शहरं
Join us  
Trending Stories
1
“अशोक खरात विकृत, जलदगती न्यायालयात प्रकरण चालवून फाशी द्या”; सुनील तटकरेंनी केली मोठी मागणी
2
इराणपेक्षा हा अरब देशच जास्त होरपळतोय; वीज, पाणी अन् ऑईल डेपो, सरकारी इमारतीही नेस्तनाभूत...
3
देशात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा; कोणकोणत्या राज्यांना हवामान खात्याने दिला अलर्ट?
4
पत्नीने पतीसोबत राहण्यास दिला नकार, उच्च न्यायालयाने प्रियकरासोबत राहण्याची दिली परवानगी
5
इराण युद्धाचा परिणाम! 'मूडीज'ने भारताचा विकास दर अंदाज घटवला; महागाई आणि व्याजदर वाढण्याचा धोका
6
इराणचा मोठा दावा! पायलटला शोधायला आलेले अमेरिकेचे C-130 विमान पाडले 
7
Middle East War: मध्य पूर्वेतील युद्ध भडकणार? अमेरिकेचं सर्वात घातक मिसाइल युद्धाच्या रणांगणात, इराणवर महासंकट!
8
मतदार यादीच्या कामाचा ‘शिक्षण-आरोग्य’वर ताण; ‘आरोग्य’चे ३ हजार, 'शिक्षण'च्या २ हजार कर्मचाऱ्यांचा समावेश
9
"या वेड्याला कसंही करून रोखा...!"; नोबेल विजेत्या माजी आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा एजन्सी प्रमुखांचंं खाडी देश अन् UN ला आवाहन
10
थारच्या वाळवंटातून कच्च तेल उत्पादनात विक्रमी वाढ; भारताचे आयातीवरील अवलंबित्व कमी होणार?
11
AI च्या नावाखाली layoff सुरू! Oracle, Amazon, Meta...२०२६ मध्ये हजारो कर्मचाऱ्यांना नारळ
12
मुंबई हादरवण्याचा कट उधळला, २५ सेकंदाच्या व्हिडिओनं पोलखोल; पाकिस्तानी नेटवर्कचा खेळ बिघडला
13
Ashok Kharat Case : भोंदूबाबाचा १ कोटींचा 'महाप्रताप'! अशोक खरातवर १२ वा गुन्हा दाखल; व्यावसायिकाची मोठी फसवणूक
14
शरद पवार-उद्धव ठाकरेंमध्ये चर्चा; बारामती-राहुरी पोटनिवडणुकीबाबत ठरवले? नेमके काय घडतेय?
15
ते जहाज पुन्हा भारताकडे वळले...! चीनकडे का जात होते? 'पिंग शुन'चे गुपित 
16
क्रिकेट सोडून सरकारी नोकरी करायला गेला; चप्पल घालून टाकलेल्या एका चेंडूने 'त्याचे' आयुष्यच बदललं
17
Dhruv Jurel: मास्टरमाइंड जुरेल! आधी दमदार बॅटिंग, मग डोकं लढवून जिंकला सामना, ठरला विजयाचा शिल्पकार
18
अंधश्रद्धेच्या नावाखाली मुलीचा बळी देण्याचा प्रयत्न; स्थानिकांनी वाचवला जीव, आरोपीला बेदम चोप...
19
टाटा ट्रस्टमधील वादाला नवे वळण! TVS च्या वेणू श्रीनिवासन यांचा तडकाफडकी राजीनामा; मेहली मिस्त्रींच्या एका आव्हानाने खळबळ
20
२००० किमी दूर कोलकात्यावर हल्ल्याची धमकी; पाकिस्तानच्या हाती 'अशी' कोणती मिसाइल लागली?
Daily Top 2Weekly Top 5

देशमुख, केदार यांची मंत्रिपदी वर्णी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 30, 2019 10:54 IST

राष्ट्रवादीचे नेते काटोलचे आमदार अनिल देशमुख व काँग्रेसचे सावनेरचे आमदार सुनील केदार यांची मंत्रिपदी वर्णी लागली आहे.

