शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs ENG 5th Test : टीम इंडियानं हातून निसटलेली मॅच जिंकून दाखवली! मालिकेत बरोबरी
2
"हे बंद करा"; परिणय फुकेंच्या विधानावर बोलताना CM फडणवीसांनी माध्यमांचे टोचले कान, काय म्हणाले?
3
मुंबई घडवण्यात हिंदी भाषिकांचं मोठं योगदान, मराठी केवळ ३० टक्के...: निशिकांत दुबेंनी पुन्हा डिवचलं
4
एका शेअरवर १५६ रुपयांचा डिविडंड देणार ही कंपनी, रेकॉर्ड डेट १५ ऑगस्टपूर्वीच, तुमच्याकडे आहे का?
5
“आपला पक्ष मुंबईत सर्वांत जास्त बलवान आहे, यंदा महापालिकेत मनसेचीच सत्ता येणार”: राज ठाकरे
6
एक दिवस एमजी टाटाला मागे टाकणार? जुलैमध्ये एवढ्या विकल्या इलेक्ट्रीक कार... ह्युंदाई क्रेटा...
7
भारतातील एकमेव रेल्वे स्टेशन, ज्याला नावच नाही, तरीही थांबते ट्रेन, लोक करतात प्रवास
8
पंतप्रधान मोदींनंतर चार तासांनी अमित शाह राष्ट्रपतींना भेटले; ५ ऑगस्टला काहीतरी मोठे घडणार....
9
IND vs ENG :मियाँ मॅजिक! बॅक टू बॅक ओव्हरमध्ये विकेट; KL राहुलनं एक कॅच सोडला
10
IND vs ENG : क्रिस वोक्सला सलाम! खांदा फॅक्चर असताना संघासाठी मैदानात उतरला (VIDEO)
11
शाहरुख खान अन् राणी मुखर्जीसाठी प्रिय मित्र करण जोहरची पोस्ट, म्हणाला, "३३ वर्षांचा हा काळ..."
12
थ्रेडिंगमुळे लिव्हर फेल? आयब्रो करणं पडेल चांगलंच महागात, डॉक्टरांचा धोक्याचा इशारा
13
१७,००० कोटींचा घोटाळा! अनिल अंबानींच्या डोकेदुखीत वाढ, ED आता 'या' लोकांची चौकशी करणार
14
Post Office ची ५० वर्ष जुनी सेवा होणार बंद, तुमच्यावर काय परिणाम होणार?
15
नव्या प्रभाग रचनेला आव्हान देणाऱ्या याचिका सुप्रीम कोर्टाने फेटाळल्या; स्थानिक निवडणुकांना हिरवा कंदील
16
६ ऑगस्टला बच्चू कडू राज ठाकरेंची भेट घेण्याची शक्यता; शेतकरी आंदोलनाला मनसेचं पाठबळ मिळणार?
17
लॉटरी लागली! टाटांच्या 'या' शेअरचे होणार १० तुकडे, १०० शेअर्सचे थेट १००० होणार, रेकॉर्ड डेट कधी?
18
मैत्रिणीचा संसार मोडला, नंतर तिच्याच नवऱ्याशी केलं लग्न; आता ३ वर्षांतच अभिनेत्रीवर घटस्फोट घेण्याची वेळ
19
Nagpur: नागपुरात मद्यधुंद अवस्थेत कार चालवणाऱ्या जवानानं ३० जणांना उडवलं, व्हिडीओ व्हायरल!

‘एज्युकेशन हब’मुळे नागपूरचा विकास

By admin | Updated: August 11, 2015 03:52 IST

पुण्याप्रमाणेच नागपुरातदेखील मोठ्या प्रमाणावर नामांकित शैक्षणिक संस्था आल्या आहेत. यामुळे येथील औद्योगिक

