शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Local Accident: लोकल रेल्वेने चार प्रवाशांना उडवले, दोघे ठार; सँडहर्स्ट रोड स्थानकावरील घटना
2
जवाहर लाल नेहरू विद्यापीठात पुन्हा 'लाल सलाम', 'अभाविप'ला झटका; चारही जागा डाव्यांनी जिंकल्या
3
'...त्याच्यामुळेच युती होऊ शकली नाही'; नितेश राणेंचं नाव घेत दीपक केसरकर स्पष्टच बोलले
4
पाकिस्तानचे PM शाहबाज यांच्या जवळच्या मंत्र्यांने दहशतवादी हाफिज सईदकडे आश्रय घेतला; केंद्रीय मंत्र्याने पहिल्यांदाच भेट दिली
5
दिल्लीनंतर आता बिहार! भाजपा नेत्याने १० महिन्यात दोन राज्यात केले मतदान; विरोधकांनी घेरलं
6
Mumbai Local Train: मुंबई लोकल तासाभराच्या खंडानंतर पुन्हा धावली; कर्मचाऱ्यांच्या आंदोलनामुळे प्रवाशांचे हाल
7
"श्री, मला माफ कर..."! मुंग्यांच्या भीतीने विवाहितेने आयुष्य संपवलं; अजब प्रकारानं सगळेच हैराण
8
केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी महत्वाची बातमी, VRS संदर्भात सरकारनं जारी केली नवी गाइडलाइन!
9
"तेव्हाच सांगितलं होतं असं काही करू नका"; जमीन घोटाळा आरोपांवर अजित पवार स्पष्टच बोलले...
10
WPL 2026 Retained Players List : मुंबई इंडियन्सनं वर्ल्ड चॅम्पियन कॅप्टन हरमनप्रीतला पगारवाढ दिली, पण...
11
"...आता कमरेवर हात ठेवून शेतात फिरतायेत"; एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरे यांना टोला
12
IND A vs SA A : पंत-KL राहुलसह सारेच ढेर; नाबाद शतकासह ‘ध्रुव’ तारा चमकला
13
राहुल गांधींनी हरियाणातील ज्या भाजप नेत्याच्या पत्त्यावर 66 मतं असल्याचा दावा केला, त्याचं सत्य काय? जाणून घ्या...!
14
Travel : हिवाळ्यात फिरायला जायचा विचार करताय? दक्षिण भारतातील 'ही' ठिकाणं ठरतील बेस्ट
15
Parth Pawar Land Case: "तुम्ही-आम्ही भांडत राहायचं आणि यांची मुलं जमिनी लाटून..."; उद्धव ठाकरेंचा घणाघात
16
LIC चे तिमाही निकाल जाहीर; नफा 31% ने वाढला अन् ₹10,098 कोटींचा आकडा गाठला...
17
बांगलादेश, नेपाळनंतर आता पाकिस्तानात Gen Z आंदोलन पेटले; शहबाज शरीफ यांच्या सत्तेला हादरा?
18
पार्थ पवारांच्या जमीन व्यवहार प्रश्नावर अजित पवार शांतपणे निघून गेले; पत्रकारांना काहीच उत्तर दिले नाही
19
अक्षरच्या फिरकीची जादू, वॉशिंग्टनच्या ८ चेंडूत ३ विकेट्स! कांगारुंची शिकार करत टीम इंडियाची मालिकेत आघाडी
20
Babar Azam: बाबर आझमचं करिअर धोक्यात? वयाच्या ३१ व्या वर्षीच निवृत्त होण्याची येऊ शकते वेळ!

अनुकंपा नोकरीची मागणी तातडीने करणे आवश्यक - हायकोर्ट 

By राकेश पांडुरंग घानोडे | Updated: April 25, 2023 15:41 IST

विलंब केल्यामुळे मुलीला दिलासा नाकारला

नागपूर : अनुकंपा नोकरीची मागणी तातडीने करणे आवश्यक आहे. दीर्घ काळानंतर दावा करणाऱ्याला नोकरी दिली जाऊ शकत नाही, असे मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने एका प्रकरणावरील निर्णयात स्पष्ट केले.

न्यायमूर्तिद्वय अतुल चांदूरकर व महेंद्र चांदवाणी यांनी हा निर्णय दिला. सरकारी कर्मचाऱ्याचा मृत्यू झाल्यानंतर त्याच्या कुटुंबातील एका पात्र व्यक्तीला नोकरी देण्यासाठी ही योजना आहे. पीडित कुटुंबाची हालअपेष्टा होऊ नये व त्याला तातडीने आर्थिक आधार मिळावा, हा अनुकंपा नोकरीच्या योजनेचा उद्देश आहे. त्यामुळे या नोकरीसाठी तातडीने अर्ज करणे आवश्यक आहे. नोकरी मागण्यास विलंब केल्यास योजनेचा उद्देश बाधित होतो, असे न्यायालयाने सांगितले.

अनुकंपा नोकरी मागण्यास विलंब करणाऱ्या विवाहित मुलीला या निर्णयाद्वारे दिलासा नाकारण्यात आला. राजश्री खोपे, असे मुलीचे नाव आहे. त्यांचे वडील माणिक भातकुलकर महाराष्ट्र जीवन प्राधिकरणच्या अमरावती मंडळात कार्यरत होते. भातकुलकर यांचे ८ जुलै १९९८ रोजी निधन झाले. मुलगी २००५ मध्ये सज्ञान झाली होती. परंतु, तिने नोकरी मागण्यासाठी १४ वर्षाचा विलंब केला. तसेच, सध्या तिच्या वडिलांच्या मृत्यूनंतर २४ वर्षे लोटली आहेत. त्यामुळे तिची नोकरीची मागणी अमान्य करण्यात आली.

आधी आईने केला होता दावा

आधी मुलीच्या आईने ९ फेब्रुवारी १९९९ रोजी अनुकंपा नोकरीसाठी अर्ज केला होता. परंतु, त्यांना नाेकरी देण्यात आली नाही. दरम्यान, वयाची ४५ वर्षे पूर्ण केल्यामुळे त्यांचे नाव प्रतीक्षा यादीतून वगळण्यात आले. परिणामी, मुलीने १६ डिसेंबर २०१९ रोजी अर्ज करून नोकरी देण्याची मागणी केली. त्यावरही काहीच निर्णय घेण्यात आला नाही. करिता, मुलीने उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती.

टॅग्स :Courtन्यायालयHigh Courtउच्च न्यायालयjobनोकरी