शहरं
Join us  
Trending Stories
1
'या' राज्यात स्थानिक निवडणुकीत भाजपानं बिनविरोध ७५% जागा जिंकल्या; आज निकालातही 'क्लीन स्वीप'
2
बिहारमध्ये रस्त्यावर सापडल्या VVPAT स्लिप्स! निवडणूक आयोगाने ARO ला निलंबित केले, FIR दाखल करण्याचे आदेश दिले
3
Manoj Jarange Patil: मनोज जरांगेंना मुंबई पोलिसांचे समन्स; १० नोव्हेंबरला तपास अधिकाऱ्यांसमोर हजर राहण्याचे निर्देश!
4
"निवडणुकीत बुडण्याची प्रॅक्टिस...!" राहुल गांधींच्या तलावातील उडीवरून पंतप्रधान मोदींचा टोला; RJD वरही निशाणा, स्पष्टच बोलले
5
Crime: विधवा भावजयीच्या प्रेमात पडला जेठ, लग्नासाठी सतत दबाव; नकार देताच अ‍ॅसिड फेकलं!
6
IND vs SA : सलग दोन सेंच्युरीसह 'या' पठ्ठ्यानं वाढवलं गिल-गंभीर जोडीचं टेन्शन; कारण...
7
आधार कार्ड काढायला घराबाहेर पडले ते परतलेच नाहीत; पेट्रोल पंप मालकाचा २ मुलींसह संशयास्पद मृत्यू
8
Hero: ड्युअल डिस्क ब्रेक्स, मल्टीपल राइडिंग मोड्स आणि बरेच काही; हिरो एक्सट्रीम १२५ आर लॉन्च!
9
Dance Bar Raid: उल्हासनगरातील चांदणी लेडीज सर्व्हिस बारवर पोलिसांची धाड, ९ महिलांसह १५ जणांना अटक
10
अरे देवा! मेट्रो स्टेशन तयार झालं पण नंतर कळालं उंचीच कमी, पुढं जे केलं ते पाहून थक्क व्हाल
11
स्टाँग रूमचे CCTV बंद, मध्यरात्री एका पिकअप व्हॅनची एन्ट्री; RJD च्या आरोपानंतर तपासाचे आदेश
12
चीनने वाढवली लष्करी ताकद! तिसरी विमानवाहू युद्धनौका 'फुजियान' तयार, अमेरिकेची चिंता वाढली
13
कोण आहेत गजाला हाशमी? ज्यांनी अमेरिकेत रचला नवा इतिहास; भारताशी थेट कनेक्शन, जाणून घ्या
14
वीज चमकली की सुरू होतं काउंटडाउन!… काय आहे क्रिकेटच्या मैदानात क्वचित लागू होणारा '30:30 नियम'?
15
चॉकलेट की बिस्किट... आरोग्यासाठी जास्त धोकादायक काय? खाण्याआधी एकदा विचार कराच
16
बिहारमध्ये वाढलेल्या मतदानाचा अर्थ काय, कोणता फॅक्टरमुळे वाढलं मतदान? प्रशांत किशोरांनी मांडलं गणित
17
ब्रिस्बेनच्या मैदानात पावसाची बॅटिंग! टीम इंडियानं ऑस्ट्रेलियाविरुद्धची टी-२० मालिका २-१ अशी जिंकली
18
डॉक्टरच्या लॉकरमध्ये मिळाली AK-47 रायफल, जम्मू-काश्मीर पोलीसही चकित; नेमकं प्रकरण काय?
19
"भैया मत करो...", बाईकवर मागे बसलेल्या तरुणीसोबत रॅपिडो चालकाचं धक्कादायक कृत्य
20
आधी ४५ कोटींचे मेट्रो स्टेशन बनवले, नंतर लक्षात आलं की उंची कमी झाली; मग...; हा जुगाड जाणून डोक्यावर हात माराल

गुणवाढ घोटाळ्यासंदर्भात आठवडाभरात निर्णय

By admin | Updated: August 1, 2016 02:12 IST

राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठात चार वर्षांपूर्वी उघडकीस आलेल्या गुणवाढ घोटाळा प्रकरणावर अद्यापही अंतिम निर्णय झालेला नाही.

