शहरं
Join us  
Trending Stories
1
'पाकिस्तानचे दोन तुकडे करा, पाकव्याप्त काश्मीर भारतात घ्या', काँग्रेसच्या मुख्यमंत्र्याची PM मोदींकडे मागणी
2
पहलगाम हल्ल्यात हिंदूच टार्गेट! आधी पॅन्ट काढल्या अन् 'खतना' न केलेल्यांचीच हत्या; तपास पथकाकडून मोठा खुलासा
3
Pahalgam Terror Attack: लष्कराची मोठी कारवाई! आणखी दोन दहशतवाद्यांची घरे स्फोटके लावून पाडली
4
पाकिस्तानच्या नापाक कारवाया थांबत नाहीत, २४ तासांत दुसऱ्यांदा नियंत्रण रेषेवर गोळीबार, भारतीय सैन्याने दिले चोख प्रत्युत्तर
5
"विकी कौशलमुळे 'छावा' चालला असं नाही, तर...", महेश मांजरेकर स्पष्टच बोलले
6
"हे काही टीव्ही शोज नाहीयेत...", अभिनेत्री शिवानी सुर्वेनं प्रसारमाध्यमांना फटकारलं
7
EPFO नं केला मोठा बदल, जॉब बदल्यावर PF ट्रान्सफर करणं होणार सोपं; १.२५ कोटी लोकांना फायदा
8
अक्षय शिंदे प्रकरणी आदेश देऊनही पोलिसांविरोधात गुन्हा दाखल न केल्याने हायकोर्टाचा संताप
9
PPF ची 'ही' ट्रिक अनेकांना माहीत नाही, बनेल १ कोटींचा फंड, वर्षाला मिळू शकतं ७ लाखांपेक्षा अधिक व्याज
10
भारताची धास्ती घेत पाक लष्कराची सीमेवर मोठ्या प्रमाणात जमवाजमव; सैनिकांची संख्या वाढवली
11
मोठी बातमी: एल्फिन्स्टन ब्रिज सोमवारपर्यंत बंद होणार नाही; नागरिकांच्या आंदोलनाची थेट मुख्यमंत्र्यांनी घेतली दखल!
12
भारत-पाकमध्ये पाण्यावरून युद्ध होईल? तणाव वाढला; पाकिस्तानात हाहाकार, कारण...
13
भारताकडून पाकिस्तानला पाण्याचा थेंबही मिळणार नाही; केंद्र सरकारनं आखली रणनीती
14
अजित पवार यांचा अधिकाऱ्यांना सज्जड दम; सांगितलेली कामे केली नाहीत, तर पुढच्या बैठकीला..
15
आजचे राशीभविष्य, २६ एप्रिल २०२५: शक्यतो आज आर्थिक देवाण-घेवाण करू नका
16
अखेर पाक म्हणाला, होय, आम्ही दहशतवाद्यांना पोसले; संरक्षणमंत्री ख्वाजा आसिफ यांची कबुली
17
एकही पाकिस्तानी भारतात राहणार नाही याची खात्री करा; शाहांचा सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना फोन
18
पाकिस्तानी नागरिकांवर महाराष्ट्रात वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना आदेश
19
राहुल गांधी यांना सर्वोच्च न्यायालयाने फटकारले; "स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल..."
20
संसदेने मंजूर केलेला कायदा संवैधानिक, स्थगिती देऊ नका; केंद्र सरकारची मागणी

अंतिम वर्षाच्या परीक्षा रद्द करण्याची मागणी दुर्दैवी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 21, 2020 09:14 IST

अंतिम वर्षाच्या विद्यार्थ्यांच्या परीक्षा घेऊ नयेत, अशी राज्याचे उच्चशिक्षणमंत्री उदय सामंत यांनी विद्यापीठ अनुदान आयोगाला पत्र लिहून मागणी केली आहे. यावरून अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेने शिक्षणमंत्र्यांवर निशाणा साधला आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : अंतिम वर्षाच्या विद्यार्थ्यांच्या परीक्षा घेऊ नयेत, अशी राज्याचे उच्चशिक्षणमंत्री उदय सामंत यांनी विद्यापीठ अनुदान आयोगाला पत्र लिहून मागणी केली आहे. यावरून अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेने शिक्षणमंत्र्यांवर निशाणा साधला आहे. अंतिम वर्षाच्या परीक्षा रद्द करण्याची मागणीच मुळात दुर्दैवी आहे. यामुळे भविष्यात विद्यार्थ्यांचे नुकसान होण्याचा धोका असल्याचे अभाविपतर्फे म्हणण्यात आले आहे.यासंदर्भात अभाविपच्या विदर्भ प्रांतातर्फे पत्रकच काढण्यात आले आहे. विद्यापीठात अंतिम वर्षाच्या परीक्षा होतील, असे खुद्द शिक्षणमंत्र्यांनीच ८ मे रोजी सार्वजनिकपणे सांगितले. त्यानंतर राज्यातील विविध विद्यापीठांनी त्यासंदर्भात तयारी सुरू केली व परीक्षा-मूल्यमापन संचालकांनी तसे पत्रकदेखील काढले. मात्र आता शिक्षणमंत्र्यांनी अशी मागणी करणे खेदजनक आहे. त्यांच्या या भूमिकेमुळे लाखो विद्यार्थांचे शैक्षणिक नुकसान होऊ शकते. विद्यार्थ्यांचे भविष्यातील रोजगार तसेच उच्चशिक्षणाच्या संधींवर याचा परिणाम होऊ शकतो. परदेशात किंवा इतर राज्यांतील शैक्षणिक संस्थांमध्ये प्रवेश घेताना यामुळे अडचणी निर्माण होऊ शकतात. त्यामुळे शिक्षणमंत्र्यांनी विचार करून पावले उचलावीत, असे अभाविपतर्फे म्हणण्यात आले आहे.इतर राज्यात परीक्षा, मग महाराष्ट्रात का नाही?राज्य शासनाने नेमलेल्या तज्ज्ञ समितीनेच जुलैमध्ये परीक्षा घेण्यात याव्या असे सुचविले. राज्यातील एकाही विद्यापीठाने परीक्षा रद्द करण्यात याव्या असा प्रस्ताव दिलेला नाही. मग शिक्षणमंत्र्यांनी अशी मागणी का केली, असा सवाल अभाविपने विचारला आहे. देशातील इतर राज्यांतही परीक्षा होणार आहेत. मग महाराष्ट्रातच का नाही, असा प्रश्नदेखील उपस्थित करण्यात आला आहे.

 

टॅग्स :examपरीक्षा