ठळक मुद्देदेशमुख पाचव्यांदा तर केदार दुसऱ्यांदा घेणार शपथ आशिष जयस्वाल यांना रात्री उशिरापर्यंत निरोप नाही

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : राष्ट्रवादीचे नेते काटोलचे आमदार अनिल देशमुख व काँग्रेसचे सावनेरचे आमदार सुनील केदार यांची मंत्रिपदी वर्णी लागली आहे. देशमुख हे तब्बल पाचव्यांदा तर केदार हे दुसऱ्यांदा मंत्रिपदाची शपथ घेणार आहेत. या दोन्ही नेत्यांना त्यांच्या पक्षाकडून तसे फोन आले आहेत. विशेष म्हणजे १९९५ मध्ये हे दोन्ही नेते अपक्ष म्हणून विधानसभेत पोहचले होते व युती सरकारमध्ये मंत्रीही झाले होते.अनिल देशमुख यांना शनिवारी दुपारी १ वाजताच पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांचा फोन आला होता. विशेष म्हणजे देशमुख यांना मंत्रिपदाचे संकेत शरद पवार यांच्या नागपूर दौºयातच मिळाले होते. देशमुख रविवारी सायंकाळी मुंबईला रवाना झाले. देशमुख तब्बल पाचव्यांदा मंत्री होणार असून, यापूर्वी ते सलग १८ वर्षे मंत्री राहिले आहेत. विशेष म्हणजे ते जेव्हाही निवडून आले, तेव्हा मंत्री झाले आहेत. २०१४ मध्ये ते निवडणूक हरले होते. त्यावेळी राज्यातील आघाडी सरकारही गेले होते. सहकारमहर्षी बाबासाहेब केदार यांचे पुत्र असलेले आ. सुनील केदार यांची जिल्ह्याच्या ग्रामीण राजकारणावर पकड आहे. आ. केदार हे तब्बल पाचव्यांदा आमदार म्हणून विजयी झाले आहेत. एकदा त्यांनाही पराभवाला सामोरे जावे लागले होते. १९९२ मध्ये सर्वप्रथम केदार यांनी पाटणसावंगी सर्कलमधून जिल्हा परिषदेची निवडणूक लढविली व विजयी होत सक्रिय राजकारणात प्रवेश केला. पुढे १९९५ मध्ये ते सावनेर विधानसभा मतदारसंघातून अपक्ष म्हणून विजयी झाले होते. त्याचवेळी युती सरकारमध्ये ऊर्जाराज्यमंत्री म्हणून काम करण्याचा अनुभव त्यांच्या पाठीशी आहे.पहिल्या टप्प्यात नागपूर जिल्ह्यातून नितीन राऊत यांची मंत्रिमंडळात वर्णी लागली होती. त्यामुळे विस्तारात कुणाला संधी मिळते, याकडे राजकीय वर्तुळाच्या नजरा लागल्या होत्या. राष्ट्रवादीकडून अनिल देशमुख, काँग्रेसकडून आ. सुनील केदार तर शिवसेनेच्या कोट्यातून आ. आशिष जयस्वाल यांचे नाव आघाडीवर होते. देशमुख यांना शनिवारीच निरोप मिळाला होता. त्यामुळे ते निश्चिंत होते. केदार यांना रविवारी रात्री ७.३०वाजेपर्यंत निरोप मिळाला नव्हता. त्यामुळे त्यांचे समर्थक अस्वस्थ होते. शेवटी निरोप येताच केदार समर्थक सुखावले. आ. जयस्वाल यांना मात्र रात्री उशिरापर्यंत शिवसेनेकडून निरोप आला नव्हता. जयस्वाल मात्र मुंबईत पोहोचले आहेत.मंत्रिपदापूर्वीच देशमुखांना मिळाला होता लालदिवाअनिल देशमुख हे १९७० पासून युवक कॉँग्रेसमध्ये सक्रिय झाले. या काळात युवक काँग्रेसचा देशभरात जोर होता. मे १९९२ मध्ये देशमुख हे पंचायत समितीची निवडणूक लढले व सभापती झाले. २३ मे ते ९ जून १९९२ या काळात सभापती राहिलेले देशमुख ९ जुलै १९९२ रोजी नागपूर जिल्हा परिषदेचे अध्यक्ष झाले. या काळात राज्य सरकारने जिल्हा परिषद अध्यक्षांना राज्यमंत्र्यांचा दर्जा दिला व त्याचवेळी देशमुख यांना लाल दिवा मिळाला होता.

टॅग्स :Governmentसरकार