शहरं
Join us  
Trending Stories
1
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
2
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
3
प्रवाशांच्या जीवाशी खेळ! वंदे भारतचं जेवण घेताय? अहमदाबाद-मुंबई प्रवासात प्रवाशाच्या ताटात काय आढळलं पाहा
4
"आम्ही देशाला ६ सनातनी मुलं दिली, प्रत्येक हिंदूला 3 मुल तर असायलाच हवीत", पाकिस्तानातून आलेल्या सीमा हैदरचा सल्ला
5
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
6
होर्मुझचा इतिहास: ज्या जागेसाठी अमेरिका-इराण भिडलेत, तिथले मूळ रहिवासी कोण होते? टोलही होता...
7
अनंत अंबानींची मोठी घोषणा; केरळमधील मंदिरांना ₹१८ कोटींची देणगी, हत्तींच्या देखभालीसाठी करणार मदत
8
Leopard In Dindoshi : दिंडोशीत बिबट्याची दहशत! रहिवाशांमध्ये पसरले भीतीचे वातावरण
9
Vastu Shastra: साध्या वाटणाऱ्या 'या' ७ गोष्टी तुमच्या देवघरातील सकारात्मक ऊर्जा नष्ट करत आहेत का?
10
सोन्याची किंमत ३३६४ रुपयांनी, तर चांदी ८४०१ रुपयांनी झाली स्वस्त; पटापट चेक करा आजचे लेटेस्ट दर
11
Ram Bhajan Kumar : संघर्षगाथा! दगड फोडणारा झाला मोठा अधिकारी; ७ वेळा अपयश, आता नेत्रदीपक भरारी
12
दुसऱ्या पायलटबाबत इराणला माहितीच नव्हती, लीक करणाऱ्याला शोधणार ट्रम्प; रेस्क्यू मोहिमेवर मोठा गौप्यस्फोट
13
कोण आहे ५ कोटींचे बक्षीस असलेला मिसिर बेसरा? ज्याच्या खात्म्यासाठी ३ हजार जवानांचा जंगलाला वेढा
14
३,००० कोटींचे कंत्राट मिळताच डिफेन्स शेअरमध्ये ५%ची उसळी; वर्षात गुंतवणूकदारांना १७७०% परतावा
15
तामिळनाडू, केरळ, आसाम, बंगालमध्ये समीकरणे बदलली, कोण बाजी मारणार? धक्कादायक ओपिनियन पोल
16
Anjali Damania : अजित पवारांच्या अपघातादिवशी भोंदू खरातच्या मोबाईलवर १९ मेसेज; अंजली दमानिया यांचा दावा
17
१ घर, एक कर्मचारी अन् AI ची जादू; १८ लाख गुंतवून तब्बल २८ कोटींची कमाई करतोय 'हा' युवक
18
नव्या कामगार कायद्यानं ग्रॅच्युईटी वाढणार; काय आहे नवा फॉर्म्युला, कोणावर किती होणार परिणाम?
19
"किडनी दे, नाहीतर ३० लाख आण!"; थार गाडी अन् ८ लाख देऊनही छळ; लग्नानंतर उघड झालं पतीचं भयानक गुपित!
20
मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! एअर इंडियाचा प्रवास महागला; प्रवाशांच्या खिशाला कात्री...
Daily Top 2Weekly Top 5

अनुकंपा नोकरीची मागणी तातडीने करणे आवश्यक - हायकोर्ट 

By राकेश पांडुरंग घानोडे | Updated: April 25, 2023 15:41 IST

विलंब केल्यामुळे मुलीला दिलासा नाकारला

नागपूर : अनुकंपा नोकरीची मागणी तातडीने करणे आवश्यक आहे. दीर्घ काळानंतर दावा करणाऱ्याला नोकरी दिली जाऊ शकत नाही, असे मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने एका प्रकरणावरील निर्णयात स्पष्ट केले.

न्यायमूर्तिद्वय अतुल चांदूरकर व महेंद्र चांदवाणी यांनी हा निर्णय दिला. सरकारी कर्मचाऱ्याचा मृत्यू झाल्यानंतर त्याच्या कुटुंबातील एका पात्र व्यक्तीला नोकरी देण्यासाठी ही योजना आहे. पीडित कुटुंबाची हालअपेष्टा होऊ नये व त्याला तातडीने आर्थिक आधार मिळावा, हा अनुकंपा नोकरीच्या योजनेचा उद्देश आहे. त्यामुळे या नोकरीसाठी तातडीने अर्ज करणे आवश्यक आहे. नोकरी मागण्यास विलंब केल्यास योजनेचा उद्देश बाधित होतो, असे न्यायालयाने सांगितले.

अनुकंपा नोकरी मागण्यास विलंब करणाऱ्या विवाहित मुलीला या निर्णयाद्वारे दिलासा नाकारण्यात आला. राजश्री खोपे, असे मुलीचे नाव आहे. त्यांचे वडील माणिक भातकुलकर महाराष्ट्र जीवन प्राधिकरणच्या अमरावती मंडळात कार्यरत होते. भातकुलकर यांचे ८ जुलै १९९८ रोजी निधन झाले. मुलगी २००५ मध्ये सज्ञान झाली होती. परंतु, तिने नोकरी मागण्यासाठी १४ वर्षाचा विलंब केला. तसेच, सध्या तिच्या वडिलांच्या मृत्यूनंतर २४ वर्षे लोटली आहेत. त्यामुळे तिची नोकरीची मागणी अमान्य करण्यात आली.

आधी आईने केला होता दावा

आधी मुलीच्या आईने ९ फेब्रुवारी १९९९ रोजी अनुकंपा नोकरीसाठी अर्ज केला होता. परंतु, त्यांना नाेकरी देण्यात आली नाही. दरम्यान, वयाची ४५ वर्षे पूर्ण केल्यामुळे त्यांचे नाव प्रतीक्षा यादीतून वगळण्यात आले. परिणामी, मुलीने १६ डिसेंबर २०१९ रोजी अर्ज करून नोकरी देण्याची मागणी केली. त्यावरही काहीच निर्णय घेण्यात आला नाही. करिता, मुलीने उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती.

टॅग्स :Courtन्यायालयHigh Courtउच्च न्यायालयjobनोकरी