कुलगुरुंचे सूतोवाच : चौकशी पूर्ण, अहवाल सादर नागपूर : राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठात चार वर्षांपूर्वी उघडकीस आलेल्या गुणवाढ घोटाळा प्रकरणावर अद्यापही अंतिम निर्णय झालेला नाही. यासंबंधातील चौकशी पूर्ण झाली असून याचा अहवाल कुलगुरू डॉ.सिद्धार्थविनायक काणे यांना सादर करण्यात आलेला आहे. या घोटाळ्यासंदर्भात ३ आॅगस्ट अगोदर निर्णय घेणार असल्याचे कुलगुरूंनी स्पष्ट केले आहे. तत्कालीन सहायक कुलसचिव संध्या चुनोडकर- हांडा या प्रकरणातील मुख्य आरोपी होत्या. जुलै २०१२ मध्ये फेरमूल्यांकनातून गुणवाढ, असा घोटाळा उजेडात आला होता. विद्यापीठाच्या फेरमूल्यांकन विभागातील सहायक कुलसचिव संध्या चुनोडकर-हांडा यांनी आपल्या पदाचा दुरुपयोग करून त्यांच्या मुलाची तीन विषयात फेरमोजणी करून गुणवाढ करवून घेतली होती. हा प्रकार केवळ त्यांच्या मुलापुरता मर्यादित नव्हता तर इतरही अनेक विद्यार्थ्यांना याचा लाभ देण्यात आला, असा आरोप होता. विद्यापीठाने शिस्तपालन समितीद्वारे चौकशी करण्याचा निर्णय घेतला व तेव्हापासून हे प्रकरण समितीकडे होते.परीक्षा मंडळाच्या बैठकीत या अहवालाला मान्यतादेखील देण्यात आली होती व चुनोडकर-हांडा यांना निलंबित करण्यात आले होते. त्यांनी न्यायालयात दाद मागितली होती व सेवानिवृत्त न्यायाधीश धाराशिवकर यांच्यामार्फत विभागीय चौकशी करण्यात आली. या समितीने या प्रकरणाची सखोल चौकशी करून अहवाल तयार केला. तो अहवाल संध्या चुनोडकर यांना पाठवून त्यांना त्याबाबत विचारणा करण्यात आली. त्यांची बाजू नोंदवून घेत, अंतिम अहवाल कुलगुरूंकडे पाठविण्यात आला आहे. यासंदर्भात कुलगुरूंना विचारणा केली असता त्यांनी ही बाब मान्य केली. या प्रकरणासंदर्भात निर्णय घेण्यासंदर्भात व्यवस्थापन परिषदेने मला अधिकार दिले आहेत. परीक्षा मंडळाच्या बैठकीअगोदर हा निर्णय घेण्यात येईल व तो सर्वांसमोर येईल, असे त्यांनी सांगितले.(प्रतिनिधी) काणेंनीच सुरू केली होती चौकशी प्रभारी परीक्षा नियंत्रक असताना डॉ.काणे यांनी या प्रकरणाच्या चौकशीला सुरुवात केली होती. विभागीय चौकशी समितीसमोर त्यांची साक्षदेखील झाली व उलटतपासणीदेखील करण्यात आली. आता डॉ.काणे हे स्वत: कुलगुरू झाले आहेत व जी चौकशी त्यांनी सुरू केली होती, त्यावर कुलगुरू म्हणून निर्णय तेच देणार आहेत. या योगायोगासंदर्भात विद्यापीठातच चर्चा रंगली आहे. अद्याप पोलीस तक्रार नाहीच गुणवाढ घोटाळा हे गंभीर प्रकरण होते. यासंदर्भात शिस्तपालन समितीने कठोर कारवाईची शिफारस केली होती. या प्रकरणात पोलीस तक्रार करावी, अशी मागणी संघटनांनी केली होती. परंतु अद्यापपर्यंत पोलीस तक्रार झालेली नाही.