शहरं
Join us  
Trending Stories
1
केंद्र सरकारने अचानक जातीय जनगणनेचा निर्णय का घेतला? काँग्रेसचा सवाल...
2
“शेतकऱ्यांना विमा कवच आवश्यक, नवा पॅटर्न अन्यायकारक, योजना पहिल्यासारखी सुरु ठेवा”: सपकाळ
3
केवळ अजित पवारच नव्हे, शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडूनही मोदी सरकारच्या निर्णयाचं स्वागत
4
'फक्त एकाला मारणार, जो लाखांच्या...!'; लॉरेंस बिश्नोई गँगची पाकला धमकी, कुणावर निशाणा?
5
गुरुवारी विनायक चतुर्थी: ५ मिनिटे लागतील, स्वामी-बाप्पा कृपा करतील; ‘हे’ मंत्र-श्लोक म्हणाच
6
BREAKING: देशात जातिनिहाय जनगणना होणार; केंद्रातील मोदी सरकारचा मोठा निर्णय
7
'या' स्फूर्तिदायी काव्यरचनांमधून द्या महाराष्ट्र दिनाच्या शुभेच्छा आणि शेअर करा आकर्षक शुभेच्छा पत्रं!
8
"CSKला धोनीची गरज नाही, संघाच्या भविष्यासाठी..."; MSD ज्याला आदर्श मानतो, त्यानेच मांडलं रोखठोक मत
9
विनायक चतुर्थी: गणपती पूजनात ‘या’ गोष्टी हव्यातच, कसे कराल व्रत? पाहा, सोपी पद्धत अन् मान्यता
10
विनायक चतुर्थी: ६ राशींना अनुकूल, अडकलेले पैसे मिळतील; नोकरीत पदोन्नती, बाप्पा चांगलेच करेल!
11
"PM मोदींना लष्कराला फ्री हॅन्ड देण्याचा अधिकारच नाही, तो तर..."; प्रकाश आंबेडकरांचं थेट कायद्यावर बोट
12
IPL 2025 : कुलदीप-रिंकू यांच्यात नेमकं काय घडलं? खरी गोष्ट आली समोर (VIDEO)
13
मैत्रिणीचे लग्न आटोपून घरी येताना अल्पवयीन मुलीवर सामूहिक बलात्कार, ९ जणांना अटक
14
जातिनिहाय जनगणना होणार, मोदींनी राहुल गांधींच्या हातून मोठा मुद्दा हिसकावला, असे आहेत फायदे तोटे  
15
"सुप्रीम कोर्टाच्या आदेशाने गुन्हा दाखल झालेल्या मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांचा राजीनामा कधी घेणार?’’ काँग्रेसचा सवाल 
16
IPL 2025: रोबोट कुत्र्यामुळे BCCI अडचणीत, उच्च न्यायालयाकडून मिळाली नोटीस, पण कशासाठी?
17
देवेंद्र फडणवीसांच्या लेकीला दहावीत 92 टक्के; 'वर्षा'मध्ये गृहप्रवेश केल्यावर अमृता फडणवीसांनी दिली आनंदाची बातमी
18
'अब तो नाम पूछना ही पडेगा...'; भोपाळमध्ये विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दलानं लावले पोस्टर!
19
काय सांगता? 'असं' चालाल तर नक्कीच लवकर वजन कमी कराल; होतील फायदेच फायदे

निर्णयामुळे गुन्हेगारांवर वचक बसणार

By admin | Updated: May 6, 2016 02:57 IST

मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठातर्फे युग चांडकच्या मारेकऱ्यांची फाशीची शिक्षा कायम ठेवण्याच्या निर्णयाचे नागपूरकरांनी स्वागत केले आहे.

नागपूरकरांच्या भावना : फाशी कायम ठेवण्याच्या निर्णयाचे केले स्वागतनागपूर : मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठातर्फे युग चांडकच्या मारेकऱ्यांची फाशीची शिक्षा कायम ठेवण्याच्या निर्णयाचे नागपूरकरांनी स्वागत केले आहे. या निर्णयामुळे न्यायपालिकेवरील नागरिकांचा विश्वास आणखी वाढला असल्याचे मत महिला वर्गाने व्यक्त केले आहे. ‘लोकमत’ने या निर्णयानंतर महिलांच्या भावना जाणून घेतल्या.न्यायालयाकडून हीच अपेक्षा होतीन्यायालयाकडून अशाच निर्णयाची अपेक्षा होती. युग चांडक प्रकरणात फाशीची शिक्षा कायम ठेवल्यामुळे न्यायव्यवस्थेवरील समाजाचा विश्वास आणखी वाढला आहे, हे निश्चित.- नीलिमा गढीकर, माजी नगरसेविका

सकारात्मक संदेशउच्च न्यायालयाच्या या निर्णयामुळे समाजात सकारात्मक संदेश गेला आहे. या निर्णयामुळे महिलांच्या मनातील भीती संपली आहे. या निर्णयाचे नक्कीच चांगले परिणाम होणार आहेत. गुन्हे करण्याची कोणी हिंमत करणार नाही.- नाजरा पटेल, शिक्षिका

प्रशंसनीय निर्णयउच्च न्यायालयाने या निर्णयाच्या माध्यमातून आपली चिंतादेखील व्यक्त केली आहे. न्यायालयाने युग प्रकरणानंतरची स्थिती लक्षात घेतली हे देखील महत्त्वाचे आहे. न्यायालयाचा हा निर्णय समाधानकारक व प्रशंसनीय आहे.- सुशीला सिन्हा, गृहिणी

गुन्हेगारांना फाशीच हवीअशाप्रकारचे गुन्हे करणाऱ्या गुन्हेगारांना फाशीचीच शिक्षा द्यायला हवी. उच्च न्यायालयाने गुन्हेगारांची फाशीची शिक्षा कायम ठेवून युगच्या कुटुंबीयांसोबतच समाजाला न्याय दिला आहे.- साक्षी शर्मा, गृहिणी

महिलांना आनंदयुग चांडकच्या मारेकऱ्यांची फाशीची शिक्षा कायम ठेवून न्यायालयाने गुन्हेगारांना चांगलाच धडा शिकविला आहे. या प्रकरणानंतर महिलांमध्ये मुलांची चिंता वाढली होती. परंतु त्यांना या निर्णयामुळे सर्वात जास्त आनंद झाला आहे.- इकरा खान, समाजसेविका

समाधानकारक निर्णयउच्च न्यायालयाने खूपच चांगला निर्णय दिला आहे. यामुळे सर्वांनाच समाधान लाभले आहे. मारेकऱ्यांच्या फाशीच्या शिक्षेची लवकरात लवकर अंमलबजावणी झाली पाहिजे.- निशा बोरकर, गृहिणी