शहरं
Join us  
Trending Stories
1
‘बांगलादेशी आहेस का?’, केरळमध्ये परप्रांतीय दलित तरुणाला बेदम मारहाण, रुग्णालयात मृत्यू 
2
रशियाला युद्धादरम्यान मोठा धक्का ! सैन्याचे लेफ्टनंट जनरल सर्वारोव्हचा कार स्फोटात मृत्यू
3
Vijay Hazare Trophy स्पर्धेत दिसणार रोहित-विराटचा जलवा! ही जोडी कधी अन् कोणत्या मैदानात खेळणार सामना?
4
युजवेंद्र चहलने विकत घेतली आलिशान BMW Z4 कार; भारतात त्याची किंमत ऐकून धक्काच बसेल!
5
नवीन वर्षाच्या सुरूवातीला कमी हाेणार थंडीचा जोर; हवामान तज्ज्ञांनी व्यक्त केला अंदाज
6
बांगलादेशातील हिंदू तरुणाच्या हत्येप्रकरणी मोठा खुलासा; ईशनिंदेचा आरोप खोटा, 'हे' होते कारण
7
महाराष्ट्रापाठोपाठ गोव्यातील निवडणुकीतही भाजपाची मुसंडी, काँग्रेसची पीछेहाट, आपचा धुव्वा
8
AI शक्तिशाली सहाय्यक, मात्र मानवी मेंदूला पर्याय नाही; सर्व तज्ज्ञांचे एकमताने शिक्कामोर्तब
9
भारतीय ऑलराउंडरची क्रिकेटच्या सर्व प्रकारातून निवृत्ती! IPL लिलावात CSK नं लावली होती विक्रमी बोली
10
"पालिका निवडणुकांमध्येही देवेंद्र फडणवीसच ‘धुरंधर’; उद्धव ठाकरे 'रेहमान डकैत"; भाजपाची टीका
11
IPL 2026: Axar Patel ला धक्का! कर्णधारपदावरून हटवलं, आता 'हा' Delhi Capitals चा 'कॅप्टन'
12
Video: उकळत्या तेलात हात घालून काढते गरमागरम पकोडे... 'समोसा गर्ल' ची रंगलीये तुफान चर्चा
13
झाडू मारण्यासाठी सॉफ्टवेअर इंजिनिअरने सोडली हाय-फाय नोकरी; आता महिन्याला १.१ लाख पगार
14
हाण की बडीव! रुग्णालयात डॉक्टर-रुग्ण भिडले, एकमेकांच्या जीवावर उठले; लाथाबुक्क्यांनी मारहाण
15
VIDEO: तुर्की संसदेत जोरदार राडा ! आधी खासदारांमध्ये बाचाबाची अन् लाथाबुक्क्यांनी हाणामारी
16
नगरपरिषद निवडणुकीतील यश भाजपाचंच की 'इनकमिंग'चं?; सुप्रिया सुळेंनी मांडला 'हिशेब'
17
मंत्रिपदाचा आणि जिंकण्याचा संबंध नाही, आत्मचिंतनाची गरज; बावनकुळेंचा मुनगंटीवारांवर निशाणा?
18
"ज्यांच्याकडे मुख्यमंत्रिपद तेही कायम नाही, मी योग्य क्षणी..."; सुधीर मुनगंटीवारांनी थेटच सांगितले
19
"…तर तुला कोणीच संघाबाहेर काढू शकणार नाही!" १९८३ च्या वर्ल्ड चॅम्पियनकडून संजू सॅमसनला सल्ला
20
बाजारात जोरदार उसळी! गुंतवणूकदारांनी कमावले ३.५ लाख कोटी रुपये; 'ही' ६ कारणे ठरली गेमचेंजर
Daily Top 2Weekly Top 5

कृषी विभागाचा ‘आत्मा’ संकटात!

By admin | Updated: December 4, 2015 03:19 IST

कृषिविषयक योजना थेट शेतकऱ्यांपर्यंत पोहोचाव्यात, शेतकऱ्यांना नवनवीन कृषी तंत्रज्ञानाची ओळख व्हावी व यातून बळीराजा हा सुखी-सुमृद्ध व्हावा,

