शहरं
Join us  
Trending Stories
1
"मीरा भाईंदर महापालिका निवडणुकीत ५० टक्के जागा द्या, नाहीतर..."; मंत्री सरनाईकांचा इशारा
2
SIR मुळे तामिळनाडूत खळबळ, मतदार यादीतून हटवली तब्बल ९८ लाख नावं, धक्कादायक माहिती समोर
3
IND vs SA 5th T20I : वर्ल्ड कप संघ निवडीआधी गिल 'आउट'; संजूला पुन्हा मिळाली ओपनिंगची संधी अन्...
4
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटे यांची अटक टळली; हायकोर्टाने शिक्षेला स्थगिती दिली, पण...
5
नालासोपारा: जमिनीवर पाडलं, लाथाबुक्क्यांनी मारलं... सख्ख्या भावाचा खून करणाऱ्या आरोपीला अटक
6
सावधान! तुम्हीही घाईघाईत जेवताय? आताच बदला सवय; स्वत:च देताय अनेक आजारांना आमंत्रण
7
२०२५ मधील शेवटची अंगारकी चतुर्थी: वर्षभर कृपा-लाभाची सुवर्ण संधी; ‘अशी’ करा गणेश उपासना
8
लाडात वाढवलं, खूप शिकवलं, पण मुलीनं पळून जाऊन लग्न केलं, संतप्त कुटुंबानं जिवंतपणी काढली अंत्ययात्रा 
9
अंगठी घातल्याने अथवा नाव बदलल्याने नशीब बदलतं का? प्रेमानंद महाराजांनी दिलं असं उत्तर
10
NCP नेत्यांची अजितदादांसोबत बैठक, CM फडणवीसांशीही चर्चा अपेक्षित; २९ मनपात महायुती म्हणून…
11
U19 Asia Cup 2025 : ठरलं! आशिया कप स्पर्धेत पुन्हा भारत-पाक यांच्यात रंगणार फायनल!
12
“भगवान ऋषभदेवांचे विचार भारताच्या प्राचीन व महान संस्कृतीचे प्रतीक”: CM देवेंद्र फडणवीस
13
IPL 2026: प्रिती झिंटाचा मास्टरस्ट्रोक! लिलावात बोली लावली, तिकडे पठ्ठ्याने केली तुफानी खेळी
14
"मी हरियाणामध्ये हिंदू महिलेचे 'घूंघट' खेचले असते तर...", नीतीश कुमारांच्या हिजाब वादावर काय म्हणाले उमर अब्दुल्ला?
15
७१ व्या वर्षी रेखा यांनी केलं लग्न? भर कार्यक्रमात स्वतःच केला मोठा खुलासा; म्हणाल्या, "प्रेम आहे तर..."
16
प्यारवाली लव्हस्टोरी! ब्रेकअपनंतर शोधला डिजिटल पार्टनर; चक्क AI बॉयफ्रेंडसोबत बांधली लग्नगाठ
17
ED: बेटिंग ॲप प्रकरणी युवराज सिंग, रॉबिन उथप्पा यांची मालमत्ता जप्त; ईडीची मोठी कारवाई
18
“सत्य लपून राहत नाही, आता दुसरा मंत्रीही राजीनामा देणार”; उद्धव ठाकरेंचा रोख कुणाकडे?
19
'सेबीची कारवाई म्हणजे आर्थिक मृत्यूदंड' अवधूत साठेंच्या वकिलांचा 'सॅट'मध्ये युक्तिवाद; काय दिला निर्णय?
20
Anurag Dwivedi : २०० रुपयांपासून सुरुवात, आता कोट्यवधींची कमाई; ९ वर्षांत युट्यूबर अनुराग द्विवेदी कसा बनला धनकुबेर?
Daily Top 2Weekly Top 5

अंतिम वर्षाच्या परीक्षा रद्द करण्याची मागणी दुर्दैवी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 21, 2020 09:14 IST

अंतिम वर्षाच्या विद्यार्थ्यांच्या परीक्षा घेऊ नयेत, अशी राज्याचे उच्चशिक्षणमंत्री उदय सामंत यांनी विद्यापीठ अनुदान आयोगाला पत्र लिहून मागणी केली आहे. यावरून अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेने शिक्षणमंत्र्यांवर निशाणा साधला आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : अंतिम वर्षाच्या विद्यार्थ्यांच्या परीक्षा घेऊ नयेत, अशी राज्याचे उच्चशिक्षणमंत्री उदय सामंत यांनी विद्यापीठ अनुदान आयोगाला पत्र लिहून मागणी केली आहे. यावरून अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेने शिक्षणमंत्र्यांवर निशाणा साधला आहे. अंतिम वर्षाच्या परीक्षा रद्द करण्याची मागणीच मुळात दुर्दैवी आहे. यामुळे भविष्यात विद्यार्थ्यांचे नुकसान होण्याचा धोका असल्याचे अभाविपतर्फे म्हणण्यात आले आहे.यासंदर्भात अभाविपच्या विदर्भ प्रांतातर्फे पत्रकच काढण्यात आले आहे. विद्यापीठात अंतिम वर्षाच्या परीक्षा होतील, असे खुद्द शिक्षणमंत्र्यांनीच ८ मे रोजी सार्वजनिकपणे सांगितले. त्यानंतर राज्यातील विविध विद्यापीठांनी त्यासंदर्भात तयारी सुरू केली व परीक्षा-मूल्यमापन संचालकांनी तसे पत्रकदेखील काढले. मात्र आता शिक्षणमंत्र्यांनी अशी मागणी करणे खेदजनक आहे. त्यांच्या या भूमिकेमुळे लाखो विद्यार्थांचे शैक्षणिक नुकसान होऊ शकते. विद्यार्थ्यांचे भविष्यातील रोजगार तसेच उच्चशिक्षणाच्या संधींवर याचा परिणाम होऊ शकतो. परदेशात किंवा इतर राज्यांतील शैक्षणिक संस्थांमध्ये प्रवेश घेताना यामुळे अडचणी निर्माण होऊ शकतात. त्यामुळे शिक्षणमंत्र्यांनी विचार करून पावले उचलावीत, असे अभाविपतर्फे म्हणण्यात आले आहे.इतर राज्यात परीक्षा, मग महाराष्ट्रात का नाही?राज्य शासनाने नेमलेल्या तज्ज्ञ समितीनेच जुलैमध्ये परीक्षा घेण्यात याव्या असे सुचविले. राज्यातील एकाही विद्यापीठाने परीक्षा रद्द करण्यात याव्या असा प्रस्ताव दिलेला नाही. मग शिक्षणमंत्र्यांनी अशी मागणी का केली, असा सवाल अभाविपने विचारला आहे. देशातील इतर राज्यांतही परीक्षा होणार आहेत. मग महाराष्ट्रातच का नाही, असा प्रश्नदेखील उपस्थित करण्यात आला आहे.

 

टॅग्स :examपरीक्षा