शहरं
Join us  
Trending Stories
1
युक्रेनने रशियावर मोठा हल्ला केला, अणुऊर्जा प्रकल्पाजवळ ड्रोन हल्ला; स्वातंत्र्यदिनी मोठी कारवाई केली
2
सासरचे इतका त्रास देत होते तर मुलीला माहेरी का नेले नाही? उत्तर देताना निक्की भाटीच्या वडिलांच्या डोळ्यांत आलं पाणी
3
Lalbaugcha Raja 2025 : 'ही शान कोणाची... लालबागच्या राजाची!!"; बाप्पाच्या सजावटीत यंदा खास काय?
4
'एक बैठक घेण्यासाठी मनोज जरांगेंना आमदार १०-१५ लाख रुपये देतात'; लक्ष्मण हाकेंचा गंभीर आरोप
5
अमेरिकेत ट्रकचा भीषण अपघात, भारतीय चालकाला 'इतक्या' वर्षांची शिक्षा होणार? कुटुंबाने मागितली भारत सरकारची मदत!
6
लाडकी बहीण योजनेच्या गैरवापराची चौकशी करणार - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
7
Bigg Boss 19: बॉलिवूडचे सुपरस्टार्स ते टीव्हीवरचे कलाकार; पाहा 'बिग बॉस १९'च्या स्पर्धकांची संपूर्ण यादी
8
Manoj Jarange Patil : 'जीव गेला तरीही मागे हटणार नाही, गुलाल उधळूनच परतायचे' मनोज जरांगेंचा सरकारला इशारा
9
Bigg Boss 19 Premiere : नव्या पर्वाची दणक्यात सुरुवात! 'ही' आहे पहिली स्पर्धक
10
Bigg Boss 19: घरात होणार गँगवॉर! 'गँग्स ऑफ वासेपूर' फेम अभिनेत्याची 'बिग बॉस'मध्ये एन्ट्री
11
महिन्याला १ लाख कमवायची निक्की; तरीही का बंद केला ब्युटी पार्लरचा व्यवसाय? वडिलांनी सांगितलं कारण, म्हणाले...
12
पूजाचं ऐकलं अन् पुजारानं हा निर्णय घेतला! निवृत्तीनंतर स्वत: शेअर केली 'अनटोल्ड स्टोरी'
13
सुनेला जाळून मारण्यात मुलाची केली मदत; दिल्लीच्या निक्की भाटी प्रकरणात सासूला अटक!
14
स्कॉर्पिओ, बुलेट, रोख रक्कम आणि सोने; एवढे सगळे देऊनही निक्कीला रोज रात्री मारहाण करायचे, बहिणीने केले धक्कादायक खुलासे
15
विद्यार्थ्याचा पाय घसरला, शिक्षक वाचवायला गेले; वेरुळच्या जोगेश्वरी कुंडात बुडून दोघांचा मृत्यू 
16
'कभी खुशी कभी गम' फेम अभिनेत्री झाली आई, ३४व्या वर्षी दिला गोंडस लेकीला जन्म
17
'सन्मानजनक निरोप द्यायला हवा होता...', पुजाराच्या निवृत्तीवर शशी थरुर यांची भावनिक पोस्ट
18
Ganpati 2025: शिव ठाकरेच्या घरी वाजत गाजत आले गणपती बाप्पा, इतकी सुंदर मूर्ती की नजरच हटेना, पाहा व्हिडीओ
19
Asia Cup 2025: आशिया चषकात सर्वाधिक सामने जिंकणारे टॉप-५ कर्णधार!
20
भारतानंतर आता युरोपचाही अमेरिकेला मोठा धक्का; 'या' दोन देशांनी 'एफ ३५' फायटर जेट्स खरेदीला दिला नकार!

एकात्मतेच्या आधारावर राष्ट्र विकास व्हावा

By admin | Updated: October 19, 2015 03:04 IST

आजच्या काळात जात, भाषा, प्रांत यांच्यातील भेदभाव दूर सारून सर्व समाजाने एकत्रितपणे राहण्याची गरज आहे.

