे व बाऊंड्री वॉलचे काम मंदगतीने सुरू झाले. मात्र, अडीच वर्षांपासून ते काम ठप्प पडले आहे. त्यामुळेच येथे टर्मिनल बिल्डिंगचे काम सुरू होऊ शकलेले नाही.

चंद्रपूर येथील राजुरा येथे नव्या विमानतळाच्या प्रस्तावाला मंजुरी मिळाली आहे. त्यासाठी अडीच वर्षांपूर्वी येथे ५३० एकर जमीन घेण्यात आली. शिवाय, १५० एकर जमीन आणखी हवी आहे. राजुरा विमानतळासंदर्भात अद्याप कोणताच आराखडा तयार झालेला नाही. त्यामुळे, विमानतळासंदर्भातील डिझाईनही बनलेले नाही. या विमानतळासाठी केंद्राकडून मंजूर झालेल्या ५२ कोटी रुपये निधीपैकी ६.५ कोटी निधी प्राप्त झाल्याने कामास सुरुवात होणार असल्याचे सूत्रांकडून प्राप्त माहितीनुसार स्पष्ट होत आहे. यासोबतच राज्य शासनाकडून २३ कोटी रुपयेही उपलब्ध केले जाणार आहे. यासोबतच अमरावती एअरपोर्टवरून नोव्हेंबर महिन्यापासून फ्लाईटचे संचालन होणार असल्याचा दावा केला जात आहे.

२५० पॅसेंजर हॅण्डलिंगसाठी प्रस्तावित विमानतळ

अमरावती येथील बेलोरा व चंद्रपूरमध्ये प्रस्तावित राजुरा विमानतळ एटीआर ७२ सीटर विमानाच्या संचालनाच्या अनुषंगाने तयार केले जाणार आहेत. यासाठी तयार करण्यात येणारी टर्मिनल बिल्डिंग एकावेळी २५० प्रवाशांचे नियोजन करू शकणार असल्याचे सूत्र सांगत आहे. मात्र, अजूनही पायाभूत कामे सुरू झाली नसल्याने हे दावे केवळ स्वप्नवत ठरत आहेत.

लहान विमानतळाचा विकास व्हावा

वर्तमानात कोणत्याही उद्योगासाठी व क्षेत्राच्या विकासासाठी विमानसेवा आवश्यक असून, त्याच दिशेने जिल्हास्तरावर विमानाचे संचालन व्हावे, असे आमचे प्रयत्न आहेत. ज्या जिल्ह्यात विमानतळ नाहीत, तेथे किमान लहान विमानाच्या संचालनाच्या दृष्टीने विकास होणे गरजेचे आहे.

- ललित गांधी, प्रदेश अध्यक्ष : महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स

.......

टॅग्स :Airportविमानतळ