शहरं
Join us  
Trending Stories
1
Parth Pawar Land Deal: भूखंड खरेदी प्रकरणात तिघांविरोधात गुन्हा दाखल, FIR मध्ये पार्थ पवारांचे नाव नाही 
2
प्रसिद्ध गायिका आणि अभिनेत्री सुलक्षणा पंडित यांचं निधन, मुंबईतील रुग्णालयात घेतला अखेरचा श्वास
3
Mumbai Local Accident: लोकल रेल्वेने चार प्रवाशांना उडवले, दोघे ठार; सँडहर्स्ट रोड स्थानकावरील घटना
4
...अखेर मनोहर शिंदेंनी दाखवला काँग्रेसला 'हात'! पृथ्वीराज चव्हाण यांच्यासह जिल्हाध्यक्षांना पाठवला राजीनामा
5
पुण्यातील इंजिनिअरचे साडेनऊ तोळे सोने घेऊन पळाला, पोलिसांनी 'साशी गँग'च्या सदस्याला हरयाणात केली अटक
6
जवाहर लाल नेहरू विद्यापीठात पुन्हा 'लाल सलाम', 'अभाविप'ला झटका; चारही जागा डाव्यांनी जिंकल्या
7
'...त्याच्यामुळेच युती होऊ शकली नाही'; नितेश राणेंचं नाव घेत दीपक केसरकर स्पष्टच बोलले
8
पाकिस्तानचे PM शाहबाज यांच्या जवळच्या मंत्र्यांने दहशतवादी हाफिज सईदकडे आश्रय घेतला; केंद्रीय मंत्र्याने पहिल्यांदाच भेट दिली
9
दिल्लीनंतर आता बिहार! भाजपा नेत्याने १० महिन्यात दोन राज्यात केले मतदान; विरोधकांनी घेरलं
10
Mumbai Local Train: मुंबई लोकल तासाभराच्या खंडानंतर पुन्हा धावली; कर्मचाऱ्यांच्या आंदोलनामुळे प्रवाशांचे हाल
11
"श्री, मला माफ कर..."! मुंग्यांच्या भीतीने विवाहितेने आयुष्य संपवलं; अजब प्रकारानं सगळेच हैराण
12
केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी महत्वाची बातमी, VRS संदर्भात सरकारनं जारी केली नवी गाइडलाइन!
13
WPL 2026 Retained Players List : मुंबई इंडियन्सनं वर्ल्ड चॅम्पियन कॅप्टन हरमनप्रीतला पगारवाढ दिली, पण...
14
"...आता कमरेवर हात ठेवून शेतात फिरतायेत"; एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरे यांना टोला
15
नागपुरात सडक्या सुपारीचे दलाल परत सक्रिय, सहा हजार किलोंहून अधिक माल जप्त
16
"तेव्हाच सांगितलं होतं असं काही करू नका"; जमीन घोटाळा आरोपांवर अजित पवार स्पष्टच बोलले...
17
IND A vs SA A : पंत-KL राहुलसह सारेच ढेर; नाबाद शतकासह ‘ध्रुव’ तारा चमकला
18
राहुल गांधींनी हरियाणातील ज्या भाजप नेत्याच्या पत्त्यावर 66 मतं असल्याचा दावा केला, त्याचं सत्य काय? जाणून घ्या...!
19
Travel : हिवाळ्यात फिरायला जायचा विचार करताय? दक्षिण भारतातील 'ही' ठिकाणं ठरतील बेस्ट
20
Parth Pawar Land Case: "तुम्ही-आम्ही भांडत राहायचं आणि यांची मुलं जमिनी लाटून..."; उद्धव ठाकरेंचा घणाघात

देशमुख, केदार यांची मंत्रिपदी वर्णी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 30, 2019 10:54 IST

राष्ट्रवादीचे नेते काटोलचे आमदार अनिल देशमुख व काँग्रेसचे सावनेरचे आमदार सुनील केदार यांची मंत्रिपदी वर्णी लागली आहे.

