शहरं
Join us  
Trending Stories
1
हल्ल्याची छायाचित्रे पाहून भारतीयांचे रक्त उसळते आहे; दहशतवाद्यांना होईल शिक्षा, पीडितांना न्याय मिळेल : मोदी
2
किती अधिकाऱ्यांना मंत्रालयात सुनावणीसाठी बोलावणार?
3
भारत-फ्रान्स यांच्यात आज होणार Rafale-M jetsचा करार; भारतीय नौदल होणार अधिक सामर्थ्यवान
4
DC vs RCB : भर मैदानात कोहली-केएल राहुल यांच्यात वाजलं? नेमकं काय घडलं? (VIDEO)
5
पाकिस्तानी नागरिकांनी दिलेल्या वेळेत भारत सोडला नाही तर बसणार मोठा दणका, काय होणार शिक्षा?
6
Shocking!! सायबर चौकात दहशत! कोल्हापुरात सराईत गुंडाकडून तलवारीने हल्ला; दोघे जखमी
7
राज्याला हादरवणाऱ्या शिक्षण घोटाळ्याची ईडीने मागविली माहिती; SIT गठीत करण्याच्या हालचालींना वेग
8
ट्रक-बोलेरोच्या भीषण अपघातात चार जण जागीच ठार; एक जण गंभीर जखमी, रुग्णालयात दाखल
9
धक्कादायक! नागपुरातील भोसले घराण्याची ऐतिहासिक तलवार आंतरराष्ट्रीय कंपनीकडून ऑनलाईन विक्रीला
10
"देशाच्या सुरक्षेसाठी शिवसैनिक जवानांसारखा लढेल, ही लढाई..."; DCM एकनाथ शिंदे यांचे वक्तव्य
11
भुवीनं साधला मोठा डाव! IPL च्या इतिहासात सर्वाधिक विकेट्स घेणारा ठरला दुसरा गोलंदाज
12
पाकिस्तानात मोठी कारवाई! खैबर पख्तूनख्वा प्रांतात घुसखोरी करणारे ५४ TTP समर्थक ठार
13
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित एक ओव्हर नाही टिकला; पण दोन चेंडूत विराटची बरोबरी करून परतला
14
मध्य प्रदेशात भीषण अपघात; भरधाव कार विहिरीत कोसळली, 12 जणांचा मृत्यू
15
"शरद पवारांनी जाणीवपूर्वक 'ते' वक्तव्य केले"; पहलगामबाबतच्या 'त्या' विधानावरुन भुजबळांचे स्पष्टीकरण
16
पाकिस्तानात भीतीचे वातावरण; लष्कर प्रमुखानंतर बिलावल भुट्टोचे कुटुंबीय देश सोडून पळाले
17
जसप्रीत बुमराहची रेकॉर्ड ब्रेक स्पेल; मुंबई इंडियन्सकडून 'अशी' कामगिरी करणारा पहिलाच!
18
सीमेवर तणाव वाढताच पाकिस्तानने चीनकडे मागितले १.४ बिलियन डॉलर
19
"लाडक्या बहि‍णी १५०० मध्ये खूष, २१०० रुपये देऊ असं कुणीच म्हटलं नाही"; नरहरी झिरवाळांचे विधान
20
MI vs LSG : बॅटिंग-बॉलिंग सगळ्यात भारी! पुन्हा दिसतोय MI चा चॅम्पियनवाला तोरा

नोटाबंदी ही पैसा पांढरा करण्याची ‘स्कीम’; पी.चिदंबरम यांचा आरोप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 1, 2018 21:36 IST

केंद्र शासनाने २०१६ केलेली नोटाबंदीचा उद्देश हा काही विशिष्ट लोकांना फायदा पोहोचविण्याचा होता. काळा पैसा पांढरा करण्याची ही एक योजनाच होती, असा आरोप देशाचे माजी वित्तमंत्री पी.चिदंबरम यांनी केला आहे.

