शहरं
Join us  
Trending Stories
1
Beed: सरपंच संतोष देशमुख हत्येप्रकरणी वाल्मिक कराडसह सर्व आरोपींवर आरोप निश्चित
2
Prashant Jagtap: अजित पवारांसोबत जाण्याला विरोध का? प्रशांत जगतापांनी अखेर कारण सांगितलं, पुणेकरांचा मांडला मुद्दा
3
सायबर भामट्यांकडून IPS अधिकाऱ्याला ८ कोटींना गंडा; १२ पानांच्या चिठ्ठीत सगळं लिहिलं अन्...
4
सोने, स्टॉक की बिटकॉइन? अब्जाधीश गुंतवणूकदार रे डॅलिओ यांनी निखिल कामतसोबत उलगडली गुपिते
5
राज्यातील महानगरपालिका निवडणुकीसाठी काँग्रेसचे ४० स्टार प्रचारक जाहीर; पाहा, संपूर्ण यादी
6
Palmistry: तुमच्या हातावरील 'शुक्र पर्वत' सांगतो विवाहसौख्याचे गुपित; खडतर जीवन की श्रीमंती?
7
ठाकरे एकत्र, युती लवकरच; पण मनसेला समाधानकारक जागा मिळतील का?; संदीप देशपांडेचे मोठे विधान
8
DJ वाजवण्यापासून रोखलं, लग्नाची मिरवणूक निघण्यापूर्वीच नवरदेवानं उचललं टोकाचं पाऊल
9
ईशनिंदा नव्हे...! वाद प्रमोशनचा होता अन् धर्माच्या नावानं मारून टाकलं; दीपूचंद्र दासच्या कुटुंबाचा धक्कादायक खुलासा
10
संघर्षाचं सोनं झालं अन् 'आशा' बनली नगराध्यक्ष, नीलडोहच्या भूमिका मंडपेंची प्रेरणादायी वाटचाल 
11
Amravati Crime: प्रेमजाळं, ती २६ वर्षांची, तो २१ वर्षांचा! अनेकवेळा अत्याचार, दोनदा गर्भपात अन् तरीही धनंजयचा लग्नास नकार!
12
Vijay Hazare Trophy : किंग कोहली मैदानात उतरणार; पण स्टेडियममध्ये चाहत्यांना नो एन्ट्री; कारण...
13
“मुंबईत २०० जागांवर तयारी, ५० टक्के फॉर्म्युलाचा आग्रह, काँग्रेस…”; प्रकाश आंबेडकर थेट बोलले
14
MNS Shiv Sena UBT Alliance: ऐनवेळी ठाकरे बंधूंच्या युतीची घोषणा टळली, संजय राऊतांनी सांगितली नवी वेळ
15
Chanakya Niti: रातोरात श्रीमंत व्हाल, जर चाणक्यनीतीच्या 'या' ५ सवयी आजच लावून घ्याल
16
प्रसिद्ध व्हिस्की कंपनीने अचानक उत्पादन केले बंद! तब्बल १ हजार कर्मचाऱ्यांचे भविष्य टांगणीला
17
Dhurandhar: पाकिस्तानातील कराचीमध्ये राहायचे रणवीर सिंगचे आजोबा, पण घडलं असं काही की...
18
“कुणीही एकत्र येऊ शकते, पण मराठी माणूस हा पूर्णपणे भाजपाच्या पाठीशी उभा आहे”; कुणाचा दावा?
19
"...तर मग ऑपरेशन सिंदूर तरी कुठे चुकीचे होते?" मुनीर यांच्यावर पाकिस्तानी मौलानांचा कडाडून हल्ला
20
घसरत्या रुपयाला सावरण्यासाठी आरबीआयची धडपड; बाजारात विकले तब्बल....अब्ज डॉलर
Daily Top 2Weekly Top 5

आत्महत्येनंतरही संकटाचं ओझं!

By admin | Updated: June 28, 2015 03:04 IST

वाठोडा येथील विजय नावाचा शेतकरी जीवनाची लढाई लढत असताना त्याचा त्यात पराभव झाला.

बँकेची कर्जवसुलीसाठी नोटीस : धुणीभांडी करतेय शेतकऱ्याची पत्नीवसीम कुरेशी  नागपूरवाठोडा येथील विजय नावाचा शेतकरी जीवनाची लढाई लढत असताना त्याचा त्यात पराभव झाला. परंतु त्याच्या मृत्यूनंतरही त्याच्या कुटुंबाचे कष्ट कमी झाले नाही. त्याचे कुटुंब आता अनेक संकटांचा सामना करीत आहे. शासनाच्या दफ्तरी शेतकरी आत्महत्येचा उल्लेख करण्यात आला. मात्र त्याचा लाभ त्याच्या कुटुंबास काहीच झाला नाही. काही वर्षांपूर्वी कामठी तालुक्यातील टेमसना येथे आपली साडेसात एकर जमिनीत शेती करून विजय नावाचा शेतकरी आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करायचा. त्याला कर्ज घ्यायची गरजही पडली नाही. तीन वर्षांपूर्वी हवामानाने साथ न दिल्यामुळे त्याच्या शेतात नापिकी झाली. त्यानंतर त्याने २०१३ मध्ये आशेपोटी बँकेकडून १ लाख १३ हजार ८०० रुपयांचे कर्ज घेतले. त्याच्या शेतात पीक तर आले परंतु अतिवृष्टीमुळे ते वाया गेले. कर्जाच्या चिंतेमुळे विजयने १७ एप्रिल २०१४ रोजी आपल्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केली. कुटुंबातील प्रमुख व्यक्ती गेल्यामुळे नवव्या वर्गात असलेल्या त्याच्या अमोल नावाच्या मुलास काम करणे भाग पडले. त्याची आई माला विजय नरड ही सुद्धा दुसऱ्याच्या घरी धुणीभांडी करू लागली.परंतु विजयची आत्महत्या शासनाच्या दफ्तरी केवळ आत्महत्या म्हणूनच राहिली.मुलाचे शिक्षण पूर्ण व्हावेकमी वयात पतीचा मृत्यू झाला. मुलांचा सांभाळ करताना संकटांचा सामना करावा लागत आहे. याशिवाय शासकीय कार्यालयाच्या चकराही माराव्या लागत आहेत. इतके दु:ख सोसले, यापुढेही दु:ख झेलण्याची तयारी आहे. अशा स्थितीत शासनाकडून मदत मिळत असल्याचे नागरिकांनी सांगितले. त्यामुळे मदत मिळाल्यास कर्ज फेडण्यास मदत होऊन मुलांचे शिक्षण तरी पूर्ण होईल, अशी अपेक्षा माला विजय नरड यांनी व्यक्त केली.अनेक शेतकरी आत्महत्यांची नोंदच नाहीशेतकऱ्यांच्या आत्महत्यांच्या अनेक प्रकरणांची शासनाकडे नोंदच नाही. शेतकऱ्यांच्या विरुद्ध षडयंत्र सुरू आहे. आता गाव शेतकऱ्यांचे राहिलेले नाही. शेतकऱ्याच्या मालाला भाव मिळत नाही. त्याने लावलेले पैसेही वसूल होत नाहीत. त्यात हवामानाची साथ मिळत नाही आणि सध्याचा जमीन अधिग्रहण कायदा इंग्रजांच्या शासनापेक्षाही घातक आहे.-संजय सत्यकार, शेतकरी नेता