शहरं
Join us  
Trending Stories
1
अभिनेते धर्मेंद्र व्हेंटिलेटरवर? आयसीयूत सुरु आहेत उपचार; टीमने दिली हेल्थ अपडेट, म्हणाले...
2
मुंबईत काँग्रेस स्वबळावर लढणार तर उद्धव ठाकरेंसोबत युतीआधीच मनसेने 'इतक्या' जागांची केली तयारी
3
'मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण' योजना बंद होणार? एकनाथ शिंदेंकडून मोठी घोषणा, e-KYC देखील...
4
धक्कादायक! बाथरूममध्ये आंघोळीसाठी गेली, पण तासभर बाहेर नाही आली; दरवाजा तोडला तर...
5
ब्युटी आणि फॅशन क्षेत्रातील 'हा' शेअर्स ५२ आठवड्यांच्या उच्चांकाजवळ, वर्षात ५७% रिटर्न, अजूनही संधी?
6
२ डॉक्टर अन् मशिदीच्या इमामासह ७ जणांना अटक, 'व्हाइट कॉलर' दहशतवाद्यांचा पर्दाफाश, पोलिसांनी केले धक्कादायक खुलासे
7
कर्मानेच अडकले! करायला गेला एक अन्.. दहशतवादी अकील आणि मुजम्मिल यांचा 'असा' झाला पर्दाफाश!
8
Jalgaon Accident: कार दुभाजकावर धडकून पेटली, पत्नीचा होरपळून मृत्यू, पती गंभीर जखमी 
9
कमाल झाली राव! फोनमध्ये नेटवर्कशिवाय चालणार मॅप, करता येणार मेसेज; 'कसं' ते जाणून घ्या
10
SIP ने केले मालामाल! ५ वर्षांत २९ फंड्सचा २०% हून अधिक परतावा; 'मिड कॅप'ची जबरदस्त कामगिरी
11
Astro Tips: ज्योतिष शास्त्रानुसार, मंगळवारी केस कापल्याने आयुष्य ८ महिने कमी होते? पर्याय काय?
12
मत फुटले तरी लंकेंनी नगरपंचायत राखली! पारनेरच्या नगराध्यक्षपदी डॉ. विद्या कावरे, मविआने उधळला विजयाचा गुलाल
13
'महेंद्र दळवी डोक्यावर पडलेले आमदार'; शिंदेंची शिवसेना-अजित पवारांच्या राष्ट्रवादीत संघर्षाचा भडका
14
आयटी क्षेत्रामुळे सेन्सेक्स आणि निफ्टीची मोठी झेप; पण, टाटा समूहातील 'हा' शेअर भयावह घसरला
15
CSK ‘खिडकी’तून बाहेर काढणार असल्याची चर्चा! त्यातच जड्डू Insta वरून ‘गायब’
16
सांगलीतील विटा शहर हादरले! रेफ्रिजरेटर-सिलेंडरच्या भीषण स्फोटात लग्नघरातील चौघांचा मृत्यू
17
५ स्टार सेफ्टी रेटिंग अन् तब्बल ७५००० डिस्काउंट असणारी कार ह्युंदाईने वेबसाईटवरूनच काढून टाकली! विक्रीही बंद होणार?
18
भंगार विक्रीतून सरकार झालं मालमाल; इतक्या कमाईत खरेदी करू शकतात ७ वंदे भारत ट्रेन
19
Video - दारूने भरलेले ग्लास, तळलेले शेंगदाणे... बंगळुरूच्या सेंट्रल जेलमध्ये कैद्यांची जंगी पार्टी
20
सत्य साईबाबा: चमत्कारी जीवन, भक्तांमध्ये दिग्गज सेलिब्रेटी, आजही जगभर अनुयायी; काय होते वैशिष्ट्य?

अंतिम वर्षाच्या परीक्षा रद्द करण्याची मागणी दुर्दैवी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 21, 2020 09:14 IST

अंतिम वर्षाच्या विद्यार्थ्यांच्या परीक्षा घेऊ नयेत, अशी राज्याचे उच्चशिक्षणमंत्री उदय सामंत यांनी विद्यापीठ अनुदान आयोगाला पत्र लिहून मागणी केली आहे. यावरून अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेने शिक्षणमंत्र्यांवर निशाणा साधला आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : अंतिम वर्षाच्या विद्यार्थ्यांच्या परीक्षा घेऊ नयेत, अशी राज्याचे उच्चशिक्षणमंत्री उदय सामंत यांनी विद्यापीठ अनुदान आयोगाला पत्र लिहून मागणी केली आहे. यावरून अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेने शिक्षणमंत्र्यांवर निशाणा साधला आहे. अंतिम वर्षाच्या परीक्षा रद्द करण्याची मागणीच मुळात दुर्दैवी आहे. यामुळे भविष्यात विद्यार्थ्यांचे नुकसान होण्याचा धोका असल्याचे अभाविपतर्फे म्हणण्यात आले आहे.यासंदर्भात अभाविपच्या विदर्भ प्रांतातर्फे पत्रकच काढण्यात आले आहे. विद्यापीठात अंतिम वर्षाच्या परीक्षा होतील, असे खुद्द शिक्षणमंत्र्यांनीच ८ मे रोजी सार्वजनिकपणे सांगितले. त्यानंतर राज्यातील विविध विद्यापीठांनी त्यासंदर्भात तयारी सुरू केली व परीक्षा-मूल्यमापन संचालकांनी तसे पत्रकदेखील काढले. मात्र आता शिक्षणमंत्र्यांनी अशी मागणी करणे खेदजनक आहे. त्यांच्या या भूमिकेमुळे लाखो विद्यार्थांचे शैक्षणिक नुकसान होऊ शकते. विद्यार्थ्यांचे भविष्यातील रोजगार तसेच उच्चशिक्षणाच्या संधींवर याचा परिणाम होऊ शकतो. परदेशात किंवा इतर राज्यांतील शैक्षणिक संस्थांमध्ये प्रवेश घेताना यामुळे अडचणी निर्माण होऊ शकतात. त्यामुळे शिक्षणमंत्र्यांनी विचार करून पावले उचलावीत, असे अभाविपतर्फे म्हणण्यात आले आहे.इतर राज्यात परीक्षा, मग महाराष्ट्रात का नाही?राज्य शासनाने नेमलेल्या तज्ज्ञ समितीनेच जुलैमध्ये परीक्षा घेण्यात याव्या असे सुचविले. राज्यातील एकाही विद्यापीठाने परीक्षा रद्द करण्यात याव्या असा प्रस्ताव दिलेला नाही. मग शिक्षणमंत्र्यांनी अशी मागणी का केली, असा सवाल अभाविपने विचारला आहे. देशातील इतर राज्यांतही परीक्षा होणार आहेत. मग महाराष्ट्रातच का नाही, असा प्रश्नदेखील उपस्थित करण्यात आला आहे.

 

टॅग्स :examपरीक्षा