शहरं
Join us  
Trending Stories
1
पावसाचा हाहाकार! चीनमध्ये १.८४ लाख कोटींचं नुकसान; पाकिस्तानमध्ये ३०० जणांचा मृत्यू, भारतात...
2
"जे उचकायचं ते उचका, मी कोणाच्या बापाला घाबरत नाही"; चित्रा वाघांचा मनोज जरांगेंवर पलटवार
3
'पहिला देश, नंतर व्यापार'! डोनाल्ड ट्रम्प यांच्या 'टॅरिफ'नंतरही भारत झुकला नाही; मोदी सरकारने दिला हा संदेश
4
विरारमध्ये दुर्घटना बचावकार्य युद्धपातळीवर सुरू, जिल्हाधिकाऱ्यांनी घेतला बचावकार्याचा आढावा
5
Nikki Murder Case : निक्कीच्या मृत्यूचं गूढ आणखी वाढलं, 'या' पुराव्यांमुळे बदलली तपासाची दिशा, पोलीसही हैराण
6
"आता माझ्याकडे मृत्यूशिवाय पर्याय नाही, म्हणून..."; भाजपा नेत्यानं मुख्यमंत्र्यांकडे मागितलं इच्छामरण
7
गंगेचा प्रवाह धोका? गंगोत्री ग्लेशियर १० टक्के वितळला, पाणी होतंय कमी; IIT इंदूरच्या संशोधनात काय? 
8
'आम्ही तिला मारलं नाही' निक्कीच्या सासरच्या लोकांचा दावा! पण पतीच्या एका कृतीने वाढला संशय
9
ऑनलाईन गेमिंगचे व्यसन जडले, तरुणाने घरातील दागिने चोरले अन् गेममध्ये उडवले 'इतके' पैसे!
10
भारतीय औषध कंपन्यांसमोर डोनाल्ड ट्रम्प झुकले! ५० टक्के टॅरिफमधून दिली सूट, नेमके कारण काय?
11
लव्ह मॅरेज, २ आलिशान शोरूम आणि ३६ पानी पत्र...; कोट्यवधीची संपत्ती तरीही उद्योगपतीचं कुटुंब संपलं कसं?
12
शेजाऱ्यांना खुश करण्यासाठी मार्क झुकेरबर्ग वाटतायेत 'हेडफोन'; का वैतागले आहेत शेजारी?
13
टाटानं केली नव्या 'एआय अँड सर्व्हिस ट्रांसफॉर्मेशन' युनिटची स्थापन, काय असणार काम? कुणाला मिळाली जबाबदारी? जाणून घ्या
14
बॉलिवूड सेलिब्रिटींच्या घरी बाप्पाचे आगमन, पाहा खास PHOTOS
15
एका वर्षापूर्वी झालेला बेपत्ता; आता केदारनाथ मंदिराजवळ सापडला भाविकाचा सांगाडा
16
इस्रायलप्रमाणे युद्धाची तयारी करत आहे 'हा' देश, ८१ प्रदेशांमध्ये काम सुरू!
17
"भारत आणि अमेरिका यांच्यात लवकरच होणार 'मुक्त व्यापार करार'!"; माजी परराष्ट्र सचिवांचं मोठं विधान, आणखी काय म्हणाले?
18
महाराष्ट्राच्या सीमेवर भयंकर चकमक; 'सी- ६०' दलाकडून भर पावसात चार नक्षल्यांचा खात्मा
19
भयंकर... पाचवीतील विद्यार्थिनीने शाळेतच घेतलं पेटवून, कुटुंबीय म्हणाले, 'तिच्यावर अत्याचार...'
20
हे लक्षात ठेवाच! कमी पाणी प्यायल्याने वाढू शकते स्ट्रेस लेव्हल; दररोज किती प्यावं पाणी?

कॉपीच्या मदतीने पदवी

By admin | Updated: May 19, 2017 02:32 IST

राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्यावतीने उन्हाळी सत्रात घेण्यात आलेल्या तीन टप्प्यातील परीक्षांमध्ये

