शहरं
Join us  
Trending Stories
1
दिल्ली बॉम्बस्फोट प्रकरणात नवा ट्विस्ट, 'i20 कार'सोबत आणखी एक लाल कार होती ? चेकपोस्ट अलर्टवर
2
Delhi Blast: PM मोदी ॲक्शन मोडवर, थोड्याच वेळात हायलेव्हल बैठक; जयशंकर, डोवाल यांच्यासह... 
3
इकडे सुप्रिम कोर्टात सुनावणी, तिकडे दोन्ही शिवसेना एकत्र लढणार? गोंडस नाव दिले, म्हणे उद्धव ठाकरेंची परवानगी...
4
थरारक! लग्नातच नवरदेवावर चाकूने जीवघेणा हल्ला; ड्रोनद्वारे आरोपीचा २ किमी पाठलाग केला, मग...
5
दिल्ली ब्लास्टचं इंटरनॅशनल कनेक्शन? पाकिस्तानच नव्हे, 'या' मुस्लीम देशाचं नावही येतंय समोर; पासपोर्टवरून धक्कादायक खुलासा!
6
Astro Tips: दर गुरुवारी औदुंबराला पाणी घालण्याचे आध्यात्मिक आणि वैद्यकीय लाभ वाचून चकित व्हाल!
7
अरे व्वा...! या ढासू 7-सीटर SUV वर तब्बल ₹1.50 लाखांचा कॅश डिस्काउंट; जाणून घ्या किंमत अन् फीचर्स
8
'त्या' पोस्टरनं उलगडलं जैशचं टेरर मॉड्युल; समोर आला फोटो, एक महिना आधीच पाकिस्तानातून..
9
Bihar Election Exit Poll: मैथिली ठाकूर हरणार की जिंकणार, एक्झिट पोलचा अंदाज काय?
10
बापरे... ६ बायका...! सर्व जणी एकाच वेळी प्रेग्नन्ट; इंटरनेटवर व्हायरल होतोय हा युवक; बघा VIDEO
11
Motorola: ६.६७ इंचाचा डिस्प्ले, ५००० एमएएचची बॅटरी; 'हा' वॉटरप्रूफ फोन झाला आणखी स्वस्त!
12
Test Cricket: कसोटी कारकिर्दीत १० षटकारही मारले नाहीत असे ५ क्रिकेटपटू, यादीत एक भारतीय!
13
शिवसेना कुणाची? आता सुप्रीम कोर्टात पुढच्याच वर्षी अंतिम सुनावणी होणार; आजची तारीख पुढे ढकलली
14
₹१ च्या शेअरची कमाल, १ लाखांच्या गुंतवणूकीचे झाले ₹१ कोटी; ₹१४५ वर आला भाव, तुमच्याकडे आहे का?
15
लग्नात बूट चोरल्यानं भडकला नवरा, वरमाला फेकली; नाराज नवरीनेही लग्न मोडले, अनवाणीच परत पाठवला
16
वनप्लस 15 ची किंमत रिलायन्स डिजिटलने लीक केली, डिलीटही केली पण...; गुगलवर आताही दिसतेय...
17
Swami Samartha: देवाजवळ दिवा लावताना काच फुटली, दिवा पडला तर स्वामींना करावी 'ही' प्रार्थना!
18
अतूट प्रेम! कोमात असलेल्या लेकीला शुद्धीवर आणण्यासाठी १० वर्ष आईने रोज केला डान्स अन्...
19
सलग तिसऱ्या दिवशी बाजारात तेजी! IT शेअर्समध्ये जोरदार खरेदी, एशियन पेंट्स टॉप गेनर, कुठे झाली घसरण?
20
Delhi Blast : "दावत के लिए बिरयानी तैयार..."; दिल्ली स्फोटासाठी खास कोडवर्ड, चॅट बॉक्समध्ये धक्कादायक खुलासा

उमरेड येथे आणखी पाच दिवस कडकडीत बंदचा निर्णय

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 26, 2021 04:08 IST

लोकमत न्यूज नेटवर्क उमरेड : मागील बैठकीत १८ ते २५ एप्रिल दरम्यान वैद्यकीय सेवा वगळता अन्य दुकाने कडकडीत बंद ...

लोकमत न्यूज नेटवर्क

उमरेड : मागील बैठकीत १८ ते २५ एप्रिल दरम्यान वैद्यकीय सेवा वगळता अन्य दुकाने कडकडीत बंद पाळण्याचा निर्णय किराणा व्यापारी, कृषिसेवा केंद्र संचालक, भाजीपाला विक्रेते यांच्या पुढाकारातून घेण्यात आला होता. आता उद्या सोमवारपासून काय होणार, याकडे अनेकांचे लक्ष लागले होते.

