शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतात श्रीमंतांच्या संपत्तीत ६२% वाढ, इतर ९९% लोकांची संपत्ती वाढली १%, पण प्रगतीला धोका
2
आजचे राशीभविष्य,०५ नोव्हेंबर २०२५: बोलण्यावर संयम ठेवा; रागावर व वाणीवर संयम ठेवावा लागेल
3
“निवडणूक आयोगाचा कारभार ‘दस नंबरी’, दुबार तिबार नावांची जबाबदारी कोणाची?”: हर्षवर्धन सपकाळ
4
'चिप'ची भीती दाखवून मुलीवर अत्याचार; जन्मदात्या आईचे हादरवणारं कृत्य, कोर्टाने दिली १८० वर्षांची शिक्षा!
5
“मतदार याद्यांमध्ये घोळ, सत्ताधाऱ्यांकडून कबूल, दुबार मतदानावर आयोग गप्प का?”: सुप्रिया सुळे
6
आशिया चषकाचा वाद: जय शाह यांच्या उपस्थितीमुळे मोहसिन नकवींची बैठकीला दांडी
7
रेल्वे अपघातानंतर नातेवाइकांचा आक्रोश; हेल्पलाइन नंबरवर टीबीमुक्त अभियानाचा जागर
8
चेंबूरमधील मेंदी प्रकरणाला नवी कलाटणी; शाळा प्रशासनाने सर्व आरोप फेटाळून लावले
9
अखेर बिगुल वाजला ! राज्यातील २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींच्या निवडणुकांची घोषणा
10
चीनची कार थेट आकाशातून जाणार, ‘उडणाऱ्या कार’चे उत्पादन झाले सुरू
11
हिंदुजा समूहाला जागतिक पातळीवर पोहोचवणारे चेअरमन गोपीचंद हिंदुजा यांचे निधन
12
मंत्री गुलाबराव पाटील कॅबिनेटमध्ये संतापले; पूरग्रस्त शेतकरी आणि नागरिकांबाबतचा होता विषय
13
लवकरच ‘बीएसएनएल’ नेटवर्क; मुंबईत २ हजार टॉवर उभारणी करणार ; इंट्रा सर्कल रोमिंगचा करार
14
तारापूर अणुऊर्जा प्रकल्पातील एक प्लांट बंद; २७० मेगावॉट विजेचा तुटवडा भासण्याची शक्यता
15
लोको पायलटने रेड सिग्नल दुर्लक्ष केला, छत्तीसगडमध्ये झालेल्या प्रवासी ट्रेन आणि मालगाडी अपघातामागील कारण काय?
16
आठवीत शाळा सोडली; मुलांसोबत टेनिस बॉलवर खेळत ‘क्रांती’ घडवली, आणि आज ती वर्ल्ड चॅम्पियन!
17
"मुख्यमंत्री होताच...!"; योगी आदित्यनाथ यांच्या 'टप्पू-पप्पू-अप्पू' विधानावरून तेजस्वी यादव यांचा मोठा पलटवार
18
बिहार विधानसभा निवडणुकीत PK यांच्या जनसुराजला किती जागा मिळणार? ओवेसींच्या पक्षाचं काय होणार? असा आहे सर्व्हेचा अंदाज
19
अजित पवारांची बिहार विधानसभा निवडणुकीत वेगळी चूल; तेजस्वी यादवांविरोधात उतरवला उमेदवार, १५ उमेदवार कोण?
20
बिलासपूरजवळ भीषण रेल्वे अपघातात १० जणांचा मृत्यू ! जखमींच्या किंकाळ्यांनी परिसर थरारला; महाराष्ट्रातील प्रवासी किती?

रस्त्यांच्या जाळ्यामुळे देशाचा विकास : प्रमोद सावंत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 6, 2019 00:25 IST

केंद्रातील भाजपा नेतृत्वातील एनडीए सरकारच्या पाच वर्षांच्या काळात स्वच्छ भारत अभियान, अंत्योदय योजना, मेक इन इंडिया प्रधानमंत्री आवास योजना, विमा योजना अशा विविध विकास योजना राबविण्यात आल्या. केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी देशभरातील सागरी मार्ग व रस्त्यांचे जाळे निर्माण केल्याने देशाच्या विकासाला गती मिळाली, असे प्रतिपादन गोवा राज्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी शुक्रवारी केले.

ठळक मुद्देदेशाच्या विकासासाठी एनडीए सरकारची गरज

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : केंद्रातील भाजपा नेतृत्वातील एनडीए सरकारच्या पाच वर्षांच्या काळात स्वच्छ भारत अभियान, अंत्योदय योजना, मेक इन इंडिया प्रधानमंत्री आवास योजना, विमा योजना अशा विविध विकास योजना राबविण्यात आल्या. केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी देशभरातील सागरी मार्ग व रस्त्यांचे जाळे निर्माण केल्याने देशाच्या विकासाला गती मिळाली, असे प्रतिपादन गोवा राज्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी शुक्रवारी केले. कुंभारटोली येथे आयोजित नागपूर लोकसभा मतदार संघातील भाजपाचे उमेदवार नितीन गडकरी यांच्या प्रचार सभेत ते बोलत होते.प्रमोद सावंत म्हणाले, देशाच्या विकासासाठी नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाची गरज आहे. म्हणून ते पंतप्रधान व्हावे, सोबतच देशासाठी नितीन गडकरी यांना कें द्रात पाठविणे गरजेचे आहे. गोवा राज्यातील रस्त्यांच्या विकासासाठी त्यांनी १५ हजार कोटींचा निधी उपलब्ध केला. गडकरी काहीही करू शकतात. त्यांच्यामुळे मी रात्री २ वाजता मुख्यमंत्री पदाची शपथ घेतली.पंतप्रधान आवास योजनेच्या माध्यमातून निराधारांना निवारा मिळाला. शौचालय, अंत्योदय योजनेच्या माध्यमातून गोरगरीब लोकांना मोठा दिलासा दिला. मोदी यांच्या नेतृत्वात देश सुरक्षित आहे. दहशतवादी हल्ल्याचा बदला सर्जिकल स्ट्राईकच्या माध्यमातून घेतला. दुसरीकडे युपीए सरकारच्या काळात नुसते घोटाळे झाले. सबका साथ, सबका विकास यासाठी पुन्हा भाजपाच्या हातात देशाची सत्ता द्यावी, असे आवाहन सावंत यांनी केले.यावेळी आमदार कृष्णा खोपडे, स्थायी समितीचे माजी अध्यक्ष बाल्या बोरकर, नगरसेविका मनिषा धावडे यांनीही मार्गदर्शन केले.व्यासपीठावर परिवहन समितीचे सभापती बंटी कुकडे, प्रमोद पेंडके, महेंद्र राऊ त, हितेश जोशी, चंदन गोस्वामी,नामदेव ठाकरे, जी.पी. शर्मा, नरेश चिटकाटे, दत्तु पारसकर, प्रमोद भोवते आदी उपस्थित होते. सूत्रसंचालन माजी नगरसेवक हितेश जोशी यांनी केले.

टॅग्स :Lok Sabha Election 2019लोकसभा निवडणूकnagpur-pcनागपूरMaharashtra Lok Sabha Election 2019महाराष्ट्र लोकसभा निवडणूक 2019