शहरं
Join us  
Trending Stories
1
‘दोन शून्यां’ची बेरीज केली, त्यावर कितीही शून्य जोडले तरी…; भाजपाचा ठाकरे बंधूंना खोचक टोला
2
CM रेखा गुप्तांवर हल्ला करणाऱ्या व्यक्तीचा फोटो आला समोर, आरोपी गुजरातचा रहिवासी
3
India China Talks: व्यापारापासून ते थेट उड्डाणांपर्यंत; भारत-चीन यांच्यातील चर्चेत अनेक समस्यांवर निघाला तोडगा
4
BMC: पावसाळ्यात कुठे अडकलात तर काय कराल? मुंबई महानगरपालिकेची महत्त्वाची पोस्ट!
5
'हिला भुतांनी पछाडलेले आहे'; तांत्रिक गरम सळीने चटके देत राहिला, वेदनेने मुलीचा मृत्यू झाला
6
खळबळजनक! बीडमधील कोर्टात सरकारी वकिलाने स्वतःला संपवलं; कारण काय?
7
"चहलने तो टीशर्ट स्टंट खरंच केला? माझा विश्वासच बसत नव्हता..", धनश्री वर्माने व्यक्त केल्या भावना
8
पंतप्रधान अन् मुख्यमंत्र्यांनाही पदावरुन हटवण्याची तरतूद; केंद्र सरकारच्या नवीन विधेयकात नेमकं काय?
9
BEST Election Results: ना ठाकरे बंधू, ना भाजपा; शशांक राव यांच्या पॅनलला १४ जागा, आकडेवारी पाहाच
10
आधी बोलत होता, अचानक हात खेचला, धक्का दिला; रेखा गुप्ता यांच्यावर कसा हल्ला झाला? प्रत्यक्षदर्शी म्हणाले...
11
Toll: खराब रस्त्यांवर टोल नाही; सर्वोच्च न्यायालयाचा ऐतिहासिक निर्णय!
12
दिल्लीच्या मुख्यमंत्री रेखा गुप्ता यांच्यावर हल्ला; जनसुनावणीदरम्यान कागद हातात दिला, केस ओढले अन्....
13
रात्रीच्या वेळी शेतामध्ये प्रियकरासोबत आक्षेपार्ह अवस्थेत होती मुलगी; मागून गेलेल्या वडिलांनी बघितलं, उचललं टोकाचं पाऊल अन्...
14
फक्त ३ वर्षात पैसे दुप्पट! FD पेक्षाही जास्त परतावा देणारे टॉप ५ म्युच्युअल फंड, १० वर्षांत कोट्यधीश
15
व्हाट्सॲप युजर्ससाठी महत्त्वाची बातमी: 'Meta AI' मुळे ग्रुप चॅट्सची प्रायव्हसी धोक्यात? पेटीएम संस्थापकांचा दावा
16
बेस्ट निवडणूक २०२५: शशांक राव-महायुती पॅनलची बाजी, ठाकरे बंधू चितपट; विजयी उमेदवारांची यादी
17
HDFC बँकेच्या ग्राहकांसाठी महत्त्वाची बातमी! २२-२३ ऑगस्टला 'या' ऑनलाईन सेवा राहणार बंद
18
BEST Election Results: 'ब्रँडचे बॉस एकही जागा जिंकले नाहीत'; बेस्ट निवडणुकीतील पराभवावरुन ठाकरे बंधूंना भाजपचा टोला
19
India-China Trade: भारत की चीन.. या मैत्रीचा सर्वाधिक फायदा कोणाला होणार? काय सांगते आकडेवारी
20
महाराष्ट्र जलमय... पिके खरडली, घरे बुडाली; मराठवाड्यात ११ जीव गेले, ४९८ जनावरे दगावली

गुणवाढ घोटाळ्यासंदर्भात आठवडाभरात निर्णय

By admin | Updated: August 1, 2016 02:12 IST

राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठात चार वर्षांपूर्वी उघडकीस आलेल्या गुणवाढ घोटाळा प्रकरणावर अद्यापही अंतिम निर्णय झालेला नाही.

