शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताचा मोठा निर्णय! पाकिस्तानातील १६ युट्यूब चॅनेल्सवर घातली बंदी, बघा संपूर्ण यादी
2
आपल्याच लोकांनी विश्वासघात केला! पहलगाम हल्ल्यात १५ काश्मिरींची ओळख पटली
3
पंतगराव कदम यांच्या कन्या भारती लाड यांचे निधन; पुण्यात घेतला अखेरचा श्वास
4
"हिंदी ऑडिशन क्रॅक करता येत नाहीयेत...", आस्ताद काळेने सांगितला अनुभव; म्हणाला...
5
अजब प्रेम की गजब कहाणी! आधी लैंगिक अत्याचाराच्या गुन्ह्यात अडकवलं; नंतर त्याच्यासोबत लग्न केलं
6
'माझ्या मतदारसंघात येऊन मला शहाणपणा शिकवायची गरज नाही', योगेश कदम यांनी नितेश राणेंना सुनावलं
7
AI मुळे आयटी क्षेत्रातील नोकऱ्यांना किती धोका? TCS च्या जागतिक अधिकाऱ्याने स्पष्टच सांगितलं
8
"स्वतःच लोकांना मारता, तासभर एकही सैनिक तिथे गेला नाही"; आफ्रिदीने पहलगाम हल्ल्यासाठी सैन्याला धरले जबाबदार
9
Post Office च्या कमालीच्या पाच सेव्हिंग स्कीम्स; गुंतवणूक करा, मिळेल FD पेक्षा अधिक व्याज
10
पाकिस्तानला तुर्कीची रसद! बायरकतार ड्रोनसह सहा विमाने भरून शस्त्रास्त्रे कराचीला पोहोचली
11
Mumbai: BEST बसचे तिकीट दरात दुप्पटीने महागणार! साध्या आणि एससी बसच्या प्रवासासाठी किती पैसे मोजावे लागणार?
12
ऐकावे ते नवलच! एक व्यक्ती मृत असतानाही सोलापुरातील निवडणुकीत झाले १०० टक्के मतदान
13
"कपडे काढून बस अन्...", साजिद खानने अभिनेत्रीकडे केली होती विचित्र मागणी; म्हणाली...
14
"....नाहीतर मी मेलो असतो"; केदार शिंदेंच्या आयुष्यात स्वामी समर्थ कसे आले?
15
Astro Tips: अचूक उत्तर मिळण्यासाठी ज्योतिषांकडे एखादा प्रश्न घेऊन कधी जायला हवे? जाणून घ्या!
16
सुनील मित्तल यांच्यानंतर मुकेश अंबानीही पुढे आले; चीनच्या 'या' कंपनीच्या मागे का पडलेत हे दिग्गज?
17
दहशतवाद्यांचा, हल्ल्यांचा आकडा ! गेल्या ३२ वर्षांत २३,३८६ दहशतवादी मारले; ६४१३ जवान शहीद झाले
18
इलेक्ट्रिक दुचाकी वाहनांना आता ४० नाही तर फक्त ५ दिवसात मिळणार अनुदान; कसा करायचा अर्ज?
19
१ मेपासून बदलणार पैशांशी निगडीत हे नियम; खिशावर होणार थेट परिणाम
20
"माझा विनयभंग झाला असता", अभिनेत्रीने सांगितला धक्कादायक प्रसंग; धोनीला अवॉर्ड दिल्यानंतर...

पशुसंवर्धन विभागाने तारली ग्रामीण अर्थव्यवस्था

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 23, 2021 04:06 IST

नागपूर : कोरोनामुळे सर्व उद्योग व्यवसाय बंद असल्याने मोठा फटका अर्थव्यवस्थेला बसला. पण पशुसंवर्धनाच्या माध्यमातून ग्रामीण अर्थव्यवस्थेला बळ मिळाले. ...

नागपूर : कोरोनामुळे सर्व उद्योग व्यवसाय बंद असल्याने मोठा फटका अर्थव्यवस्थेला बसला. पण पशुसंवर्धनाच्या माध्यमातून ग्रामीण अर्थव्यवस्थेला बळ मिळाले. दुग्धव्यवसाय, शेळीपालन, कुक्कुटपालन हे व्यवसाय लॉकडाऊनमध्येही सुरळीत सुरू होते. शेतकरी मोठ्या प्रमाणात पशुसंवर्धनविषयक व्यवसायाकडे वळलेले दिसत आहे. त्याचे कारण म्हणजे फक्त याच व्यवसायाने ग्रामीण अर्थव्यवस्था तारलेली दिसत आहे.

जिल्हा परिषदेत पशुसंवर्धन दिन साजरा करण्यात आला. या कार्यक्रमात कृषी सभापती तापेश्वर वैद्य यांनी ग्रामीण अर्थकारण आणि पशुसंवर्धन या विषयावर मार्गदर्शन केले. कृत्रिम रेतन, कृती शिबिर, लसीकरण मोहीम, चर्चासत्र, वंध्यत्व निवारण शिबिर आदी माध्यमातून शेतकऱ्यांमध्ये जनजागृती करण्यात आली. परंतु कोविडमुळे जनसमूह एकत्र करणे योग्य नसल्याने पशुवैद्यकांनी आपापल्या क्षेत्रात नियमित कर्तव्य बजावले. गेल्यावर्षी कोरोना संसर्गासोबतच पशुंवरदेखील लम्पी आजार झाला होता. वेळीच जिल्ह्यातील संपूर्ण पशुवैद्यकीय चमूंनी नियोजन करून अवघ्या काही दिवसातच नियंत्रण मिळविले. त्याचदरम्यान नागपूर व कामठी तालुक्यात बर्ड फ्लूने पक्षी मृत झाल्याचे आढळले. विभागाने यावरही प्रतिबंध घातला.

- नाविन्यपूर्ण योजना व डीपीडीसीतूनही लाभ

नाविन्यपूर्ण योजना व डीपीडीसीतून ७०२ गाय गट तसेच ९९० शेळी गट व १ हजार पक्ष्याचे १८ कुक्कुट पक्षिगृह बांधकाम वाटप करून या व्यवसायाला अधिक चालना देण्यात आली आहे. या आर्थिक वर्षात पशुसंवर्धन विभागामार्फत पशुपालकांना अधिक सक्षम होण्याच्या दृष्टीने ३१६ गाय गट, ५५६ शेळी गट वाटप करण्याचे लक्ष्य ठेवण्यात आले असल्याचे वैद्य म्हणाले.

- दूध उत्पादन वाढविण्यावर भर

प्रत्येक शेतकऱ्याला योजनेमार्फत दुधाळ जनावरे देणे शक्य नसल्याने त्यांच्या घरच्या गाईपासून चांगल्या प्रतीच्या जास्त दूध देणाऱ्या कालवड तयार करण्याचे कार्य राष्ट्रीय कृत्रिम रेतन कार्यक्रम योजनेंतर्गत जिल्ह्यातील ५२६ गावांमध्ये सुरू आहे. विदर्भ,मराठवाडा दुग्धविकास प्रकल्पांतर्गत शेतकऱ्यांना बहुवार्षिक चारा हायब्रीड नेपियरचा पुरवठा करून वर्षभर हिरवा चारा उपलब्ध करून देण्यात येत आहे.