ठळक मुद्देदेशमुख पाचव्यांदा तर केदार दुसऱ्यांदा घेणार शपथ आशिष जयस्वाल यांना रात्री उशिरापर्यंत निरोप नाही

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : राष्ट्रवादीचे नेते काटोलचे आमदार अनिल देशमुख व काँग्रेसचे सावनेरचे आमदार सुनील केदार यांची मंत्रिपदी वर्णी लागली आहे. देशमुख हे तब्बल पाचव्यांदा तर केदार हे दुसऱ्यांदा मंत्रिपदाची शपथ घेणार आहेत. या दोन्ही नेत्यांना त्यांच्या पक्षाकडून तसे फोन आले आहेत. विशेष म्हणजे १९९५ मध्ये हे दोन्ही नेते अपक्ष म्हणून विधानसभेत पोहचले होते व युती सरकारमध्ये मंत्रीही झाले होते.अनिल देशमुख यांना शनिवारी दुपारी १ वाजताच पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांचा फोन आला होता. विशेष म्हणजे देशमुख यांना मंत्रिपदाचे संकेत शरद पवार यांच्या नागपूर दौºयातच मिळाले होते. देशमुख रविवारी सायंकाळी मुंबईला रवाना झाले. देशमुख तब्बल पाचव्यांदा मंत्री होणार असून, यापूर्वी ते सलग १८ वर्षे मंत्री राहिले आहेत. विशेष म्हणजे ते जेव्हाही निवडून आले, तेव्हा मंत्री झाले आहेत. २०१४ मध्ये ते निवडणूक हरले होते. त्यावेळी राज्यातील आघाडी सरकारही गेले होते. सहकारमहर्षी बाबासाहेब केदार यांचे पुत्र असलेले आ. सुनील केदार यांची जिल्ह्याच्या ग्रामीण राजकारणावर पकड आहे. आ. केदार हे तब्बल पाचव्यांदा आमदार म्हणून विजयी झाले आहेत. एकदा त्यांनाही पराभवाला सामोरे जावे लागले होते. १९९२ मध्ये सर्वप्रथम केदार यांनी पाटणसावंगी सर्कलमधून जिल्हा परिषदेची निवडणूक लढविली व विजयी होत सक्रिय राजकारणात प्रवेश केला. पुढे १९९५ मध्ये ते सावनेर विधानसभा मतदारसंघातून अपक्ष म्हणून विजयी झाले होते. त्याचवेळी युती सरकारमध्ये ऊर्जाराज्यमंत्री म्हणून काम करण्याचा अनुभव त्यांच्या पाठीशी आहे.पहिल्या टप्प्यात नागपूर जिल्ह्यातून नितीन राऊत यांची मंत्रिमंडळात वर्णी लागली होती. त्यामुळे विस्तारात कुणाला संधी मिळते, याकडे राजकीय वर्तुळाच्या नजरा लागल्या होत्या. राष्ट्रवादीकडून अनिल देशमुख, काँग्रेसकडून आ. सुनील केदार तर शिवसेनेच्या कोट्यातून आ. आशिष जयस्वाल यांचे नाव आघाडीवर होते. देशमुख यांना शनिवारीच निरोप मिळाला होता. त्यामुळे ते निश्चिंत होते. केदार यांना रविवारी रात्री ७.३०वाजेपर्यंत निरोप मिळाला नव्हता. त्यामुळे त्यांचे समर्थक अस्वस्थ होते. शेवटी निरोप येताच केदार समर्थक सुखावले. आ. जयस्वाल यांना मात्र रात्री उशिरापर्यंत शिवसेनेकडून निरोप आला नव्हता. जयस्वाल मात्र मुंबईत पोहोचले आहेत.मंत्रिपदापूर्वीच देशमुखांना मिळाला होता लालदिवाअनिल देशमुख हे १९७० पासून युवक कॉँग्रेसमध्ये सक्रिय झाले. या काळात युवक काँग्रेसचा देशभरात जोर होता. मे १९९२ मध्ये देशमुख हे पंचायत समितीची निवडणूक लढले व सभापती झाले. २३ मे ते ९ जून १९९२ या काळात सभापती राहिलेले देशमुख ९ जुलै १९९२ रोजी नागपूर जिल्हा परिषदेचे अध्यक्ष झाले. या काळात राज्य सरकारने जिल्हा परिषद अध्यक्षांना राज्यमंत्र्यांचा दर्जा दिला व त्याचवेळी देशमुख यांना लाल दिवा मिळाला होता.

टॅग्स :Governmentसरकार