कुलगुरुंचे सूतोवाच : चौकशी पूर्ण, अहवाल सादर नागपूर : राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठात चार वर्षांपूर्वी उघडकीस आलेल्या गुणवाढ घोटाळा प्रकरणावर अद्यापही अंतिम निर्णय झालेला नाही. यासंबंधातील चौकशी पूर्ण झाली असून याचा अहवाल कुलगुरू डॉ.सिद्धार्थविनायक काणे यांना सादर करण्यात आलेला आहे. या घोटाळ्यासंदर्भात ३ आॅगस्ट अगोदर निर्णय घेणार असल्याचे कुलगुरूंनी स्पष्ट केले आहे. तत्कालीन सहायक कुलसचिव संध्या चुनोडकर- हांडा या प्रकरणातील मुख्य आरोपी होत्या. जुलै २०१२ मध्ये फेरमूल्यांकनातून गुणवाढ, असा घोटाळा उजेडात आला होता. विद्यापीठाच्या फेरमूल्यांकन विभागातील सहायक कुलसचिव संध्या चुनोडकर-हांडा यांनी आपल्या पदाचा दुरुपयोग करून त्यांच्या मुलाची तीन विषयात फेरमोजणी करून गुणवाढ करवून घेतली होती. हा प्रकार केवळ त्यांच्या मुलापुरता मर्यादित नव्हता तर इतरही अनेक विद्यार्थ्यांना याचा लाभ देण्यात आला, असा आरोप होता. विद्यापीठाने शिस्तपालन समितीद्वारे चौकशी करण्याचा निर्णय घेतला व तेव्हापासून हे प्रकरण समितीकडे होते.परीक्षा मंडळाच्या बैठकीत या अहवालाला मान्यतादेखील देण्यात आली होती व चुनोडकर-हांडा यांना निलंबित करण्यात आले होते. त्यांनी न्यायालयात दाद मागितली होती व सेवानिवृत्त न्यायाधीश धाराशिवकर यांच्यामार्फत विभागीय चौकशी करण्यात आली. या समितीने या प्रकरणाची सखोल चौकशी करून अहवाल तयार केला. तो अहवाल संध्या चुनोडकर यांना पाठवून त्यांना त्याबाबत विचारणा करण्यात आली. त्यांची बाजू नोंदवून घेत, अंतिम अहवाल कुलगुरूंकडे पाठविण्यात आला आहे. यासंदर्भात कुलगुरूंना विचारणा केली असता त्यांनी ही बाब मान्य केली. या प्रकरणासंदर्भात निर्णय घेण्यासंदर्भात व्यवस्थापन परिषदेने मला अधिकार दिले आहेत. परीक्षा मंडळाच्या बैठकीअगोदर हा निर्णय घेण्यात येईल व तो सर्वांसमोर येईल, असे त्यांनी सांगितले.(प्रतिनिधी) काणेंनीच सुरू केली होती चौकशी प्रभारी परीक्षा नियंत्रक असताना डॉ.काणे यांनी या प्रकरणाच्या चौकशीला सुरुवात केली होती. विभागीय चौकशी समितीसमोर त्यांची साक्षदेखील झाली व उलटतपासणीदेखील करण्यात आली. आता डॉ.काणे हे स्वत: कुलगुरू झाले आहेत व जी चौकशी त्यांनी सुरू केली होती, त्यावर कुलगुरू म्हणून निर्णय तेच देणार आहेत. या योगायोगासंदर्भात विद्यापीठातच चर्चा रंगली आहे. अद्याप पोलीस तक्रार नाहीच गुणवाढ घोटाळा हे गंभीर प्रकरण होते. यासंदर्भात शिस्तपालन समितीने कठोर कारवाईची शिफारस केली होती. या प्रकरणात पोलीस तक्रार करावी, अशी मागणी संघटनांनी केली होती. परंतु अद्यापपर्यंत पोलीस तक्रार झालेली नाही.