शहरं
Join us  
Trending Stories
1
Asha Bhosale: सूरसम्राज्ञी आशा भोसले अनंतात विलीन, दिग्गज गायकांनी गाणं गाऊन दिली अखेरची स्वरांजली
2
होर्मुझ सामुद्रधुनीवर ब्रिटन-फ्रान्सचा 'बिग प्लॅन'; ४० देशांना एकत्र आणणार, ट्रम्प यांना डच्चू
3
दिल्ली, हरयाणा, पंजाबमधील CCTV चे फुटेज थेट पाकिस्तानला, चिनी कॅमेऱ्यातून भारताची हेरगिरी
4
सिंगल चार्जवर ३२० KM रेंज...किंमत फक्त ₹१.२९ लाख! Ola ची नवीन EV स्कूटर लॉन्च
5
Latest Marathi News LIVE: सूरसम्राज्ञी आशा भोसले पंचत्वात विलीन, चाहत्यांनी साश्रू नयनांनी दिला अखेरचा निरोप
6
बालेन शाह यांनी PM मोदींना भेटण्यासाठी ठेवली अट; नेपाळ-भारत संबंध पुन्हा सुधारणार
7
"काही लोकांना ४ लग्नांची सूट, भाजप सत्तेत आल्यास...";  अमित शाह यांनी बंगालमध्ये सभा गाजवली, स्पष्टच बोलले
8
इराणी नेत्यांच्या सुरक्षेसाठी पाकिस्ताननं अख्खी ताकद पणाला लावली; कसं केले होते नियोजन?
9
सीलिंग फॅन की टेबल फॅन? वीज बिल वाचवण्यासाठी कोणता पर्याय सर्वोत्तम? खरेदीपूर्वी नक्की वाचा
10
"US-इराणमध्ये तयार होता अंतिम करार; शेवटच्या क्षणी आला एक कॉल अन् २१ तासांची चर्चा फिस्कटली"
11
श्रीलंकेत भारताची मोठी खेळी; खरेदी केली मोठी शिपबिल्डिंग कंपनी, चीन पाहतच राहिला
12
आशा भोसलेंची नात जनाईला धीर द्यायला पोहोचला 'मानलेला भाऊ' मोहम्मद सिराज, पाहा VIDEO
13
Garud Puran: गरुड पुराणानुसार मृत्यूपूर्वी मिळतात 'हे' रहस्यमयी संकेत; अखेरच्या काळात नेमकं काय घडतं?
14
MPSC भरती प्रक्रियेत मोठा बदल; राज्य मंत्रिमंडळाने घेतले ७ महत्त्वाचे निर्णय, जाणून घ्या
15
आले कधी अन् गेले कधी, समजलंच नाही! आयपीएलमध्ये सर्वात कमी धावसंख्येवर ऑलआउट झालेले संघ
16
८ व्या वेतन आयोगाची बंपर भरती; १.८० लाख रुपये महिना पगार, जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
17
पत्नीला काम सांगायचे म्हणून मुलाने केला पित्याचा खून; गडचिरोलीतील धक्कादायक घटना
18
Kalyan Accident: कल्याण-अहिल्यानगर महामार्गावर भीषण अपघात; ११ जणांचा मृत्यू, दोन गंभीर
19
IPL 2026: "सरळ मैदानाबाहेर जा...!" लाईव्ह सामन्यात सुनील गावस्कर आरसीबीच्या खेळाडूवर भडकले
20
इस्रायलचा महात्मा गांधी हॉस्पिटलवर हल्ला; सगळीकडे विध्वंस, इराणनं शेअर केला Video
Daily Top 2Weekly Top 5

कृषी विभागाचा ‘आत्मा’ संकटात!

By admin | Updated: December 4, 2015 03:19 IST

कृषिविषयक योजना थेट शेतकऱ्यांपर्यंत पोहोचाव्यात, शेतकऱ्यांना नवनवीन कृषी तंत्रज्ञानाची ओळख व्हावी व यातून बळीराजा हा सुखी-सुमृद्ध व्हावा,

