शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

दर तीन सेकंदात एका व्यक्तीला डिमेंशिया

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 21, 2021 04:08 IST

-आज जागतिक अल्झायमर दिन नागपूर : अल्झायमर रोग हा स्मृती, विचार, भावना आणि वागणुकीत अडचणी निर्माण करणारा मेंदूचा आजार ...

-आज जागतिक अल्झायमर दिन

नागपूर : अल्झायमर रोग हा स्मृती, विचार, भावना आणि वागणुकीत अडचणी निर्माण करणारा मेंदूचा आजार आहे. मेंदूला रक्तपुरवठा कमी झाल्यामुळे होणारा स्मृतिभ्रंश म्हणजे ‘डिमेंशिया’चा सर्वात सामान्य प्रकार आहे. जगात दर तीन सेकंदांनी एकाला डिमेंशिया होतो. अमेरिकेच्या भूतपूर्व अध्यक्षांसह अनेक महत्त्वाच्या व्यक्तींना या आजाराने ग्रासले आहे. २१व्या शतकातील आरोग्य संकट म्हणून ‘डिमेंशिया’कडे पाहिले जात आहे, असे मत प्रसिद्ध मेंदूरोग तज्ज्ञ डॉ.चंद्रशेखर मेश्राम यांनी व्यक्त केले.

इंडियन अकॅडमी ऑफ न्युरोलॉजीतर्फे मंगळवारी जागतिक अल्झायमर दिन साजरा केला जात आहे. त्या पार्श्वभूमीवर ते ‘लोकमत’शी बोलत होते. डॉ.मेश्राम म्हणाले, अल्झायमर रोग होण्यासाठी वाढते वय हा सर्वात मोठा घटक आहे. अल्झायमर आजाराचे निदान झालेले बहुतेक लोक ६५ किंवा त्याहून अधिक वयाचे असतात, परंतु या रोगाला २० वर्षांपूर्वीच सुरुवात झालेली असते. एकीकडे आयुष्य वाढत असताना, दुसरीकडे अल्झायमरचे रुग्ण वाढत आहेत.

- भारतात १,००० पैकी ४ लोकांना स्मृतिभ्रंश

डॉ.मेश्राम म्हणाले, जगात स्मृतिभ्रंश असलेले सुमारे ५ कोटी लोक आहेत. भारतात १,००० पैकी ४ लोकांना हा आजार दिसून येतो. पुढील १० वर्षांत याचे प्रमाण दुप्पट होईल. स्त्रियांमध्ये या आजाराचे प्रमाण अधिक आहे. या आजारात मेंदूच्या पेशी खराब होतात आणि मेंदू संकुचित पावतो. विसराळूपणा ही अल्झायमर आजाराच्या रुग्णांची सर्वात सामान्य तक्रार आहे.

- ही आहेत लक्षणे

महत्त्वाच्या तारखा किंवा घटना विसरून जाणे, तारीख, वेळ आणि ठिकाण लक्षात न राहणे, घराचा मार्ग विसरणे, वाचताना अडचण येणे, नातेवाईक आणि मित्रांना न ओळखणे, नातेसंबंध विसरणे, निर्णय घेण्याची क्षमता कमी होणे. त्यांना दैनंदिन दिनचर्येमध्ये अडचण येणे, ही सामान्य लक्षणे आहेत. रुग्ण नेहमी गोंधळलेला, संशयास्पद, निराश, भयभीत किंवा चिंताग्रस्त होऊ शकतो. स्मृतिभ्रंश झालेल्या व्यक्तींची लहान मुलाप्रमाणे काळजी घ्यावी लागते.

- आजाराचे निदान शक्य

सीटी स्कॅन, एमआरआय, पेट स्कॅन आणि रक्ताच्या चाचण्यांमधून अल्झायमर रोगाचे निदान करता येते. सध्या अल्झायमर रोग बरा करण्यासाठी कोणतीही औषधे उपलब्ध नाहीत, परंतु काही लक्षणांवर औषधोपचार केला जाऊ शकतो. ‘व्हिटॅमिन बी-१२’च्या कमतरतेमुळे, हायपोथायरॉइडीझममुळे स्मृतिभ्रंश झाल्यास तो औषधांद्वारे बरा होऊ शकतो. व्हिटॅमिन बी-१२चे प्रमाण शाकाहारी आहार करण्यांमध्ये अधिक दिसून येतो.

-आहार महत्त्वाचा

डिमेंशियामध्ये आहार महत्वाची भूमिका बजावतो. जे लोक उच्च कार्बोहायड्रेट आहार घेतात, सर्व प्रकारची साखर, जंक फूड, पॅकेज केलेले अन्न, कोल्ड ड्रिंक्स, फळांचे रस आणि सूर्यफूल तेल, राइस ब्रांड ऑइल, सोयाबीन तेल आणि हायड्रोजनयुक्त वनस्पती तेल स्वयंपाक करण्यासाठी वापरतात, त्यांना स्मृतिभ्रंश होण्याची शक्यता अधिक असते. मेंदूच्या आरोग्यासाठी शारीरिक आणि मानसिक व्यायाम महत्त्वाचे ठरतो. तंबाखू, धूम्रपान, मद्यपान यांपासून दूर राहणे, मधुमेह आणि उच्चरक्तदाबाचा योग्य उपचार, नवीन गोष्टी शिकणे, छंद विकसित करणे आणि सामाजिक कामांमध्ये रस घेणे या स्मृती जपण्यासाठी आणि स्मृतिभ्रंश रोखण्यासाठी महत्त्वपूर्ण बाबी आहेत.