शहरं
Join us  
Trending Stories
1
Achyut Potdar Death: "अरे कहना क्या चाहते हो.." डायलॉगफेम फेम ज्येष्ठ अभिनेते अच्युत पोतदार काळाच्या पडद्याआड
2
युद्ध थांबणार...! "खूप आनंद वाटतोय, रशियाच्या राष्ट्राध्यक्षांना फोन केला..."; झेलेन्स्की यांच्या सोबतच्या बैठकीनंतर, काय म्हणाले ट्रम्प? 
3
१००पेक्षा जास्त लोकल रद्द, नाेकरदारांचे मेगा हाल! मुंबई विद्यापीठाने परीक्षा पुढे ढकलल्या!
4
वाचवा म्हणत तरुणीची कारमधून उडी, पाठलाग सुरु असतानाच थारची रिक्षाला धडक, ५ जणांचा मृत्यू
5
आजचे राशीभविष्य, १९ ऑगस्ट २०२५: कुटुंबात वाद संभवतात, नोकरीतील वातावरण चिंताजनक असेल
6
शाळेला निघालेली मुलं पाेलिस ठाण्यात! माटुंगा येथे दोन स्कूल बस अडकल्या गुडघाभर पाण्यात...
7
अतिवृष्टीचा ४ लाख हेक्टरवरील पिकांना फटका; मुंबईसह कोकण, मराठवाड्यात पावसाचे धुमशान
8
मुंबई: वडाळ्यात बेस्ट बसच्या धडकेत टॅक्सीची वाट बघत उभ्या असलेल्या आई, मुलाचा मृत्यू
9
पावसाचा मंडे ‘ब्लॉक’! चाकरमानी स्टेशनावर अडकले, चार तासांत उपनगरात ७५ मि.मी. पाऊस
10
मुदतीत थकबाकी न भरल्यास संरक्षण नाहीच, भाडे न देणाऱ्याची हकालपट्टी निश्चित: सुप्रीम कोर्ट
11
माेफत शिका, तुम्हीही ‘एआय’ एक्स्पर्ट बना; केंद्राच्या स्वयम पोर्टलवर अनेक काेर्सेस उपलब्ध
12
मुंबई, ठाण्याची दैना; आठवड्याच्या पहिल्याच दिवशी दाणादाण; आज रेड अलर्ट तर उद्या यलाे अलर्ट!
13
मुख्य निवडणूक आयुक्तांविरोधात ‘इंडिया’कडून महाभियोगाची तयारी; मतदारयादी त्रुटींबाबत आक्रमक
14
"अख्खा जिल्हा, ९९१ एकर जमीन एकाच कंपनीला दिली, ही काय चेष्टा लावलीय का?" हायकोर्ट संतापले
15
माणुसकीला काळीमा फासणारी घटना! ४ वर्षाच्या मुलाचं गुप्तांग कापलं; कारण ऐकून संताप अनावर होईल
16
टोल नाक्यावर सैन्यातील जवानाला मारहाण, NHAI ची मोठी कारवाई; कंपनीला २० लाख दंड, सोबतच...
17
LGEC 2025: 'लाडकी बहीण' योजनेमुळे महाराष्ट्रातील अर्थव्यवस्थेला चालनाच मिळाली; सुनील तटकरेंनी समजावलं 'गणित'
18
Donald Trump : डोनाल्ड ट्रम्प यांनी पाकिस्तानला जवळ केले! पण अमेरिकी कंपन्यांसाठी धोक्याची घंटा ठरणार
19
भारताच्या मुख्य निवडणूक आयुक्तांना संविधानाचं 'सुरक्षा कवच'; पदावरून हटवणं इतकं सोपं नाही, कारण...
20
Asia Cup 2025 : आता बुमराहला विश्रांतीच घेऊ द्या! आशिया कप स्पर्धेआधी असं का म्हणाले गावसकर?

आत्महत्येनंतरही संकटाचं ओझं!

By admin | Updated: June 28, 2015 03:04 IST

वाठोडा येथील विजय नावाचा शेतकरी जीवनाची लढाई लढत असताना त्याचा त्यात पराभव झाला.

बँकेची कर्जवसुलीसाठी नोटीस : धुणीभांडी करतेय शेतकऱ्याची पत्नीवसीम कुरेशी  नागपूरवाठोडा येथील विजय नावाचा शेतकरी जीवनाची लढाई लढत असताना त्याचा त्यात पराभव झाला. परंतु त्याच्या मृत्यूनंतरही त्याच्या कुटुंबाचे कष्ट कमी झाले नाही. त्याचे कुटुंब आता अनेक संकटांचा सामना करीत आहे. शासनाच्या दफ्तरी शेतकरी आत्महत्येचा उल्लेख करण्यात आला. मात्र त्याचा लाभ त्याच्या कुटुंबास काहीच झाला नाही. काही वर्षांपूर्वी कामठी तालुक्यातील टेमसना येथे आपली साडेसात एकर जमिनीत शेती करून विजय नावाचा शेतकरी आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करायचा. त्याला कर्ज घ्यायची गरजही पडली नाही. तीन वर्षांपूर्वी हवामानाने साथ न दिल्यामुळे त्याच्या शेतात नापिकी झाली. त्यानंतर त्याने २०१३ मध्ये आशेपोटी बँकेकडून १ लाख १३ हजार ८०० रुपयांचे कर्ज घेतले. त्याच्या शेतात पीक तर आले परंतु अतिवृष्टीमुळे ते वाया गेले. कर्जाच्या चिंतेमुळे विजयने १७ एप्रिल २०१४ रोजी आपल्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केली. कुटुंबातील प्रमुख व्यक्ती गेल्यामुळे नवव्या वर्गात असलेल्या त्याच्या अमोल नावाच्या मुलास काम करणे भाग पडले. त्याची आई माला विजय नरड ही सुद्धा दुसऱ्याच्या घरी धुणीभांडी करू लागली.परंतु विजयची आत्महत्या शासनाच्या दफ्तरी केवळ आत्महत्या म्हणूनच राहिली.मुलाचे शिक्षण पूर्ण व्हावेकमी वयात पतीचा मृत्यू झाला. मुलांचा सांभाळ करताना संकटांचा सामना करावा लागत आहे. याशिवाय शासकीय कार्यालयाच्या चकराही माराव्या लागत आहेत. इतके दु:ख सोसले, यापुढेही दु:ख झेलण्याची तयारी आहे. अशा स्थितीत शासनाकडून मदत मिळत असल्याचे नागरिकांनी सांगितले. त्यामुळे मदत मिळाल्यास कर्ज फेडण्यास मदत होऊन मुलांचे शिक्षण तरी पूर्ण होईल, अशी अपेक्षा माला विजय नरड यांनी व्यक्त केली.अनेक शेतकरी आत्महत्यांची नोंदच नाहीशेतकऱ्यांच्या आत्महत्यांच्या अनेक प्रकरणांची शासनाकडे नोंदच नाही. शेतकऱ्यांच्या विरुद्ध षडयंत्र सुरू आहे. आता गाव शेतकऱ्यांचे राहिलेले नाही. शेतकऱ्याच्या मालाला भाव मिळत नाही. त्याने लावलेले पैसेही वसूल होत नाहीत. त्यात हवामानाची साथ मिळत नाही आणि सध्याचा जमीन अधिग्रहण कायदा इंग्रजांच्या शासनापेक्षाही घातक आहे.-संजय सत्यकार, शेतकरी नेता