योजना गुंडाळण्याची तयारी : संचालकांचे पत्र जारी जीवन रामावत नागपूरकृषिविषयक योजना थेट शेतकऱ्यांपर्यंत पोहोचाव्यात, शेतकऱ्यांना नवनवीन कृषी तंत्रज्ञानाची ओळख व्हावी व यातून बळीराजा हा सुखी-सुमृद्ध व्हावा, असे गोड स्वप्न दाखवीत राज्य शासनाने मागील १० वर्षांपूर्वी राज्यात सुरू केलेली ‘कृषी तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणा’(आत्मा) ही योजनाच आज गुंडाळण्याची तयारी सुरू झाली आहे. कृषी आयुक्तालयातील संचालक (आत्मा) यांनी अलीकडेच एक पत्र जारी करू न त्याचे संकेत दिले आहेत. विशेष म्हणजे,‘लोकमत’ ने यासंबंधी महिनाभरापूर्वीच ‘कृषी विभागाचा आत्मा आॅक्सिजनवर’ या मथळ्याखाली बातमी प्रकाशित केली होती. त्यावर आता संचालक (आत्मा) यांच्या पत्राने शिक्कामोर्तब झाले आहे. राज्य शासनाने २००५-०६ मध्ये ‘कृषी तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणा’ (आत्मा) हा स्वतंत्र विभाग सुरू केला होता. यासाठी अधिकारी व कर्मचाऱ्यांची मोठी फौज उभी करून राज्यभरात स्वतंत्र कार्यालये थाटली आहेत. परंतु अवघ्या १० वर्षांत ही संपूर्ण ‘यंत्रणा’ गुंडाळण्याची वेळ का आली? असा सर्वांपुढे प्रश्न उपस्थित झाला आहे. जाणकारांच्या मते, ‘आत्मा’ ही यंत्रणाच आपले उद्दिष्ट साध्य करण्यात पूर्णत: ‘फेल’ ठरली आहे; शिवाय केंद्र शासनाकडून मिळणाऱ्या निधीत कपात करण्यात आली आहे. केंद्र शासनाने २०१५-१६ मध्ये या योजनेसाठी केंद्राचा ६० व राज्याचा ४० टक्के निधी अशी विभागणी केली आहे. यामुळे आता ही योजना राबविण्यासाठी राज्याला ४० टक्के हिस्सा देणे अनिवार्य झाले आहे. शिवाय २०१५-१६ या वर्षासाठी केंद्र व राज्य शासनाकडून अजूनपर्यंत आयुक्तालयाकडे कोणताही निधी प्राप्त झालेला नाही. त्यामुळे कृषी आयुक्तालयाने केंद्राच्या मदतीने या यंत्रणेच्या माध्यमातून सध्या राज्यात राबविण्यात येत असलेले सर्व कार्यक्रम कृषी विभागाच्या नियमित आस्थापनाकडे वर्ग करण्याच्या सूचना दिल्या आहेत. विशेष म्हणजे, पूर्वी हा विभाग नावाप्रमाणेच कृषी विभागाचा ‘आत्मा’ म्हणून ओळखल्या जात होता. परंतु आज तोच ‘आत्मा’ ‘व्हेंटिलेटर’वर अखेरच्या घटका मोजू लागला आहे. कंत्राटी पदभरतीला ब्रेक कृषी आयुक्तालयातील संचालक (आत्मा) यांनी जारी केलेल्या पत्रातून कंत्राटी कर्मचाऱ्यांची पदभरती ताबडतोब थांबविण्याचे निर्देश दिले आहेत. शिवाय सद्यस्थितीत कार्यरत कर्मचाऱ्यांच्या चालू कराराचा कालावधी संपल्यानंतर पुढील आदेश होईपर्यंत संबंधितांना पुनर्नियुक्ती देण्यात येऊ नये, असेही स्पष्ट केले आहे. सोबतच जिल्हास्तरावरील संगणक अज्ञावली रू परेषक या पदाचा कार्यभार कृषी कार्यालयातील लेखा नि लिपिक यांच्याकडे देण्यात यावा, तसेच तालुका तंत्रज्ञान व्यवस्थापक व सहायक तंत्रज्ञान व्यवस्थापकपदाचा अनुक्रमे तालुका कृषी अधिकारी कार्यालयातील कृषी अधिकारी व कृषी पर्यवेक्षक/कृषी सहायक/कृषी सेवक यांच्याकडे वर्ग करण्यात यावा, अशाही सूचना करण्यात आल्या आहेत. विशेष म्हणजे, नागपूर विभागातील या कंत्राटी कर्मचाऱ्यांच्या पदभरतीसाठी नुकत्याच काही महिन्यांपूर्वी चंद्रपूर येथील ‘सर्च’ या एका खाजगी संस्थेच्या माध्यमातून निवड प्रक्रिया राबविण्यात आली होती. यात उमेदवारांकडून मुलाखतीच्या नावाखाली लाखो रुपये उकळण्यात आले होते. मात्र चंद्रपूर येथे रुजू झालेल्या काही उमेदवारांचा अपवाद वगळता अजूनपर्यंत कुणालाही नियुक्तीपत्र मिळालेले नाहीत. अशात आता संचालक ‘आत्मा’ यांच्या पत्राने त्या संपूर्ण नियुक्त्यांवर कायमचा बे्रक लावला आहे. अधिकाऱ्यांचे धाबे दणाणलेविशेष म्हणजे, ‘आत्मा’ या योजनेचा मागील १० वर्षांत शेतकऱ्यांना फायदा झाला असो की नाही, मात्र कृषी अधिकाऱ्यांना त्याचा नक्कीच भरभरू न लाभ मिळाला आहे. अनेकांना १० वर्षानंतर मिळणारी पदोन्नती २००६ मध्येच मिळाली असून, क्लास-१ चे थेट सुपर क्लास-१ झाले आहेत. शिवाय काही क्लास-२ मधून थेट क्लास-१ च्या श्रेणीत गेले आहेत. त्यापैकी अनेक जण ‘आत्मा’ योजनेतच उच्च पदावर बसले आहेत. परंतु आज त्या सर्व अधिकाऱ्यांचे धाबे दणाणले आहेत. ‘आत्म्याला’ कुलूप लागले तर आपले काय? अशी त्यांना आता चिंता भेडसावू लागली आहे. त्यामुळे अनेकांनी आतापासूनच सुरक्षित आणि मलाईच्या ठिकाणी बसण्यासाठी मंत्रालयाचा उंबरठा झिंजविणे सुरू केले असल्याची माहिती पुढे आली आहे.