मुख्यमंत्री फडणवीस : कम्युनिकेशन हायवेसाठी अंबानी उत्सुकनागपूर : पुण्याप्रमाणेच नागपुरातदेखील मोठ्या प्रमाणावर नामांकित शैक्षणिक संस्था आल्या आहेत. यामुळे येथील औद्योगिक विकासालादेखील चालना मिळेल व शहराचा सर्वांगीण विकास होईल असा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला. नागपूर दौऱ्यावर आले असताना पत्रकारांशी त्यांनी संवाद साधला. संरक्षण क्षेत्रातील युनिट्सदेखील नागपुरात स्थापन करण्याचा प्रयत्न करण्यात येत आहे असेदेखील त्यांनी सांगितले.(प्रतिनिधी)‘एमआरओ’साठी दोन कंपन्या तयार४नागपुरात ‘एमआरओ’ (मेन्टेनन्स, रिपेअर आणि ओव्हहॉल) स्थापन करण्यासाठी २ विमान कंपन्यांनी तयारी दाखवली असल्याची माहितीदेखील फडणवीस यांनी दिली. सध्या ‘बोईंग’सोबत यासंदर्भात चर्चा सुरू आहे. ‘बोईंग’ने नागपुरला ‘एमआरओ’ तयार केला होता व त्यानंतर याचे हस्तांतरण ‘एअर इंडिया’ला केले होते. सिंगापूर एअरलाईन्ससोबत हातमिळावणी करुन ‘एमआरओ’मध्ये परत येण्याचे ‘बोईंग’चे प्रयत्न सुरू आहे असे मुख्यमंत्र्यांनी सांगितले.कम्युनिकेशन हायवेसाठी अंबानी उत्सुक४दरम्यान, नागपूर ते मुंबई दरम्यानच्या प्रस्तावित कम्युनिकेशन सूपर हायवेसाठी मुकेश अंबानी यांच्या रिलायन्स ग्रुपने उत्सुकता दाखवली आहे असे मुख्यमंत्री फडणवीस यांनी सांगितले. हा हायवे अमरावती, औरंगाबादमार्गे जाणार आहे. ८०० किमी लांबीच्या रस्त्यावर ‘आॅप्टिक फायबर’ टाकण्यात येणार आहे. यामुळे वाहनांना वेग कायम राखणे शक्य होणार आहे. या प्रकल्पामुळे माहिती तंत्रज्ञान क्षेत्राला ‘बूस्ट’ मिळेल आणि या मार्गावर ही सुविधा उपलब्ध करुन देण्यासाठी ३० हजार कोटींचा प्रकल्प राबविण्यात येईल असेदेखील त्यांनी स्पष्ट केले.मुख्यमंत्री करणार गोसीखुर्दचा दौरा४दरम्यान मुख्यमंत्री स्वत: गोसीखुर्द प्रकल्पाचा दौरा करून त्याची पाहणी करणार आहेत. प्रलंबित सिंचन प्रकल्पांना वेग देण्यात येणार असल्याचेदेखील त्यांनी स्पष्ट केले.डहाणू बंदरामुळे मुंद्र्याला मिळणार आव्हान४पालघर जिल्ह्यातील प्रस्तावित डहाणू बंदरामुळे गुजरात येथील मुंद्रा बंदरातील जलवाहतुकीशी स्पर्धा निर्माण होणार आहे असे मत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केले. ‘जेएनपीटी’ व ‘महाराष्ट्र मेरीटाईम बोर्ड’ यांनी बंदर निर्मितीसंदर्भातील करारावर स्वाक्षऱ्या केल्या आहेत. या बंदराची क्षमता १०० मिलीयन टनाची राहणार आहे. मुंद्रा येथील बंदराने १०० मिलीयन टनाची मर्यादा २०१४ सालीच ओलांडली होती व आजच्या तारखेत देशातील सर्वात मोठे बंदर आहे. मुंद्रा बंदर हे उद्योगपती गौतम अदानी यांच्या पुढाकारातून विकसित झाले आहे. डहाणू येथील बंदरदेखील ‘मल्टीकार्गो’ बंदर राहणार आहे. मोठी जहाजे येण्यासाठी येथे २० मीटरची नैसर्गिक कोरडी जागा आहे. या बंदराच्या उपयुक्ततेबाबत अंतर्गत अभ्यास पूर्ण झाला आहे. आज राज्यात केवळ ‘जेएनपीटी’ हे एकमेव मोठे बंदर आहे. नवीन बंदर हे ‘जेएनपीटी’ला पर्याय राहणार आहे असे मुख्यमंत्री म्हणाले. या बंदरासाठी सहा हजार कोटींची गुंतवणूक अपेक्षित असून तीन वर्षांत याचे काम पूर्ण होईल. या बंदराची जागा ही डहाणू किनारपट्टीच्या उत्तरेकडे ४.५ नॉटिकल माईल्सवर आहे असेदेखील त्यांनी सांगितले. ७० टक्के मालवाहतूक ही जलमार्गाने होते. त्यामुळे तेथे बंदर निर्माण करण्याची आवश्यकता होती असेदेखील त्यांनी स्पष्ट केले. केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक व जहाजबांधणीमंत्री नितीन गडकरी यांनी या कामात पुढाकार घेतला असेदेखील ते म्हणाले.