शहरं
Join us  
Trending Stories
1
बीड जिल्ह्यात मुसळधार पाऊस, नद्या-नाले तुडुंब; जीप वाहून सहा जण अडकल्याची भीषण घटना
2
कावड-पालखी सोहळ्यातील ट्रॅक्टरचा अकोला दगडीपुलाजवळ अपघात, २२ भाविक जखमी
3
सी.पी राधाकृष्णन यांना उपराष्ट्रपतिपदाचे उमेदवार बनवण्यामागे भाजपाची खेळी काय? जाणून घ्या
4
कोल्हापूर सर्किट बेंच झाले, आता खंडपीठाचा प्रस्ताव द्या; सरन्यायाधीश भूषण गवईंची सूचना
5
जलसमाधी आंदोलनावेळी नदीत उडी घेणाऱ्या 'त्या' आंदोलनकर्त्याचा मृतदेह १५ किमी अंतरावर सापडला
6
दहीहंडीला २४ तासांत तब्बल १.१३ कोटी दंड वसूल; वाहतूक पोलिसांनी बेशिस्त गोविंदांना लावला चाप
7
मोठी बातमी! महाराष्ट्राचे राज्यपाल सीपी राधाकृष्णन उपराष्ट्रपती पदाची निवडणूक लढणार; भाजपाची घोषणा
8
योगींच्या गोटात खळबळ! १०० हून अधिक आमदारांचा पत्ता कट होण्याची शक्यता; सपाही टेन्शनमध्ये...
9
लग्नानंतर ४५ दिवसांत असं काय घडलं, २७ वर्ष युवकानं स्वत:ला संपवलं?; आईला केला होता शेवटचा कॉल
10
पावसाळ्यात बेडूक येतात तसं निवडणूक आल्यावर जरांगे बाहेर पडतात; भाजपा आमदाराची बोचरी टीका
11
न्यायालयात लेखी स्वरुपात देणार का? निवडणूक आयोगाच्या 'त्या' वक्तव्यावर काँग्रेसचा पलटवार
12
'आता तरी उठा' या पुण्यातील बॅनरवरून अण्णा हजारेंनी मौन सोडलं, म्हणाले, "हे माझं दुर्दैव..."
13
महाराष्ट्रातील मतदानावर आरोप, ECI नं राहुल गांधींना सुनावलं; "निकालानंतर आरोप केले, पण आजपर्यंत एकही..."
14
जिथे नवीन मतदार, तिथे BJP चा विजय; महाराष्ट्रात जादूने १ कोटी मतदार निर्माण झाले- राहुल गांधी
15
दावा जगाची युद्धे थांबविल्याचा, ट्रम्पना वॉशिंग्टन डीसीतील परिस्थिती आवरेना...; दुसऱ्या राज्यातून सुरक्षा मागविली
16
आई-पत्नी आणि मुलीसमोर तरुणावर तलवारीने हल्ला; एका व्हॉट्सअॅप फॉरवर्डमुळे गेला जीव
17
७ दिवसांत प्रतिज्ञापत्र द्या अन्यथा देशाची माफी मागा; निवडणूक आयोगाचं राहुल गांधींना चॅलेंज
18
उतावीळ...! नोबेल द्या नाहीतर प्रचंड टेरिफ लावू...; ट्रम्प यांची नॉर्वेच्या अर्थमंत्र्यांना धमकी
19
'मत चोरी'च्या आरोपांना आम्ही घाबरत नाही; राहुल गांधींना निवडणूक आयोगाचे उत्तर
20
तुमचं पॅन कार्ड हरवलंय? काळजी करू नका, घरबसल्या फक्त ५ मिनिटांत मिळेल डुप्लिकेट ई-पॅन

पार्किंगच्या जागेवरील अतिक्रमणे हटवा

By admin | Updated: October 16, 2015 03:08 IST

न्यायालयाने ८ आॅक्टोबर रोजी दिलेले निर्देश केवळ धंतोली परिसरापुरते होते. आता न्यायालयाने निर्देशांचे क्षेत्र वाढविण्याचा निर्णय घेऊन हे नव्याने निर्देश दिले.

हायकोर्टाचे आदेश : सहा आठवड्यांची मुदतन्यायालयाने ८ आॅक्टोबर रोजी दिलेले निर्देश केवळ धंतोली परिसरापुरते होते. आता न्यायालयाने निर्देशांचे क्षेत्र वाढविण्याचा निर्णय घेऊन हे नव्याने निर्देश दिले. न्यायालयाने संबंधित महानगर प्राधिकाऱ्यांना असेही निर्देश दिले की, शहरातील १० झोनपैकी प्रत्येक झोनमध्ये एक पथक नेमले जावे. या पथकांमार्फत बेकायदेशीर अतिक्रमणे हटवून पार्किंगच्या जागा स्वच्छ करण्यात याव्या. मनपा आयुक्तांनाही असे निर्देश देण्यात आले आहे की, अतिक्रमणधारकाने अतिक्रमणे हटवली नाही तर त्याला गंभीर परिणाम भोगावे लागतील, अशा आशयाच्या इशारा देणाऱ्या जाहीर नोटीस वृत्तपत्रांमधून प्रसिद्ध करण्यात याव्यात. त्यानंतर कोणतीही पूर्वसूचना न देता ही अतिक्रमणे नेमून दिलेल्या कालावधीत काढून टाकली जावी. धंतोली नागरिक मंडळाच्यावतीने दाखल करण्यात आलेली जनहित याचिका गुरुवारी सुनावणीसाठी आली असता न्यायालयाने हे निर्देश दिले. या यचिकेद्वारे येथील नागरिकांनी आपली अशी कैफियत मांडली होती की, डॉक्टरांनी उघडलेल्या क्लिनिक आणि इस्पितळांच्या वाढत्या गर्दीमुळे नागरिकांना श्वास घेणे मुश्कील झाले आहे. या गर्दीमुळे सहजपणे जगण्यासाठी मोकळी जागा कमी झालेली आहे. न्यायालयाने या याचिकेवर गत ८ आॅक्टोबर रोजी निर्देश दिले होते. त्यावर मनपाच्यावतीने कार्यवाही अहवाल दाखल करण्यात आला होता. अहवालात अतिक्रमण झालेल्या काही ठिकाणांची छायाचित्रे होती. १९ ठिकाणांचे निरीक्षण केल्याचा आणि काही बेकायदेशीर बांधकामे पाडून संबंधितांकडून दंड वसूल केल्याचाही या अहवालात उल्लेख होता. अतिक्रमणे काढून घेण्याच्या न्यायालयांच्या निर्देशांबाबत अत्यंत सावध राहावे, निर्देशांचा गैरफायदा घेऊ नये, असा इशाराही न्यायालयाने दिला. न्यायालयात याचिकाकर्त्यांच्या वतीने अ‍ॅड. ए. सी. धर्माधिकारी, मनपाच्यावतीने अ‍ॅड. सुधीर पुराणिक, नासुप्रच्यावतीने अ‍ॅड. एस. के. मिश्रा, प्रतिवादी आणि मध्यस्थांच्यावतीने अ‍ॅड. आनंद परचुरे, राहील मिर्झा, अ‍ॅड. भानुदास कुळकर्णी, अ‍ॅड. अरुण अग्रवाल, अ‍ॅड. श्रीरंग भांडारकर यांनी बाजू मांडली. (प्रतिनिधी)