शहरं
Join us  
Trending Stories
1
युक्रेनने रशियावर मोठा हल्ला केला, अणुऊर्जा प्रकल्पाजवळ ड्रोन हल्ला; स्वातंत्र्यदिनी मोठी कारवाई केली
2
सासरचे इतका त्रास देत होते तर मुलीला माहेरी का नेले नाही? उत्तर देताना निक्की भाटीच्या वडिलांच्या डोळ्यांत आलं पाणी
3
Lalbaugcha Raja 2025 : 'ही शान कोणाची... लालबागच्या राजाची!!"; बाप्पाच्या सजावटीत यंदा खास काय?
4
'एक बैठक घेण्यासाठी मनोज जरांगेंना आमदार १०-१५ लाख रुपये देतात'; लक्ष्मण हाकेंचा गंभीर आरोप
5
अमेरिकेत ट्रकचा भीषण अपघात, भारतीय चालकाला 'इतक्या' वर्षांची शिक्षा होणार? कुटुंबाने मागितली भारत सरकारची मदत!
6
लाडकी बहीण योजनेच्या गैरवापराची चौकशी करणार - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
7
Bigg Boss 19: बॉलिवूडचे सुपरस्टार्स ते टीव्हीवरचे कलाकार; पाहा 'बिग बॉस १९'च्या स्पर्धकांची संपूर्ण यादी
8
Manoj Jarange Patil : 'जीव गेला तरीही मागे हटणार नाही, गुलाल उधळूनच परतायचे' मनोज जरांगेंचा सरकारला इशारा
9
Bigg Boss 19 Premiere : नव्या पर्वाची दणक्यात सुरुवात! 'ही' आहे पहिली स्पर्धक
10
Bigg Boss 19: घरात होणार गँगवॉर! 'गँग्स ऑफ वासेपूर' फेम अभिनेत्याची 'बिग बॉस'मध्ये एन्ट्री
11
महिन्याला १ लाख कमवायची निक्की; तरीही का बंद केला ब्युटी पार्लरचा व्यवसाय? वडिलांनी सांगितलं कारण, म्हणाले...
12
पूजाचं ऐकलं अन् पुजारानं हा निर्णय घेतला! निवृत्तीनंतर स्वत: शेअर केली 'अनटोल्ड स्टोरी'
13
सुनेला जाळून मारण्यात मुलाची केली मदत; दिल्लीच्या निक्की भाटी प्रकरणात सासूला अटक!
14
स्कॉर्पिओ, बुलेट, रोख रक्कम आणि सोने; एवढे सगळे देऊनही निक्कीला रोज रात्री मारहाण करायचे, बहिणीने केले धक्कादायक खुलासे
15
विद्यार्थ्याचा पाय घसरला, शिक्षक वाचवायला गेले; वेरुळच्या जोगेश्वरी कुंडात बुडून दोघांचा मृत्यू 
16
'कभी खुशी कभी गम' फेम अभिनेत्री झाली आई, ३४व्या वर्षी दिला गोंडस लेकीला जन्म
17
'सन्मानजनक निरोप द्यायला हवा होता...', पुजाराच्या निवृत्तीवर शशी थरुर यांची भावनिक पोस्ट
18
Ganpati 2025: शिव ठाकरेच्या घरी वाजत गाजत आले गणपती बाप्पा, इतकी सुंदर मूर्ती की नजरच हटेना, पाहा व्हिडीओ
19
Asia Cup 2025: आशिया चषकात सर्वाधिक सामने जिंकणारे टॉप-५ कर्णधार!
20
भारतानंतर आता युरोपचाही अमेरिकेला मोठा धक्का; 'या' दोन देशांनी 'एफ ३५' फायटर जेट्स खरेदीला दिला नकार!

दीक्षांत समारंभावरील सावट हटणार?

