शहरं
Join us  
Trending Stories
1
Bacchu Kadu Morcha: मुख्यमंत्र्यांसोबत चर्चा करणार, पण नागपुरातील आंदोलन सुरूच राहणार; हायकोर्टाच्या आदेशानंतर काय काय घडलं?
2
हद्दच झाली! उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या स्वाक्षरीचे बनावट पत्र केले सादर, आरोपी कोण?
3
मोठी बातमी!बच्चू कडूंना पाठिंबा देण्यासाठी मनोज जरांगे पाटील नागपूरकडे रवाना
4
इंग्लंडचा खेळ खल्लास! दक्षिण आफ्रिकेच्या संघानं पहिल्यांदाच वर्ल्ड कप फायनल गाठत रचला इतिहास
5
Bacchu Kadu Morcha: मंत्री बच्चू कडूंच्या भेटीला, भरपावसात रस्त्यावरच चर्चा; आंदोलनाबद्दल काय ठरलं?
6
Nilesh Ghaiwal: गँगस्टर निलेश घायवळ 'भू-माफियाही'; ३ वर्षांत जमवली ५८ एकर जमीन
7
योगी सरकारच्या सहकार्याने, उत्तर प्रदेशातील गावा-गावात परिवर्तनाची मशाल पेटवत आहेत 'चेंजमेकर्स'!
8
भारत-चीन सीमा वाद सुटला? लष्करी कमांडर्सच्या बैठकीत दोन्ही देशांचं एकमत; 'या' महत्वाच्या मुद्द्यांवर सहमती
9
Sudhir Dalvi: 'साई बाबा' फेम ज्येष्ठ अभिनेते सुधीर दळवी यांची प्रकृती गंभीर; उपचारासाठी १५ लाखांची गरज, मदतीचं आवाहन
10
"ना बिहारमध्ये CM पद, ना दिल्लीत PM पद खाली..."; सोनिया गांधी अन् लालू यादव यांचं नाव घेत अमित शाह यांची मोठी भविष्यवाणी!
11
Phaltan Doctor: डॉक्टर तरुणीने प्रशांत बनकरला लटकलेल्या ओढणीसह पाठवला होता फोटो
12
फलटण महिला डॉक्टर मृत्यू प्रकरणात ट्विस्ट; मेहबुब शेख यांना मिळालं ३ पानी पत्र, काय लिहिलंय?
13
शेतकऱ्यांचा मोठा आक्रोश! "सुरुवात फडणवीसांनी केली, शेवट आम्ही करणार, आम्हाला जेलमध्ये टाका"
14
"मुंबईतील आंदोलन, जरांगे पाटलांवर कोर्टाच्या माध्यमातून दबाव आणला, तोच पॅटर्न..."; अजित नवलेंचा गंभीर आरोप
15
शेतकऱ्यांची एकजूट! नागपूर आंदोलनासाठी मनोज जरांगेंनी रद्द केली २ नोव्हेंबरची बैठक
16
Most Sixes in T20: टी-२० क्रिकेटमध्ये सर्वाधिक षटकार, सूर्यकुमारची टॉप-५ मध्ये एन्ट्री, हिटमॅनचा जलवा!
17
Womens World Cup 2025: दक्षिण आफ्रिकेनं उभारली विक्रमी धावसंख्या! इंग्लंडवर दुसऱ्यांदा ओढावली नामुष्की
18
'मोदीजी मतांसाठी स्टेजवर येऊन डान्सही करतील...!', बिहारमध्ये राहुल गांधींचा हल्लाबोल; 'लोकल...', म्हणत भाजपचाही पलटवार
19
ऑफिसमधील महिला मुंबईत आली, व्यवस्थापकाने जेवायला घरी नेले अन् बलात्कार केला; पत्नीने बनवला व्हिडीओ
20
"सत्याचा मोर्चा नाही तर ढोंग्यांचा मोर्चा..."; मनसे-मविआच्या मोर्चाला गुणरत्न सदावर्तेंचा विरोध

डेंग्यूमध्ये मृत्यूदर कमी, पण रुग्णात वाढ : रावींद्र भेलोंडे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 24, 2019 22:16 IST

पूर्वी डेंग्यूमुळे मृत्यूदर मोठा होता परंतु जनजागृती वाढल्याने मृत्यूदर कमी झाला आहे. मात्र रुग्णांची संख्या वाढत आहे, अशी माहिती ‘अकादमी ऑफ पेडियाट्रिक्स’ नागपूरचे अध्यक्ष व बालरोग तज्ज्ञ डॉ. रवींद्र भेलोंडे यांनी दिली.

