शहरं
Join us  
Trending Stories
1
"ह्या... हू... काय तुम्ही? कधी रे सुधारणार...? परत मी बोललो की...!" अजित दादांनी 'त्यांना' झाप-झाप झापलं
2
पाक आशिया कप स्पर्धेतून Out? सामान बसमध्ये अन् पाक खेळाडू हॉटेलमध्ये! नेमकं काय घडलं?
3
चलो दिल्ली! मनोज जरांगेंनी केली मोठी घोषणा; मराठा समाजाचे अधिवेशन घेणार, महत्त्वाचे कारण समोर
4
वाघाला घोरताना कधी पाहिलंय? VIDEO पाहून नेटकरी म्हणतायत, "हे तर आमच्या बाबांसारखेच..."
5
नवरात्रीचा मुहूर्त? पंतप्रधान मोदी नव्या ठिकाणाहून कामकाज पाहणार; PMOचा पत्ता बदलणार
6
Video - पैशांचा पाऊस! चालत्या ट्रेनमधून उडवल्या ५०० च्या नोटा; गोळा करण्यासाठी लोकांची झुंबड
7
बच्चू कडूंना कधीच सोडणार नाही म्हणणारे माजी आमदार सोडून गेले; काँग्रेसमध्ये पक्ष प्रवेश
8
सारख्या नावाचे दिवस गेले... सेम चेहराही शोधावा लागणार; यापुढे EVM वर उमेदवाराचा रंगीत फोटो छापणार...
9
प्रसिद्धीचा मुद्दा, अजितदादांचा फडणवीसांकडे रोख;  म्हणाले, “जाहिरात करावी तर देवाभाऊंसारखी”
10
समुद्रात दडलाय सोन्याचा खजिना; किंमत 2000 अब्ज डॉलर्सपेक्षा जास्त, काढणार कसा?
11
आरोपीला पकडण्यासाठी गेलेल्या पोलिसांवर प्राणघातक हल्ला: अनेक पोलिस एम्समध्ये दाखल
12
कार अन् ट्रकचा भीषण अपघात; एकाच कुटुंबातील सात जणांचा जागीच मृत्यू
13
ICC T20I Rankings : नंबर वन अभिषेक शर्मानं साधला मोठा डाव; कॅप्टन सूर्यासह तिलक वर्मा घाट्यात
14
हॉलिवूडची हुल! स्टीव्हन स्पिलबर्गच्या सिनेमात दिसले असते दिलीप प्रभावळकर, किस्सा सांगत म्हणाले...
15
उल्हासनगरात अनोख्या पद्धतीचा निषेध! रस्त्यांवरील खड्ड्यात मनसे पदाधिकाऱ्यानी केली आंघोळ
16
इतकी हिम्मत येते कुठून? शालार्थ घोटाळ्यामधील ५० पैकी ३३ शिक्षकांची सुनावणीलाच दांडी!
17
भयंकर! आरोपीला पकडण्यासाठी आलेल्या पोलिसांच्या टीमवर जीवघेणा हल्ला, अनेक जण जखमी
18
VIRAL : 'थार' घेऊन डिलिव्हरी बॉय पार्सल द्यायला आला, बघणारा प्रत्येकजण अवाक् झाला! व्हिडीओ होतोय व्हायरल
19
आमिर खानला नाही आवडली दादासाहेब फाळकेंवरील सिनेमाची स्क्रिप्ट, नक्की कारण काय?
20
ऑनलाइन मागवलेल्या बिर्याणीत झुरळ, घटनेने उडाली खळबळ; कुठे घडला 'हा' किळसवाणा प्रकार?

उपराजधानीला डेंग्यूचा डंख

By admin | Updated: August 8, 2015 02:57 IST

उपराजधानीत गेल्या तीन वर्षांपासून डेंग्यूचे रुग्ण मोठ्या संख्येत दिसून येत आहे.