By admin | Updated: July 29, 2014 00:53 IST

राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या १०० व्या दीक्षांत समारंभावरील सावट दूर होण्याची चिन्हे दिसून येत आहेत. अवैध पदव्यांच्या कथित आरोपांची चौकशी करण्यासाठी गठित करण्यात

नागपूर विद्यापीठ : खडक्कार समितीचा अहवाल सादर होणार नागपूर : राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या १०० व्या दीक्षांत समारंभावरील सावट दूर होण्याची चिन्हे दिसून येत आहेत. अवैध पदव्यांच्या कथित आरोपांची चौकशी करण्यासाठी गठित करण्यात आलेल्या डॉ. खडक्कार यांच्या अध्यक्षतेखालील समितीचा अहवाल तयार झाला आहे. हा अहवाल येत्या दोन-तीन दिवसांत कुलगुरूंना सादर करण्यात येईल. या अहवालात खरोखरच या पदव्या योग्य आहेत की अयोग्य, याचा निर्वाळा देण्यात आला आहे. हा अहवाल दीक्षांत समारंभाच्या दृष्टीने सकारात्मक असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. विद्यापीठाचा १०० वा दीक्षांत समारंभ गेल्यावर्षी १६ नोव्हेंबर रोजी होणार होता. परंतु एकही नियमित प्राध्यापक नसलेल्या महाविद्यालयांत विद्यार्थ्यांचे अंतर्गत गुण नियमबाह्य पद्धतीने देण्यात आल्याने पदव्या वैध कशा, असा प्रश्न उपस्थित करण्यात आला होता. यासंदर्भात गठित करण्यात आलेल्या डॉ. खडक्कार समितीचा अहवाल अपूर्ण होता. त्यामुळे संबंधित अहवालासंदर्भात नवीन समिती गठित करण्यात आली होती. यात डॉ. खडक्कार यांच्यासमवेत डॉ. के.सी. देशमुख, डॉ. डी.के.अग्रवाल, डॉ. हस्तक, डॉ. नासरे यांचा समावेश आहे. या समितीने संबंधित आरोपांसंदर्भात सुमारे तीन आठवडे चौकशी केली व १,३७८ विद्यार्थ्यांच्या गुणांसंदर्भातील सर्व तपशील तपासले. या समितीचा अहवाल तयार झाला असून, सोमवारी प्रभारी कुलगुरू अनुपकुमार यांच्यासोबतच डॉ. खडक्कार यांची चर्चादेखील झाली. हा अहवाल अंतिम झाला असला तरी मुद्यांची गंभीरता पाहता अहवाल सादरीकरणासाठी आणखी दोन दिवसांची मुदत मागून घेण्यात आली असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. (प्रतिनिधी)वेळेच्या गणिताचे कोडे?१०० व्या दीक्षांत समारंभात प्रदान करण्यात येणाऱ्या विद्यार्थ्यांच्या पदव्यांवर आक्षेप घेण्यात आल्यानंतर कुलपती कार्यालयाने तत्कालीन कुलगुरू डॉ. विलास सपकाळ यांना तक्रारीवर स्पष्टीकरण मागितले होते. डॉ. सपकाळ यांनी पहिल्यांदा तर सर्व पदव्या वैध असल्याचे कळविले होते. परंतु या विद्यार्थ्यांचे गुण नियमानुसार देण्यात आले की नाही हे ठामपणे सांगता येत नाही, असे तीनच दिवसांनी राज्यपाल कार्यालयाला कळविले होते. त्यानंतर दीक्षांत समारंभ ‘पोस्टपोन’ करण्यात आला. डॉ. खडक्कार यांच्या अध्यक्षतेखालील समितीला या १,३७८ विद्यार्थ्यांचा तपशील तपासण्यास सुमारे तीन आठवड्यांचा अवधी लागला. परंतु मागील नोव्हेंबर महिन्यातील संबंधित तीन दिवसांत खरोखरच इतक्या विद्यार्थ्यांचा तपशील कसा काय तपासण्यात आला, असा प्रश्न उपस्थित होत आहे. या वेळेच्या गणितामागे विद्यापीठातील वर्षानुवर्षे चालत आलेले राजकारण तर लपले नाही ना, अशी शंका विद्यापीठ वर्तुळात उपस्थित होत आहे.