योजना गुंडाळण्याची तयारी : संचालकांचे पत्र जारी जीवन रामावत नागपूरकृषिविषयक योजना थेट शेतकऱ्यांपर्यंत पोहोचाव्यात, शेतकऱ्यांना नवनवीन कृषी तंत्रज्ञानाची ओळख व्हावी व यातून बळीराजा हा सुखी-सुमृद्ध व्हावा, असे गोड स्वप्न दाखवीत राज्य शासनाने मागील १० वर्षांपूर्वी राज्यात सुरू केलेली ‘कृषी तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणा’(आत्मा) ही योजनाच आज गुंडाळण्याची तयारी सुरू झाली आहे. कृषी आयुक्तालयातील संचालक (आत्मा) यांनी अलीकडेच एक पत्र जारी करू न त्याचे संकेत दिले आहेत. विशेष म्हणजे,‘लोकमत’ ने यासंबंधी महिनाभरापूर्वीच ‘कृषी विभागाचा आत्मा आॅक्सिजनवर’ या मथळ्याखाली बातमी प्रकाशित केली होती. त्यावर आता संचालक (आत्मा) यांच्या पत्राने शिक्कामोर्तब झाले आहे. राज्य शासनाने २००५-०६ मध्ये ‘कृषी तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणा’ (आत्मा) हा स्वतंत्र विभाग सुरू केला होता. यासाठी अधिकारी व कर्मचाऱ्यांची मोठी फौज उभी करून राज्यभरात स्वतंत्र कार्यालये थाटली आहेत. परंतु अवघ्या १० वर्षांत ही संपूर्ण ‘यंत्रणा’ गुंडाळण्याची वेळ का आली? असा सर्वांपुढे प्रश्न उपस्थित झाला आहे. जाणकारांच्या मते, ‘आत्मा’ ही यंत्रणाच आपले उद्दिष्ट साध्य करण्यात पूर्णत: ‘फेल’ ठरली आहे; शिवाय केंद्र शासनाकडून मिळणाऱ्या निधीत कपात करण्यात आली आहे. केंद्र शासनाने २०१५-१६ मध्ये या योजनेसाठी केंद्राचा ६० व राज्याचा ४० टक्के निधी अशी विभागणी केली आहे. यामुळे आता ही योजना राबविण्यासाठी राज्याला ४० टक्के हिस्सा देणे अनिवार्य झाले आहे. शिवाय २०१५-१६ या वर्षासाठी केंद्र व राज्य शासनाकडून अजूनपर्यंत आयुक्तालयाकडे कोणताही निधी प्राप्त झालेला नाही. त्यामुळे कृषी आयुक्तालयाने केंद्राच्या मदतीने या यंत्रणेच्या माध्यमातून सध्या राज्यात राबविण्यात येत असलेले सर्व कार्यक्रम कृषी विभागाच्या नियमित आस्थापनाकडे वर्ग करण्याच्या सूचना दिल्या आहेत. विशेष म्हणजे, पूर्वी हा विभाग नावाप्रमाणेच कृषी विभागाचा ‘आत्मा’ म्हणून ओळखल्या जात होता. परंतु आज तोच ‘आत्मा’ ‘व्हेंटिलेटर’वर अखेरच्या घटका मोजू लागला आहे. कंत्राटी पदभरतीला ब्रेक कृषी आयुक्तालयातील संचालक (आत्मा) यांनी जारी केलेल्या पत्रातून कंत्राटी कर्मचाऱ्यांची पदभरती ताबडतोब थांबविण्याचे निर्देश दिले आहेत. शिवाय सद्यस्थितीत कार्यरत कर्मचाऱ्यांच्या चालू कराराचा कालावधी संपल्यानंतर पुढील आदेश होईपर्यंत संबंधितांना पुनर्नियुक्ती देण्यात येऊ नये, असेही स्पष्ट केले आहे. सोबतच जिल्हास्तरावरील संगणक अज्ञावली रू परेषक या पदाचा कार्यभार कृषी कार्यालयातील लेखा नि लिपिक यांच्याकडे देण्यात यावा, तसेच तालुका तंत्रज्ञान व्यवस्थापक व सहायक तंत्रज्ञान व्यवस्थापकपदाचा अनुक्रमे तालुका कृषी अधिकारी कार्यालयातील कृषी अधिकारी व कृषी पर्यवेक्षक/कृषी सहायक/कृषी सेवक यांच्याकडे वर्ग करण्यात यावा, अशाही सूचना करण्यात आल्या आहेत. विशेष म्हणजे, नागपूर विभागातील या कंत्राटी कर्मचाऱ्यांच्या पदभरतीसाठी नुकत्याच काही महिन्यांपूर्वी चंद्रपूर येथील ‘सर्च’ या एका खाजगी संस्थेच्या माध्यमातून निवड प्रक्रिया राबविण्यात आली होती. यात उमेदवारांकडून मुलाखतीच्या नावाखाली लाखो रुपये उकळण्यात आले होते. मात्र चंद्रपूर येथे रुजू झालेल्या काही उमेदवारांचा अपवाद वगळता अजूनपर्यंत कुणालाही नियुक्तीपत्र मिळालेले नाहीत. अशात आता संचालक ‘आत्मा’ यांच्या पत्राने त्या संपूर्ण नियुक्त्यांवर कायमचा बे्रक लावला आहे. अधिकाऱ्यांचे धाबे दणाणलेविशेष म्हणजे, ‘आत्मा’ या योजनेचा मागील १० वर्षांत शेतकऱ्यांना फायदा झाला असो की नाही, मात्र कृषी अधिकाऱ्यांना त्याचा नक्कीच भरभरू न लाभ मिळाला आहे. अनेकांना १० वर्षानंतर मिळणारी पदोन्नती २००६ मध्येच मिळाली असून, क्लास-१ चे थेट सुपर क्लास-१ झाले आहेत. शिवाय काही क्लास-२ मधून थेट क्लास-१ च्या श्रेणीत गेले आहेत. त्यापैकी अनेक जण ‘आत्मा’ योजनेतच उच्च पदावर बसले आहेत. परंतु आज त्या सर्व अधिकाऱ्यांचे धाबे दणाणले आहेत. ‘आत्म्याला’ कुलूप लागले तर आपले काय? अशी त्यांना आता चिंता भेडसावू लागली आहे. त्यामुळे अनेकांनी आतापासूनच सुरक्षित आणि मलाईच्या ठिकाणी बसण्यासाठी मंत्रालयाचा उंबरठा झिंजविणे सुरू केले असल्याची माहिती पुढे आली आहे.