शहरं
Join us  
Trending Stories
1
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
2
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
3
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
4
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
5
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
6
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
7
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
8
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
9
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
10
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
11
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
12
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
13
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
14
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
15
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
16
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
17
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा
18
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार
19
जम्मू-काश्मीरच्या कठुआ जिल्ह्यात दिसले 4 संशयित, सुरक्षा दलांनी सुरू केली शोध मोहीम...
20
ज्याच्यासाठी लिंग परिवर्तन केलं, त्याचं दुसऱ्यावरच प्रेम जडलं...! सनीची मारिया बनलेली किन्नर पोहोचली पोलीस ठाण्यात, अन् मग...

शेगावच्या आनंदसागरच्या धर्तीवर होणारा नागपुरातील अंबाझरीचा विकास बारगळला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 21, 2018 13:17 IST

शेगाव येथील आनंदसागरच्या धर्तीवर अंबाझरी तलाव व उद्यानाचा विकास करण्यासाठी महापालिकेने महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाला ४२.४२ एकर जागा दिली होती. महामंडळाच्या उदासीन कारभारामुळे तूर्त हा प्रकल्प बारगळला असल्याने प्रकल्पासाठी दिलेली जागा महापालिका परत घेणार आहे.

ठळक मुद्देमनपा पर्यटन विकास महामंडळाकडून ४२.४२ एकर जागा परत घेणार

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : शेगाव येथील आनंदसागरच्या धर्तीवर अंबाझरी तलाव व उद्यानाचा विकास करण्यासाठी महापालिकेने महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाला ४२.४२ एकर जागा दिली होती. महामंडळाच्या माध्यमातून हा प्रकल्प राबविला जाणार होता. परंतु गेल्या साडेतीन वर्षात महामंडळाने प्रकल्प राबविण्याच्या दृष्टीने कोणत्याही स्वरुपाचा पुढाकार घेतलेला नाही. महामंडळाच्या उदासीन कारभारामुळे तूर्त हा प्रकल्प बारगळला असल्याने प्रकल्पासाठी दिलेली जागा महापालिका परत घेणार आहे.मौजा अंबाझरी येथील अंबाझरी तलावाजवळील खसरा क्र. १ मधील ४४ एकर क्षेत्र शासकीय असून यापैकी उद्यानाचे उत्तरेकडील १९ एकर क्षेत्र महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळामार्फत विकसित करण्यास व उर्वरित २५ एकर क्षेत्र महापालिका विकसित करणार होती.अंबाझरी तलाव व उद्यान परिसराला पर्यटन स्थळाचे स्वरुप प्राप्त होणार होते. या प्रकल्पातून प्राप्त नफ्यातील ७५ टक्के रक्कम महापालिकेला तर २५ टक्के पर्यटन विकास महामंडळाला देण्याचा निर्णय घेण्यात आला होता. या प्रस्तावाला महापालिका सभागृहात ६ आॅक्टोबर २०१५ रोजी मंजुरी देण्यात आली होती. महापालिकेने कोणताही मोबदला न घेता महामंडळाला प्रकल्पासाठी ४२.४२ एकर जागा उपलब्ध केली होती. शेगाव येथील आनंदसागरच्या धर्तीवर अंबाझरी तलाव व उद्यानाचा विकास केला जाणार होता. येथे बोटिंग सुविधा, मनोरंजनाची साधने, तसेच तलाव व उद्यानाचे सौंदर्यीकरण केले जाणार होते. यातून महापालिकेच्या उत्पन्नात मोठ्या प्रमाणात वाढ होण्याची अपेक्षा होती. मात्र पर्यटन विकास महामंडळाने गेल्या साडेतीन वर्षात अंबाझरीचा कोणत्याही स्वरुपाचा विकास केलेला नाही. यामुळे ही जागा महापालिका परत घेणार आहे. ३० नोव्हेंबरला होणाऱ्या सर्वसाधारण सभेत हा प्रस्ताव मंजुरीसाठी ठेवण्यात आला आहे.नगरविकास राज्यमंत्र्यांनी दिले होते आश्वासनअंबाझरी तलाव व उद्यानाचा गांधीसागरच्या धर्तीवर विकास व्हावा, यासाठी समिती गठित करण्यात येईल. प्रकल्पासाठी पर्यटन विकास महामंडळाच्या माध्यमातून निधी उपलब्ध करण्याचे आश्वासन नगरविकास राज्यमंत्री रणजित पाटील यांनी विधान परिषदेत दिले होते. परंतु आश्वासनानुसार हा प्रकल्प राबविण्यात आला नाही.

टॅग्स :Anand Sagarआनंदसागर