शहरं
Join us  
Trending Stories
1
थरारक घटना! टेकऑफनंतर काही मिनिटांतच Air India विमानाचा यू टर्न; हवेत अडकला प्रवाशांचा श्वास
2
Mumbai Crime: मुंबईतील धक्कादायक प्रकार! चालत्या लोकलमधून मुलीला खाली फेकलं; Video व्हायरल, आरोपीला पकडलं
3
भीषण अपघात! इंडोनेशियात डिव्हायडरला धडकून बस महामार्गावर उलटली, १६ जणांचा मृत्यू
4
सहा पक्षांच्या जय, पराजयाचा संदेश काय? भाजपपेक्षा एकनाथ शिंदेंना सर्वाधिक यश? एवढा विस्तृत लेख कुठेच मिळणार नाही...
5
बॉलिवूडचे चर्चेतले चेहरे अक्षय खन्ना-सनी देओल २९ वर्षांनंतर एकत्र दिसणार? 'या' सिनेमाची चर्चा
6
लग्नाच्या आदल्या रात्री वडील ओरडले; नवरदेवाच्या लागलं मनाला, वरातीऐवजी घरातून निघाली अंत्ययात्रा!
7
कोट्यधीश होण्याचे स्वप्न आता होणार पूर्ण! २१X१०X१२ हा फॉर्म्युला वापरा; ५१ व्या वर्षी व्हाल मालामाल
8
पैसा दुप्पट करणारी सरकारी स्कीम; विना जोखीम 'इतक्या' महिन्यांत तुमचे पैसे होतील दुप्पट
9
केंद्रीय मंत्री किरेन रिजिजू अजमेर दर्ग्यावर चादर चढवणार; म्हणाले, "दुआ करने जा रहा हूं..."
10
मित्रपक्षांना चर्चेत गुंतवत स्वबळाचाच डाव टाकण्याची भाजपाची खेळी?; इच्छुकही करतायेत 'डबल गेम'
11
भाडं वाढणार; १००, २००, ५०० कोटी नाही तर, 'इतक्या' कोटींचा होणार रेल्वेला बंपर फायदा, जाणून घ्या
12
एस एस राजामौलींच्या 'वाराणसी'चं बजेट १३०० कोटी? प्रियंका चोप्रा म्हणाली, "अर्धे पैसे माझ्या..."
13
शरीफ उस्मान हादी यांचा मारेकरी देश सोडून पळाला? बांगलादेश पोलिसांनी सत्य परिस्थिती केली स्पष्ट
14
Stock Markets Today: शेअर बाजारात जोरदार तेजी, सेन्सेक्स ३४० अकांनी तर निफ्टी ११५ अंकांनी वधारला; IT Stocks सुस्साट
15
देशभक्तीला बॉक्स ऑफिसवरील यशाचा फॉर्म्युला समजणं हा अपमान..., विकी कौशलची स्पष्ट प्रतिक्रिया
16
भाजपाच्या नजरेने RSS कडे पाहणे चुकीचे; सरसंघचालक मोहन भागवत यांनी असं विधान का केले?
17
Post Office मध्ये जमा करा ₹२,००,००० आणि मिळवा ₹८९,९९० चं फिक्स व्याज, पैसेही सुरक्षित आणि मिळणार सरकारची गॅरेंटी
18
काँग्रेस-शरद पवारांसोबत आघाडी करून शिंदेसेनेने २ नगरपरिषदेत भाजपाच्या तोंडचा घास हिसकावला
19
'धुरंधर'च्या 'शरारत' गाण्यातून तमन्ना भाटियाला दिग्दर्शकाने दाखवला बाहेरचा रस्ता, म्हणाला- "मला सिनेमात आयटम साँग..."
20
'बांगलादेशातील अराजकतेला युनूस जबाबदार, भारतासोबतचे संबंधही बिघडवले'; शेख हसीना यांचा जोरदार हल्लाबोल
Daily Top 2Weekly Top 5

अटलांटा कंपनीविरुद्ध कारवाईची मागणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 10, 2021 04:09 IST

कोंढाळी : कोंढाळी-नागपूर रस्त्याचे चौपदरीकरणाचे काम करणाऱ्या अटलांटा (बालाजी) कंपनीच्या मनमानी कारभाराने या मार्गावर झालेल्या अपघातात आजवर अनेकांचे जीव ...

कोंढाळी : कोंढाळी-नागपूर रस्त्याचे चौपदरीकरणाचे काम करणाऱ्या अटलांटा (बालाजी) कंपनीच्या मनमानी कारभाराने या मार्गावर झालेल्या अपघातात आजवर अनेकांचे जीव गेले आहेत. त्यामुळे पोलिसांनी अटलांटा कंपनीविरुद्ध कडक कारवाई करावी, अशी मागणी कोंढाळी ग्रामपंचायतच्या वतीने करण्यात आली आहे. कोंढाळी ते नागपूर(वाडी)दरम्यान नागपूर-अमरावती महामार्गाच्या चौपदरीकरणाचे काम अटलांटा( बालाजी)कंपनीने केले आहे. या कंपनीकडून गत १० वर्षांपासून या मार्गावर टोल वसुली करण्यात आली. पण कोंढाळी-नागपूरदरम्यान सर्व्हिस मार्ग, ड्रेनेज, साईड शोल्डर आदी अनेक कामे अद्यापही अपूर्ण आहेत. कोंढाळी येथील वर्धा रोड टी-पाॅईंटवर नेहमी अपघात होतात. या अपघातात अनेकांचा मृत्यू झाला आहे. यासंदर्भात २२ डिसेंबर २०१७ विद्यमान गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या नेतृत्वात चक्का जाम आंदोलनही करण्यात आले होते. त्यावेळी अटलांटा कंपनीने वर्धा रोड टी-पाॅईंटवर मोठे हायमास्ट लाईट व गतिरोधक लावून देण्याचे आणि टी-पाॅईंटचे सौंदर्यीकरण करण्याचे आश्वासन दिले. पण प्रत्यक्षात कंपनीने येथे केवळ गतिरोधक लावले. वर्धा रोड टी-पाॅईंट येथे मरामाय मंदिरासमोर अत्यंत धोकादायक परिस्थिती आहे. येथील रस्ता अरुंद आहे. याबाबत कोंढाळीचे सरपंच केशव धुर्वे, उपसरपंच स्वप्निल व्यास यांनी अटलांटा कंपनी प्रशासनाला अनेक तक्रारी, निवेदन दिले. मात्र याची कुठलीही दखल घेण्यात आली नाही. या तक्रारीची दखल घेत कोंढाळीचे ठाणेदार विश्वास फुल्लरवार यांनी या मार्गाची पाहणी केली. यावेळी सरपंच केशव धुर्वे, उपसरपंच स्वप्निल व्यास, ग्रा.पं. सदस्य संजय राऊत, कमलेश गुप्ता आदी उपस्थित होते.