रविवारी (दि. २५) या विषयावर सभेचे आयोजन केले गेले. पुन्हा पाच दिवस व्यापाऱ्यांनी सहकार्य करावे, असे आवाहन आमदार राजू पारवे, नगराध्यक्ष विजयलक्ष्मी भदोरिया यांनी केले. यावर व्यापाऱ्यांनी संमती दिल्यानंतर ३० एप्रिलपर्यंत कडकडीत बंदच्या निर्णयावर शिक्कामोर्तब झाले.

उमरेड पालिकेच्या स्व. रणधीरसिंह भदोरिया सभागृहात आयोजित सभेत कृषिउत्पन्न बाजार समितीचे सभापती रूपचंद कडू, तहसीलदार प्रमोद कदम, मुख्याधिकारी सुवर्णा दखणे, डॉ. अजितसिंग खंडाते, पोलीस उपनिरीक्षक राजेश पाटील यांची मंचावर उपस्थिती होती. येत्या पाच दिवसांत घरपोच किराणा साहित्य पोहचविण्याची आणि शहरात ठिकठिकाणी हातगाडीवर भाजीपाला विक्रीची मुभा देण्यात आली. व्यापाऱ्यांच्या पुढाकारातून बंदचा निर्णय झाल्यानंतर या आठवड्यात त्याचे सकारात्मक परिणाम दिसून आले. कोरोनाग्रस्तांच्या आकडेवारीतसुद्धा कमालीची घट दिसून आली, अशी माहिती तहसीलदार प्रमोद कदम यांनी दिली. नगरसेवक सतीश चौधरी, सुरेश चिचमलकर, जयसिंह गेडाम, विशाल देशमुख, हरिहर लांडे, दामोदर मुंधडा, अनिल गोविंदानी, उमेश वाघमारे, संजय मुंडले, पंकज फटिंग, दिलीप चव्हाण, अनिल येवले, वैभव भिसे, राहुल मने, मनीष शिंगणे आदींनीही आपआपली मते यावेळी व्यक्त केली.

केवळ किराणा व्यापाऱ्यांमुळेच कोरोना पसरत आहे का, असा सवाल उपस्थित करीत मधल्या कालखंडात लग्न समारंभांसाठी उसळलेल्या गर्दीवर प्रशासनाचे कोणतेही नियंत्रण नव्हते. प्रशासनाने कठोर भूमिका घेतली नाही. तेव्हा आपल्या अपयशाचे खापर आमच्यावर फोडू नका, अशा स्पष्ट शब्दांत अनिल गोविंदानी यांनी भूमिका मांडली. प्रशासनाने केवळ बंदचा निर्णय घेऊन कोरोनावर नियंत्रण ठेवता येणार नाही, तर आरोग्य यंत्रणासुद्धा अधिक सक्षम कराव्या लागतील, असेही विचार यावेळी व्यक्त झाले. दुकानासमोर उभे राहून व्यवसाय करणाऱ्यांवर कडक कारवाई करण्यात येईल. नियमावलीचा भंग केल्यास थेट गुन्हा दाखल केला जाईल, यावरही लक्ष केंद्रित केले गेले.

....

‘त्या’ नियमावर आश्चर्य

शासनाच्या नवीन नियमावलीनुसार, किराणा दुकाने सकाळी ७ ते ११ या वेळेत सुरू ठेवता येतील. ही वेळ केवळ पुणे, मुंबईसाठीच योग्य आहे. अन्य भागात ही वेळ योग्य नाही. शासनाच्या या नियमावर आश्चर्य व्यक्त करीत वेळेत बदल करण्याची मागणी यावेळी व्यापाऱ्यांनी केली. सकाळी १० ते दुपारी २ अशी वेळ निश्चित करावी, असे विचार यावेळी व्यापाऱ्यांनी मांडले.

....

टाकीत दूषित पाणी

उमरेड कोविड सेंटरमधील पाण्याच्या टाकीचा वापर सुमारे वर्षभरापासून झालेला नाही. यामुळे टाकीत गाळ साचला असून, पाणी दूषित असल्याच्या गंभीर बाबीकडे उमेश वाघमारे यांनी लक्ष वेधले. आरटीपीसीआर चाचणीच्या अहवालास होत असलेला विलंब ही समस्यासुद्धा यावेळी मांडण्यात आली.