शांताक्का : राष्ट्रसेविका समितीचा विजयादशमी महोत्सव साजरानागपूर : आजच्या काळात जात, भाषा, प्रांत यांच्यातील भेदभाव दूर सारून सर्व समाजाने एकत्रितपणे राहण्याची गरज आहे. देश प्रगतीकडे अग्रेसर असून एकात्मतेच्या आधारावरच राष्ट्राचा विकास व्हावा, असे मत राष्ट्रसेविका समितीच्या प्रमुख संचालिका शांताक्का यांनी व्यक्त केले. राष्ट्रसेविका समितीचा विजयादशमी व शस्त्रपूजन सोहळा रविवारी सायंकाळी झाला. यावेळी त्या बोलत होत्या. गोरक्षणजवळील लक्ष्मी सभागृह येथे झालेल्या या कार्यक्रमाला सर्वोच्च न्यायालयाच्या वरिष्ठ अधिवक्ता अ‍ॅड. मोनिका अरोरा या प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होत्या आजच्या काळात ज्ञानासोबतच योग्य संस्कारांची आवश्यकता आहे. पुढील पिढी व समाजामध्ये नैतिकतेचा भाव वाढावा यासाठी महिलांनीच पुढाकार घ्यावा, असे शांताक्का म्हणाल्या. महिलांकडे पाहण्याची दृष्टी बदलण्याची आवश्यकता आहे. इंटरनेट तसेच सोशल मीडियाच्या माध्यमातून महिला म्हणजे भोगवस्तू असेच दाखविण्यात येते. केंद्राने अशा ८०० संकेतस्थळांवर बंदी आणली होती.परंतु त्याला विरोध झाला. योग्य नेतृत्वाला समाजाचे सहकार्य मिळणे आवश्यक आहे. तरच योग्य दिशेने देशाचा विकास होऊ शकतो, असे प्रतिपादनदेखील त्यांनी केले. राष्ट्रसेविका समितीच्या विजयादशमीच्या सोहळ्याला नागपुरातील निरनिराळ्या शाखांमधील सेविकांची उपस्थिती होती. शाळकरी मुलींपासून ते वयस्कर महिलांपर्यतचा समावेश असलेल्या सेविकांच्या पथकाने योगासने, घोष, लेझिम यांची निरनिराळी प्रात्यक्षिके सादर केली. त्याचबरोबर सेविकांनी दाखविलेल्या खड्गाच्या प्रात्यक्षिकांनी तर उपस्थितांच्या नजरेचे पारणे फेडले. या कार्यक्रमाला समितीच्या माजी प्रमुख संचालिका प्रमिलाताई मेढे, स्वामिनी ब्रह्मप्रकाशानंदाजी, अ.भा.सह शारीरिकप्रमुख मनिषा संत, महानगर कार्यवाहिका करुणा साठे या उपस्थित होत्या. मेधा नांदेडकर यांनी संचालन केले.या सोहळ्याचे ‘यु ट्यूब’ तसेच वेबकास्टिंगच्या माध्यमातून जगभरात थेट प्रक्षेपण करण्यात आले. (प्रतिनिधी)किस रावण की भुजा उखाडूकार्यक्रमाच्या प्रमुख अतिथी अ‍ॅड. मोनिका अरोरा यांनीदेखील सेविकांना मोलाचे मार्गदर्शन केले. महिलांकडे आजदेखील उपभोगाची वस्तू म्हणून पाहिले जाते हे फारच दुर्दैवी आहे. समाजात सुशिक्षित असुरांची संख्या वाढते आहे. या असुरांना वठणीवर आणण्याचे काम महिलाच करू शकतात, असे त्या म्हणाल्या. राष्ट्रसेविका समितीच्या माध्यमातून युवतींमध्ये शक्तीचे बीजारोपण केले जात आहे व खऱ्या अर्थाने आज हे एक ‘शक्तीपीठ’ झाले आहे. प्रत्येक महिलेने मी अबला नाही तर सबला आहे असाच विचार केला पाहिजे, असा सल्ला त्यांनी दिला.