शहरं
Join us  
Trending Stories
1
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
2
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'
3
मनसेकडून प्रतिसभागृह, आदित्य ठाकरेंना निमंत्रण; भाजपा नाराज, सहभागी होण्यास नकार
4
काळजी घ्या! कारमध्ये ठेवलेल्या बाटलीमुळे आग लागू शकते; कारणे जाणून घ्या
5
सोड्याचीच 'हवा', पेप्सी-कोला 'फुस्स'! तब्बल १५०० कोटींची सोडा विक्री, 'या' ब्रँडने बाजी मारली!
6
बदलापूर रेल्वे स्थानकातून येऊ शकते चेंगराचेंगरीची बातमी; 'हा' व्हिडीओ बघून काळजात होईल धस्स!
7
दिल्ली-मुंबई महामार्गावर थरकाप उडवणारा अपघात; स्वच्छता कर्मचाऱ्यांना चिरडले, ६ ठार, ५ गंभीर जखमी
8
Chaitra Amavasya 2025: चैत्र अमावस्येपासून दर अमावास्येला सुरू करा अग्निहोत्र; होतील अपार लाभ!
9
देशातील पहिला टेस्ला सायबर ट्रक गुजरातमध्ये पोहोचला, सुरतच्या हीरा व्यापाऱ्याची मोठी खरेदी, कोण आहे ती व्यक्ती?
10
“...तर भेटी घेण्यात काही गैर नाही”; शिंदेसेनेत प्रवेशाच्या चर्चा, चंद्रहार पाटील थेट बोलले
11
आयपीएलचा अर्धा हंगाम संपला, प्लेऑफसह ऑरेंज आणि पर्पल कॅपची शर्यतही झाली रंगतादार, कोण आघाडीवर? वाचा  
12
Gensol विरोधात इरेडानं दाखल केली तक्रार; दोन्ही कंपन्यांच्या शेअर्समध्ये भूकंप, तुमच्याकडे आहे का?
13
महाराष्ट्रातले पोलीस अकार्यक्षम; शिंदेसेनेच्या आमदाराचा महायुती सरकारलाच घरचा आहेर
14
“चिमुकल्यांना हृदयरोग, १ कोटी खर्च, भारतात उपचार घेऊ द्या”; पाकमधील पालकांचे सरकारला साकडे
15
एकीकडे युद्धाचे सावट, त्यात पाकिस्तानमधील लाहोर विमानतळावर भीषण आग, उड्डाणं रद्द, प्रवासी अडकले
16
ती माझी मैत्रीण! दहशतवादी हल्ल्यात शहीद झालेल्या विनय नरवाल यांच्या पत्नीबाबत एल्विश यादवचा खुलासा, म्हणाला- "तो फोटो पाहिल्यानंतर..."
17
अमेरिकेच्या बाजारात विकणार केवळ मेड इन इंडिया आयफोन; चीनला जोरदार झटका
18
कधीही, कुठेही, मोहिमेसाठी तयार! भारतीय नौदलाचा पाकिस्तानला संदेश
19
"जर सिंधु नदीचं पाणी रोखलं तर...": पाकिस्तानी PM शहबाज शरीफ यांची भारताला पोकळ धमकी
20
Vastu Shastra: वास्तुशास्त्रानुसार तव्यावरच्या पहिल्या पोळीवर हक्क कुणाचा? वाचा आणि कृती करा!

वसुली करणाऱ्या पोलिसांच्या निलंबनाची मागणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 11, 2019 23:53 IST

५० हजार रुपये वसुली करून एकतर्फी कारवाई करणाऱ्या तहसील ठाण्याच्या अधिकारी, कर्मचाऱ्यांची तक्रार पोलीस आयुक्त डॉ. भूषण कुमार उपाध्याय यांच्याकडे करण्यात आली आहे.

ठळक मुद्दे५० हजार, मोबाईल घेतल्याचा आरोप

लोकमत  न्यूज  नेटवर्कनागपूर : ५० हजार रुपये वसुली करून एकतर्फी कारवाई करणाऱ्या तहसील ठाण्याच्या अधिकारी, कर्मचाऱ्यांची तक्रार पोलीस आयुक्त डॉ. भूषण कुमार उपाध्याय यांच्याकडे करण्यात आली आहे. भाजपाचे आमदार कृष्णा खोपडे यांनी दोषी अधिकारी, कर्मचाऱ्यांना निलंबित करण्याची मागणी केली आहे.तहसील पोलीस ठाण्याजवळ १ सप्टेंबरला पावभाजी संचालकावर काही युवकांनी हल्ला केला. या घटनेबाबत पोलिसांनी गुन्हा दाखल केला होता. तहसील पोलिसांनी घटनास्थळी असलेल्या सीसीटीव्हीची तपासणी न करता गुन्हा दाखल करून निर्दोष युवकांविरुद्ध कारवाई केली. याची माहिती मिळाल्यानंतर नगरसेवक बाल्या बोरकर ३ सप्टेंबरला तहसील पोलीस ठाण्यात गेले. तेथे सहायक पोलीस निरीक्षक पाटील यांनी बाल्या बोरकर यांच्याशी वाद घातला. बोरकर यांनी आमदार कृष्णा खोपडे यांना तेथे बोलावले. खोपडे यांनी ९ सप्टेंबरला पोलीस आयुक्तांकडे याबाबत तक्रार केली. दरम्यान, दिनेश आकरे नावाच्या युवकाने त्याच्या जवळून ५० हजार रुपये आणि मोबाईल घेतल्याचे सांगितले. आकरे याच्या म्हणण्यानुसार त्याच्या घरी दोन वाहनात पोलीस आले होते. आकरे आपल्या जवळील ५० हजार, मोबाईल पत्नीला देत होते. पाटील, अनिल चतुर्वेदी, किशोर महंत आणि त्यांच्या साथीदारांनी आकरे यांच्या खिशातून मोबाईल आणि ५० हजार रुपये घेतले. आमदार खोपडे यांनी पाटील यांना सल्ला देऊन पोलीस निरीक्षकांना तक्रार केली. प्रकरण गंभीर होत असल्याचे पाहून मोबाईल, ५० हजार परत करण्यात आले. त्यानंतर आकरेला नेत्याजवळ गेल्यामुळे आणि कामात अडथळा आणण्याची धमकी देऊन कारवाईचा धाक दाखविण्यात आला. या प्रकरणाचा तपास दुय्यम निरीक्षक सागर यांना सोपविण्यात आला आहे. याप्रकरणी पोलीस आयुक्तांनी सहायक पोलीस निरीक्षक पाटील यांची नियंत्रण कक्षात बदली केली आहे. इतर पोलीस कर्मचाऱ्यांविरुद्ध कारवाई न झाल्यामुळे असंतोष पसरला आहे.

टॅग्स :RobberyचोरीPolice Stationपोलीस ठाणे