शहरं
Join us  
Trending Stories
1
सीमेवरील तणावादरम्यान भारताचं मोठं पाऊल, राफेल-एम विमानांसाठी फ्रान्ससोबत करार, अशी आहेत वैशिष्ट्ये
2
मोठा खुलासा! पहलगाममध्ये हल्ल्यावेळी लष्कराचा मोठा अधिकारी तिथेच होता; गेटकडे धावणाऱ्या लोकांना रोखले...
3
Bank of Baroda मध्ये जमा करा १,००,००० रुपये आणि मिळेल ₹१६,१२२ चा फिक्स्ड रिटर्न, पाहा डिटेल्स
4
दहशतवादी हल्ला करताना धर्म विचारतात का? वडेट्टीवारांचे विधान; CM फडणवीस म्हणाले, "इथे बसून…"
5
'धनंजय मुंडे यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला, मग...', अंजली दमानियांचे सरकारला दोन सवाल
6
मुंबई- लखनौ सामन्यानंतर जसप्रीत बुमराहच्या पत्नीची संतापजनक पोस्ट, नेमके प्रकरण काय?
7
LIC च्या 'या' पॉलिसीत एकदाच गुंतवणूक करा अन् दरमहा २० हजार पेन्शन मिळवा; किती गुंतवणूक करावी लागेल?
8
"काँग्रेस नेते दहशतवाद्यांना 'निर्दोष' ठरवण्याचा प्रयत्न करताहेत का?", बावनकुळे वडेट्टीवारांवर कडाडले
9
चीनला का पडतेय भारतीय कंपन्यांची गरज? 'या' कामासाठी मागताहेत मदत
10
एकही युद्ध जिंकले नाही; मग पाकिस्तानी अधिकारी छातीवर पदके लावून का फिरतात? जाणून घ्या...
11
एकट्याने पाकिस्तानी आक्रमण परतवलेले, त्यानंतर रहस्यमयी मृत्यू; आजही भारतीय सैन्याला सियाचिनमध्ये वाचवितात ओपी बाबा
12
Gold Price on 28 April : अक्षय्य तृतीयेपूर्वी सोनं झालं स्वस्त, पाहा १० ग्रॅम सोन्यासाठी किती खर्च करावा लागणार
13
'पंचायत'च्या मेकर्सची आणखी एक हटके वेबसीरिज, 'ग्राम चिकित्सालय'मधून उडणार हास्याचे फवारे!
14
पहलगामधील हल्ल्याबाबत काश्मीरच्या विधानसभेतून ओमर अब्दुल्लांनी व्यक्त केला संताप, म्हणाले, ‘’मागच्या २६ वर्षांनंतर…’’ 
15
...म्हणून ८ वर्षांनी मोठ्या अविनाश नारकर यांच्यासोबत केलं लग्न, ऐश्वर्या यांनी सांगितलं कारण
16
जीवन संपवण्यापूर्वी डॉ. शिरीष वळसंगकर यांनी चार जणांना केले होते फोन, सीडीआरमधून समोर आली नवी माहिती
17
आईनं हॉस्पिटलसाठी जीवाचं रान केले तरी तिच्यावर ही वेळ आली; मनीषाच्या मुलांची व्यथा
18
पाकिस्तानचे पाणी बंद केले हे पूर्णपणे खोटे; सरकारचे पत्र वाचून दाखवत प्रकाश आंबेडकरांचा दावा
19
शोएब अख्तरसह १६ पाकिस्तानी यूट्यूब चॅनेलवर बंदी; महिन्याला किती कमाई होती?
20
"विधानसभा निवडणुकीत काँग्रेस शहराध्यक्षाची मला मदत"; भाजपच्या सुरेश खाडे यांचा गौप्यस्फोट

डेंग्यूमध्ये मृत्यूदर कमी, पण रुग्णात वाढ : रावींद्र भेलोंडे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 24, 2019 22:16 IST

पूर्वी डेंग्यूमुळे मृत्यूदर मोठा होता परंतु जनजागृती वाढल्याने मृत्यूदर कमी झाला आहे. मात्र रुग्णांची संख्या वाढत आहे, अशी माहिती ‘अकादमी ऑफ पेडियाट्रिक्स’ नागपूरचे अध्यक्ष व बालरोग तज्ज्ञ डॉ. रवींद्र भेलोंडे यांनी दिली.

