शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी: दहशतवादी हल्ल्यातील मृतांच्या कुटुंबीयांना ५० लाखांची मदत; राज्य सरकारचा निर्णय
2
कॅनडाचा निवडणूक निकाल भारतासाठी आहे खास; खलिस्तानी धुपले, पक्षाची मान्यताच गेली
3
पाकिस्तानसोबत युद्ध झाल्यास भारताचा पराभव निश्चित; काँग्रेस नेत्याच्या पोस्टनं नवा वाद
4
'अल्लाह हू अकबर' म्हणणारा व्यक्ती एनआयएच्या रडारवर; व्हिडीओ समोर आल्यानंतर पाठवले समन्स
5
आयपीएलमध्ये विक्रमी शतक झळकावणाऱ्या वैभव सूर्यवंशीला राज्य सरकारकडून मोठं बक्षीस!
6
टाटा मिठाची कहाणी: छोट्या व्यवसायात का उतरले रतन टाटा? पैसा कामावणं नाही तर, 'हे' होतं कारण
7
सोलापूर पुन्हा हादरले! हात अन् गळा चिरून प्रशिक्षणार्थी डॉक्टरने केली आत्महत्या
8
क्रेडिट कार्ड UPI शी लिंक केल्यास मिळतात 'हे' फायदे; प्रत्येकवेळी खिशात बाळगण्याची गरज नाही
9
आयपीएलमध्ये विक्रमी शतक ठोकणारा वैभव सूर्यवंशी कितवीत शिकतो? कुठल्या शाळेत जातो? जाणून घ्या
10
"कारगिलमध्ये हरवलं होतं, जरा डोकं लावा..."; धवनने आफ्रिदीला सुनावले; अपमानाची करुन दिली आठवण
11
२६ निष्पाप लोकांना मारणारा हाशिम मुसा निघाला स्पेशल पॅरा कमांडो; हल्ल्यात पाकिस्तानी लष्कराचा सहभाग असल्याची शंका
12
भारताच्या प्रतिका रावलने एकदिवसीय क्रिकेटमध्ये रचला इतिहास, केली 'अशी' कामगिरी!
13
CMF Phone 2 Pro लाँच, किंमत एवढी स्वस्त की...; या रेंजमध्ये पहिल्यांदाच टेलिफोटो कॅमेरा सेटअप...
14
Akshaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला करतात चैत्र गौरीची पाठवणी; पण कशी? जाणून घ्या!
15
मोफत रेशनचा लाभ घेणाऱ्यांसाठी शेवटची संधी? हे काम आजच करा अन्यथा कार्डवरुन नाव वगळणार
16
प्रत्येक भारतीयाला संताप, संसदेचं विशेष अधिवेशन बोलवा; राहुल गांधी, खरगेंची मोदींकडे मागणी
17
मराठमोळ्या अभिनेत्रीने अमेरिकेत बनवलं पापड आणि कुरडई, व्हिडीओ केला शेअर
18
मुकेश अंबानींनी जगातील अब्जाधीशांना टाकलं मागे, एका दिवसात कमावले ₹४४,२९३ कोटी रुपये
19
Vaibhav Suryavanshi : "आई ३ तास ​​झोपायची, वडिलांनी नोकरी सोडली...", वैभव सूर्यवंशीने सांगितला IPL पर्यंतचा प्रवास
20
काश्मीरमध्ये ४८ पर्यटन स्थळे बंद; दहशतवाद्यांची घरे पाडल्यामुळे स्लिपर सेलकडून मोठ्या हल्ल्याची शक्यता

डेंग्यूसदृश तापाने उपराजधानी फणफणली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 24, 2019 10:48 IST

डेंग्यूसदृश तापाने उपराजधानी फणफणली आहे. मेयो, मेडिकलच्या बाह्यरुग्ण विभागात अशा रुग्णांची संख्या वाढली आहे.

ठळक मुद्देमेयो, मेडिकलसह खासगी रुग्णालयात रुग्णांची संख्या वाढली

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : डेंग्यूसदृश तापाने उपराजधानी फणफणली आहे. मेयो, मेडिकलच्या बाह्यरुग्ण विभागात अशा रुग्णांची संख्या वाढली आहे. विशेष म्हणजे, या रुग्णांची ‘एलायझा’ तपासणी केल्यावर ती ‘निगेटीव्ह’ येत आहे. परंतु याची लक्षणे व धोका तेवढाच गंभीर असल्याने खासगी इस्पितळांतील डॉक्टर असे रुग्ण आपल्या देखरेखीत ठेवत आहे. या रुग्णांमध्ये लहान मुलांसोबत तरुणांची संख्याही मोठी आहे.उपराजधानीत गेल्या सात वर्षांत मलेरियाच्या तुलनेत डेंग्यूचा फैलाव झपाट्याने वाढला आहे. शहरात पहिल्यांदाच २०१२ मध्ये डेंग्यूचे २३७ रुग्ण व पाच रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाल्याने खळबळ उडाली. त्यानंतर २०१३ मध्ये ही संख्या २४० वर पोहचली. यात दोन जणांना प्राण गमवावे लागले. २०१४ मध्ये सर्वाधिक म्हणजे ६०१ रुग्णांची नोंद झाली होती. त्यानंतर २०१५ मध्ये २३०, २०१६ मध्ये १९५ तर २०१७ मध्ये २०० रुग्ण आढळून आले होते. २०१८ मध्ये ५४३ वर रुग्ण तर जानेवारी ते आतापर्यंत ५० वर रुग्णाची नोंद झाली आहे. महानगरपालिकेच्या हिवताप व हत्तीरोग विभाग जनजागृती सोबतच घराघरांची तपासणी करून डेंग्यूच्या अळ्या आढळून येणारी कुलर्स, पाण्याच्या टाक्या, ड्रम, कुंड्या, फुलदाणी हे आपल्यासमक्ष रिकामे करून किंवा त्यात कीटकनाशक औषध फवारणी किंवा गप्पी मासे सोडत असल्याने काही प्रमाणात यावर नियंत्रण मिळविणे शक्य झाले आहे. परंतु यात प्रत्येक व्यक्तीने सहभागी होऊन आठवड्यातून एक दिवस कोरडा दिवस जरी पाळला व आजूबाजूचा परिसर स्वच्छ ठेवल्यास डेंग्यूचा प्रकोप कमी करणे शक्य असल्याचे तज्ज्ञाचे म्हणणे आहे. तूर्तास तरी शहरात डेंग्यूच्या रुग्णांची संख्या कमी दिसत असलीतरी डेंग्यू रोगाची लक्षणे असलेल्या रुग्णासोबतच ’व्हायरल’रुग्ण वाढल्याचेही डॉक्टरांचे म्हणणे आहे.

टॅग्स :dengueडेंग्यू