शहरात ८ तर ग्रामीणमध्ये १४ रुग्णांची नोंद : मनपाकडे प्रभावशाली यंत्रणेचा अभावनागपूर : उपराजधानीत गेल्या तीन वर्षांपासून डेंग्यूचे रुग्ण मोठ्या संख्येत दिसून येत आहे. गेल्या वर्षी या रोगामुळे नागपुरातील जनता चांगलीच गारद झाली होती. सध्या डेंग्यूचा प्रकोप कमी असला तरी नागपूरकरांमध्ये डेंग्यूविषयी भीती अद्यापही कायम आहे. २०१२ मध्ये डेंग्यूचे २३७, २०१३ मध्ये २४०, २०१४ मध्ये ४५० रुग्णांची नोंद झाली आहे. तर मागील महिन्यात नागपूर जिल्ह्यात २२ रुग्ण आढळून आले असून यात शहरातील आठ रुग्णांचा समावेश आहे.दरवर्षी पावसाळयात डेंग्यूच्या साथीचा फैलाव होतो, हे नित्याचे आहे. परंतु याबाबत पूर्व काळजी घेतली जात नाही. गेल्या वर्षी रोगाने थैमान घातले होते, परंतु आजार पसरू नये यासाठी महानगरपालिका केवळ जनजागृतीवर भर देत असल्याची आजही वस्तुस्थिती आहे. महत्त्वाचे म्हणजे, महानगरपालिकेकडे डासांशी मुकाबला करण्याची प्रभावशाली यंत्रणाच नाही. मनपाने अद्यापही निमआॅईल सारखे डास रोधक औषध झोन कार्यालयांना उपलब्ध करून दिलेले नाही. मनपाकडे स्वत:ची यंत्रणाही नाहीनागपूर : मनपाकडे या रोगाचे निदान करण्यासाठी स्वत:ची यंत्रणाही नाही. रुग्णांचे संशयित नमुने मेयो रुग्णालयात पाठविले जात आहे. याचा अहवाल मिळण्यास उशीर होत असल्याने रुग्ण अडचणीत येतो. या वर्षी मनपा डेंग्यूचे निदान करणारी ‘एलायझा टेस्ट’ करणारी मशीन खरेदी करणार होते, परंतु गेल्या तीन महिन्यांपासून खरेदी प्रक्रिया सुरू असल्याचे अधिकारी सांगतात. यावरून अत्यंत संवेदनशील व डेंग्यूसारख्या नाजूक बाबतीत मनपा प्रशासन किती गंभीर आहे हे दिसून येते. मनपाच्या हिवताप व हत्तीरोग विभागाला पूर्णत: अधिकार दिल्यास चित्र वेगळे दिसण्याची शक्यताही वर्तवली जात आहे. (प्रतिनिधी)१३०० घरांत आढळल्या डेंग्यूच्या अळ्यामनपाच्या हिवताप व हत्तीरोग विभागाने मे २०१५ पासून घरा-घरांची तपासणी मोहीम हाती घेतली आहे. आतापर्यंत सुमारे एक लाख घरांची तपासणी करण्यात झाली आहे. यात १३०० घरांत डेंग्यूच्या अळ्या आढळून आल्या. हनुमानगनगर व लकडगंज झोनमधील घरांमध्ये सर्वात जास्त डेंग्यू डासांच्या अळ्या आढळून आल्याची माहिती आहे. खबरदारी आवश्यकडेंग्यूवर लस किंवा औषधे उपलब्ध नाही. यामुळे प्रत्येकाने खबरदारी घेणे आवश्यक आहे. डेंग्यू डासांची उत्पत्ती साठवलेल्या स्वच्छ पाण्यात होते. रांजणातील पाणी, सिमेंटच्या टाक्यातील पाणी, इमारतीवरील टाक्यातील पाणी, घरासभोवतालच्या टाकावू वस्तू उदा. प्लॅस्टिकच्या बादल्या, रिकाम्या बाटल्या, नारळाच्या करवंट्या, निरु पयोगी टायर्स इत्यादीमध्ये कोणतेही पाणी आठ दिवसांपेक्षा जास्त साठवून ठेवल्यास डास अंडी घालून उत्पत्ती होते. तेव्हा अशा निरु पयोगी वस्तूमध्ये पाणी साठणार नाही याची खबरदारी घ्यावी. पाण्याची भांडी, ड्रम, रांजण व्यविस्थत झाकून ठेवावेत. पाण्याची भांडी झाकल्याने त्यात डास अंडी घालू शकत नाहीत. तसेच अंड्यांची वाढ होण्यासाठी हवा, प्रकाश मिळू शकत नाही. घरांवरील टाक्यांना झाकणे बसवावीत. शौचालयाच्या व्हेंटपाईपला जाळी बसवावी. आठवड्यातून एक दिवस हा कोरडा दिवस पाळावा, असे आवाहन करण्यात आले आहे.