ठळक मुद्देअकादमी ऑफ पेडियाट्रिक्सची ‘नॅपकॉन-२०१९’ परिषद

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : दहा वर्षांपूर्वी जगात सुमारे नऊ देशांमध्ये डेंग्यू आढळून येत होता. आता ११० देशांमध्ये हा रोग पसरला आहे. याला महत्त्वाचे कारण म्हणजे, प्रवास व व्यापार यांचे जागतिकीकरण आहे. डेंग्यूचा डास चावल्यानंतर चार-पाच दिवसानंतर या रोगाची लक्षणे दिसतात. या कालावधीत रुग्ण एका देशातून दुसऱ्या देशात जाऊ शकत असल्याने या रोगाचा प्रसार झपाट्याने होत आहे. या रोगावर लस नाही. रुग्णाच्या लक्षणावरून उपचार केला जातो. विदर्भातील लहान मुलांमध्ये या आजाराचा विळखा वाढत आहे. विशेष म्हणजे, पूर्वी यात मृत्यूदर मोठा होता परंतु जनजागृती वाढल्याने मृत्यूदर कमी झाला आहे. मात्र रुग्णांची संख्या वाढत आहे, अशी माहिती ‘अकादमी ऑफ पेडियाट्रिक्स’ नागपूरचे अध्यक्ष व बालरोग तज्ज्ञ डॉ. रवींद्र भेलोंडे यांनी दिली.‘अकादमी ऑफ पेडियाट्रिक्स’ नागपूरच्यावतीने आयोजित बालरोगावर १५व्या वार्षिक परिषदेचे आयोजन २७ ते २९ सप्टेंबर दरम्यान करण्यात आले आहे, याची माहिती देण्यासाठी आयोजित पत्रपरिषदेत ते बोलत होते. यावेळी परिषदेचे आश्रयदाते डॉ. उदय बोधनकर, ‘अकादमी ऑफ पेडियाट्रिक्स’ नागपूरचे सचिव डॉ. महेश तुराळे, बालरोग तज्ज्ञ डॉ. सुचित बागडे, डॉ. मीना देशमुख, डॉ. अंजली कडू उपस्थित होते. डॉ. भेलोंडे म्हणाले, ही ‘नॅपकॉन-२०१९’ परिषद संक्रमक रोगावर आधारीत आहे. डॉ. डी. नारायणप्पा हे परिषदेचे प्रभारी आहेत. परिषदेचे उद्घाटन २९ सप्टेंबर रोजी विभागीय आयुक्त डॉ. संजीव कुमार व ‘अकादमी ऑफ पेडियाट्रिक्स’चे राष्ट्रीय अध्यक्ष डॉ. दिगंत शास्त्री यांच्या उपस्थितीत होणार आहे. डॉ. तुराळे म्हणाले, डॉ. पी. आर. डांगे स्मृती व्याख्यानमालेत डॉ. शुभा फडके मार्गदर्शन करतील. परिषदेत, बालकांमधील आजार, उपचार, नवे संशोधन व तंत्रज्ञान यावर विस्तृत चर्चा व मार्गदर्शन केले जाणार आहे.अति दूधामुळे बालकांमध्ये वाढतोय अ‍ॅनेमियाअ‍ॅनेमिया म्हणजे रक्तातील लोहतत्त्वाचे प्रमाण कमी होणे. जगातील ३० टक्के लोकांमध्ये अ‍ॅनेमिया आढळून येतो. आपल्याकडे लहान मुलांमध्ये हा आजार वाढताना दिसून येत आहे, अशी माहिती बालरोग तज्ज्ञ डॉ. अंजली कडू व डॉ. सुचित बागडे यांनी दिली. ते म्हणाले, अनेक माता एक वर्षावरील बालकांना अति दूध पाजतात. यामुळे इतर पौष्टिक आहारासाठी त्याच्या पोटात जागच नसते. परिणामी, अपुऱ्या पोषणमुळे बालकांमध्ये अ‍ॅनेमियाचे प्रमाण वाढत आहे.

 

टॅग्स :dengueडेंग्यूdoctorडॉक्टर