शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
2
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
3
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
4
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडेली पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
5
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
6
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
7
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
8
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
9
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
10
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
11
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
12
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
13
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
14
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
15
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
16
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
17
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
18
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
19
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
20
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
Daily Top 2Weekly Top 5

प्रक्रिया प्रकल्प असूनसुद्धा उपराजधानीत तब्बल ११६.५० एमएलडी सांडपाणी जाते वाहून

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 6, 2022 08:10 IST

नागपूर शहरात दररोज निघणाऱ्या ५२० एमएलडीपैकी सुमारे ११६.५० एमएलडी सांडपाणी वाहून जात आहे.

ठळक मुद्देशहरातील नद्या कशा होणार स्वच्छ? रोज निघते ५२० एमएलडी सांडपाणी

नागपूर : शहरातून वाहणाऱ्या नद्यांमधून बोटी चालविण्याचे स्वप्न साकारण्यासाठी २०१३ पासून प्रयत्न सुरू आहेत. नदीतील पाणी स्वच्छ व्हावे म्हणून सांडपाण्यावर प्रक्रिया करणारे प्रकल्प उभारण्यात आले आहेत. त्यानंतरही शहरात दररोज निघणाऱ्या ५२० एमएलडीपैकी सुमारे ११६.५० एमएलडी सांडपाणी वाहून जात आहे. त्यामुळे नागनदी स्वच्छतेचा खटाटोपाला अर्थच राहिलेला नसल्याचे दिसतेय.

नागपूर महानगरपालिकेच्या सार्वजनिक आरोग्य अभियांत्रिकी विभागाकडून मिळालेल्या माहितीनुसार, शहरात दररोज सुमारे ५२० एमएलडी सांडपाणी निर्माण होत आहे. यापैकी नागपूर महापालिका आणि नागपूर सुधार प्रण्यास मिळून ४०३.५ एमएलडी पाण्यावर प्रक्रिया करते. परंतु प्रक्रिया न केलेले सांडपाणी कुठे जाते याची कल्पना किंवा नोंद महापालिकेकडे नाही, अशी माहिती महापालिकेने माहितीच्या अधिकारात पर्यावरणप्रेमी संजय अग्रवाल यांना दिली आहे. महाराष्ट्र प्रदूषण कंट्रोल बोर्डने महापालिकेला नोटीस बजावून प्रक्रिया न झालेले पाणी कन्हान नदीत सोडले जात असल्याने आक्षेप घेतला आहे. प्रक्रिया न केलेले पाणी नदीत न सोडण्याच्या मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाच्या आदेशाचा हा अवमान आहे.

- येथे होते सांडपाण्यावर प्रक्रिया

महापालिकेचे वॉटर ट्रीटमेंट प्लॅण्ट

भांडेवाडीमध्ये - ३३० एमएलडी

मानकापूरमध्ये - ५ एमएलडी

मोक्षधाम येथे - ५ एमएलडी

- नागपूर सुधार प्रन्यासचे प्लॅण्ट

काचीमेट - १ एमएलडी

सोनेगाव - ०.३ एमएलडी

हजारी पहाड - ४ एमएलडी

अंबाझरी - ३.२ एमएलडी

दाभा - ५ एमएलडी

सोमलवाडा १ - २० एमएलडी

सोमलवाडा २ - २० एमएलडी

वांजरा - १० एमएलडी

- मोक्षधामचा प्रकल्प बंद

मोक्षधाम घाटावर लावण्यात आलेला वॉटर ट्रीटमेंट प्लॅण्टमध्ये ५ एमएलडी पाण्यावर प्रक्रिया होत असल्याचे महापालिका सांगत असली तरी, हा प्रकल्प बऱ्याच दिवसापासून बंद आहे. हा प्रकल्प चालविणारा कंत्राटदाराचा कंत्राट संपल्यामुळे नवीन कंत्राटदाराचा शोध सुरू असल्याची सूत्रांची माहिती आहे.

- शहरातून निघालेले सांडपाणी ज्यावर प्रक्रिया होत नाही, ते सरळ नदीला मिळत असल्याने पर्यावरणाचे नुकसान होत आहे. ग्रामीण जनता या नदीचे पाणी पिण्यास उपयोग करीत असल्याने त्यांच्या आरोग्यावर परिणाम होत आहे. हा प्रकार न्यायालयाच्या निर्णयाचे उल्लंघन करणारा आहे.

संजय अग्रवाल, पर्यावरणप्रेमी

- पुन्हा सांडपाण्यावर प्रक्रिया करणारे तीन प्रकल्प प्रस्तावित

१) नरसाळा येथे पोहरा नदीवर २० एमएलडी क्षमतेचा प्रकल्प निर्माण होणार आहे. त्याची देखभाल दुरुस्ती स्मार्ट सिटी नागपूर करणार आहे.

२) अमृत योजनेंतर्गत शहरातील दक्षिण सिवेरेज झोनमध्ये ३५ एमएलडी प्रक्रिया केंद्र प्रस्तावित आहे.

३) नाग नदी उत्थान प्रकल्पांतर्गत ९२ एमएलडी पाण्यावर प्रक्रिया केंद्र प्रस्तावित आहे.

- महापालिकेने शहरातून दररोज ५२० एमएलडी सांडपाणी निघत असल्याचे सांगितले असले तरी, त्याचे प्रमाण जास्त आहे. या सांडपाण्यावर प्रक्रिया करणारे प्रकल्प वाढविल्यानंतरही नदीचे प्रदूषण संपणारे नाही. त्यामुळे घराघरातून यावर प्रक्रिया करणे गरजेचे आहे.

प्रद्युन्य सहस्त्रभोजनी, पर्यावरणतज्ज्ञ

टॅग्स :water pollutionजल प्रदूषण