भरारी पथकाची कारवाई : १८०० कॉपीबहाद्दर पकडले, डीएसी करणार चौकशी आशिष दुबे । लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्यावतीने उन्हाळी सत्रात घेण्यात आलेल्या तीन टप्प्यातील परीक्षांमध्ये एकूण १८०० कॉपीबहाद्दर पकडण्यात आले आहेत. विद्यापीठाच्या इतिहासात प्रथमच एवढ्या मोठ्या कॉपींचे प्रकरण पुढे आले आहे. यामुळे परीक्षा केंद्रावर तैनात अधिकाऱ्यांच्या विश्वासार्हतेवरसुद्धा प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. विद्यापीठाने ही सर्व प्रकरणे परीक्षा अनुपालन समितीकडे (डीएसी) चौकशीसाठी पाठविली आहेत. माहिती सूत्रानुसार विद्यापीठातील काही विभागाच्या अजूनही परीक्षा सुरूच आहेत. त्यामुळे या कॉपींच्या संख्येत पुन्हा वाढ होण्याची शक्यता वर्तविली जात आहे. उन्हाळी परीक्षेतील पहिला टप्पा हा ५ मार्चपासून सुरू झाला होता. या पहिल्या टप्प्यात पदविका अभ्यासक्रमासह हिवाळी परीक्षांमध्ये अनुत्तीर्ण विद्यार्थ्यांची परीक्षा घेण्यात आली. तसेच दुसऱ्या आणि तिसऱ्या टप्प्यात नियमित विद्यार्थ्यांच्या परीक्षा झाल्या. यापैकी पहिल्या टप्प्याच्या तुलनेत दुसऱ्या टप्प्यातील परीक्षांमध्ये सर्वाधिक कॉपींची प्रकरणे पुढे आली. असे असले तरी विद्यापीठाच्या परीक्षा विभागाने मात्र यावर चुप्पी साधली आहे. या विभागातील कुणीही बोलण्यास तयार नाही. जाणकारांच्या मते, पहिल्या टप्प्यापासूनच कॉपी सुरू झाली होती. ग्रामीण क्षेत्रासह शहरातील अनेक परीक्षा केंद्रावर मोठ्या प्रमाणात सामूहिक कॉपी चालली. विद्यापीठाने अशा कॉपीबहाद्दरांना पकडण्यासाठी भरारी पथके सज्ज केली होती. परंतु परीक्षा केंद्र आणि त्यावरील विद्यार्थ्यांची संख्या अधिक असल्याने त्या भरारी पथकांना सर्वांवर नजर ठेवणे शक्य नव्हते. शिवाय सुरुवातीच्या काळात भरारी पथकेसुद्धा नव्हती. त्याचा अनेकांनी फायदा घेतला. याच दरम्यान विद्यापीठाच्या परीक्षा विभागाला केंद्रावर मोठ्या प्रमाणात कॉपी चालत असल्याची माहिती मिळाली. त्यानंतर भरारी पथके तयार करण्यात आली. त्यानुसार दुसऱ्या टप्प्यातील परीक्षांदरम्यान मोठ्या प्रमाणात धाडी घालून ही कारवाई करण्यात आली. यातूनच परीक्षा केंद्रावर कॉपीच्या मदतीने विद्यार्थ्यांना उत्तीर्ण करण्याच्या खेळाचा भंडाफोड झाला. यापूर्वी कधीच एवढ्या मोठ्या संख्येने कॉपीचे प्रकरण पुढे आले नाही. यापूर्वी कोणत्याही परीक्षेत ५० पेक्षा अधिक प्रकरणे पुढे येत नव्हते. परंतु यावेळी ती संख्या १८०० वर पोहोचली आहे. यावर डीएसीचे सदस्यसुद्धा आश्चर्य व्यक्त करीत आहेत. निकालांना ब्रेक परीक्षेत कॉपी करताना पकडलेल्या विद्यार्थ्यांचा निकाल रोखण्यात येणार आहे. डीएसीचा निकाल आल्यानंतर त्यांचे निकाल जाहीर केले जाईल. परंतु डीएसीचा निकाल कधी येणार, यावर अजूनपर्यंत निर्णय झालेला नाही. भरारी पथकांची सक्रियता यासंबंधी विद्यापीठाच्या परीक्षा व मूल्यांकन मंडळाचे संचालक डॉ. नीरज खटी यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी यावेळी प्रथमच एवढ्या मोठ्या प्रमाणात कॉपीचे प्रकरण पुढे आले असल्याचे मान्य केले. शिवाय त्यांनी भरारी पथकांच्या सक्रियतेमुळे हे शक्य झाले असल्याचे ते म्हणाले. सुनियोजित झाली कॉपी माहिती सूत्रानुसार या सर्व परीक्षा केंद्रांवर सुनियोजितरीत्या कॉपी केली जात होती. नियमानुसार परीक्षा घेण्याची जबाबदारी ही शिक्षकांची आहे. परंतु केंद्रावर शिक्षकांऐवजी कॉलेजमधील विद्यार्थी आणि नुकतेच उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांना पर्यवेक्षक म्हणून तैनात करण्यात आले होते. याशिवाय परीक्षा विभागाला या केंद्रांची चौकशी करण्याची कधी गरज वाटली नाही. त्यामुळे या सर्व केंद्रांवर खुलेआम कॉपीचा उपयोग झाला.