ठळक मुद्देअकादमी ऑफ पेडियाट्रिक्सची ‘नॅपकॉन-२०१९’ परिषद

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : दहा वर्षांपूर्वी जगात सुमारे नऊ देशांमध्ये डेंग्यू आढळून येत होता. आता ११० देशांमध्ये हा रोग पसरला आहे. याला महत्त्वाचे कारण म्हणजे, प्रवास व व्यापार यांचे जागतिकीकरण आहे. डेंग्यूचा डास चावल्यानंतर चार-पाच दिवसानंतर या रोगाची लक्षणे दिसतात. या कालावधीत रुग्ण एका देशातून दुसऱ्या देशात जाऊ शकत असल्याने या रोगाचा प्रसार झपाट्याने होत आहे. या रोगावर लस नाही. रुग्णाच्या लक्षणावरून उपचार केला जातो. विदर्भातील लहान मुलांमध्ये या आजाराचा विळखा वाढत आहे. विशेष म्हणजे, पूर्वी यात मृत्यूदर मोठा होता परंतु जनजागृती वाढल्याने मृत्यूदर कमी झाला आहे. मात्र रुग्णांची संख्या वाढत आहे, अशी माहिती ‘अकादमी ऑफ पेडियाट्रिक्स’ नागपूरचे अध्यक्ष व बालरोग तज्ज्ञ डॉ. रवींद्र भेलोंडे यांनी दिली.‘अकादमी ऑफ पेडियाट्रिक्स’ नागपूरच्यावतीने आयोजित बालरोगावर १५व्या वार्षिक परिषदेचे आयोजन २७ ते २९ सप्टेंबर दरम्यान करण्यात आले आहे, याची माहिती देण्यासाठी आयोजित पत्रपरिषदेत ते बोलत होते. यावेळी परिषदेचे आश्रयदाते डॉ. उदय बोधनकर, ‘अकादमी ऑफ पेडियाट्रिक्स’ नागपूरचे सचिव डॉ. महेश तुराळे, बालरोग तज्ज्ञ डॉ. सुचित बागडे, डॉ. मीना देशमुख, डॉ. अंजली कडू उपस्थित होते. डॉ. भेलोंडे म्हणाले, ही ‘नॅपकॉन-२०१९’ परिषद संक्रमक रोगावर आधारीत आहे. डॉ. डी. नारायणप्पा हे परिषदेचे प्रभारी आहेत. परिषदेचे उद्घाटन २९ सप्टेंबर रोजी विभागीय आयुक्त डॉ. संजीव कुमार व ‘अकादमी ऑफ पेडियाट्रिक्स’चे राष्ट्रीय अध्यक्ष डॉ. दिगंत शास्त्री यांच्या उपस्थितीत होणार आहे. डॉ. तुराळे म्हणाले, डॉ. पी. आर. डांगे स्मृती व्याख्यानमालेत डॉ. शुभा फडके मार्गदर्शन करतील. परिषदेत, बालकांमधील आजार, उपचार, नवे संशोधन व तंत्रज्ञान यावर विस्तृत चर्चा व मार्गदर्शन केले जाणार आहे.अति दूधामुळे बालकांमध्ये वाढतोय अ‍ॅनेमियाअ‍ॅनेमिया म्हणजे रक्तातील लोहतत्त्वाचे प्रमाण कमी होणे. जगातील ३० टक्के लोकांमध्ये अ‍ॅनेमिया आढळून येतो. आपल्याकडे लहान मुलांमध्ये हा आजार वाढताना दिसून येत आहे, अशी माहिती बालरोग तज्ज्ञ डॉ. अंजली कडू व डॉ. सुचित बागडे यांनी दिली. ते म्हणाले, अनेक माता एक वर्षावरील बालकांना अति दूध पाजतात. यामुळे इतर पौष्टिक आहारासाठी त्याच्या पोटात जागच नसते. परिणामी, अपुऱ्या पोषणमुळे बालकांमध्ये अ‍ॅनेमियाचे प्रमाण वाढत आहे.

 

टॅग्स :dengueडेंग्यूdoctorडॉक्टर