शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
2
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
3
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
4
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
5
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
6
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
7
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
8
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
9
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
10
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
11
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
12
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
13
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
14
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
15
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
16
India T20 World Cup Squad Announced : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा! गिलचा पत्ता कट, ईशान किशनला संधी
17
२०×१२×२० SIP Rule ची कमाल, दर महिन्याची छोटी रक्कम बनवेल कोट्यधीश; सोप्या भाषेत समजून घ्या
18
तुमचे आरोग्य खऱ्याच गोष्टीस पात्र आहे! बनावट उत्पादनांविरोधात हर्बालाइफ इंडियाचा उपक्रम
19
Numerology: २०२६ चं भविष्य लपलंय तुमच्या जन्मतारखेत; नव्या वर्षात प्रगती होणार की अधोगती? वाचा
20
एपस्टीन फाइल्स प्रकरण, मोदींचे नाव घेणाऱ्या पृथ्वीराज चव्हाणांना DCM शिंदेंचे उत्तर; म्हणाले…
Daily Top 2Weekly Top 5

जिल्हा बँकेच्या २0५९ कोटींच्या ठेवी बुडणार

By admin | Updated: May 29, 2014 03:28 IST

भारतीय रिझर्व्ह बँकेने १६ मे २0१४ रोजी वर्धा, बुलडाणा व नागपूर जिल्हा सहकारी बँकेचे ...

नागपूर : भारतीय रिझर्व्ह बँकेने १६ मे २0१४ रोजी वर्धा, बुलडाणा व नागपूर जिल्हा सहकारी बँकेचे व्यवहार बंद करण्याचे आदेश दिले आहे. या बँकांमध्ये शेतकरी, जिल्हा परिषद व पतसंस्थांच्या जवळपास २0५९ कोटी रुपयांच्या ठेवी आहेत. या बँकांवर लिक्वीडेटर बसण्याची शक्यता असून, असे झाल्यास २0५९ कोटी रु पयांच्या ठेवी बुडणार असल्याची शक्यता भाजपा किसान मोर्चाचे प्रदेश सरचिटणीस प्रशांत तिगावकर यांनी पत्रपरिषदेत वर्तविली.

१५ मे २0१२ रोजी रिझर्व्ह बँकेने या तीनही बँकेला नोटीस बजावली होती. बँकांनी वसुली करून राज्य शासनाची मदत घेऊन बँकेची परिस्थिती दुरुस्त करायला हवी होती. आज रिझर्व्ह बँकेने तीनही बँकेचे व्यवहार ठप्प केल्यानंतर राज्याचे मंत्रिमंडळ जागे झाले आहे. तीनही बँकेचे व्यवहार सुरू ठेवण्यासाठी शेअर कॅपिटलच्या स्वरूपात ३१९ कोटी रुपये रिझर्व्ह बँकेकडे जमा करण्यास तत्त्वत: मंजुरी दिली आहे. मात्र रिझर्व्ह बँकेने परवाना देण्याला नकार दिल्यामुळे तीनही बँका रिझर्व्ह बँकेच्या विरोधात उच्च न्यायालयात गेल्या आहेत. उच्च न्यायालयात जरी व्यवहाराला मंजुरी मिळाली तरीही ठेवीदार आपल्या ठेवी परत मिळविण्यासाठी बँकेकडे तगादा लावणार आहे. आज तीनही बँकेकडे शेतकर्‍यांच्या १७१६ कोटींच्या ठेवी आहेत. बँकेची १५९७ कोटींची वसुली बाकी आहे. या तीनही बँका काँग्रेस-राष्ट्रवादीच्या ताब्यात आहेत. यात झालेले घोटाळे सर्वश्रुत आहेत. घोटाळे करणार्‍यांकडून जोपर्यंंत वसुली होणार नाही तोपर्यंंत बँका वाचू शकत नाही. वर्धा, बुलडाणा बँकेने सुतगिरण्या, साखर कारखाने, शिक्षण संस्थांना करोडो रुपयांचे वाटप केले आहे. त्यांची वसुली होणे शक्य नाही. तर न्यायालयाने आदेश देऊनही आमदार सुनील केदार यांनी नागपूर जिल्हा सहकारी बँकेत केलेल्या १५३ कोटी रुपयांच्या घोटाळ्याची वसुली होऊ शकली नाही. त्यामुळे जोपर्यंंत राज्य सरकार २000 कोटी रुपयांची मदत बँकेला करणार नाही तोपर्यंत बँका चालू शकणार नाही, असे तिगावकर म्हणाले.

जालना, धुळे व नांदेड बँकेला जशी सरकारने मदत केली, त्याच धर्तीवर विदर्भातील बँकेला केली असती, तर बँका डबघाईस आल्या नसत्या. या तीनही बँकेत दोन हजार कोटींवर ठेवी बुडणार असतानाही महाराष्ट्र सरकार कुठलीही कारवाई करीत नाही. यात दोषी असलेल्या महाराष्ट्र सरकार विरोधात ठेवीदार मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात याचिका दाखल करणार असल्याचे तिगावकर म्हणाले. (प्रतिनिधी)