ठळक मुद्दे‘राफेल’ला बनविणार निवडणुकीचा मुद्दा

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : केंद्र शासनाने २०१६ केलेली नोटाबंदीचा उद्देश हा काही विशिष्ट लोकांना फायदा पोहोचविण्याचा होता. काळा पैसा पांढरा करण्याची ही एक योजनाच होती, असा आरोप देशाचे माजी वित्तमंत्री पी.चिदंबरम यांनी केला आहे. नागपुरात पत्रपरिषदेत बोलताना त्यांनी वरील वक्तव्य केले.देशातील भ्रष्टाचार दूर करणे, दहशतवाद्यांचे आर्थिक स्रोत तोडणे हे नोटाबंदी मागील उद्देश असल्याचे दावे करण्यात आले. मात्र प्रत्यक्षात असे काहीही झाले नाही. उलट देशात अक्षरश: नागरिकांची धावपळ झाली. यात विशिष्ट लोकांना काळा पैसा पांढरा करण्याची संधी मिळाली. नोटाबंदीची किंमत संपूर्ण देशाला चुकवावी लागली. नोटाबंदीमुळे अर्थव्यवस्थेला सर्वात मोठा धक्का बसला. ‘जीडीपी’मध्ये १.५० टक्क्यांची घसरण झाली. लाखो लघुउद्योग बंद झाले, १५ कोटींहून अधिक कामगारांचे रोजगार गेले व ३० कोटी नागरिक उपासमारीकडे ढकलल्या गेले. नोटाबंदीच्या काळात शंभर लोकांना जीवदेखील गमवावा लागला. रिझर्व्ह बँकेने नुकत्याच दिलेल्या आकडेवारीतून नोटाबंदी फसल्याचे स्पष्ट झाले आहे, असे चिदंबरम म्हणाले.सद्यस्थितीत विदेशी गुंतवणूकदार आपली गुंतवणूक परत घेत आहेत, महागाईचा दर आणखी वाढत आहे. केंद्र सरकारच्या आर्थिक धोरणांमुळे हे चित्र उभे झाले आहे, अशी टीका चिदंबरम यांनी केली.‘राफेल’बाबत केंद्राने उत्तरे द्यावी‘राफेल’ विमानांची खरेदी हा एक मोठा घोटाळा असल्याची शंका आता नागरिकदेखील उपस्थित करत आहेत. या विमानांची नेमकी किंमत किती, ही विमाने तातडीने खरेदी करण्याची कारणे कुठली होती, ‘हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेड’ला तंत्रज्ञान हस्तांतरणात का समाविष्ट करून घेण्यात आले नाही आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे या कराराच्या बाबी गोपनीय ठेवण्याची आवश्यकता काय, या सर्व प्रश्नांची उत्तरे केंद्र सरकारने द्यावी, असे प्रतिपादन पी.चिदंबरम यांनी केले. ‘राफेल’ आणि नोटाबंदीचा मुद्दा निवडणुकीत महत्त्वाचा राहणार आहे, असेदेखील त्यांनी स्पष्ट केले. २७ आॅक्टोबर २०१७ रोजी संरक्षण मंत्री निर्मला सीतारमण यांनी फ्रान्सच्या संरक्षणमंत्री फ्लोरेन्स पार्ली यांची दिल्लीत भेट घेतली. यावेळी या करारात ‘आॅफसेट पार्टनर’च्या शक्यतेला त्यांनी फेटाळले होते. दुसऱ्याच दिवशी पार्ली यांनी नागपुरात ‘मिहान’ येथे ‘डेसॉल्ट रिलायन्स एरोस्पेस’चे भूमिपूजन केले. यात गोपनीयता का बाळगण्यात आली व सत्य का लपविण्यात आले, असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला.सत्तेवर आलो तर कंत्राटावर फेरविचार करू‘राफेल’सारखी उत्तम दर्जाची लढाऊ विमाने आपल्या सैन्याचा भाग असावी असे आम्हाला देखील वाटते. देशहितासाठी अशी अत्याधुनिक सैन्य साधने आपल्याकडे असणे गरजेचे आहे. जर आम्ही सत्तेवर आलो तर थेट हे कंत्राट रद्द करणार नाही. तर या कंत्राटाच्या अटींवर फेरविचार करून त्यात बदल करू, असे पी.चिदंबरम यांनी सांगितले.

 

 

टॅग्स :P. Chidambaramपी. चिदंबरम