शहरं
Join us  
Trending Stories
1
"आम्ही युद्धाला घाबरत नाही, आमचं संपूर्ण आयुष्य..."; सीरियाच्या राष्ट्राध्यक्षांचा इस्रायलला इशारा
2
उद्योगपती कल्याणींच्या कन्येची वडिलोपार्जित मालमत्तेवरील मालकी हक्कासाठी कराड न्यायालयात धाव
3
IND vs ENG : नो रिस्क; बुमराह चौथा कसोटी सामना खेळणार हे जवळपास फिक्स! प्रशिक्षकांनीच दिली हिंट
4
VIDEO: अंबरनाथ पालिकेत दोन ठेकेदारांमध्ये पोलिसांसमोरच सुरू झाली फ्री-स्टाइल हाणामारी
5
टाटा समूहाच्या हॉटेल कंपनीला २९६ कोटींचा नफा, ५ वर्षांत गुंतवणूकदारांना केलं मालामाल; दिला बंपर परतावा!
6
"महाराष्ट्र झाले २० टक्के कमिशनचे राज्य, राज्यात सत्ताधारी टॉवेल बनियन गँगचा धुमाकूळ’’, विजय वडेट्टीवार यांची टीका  
7
"राज्यात पाच महिन्यात १ लाख ६० हजार गुन्हे, ९२४ हत्या", अंबादास दानवे यांनी मांडली धक्कादायक आकडेवारी
8
विधिमंडळात पडळकर आणि आव्हाडांच्या कार्यकर्त्यांमध्ये हाणामारी; CM फडणवीस म्हणाले, 'हे योग्य नाही'
9
अहमदाबादमधील विमान अपघात वैमानिकांच्या चुकीमुळे? AAIBने स्पष्टच सांगितलं, ते दावे फेटाळले
10
काल पडळकर आणि आव्हाडांमध्ये वाद, आज दोन्ही नेत्यांचे कार्यकर्ते भिडले, विधानभवन परिसरात पुन्हा राडा, पाहा VIdeo
11
"भगवद्गीता वाचून हिंदू झालो, पण हिंदू होण्यासाठी...?" बाबा बागेश्वर आणि पाकिस्तानचे आरिफ अजाकिया यांच्यातील प्रश्नोत्तर व्हायरल
12
CM फडणवीस म्हणाले त्रिभाषा सूत्र लागू करणार; उद्धव ठाकरेंनी हिंदीला विरोध करणारे पुस्तकच भेट दिलं
13
Ghatkopar Wall Collapse: घराच्या दुरुस्तीदरम्यान भिंत कोसळल्याने कामगाराचा मृत्यू, घाटकोपर येथील घटना!
14
दिसला गं बाई दिसला... अखेर सारा तेंडुलकर अन् शुबमन गिलचा 'तो' VIDEO सापडलाच..!!
15
२४ तासांत ३० किलो वजन कमी करण्याची हमी, शस्त्रक्रियेनंतर लगेच महिलेचा मृत्यू   
16
यूपी पोलिसांच्या एन्काउंटरमध्ये २३८ गुन्हेगार ठार, तर ९ हजारांहून अधिक गोळीबारात जखमी
17
IND W vs ENG W : वनडेत एक नंबर कामगिरी! स्मृती-प्रतिका सलामी जोडीनं सेट केला वर्ल्ड रेकॉर्ड
18
"बिहारमध्ये बांगलादेशी-रोहिंग्या सापडले, पण पहलगामचे दहशतवादी..."; ओवैसींची सरकारवर टीका
19
भारतीय ग्रँडमास्टर्स समोर 'बुद्धी' चालेना! आर. प्रज्ञानंद याने वर्ल्ड नंबर वन कार्लसनला दिला शह
20
२ राजयोग करणार ९ राशींची भरघोस भरभराट, अडकलेली कामे होतील; हाती पैसा राहील, शुभ वरदान काळ!

उमरेड येथे आणखी पाच दिवस कडकडीत बंदचा निर्णय

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 26, 2021 04:08 IST

लोकमत न्यूज नेटवर्क उमरेड : मागील बैठकीत १८ ते २५ एप्रिल दरम्यान वैद्यकीय सेवा वगळता अन्य दुकाने कडकडीत बंद ...

लोकमत न्यूज नेटवर्क

उमरेड : मागील बैठकीत १८ ते २५ एप्रिल दरम्यान वैद्यकीय सेवा वगळता अन्य दुकाने कडकडीत बंद पाळण्याचा निर्णय किराणा व्यापारी, कृषिसेवा केंद्र संचालक, भाजीपाला विक्रेते यांच्या पुढाकारातून घेण्यात आला होता. आता उद्या सोमवारपासून काय होणार, याकडे अनेकांचे लक्ष लागले होते.

रविवारी (दि. २५) या विषयावर सभेचे आयोजन केले गेले. पुन्हा पाच दिवस व्यापाऱ्यांनी सहकार्य करावे, असे आवाहन आमदार राजू पारवे, नगराध्यक्ष विजयलक्ष्मी भदोरिया यांनी केले. यावर व्यापाऱ्यांनी संमती दिल्यानंतर ३० एप्रिलपर्यंत कडकडीत बंदच्या निर्णयावर शिक्कामोर्तब झाले.

उमरेड पालिकेच्या स्व. रणधीरसिंह भदोरिया सभागृहात आयोजित सभेत कृषिउत्पन्न बाजार समितीचे सभापती रूपचंद कडू, तहसीलदार प्रमोद कदम, मुख्याधिकारी सुवर्णा दखणे, डॉ. अजितसिंग खंडाते, पोलीस उपनिरीक्षक राजेश पाटील यांची मंचावर उपस्थिती होती. येत्या पाच दिवसांत घरपोच किराणा साहित्य पोहचविण्याची आणि शहरात ठिकठिकाणी हातगाडीवर भाजीपाला विक्रीची मुभा देण्यात आली. व्यापाऱ्यांच्या पुढाकारातून बंदचा निर्णय झाल्यानंतर या आठवड्यात त्याचे सकारात्मक परिणाम दिसून आले. कोरोनाग्रस्तांच्या आकडेवारीतसुद्धा कमालीची घट दिसून आली, अशी माहिती तहसीलदार प्रमोद कदम यांनी दिली. नगरसेवक सतीश चौधरी, सुरेश चिचमलकर, जयसिंह गेडाम, विशाल देशमुख, हरिहर लांडे, दामोदर मुंधडा, अनिल गोविंदानी, उमेश वाघमारे, संजय मुंडले, पंकज फटिंग, दिलीप चव्हाण, अनिल येवले, वैभव भिसे, राहुल मने, मनीष शिंगणे आदींनीही आपआपली मते यावेळी व्यक्त केली.

केवळ किराणा व्यापाऱ्यांमुळेच कोरोना पसरत आहे का, असा सवाल उपस्थित करीत मधल्या कालखंडात लग्न समारंभांसाठी उसळलेल्या गर्दीवर प्रशासनाचे कोणतेही नियंत्रण नव्हते. प्रशासनाने कठोर भूमिका घेतली नाही. तेव्हा आपल्या अपयशाचे खापर आमच्यावर फोडू नका, अशा स्पष्ट शब्दांत अनिल गोविंदानी यांनी भूमिका मांडली. प्रशासनाने केवळ बंदचा निर्णय घेऊन कोरोनावर नियंत्रण ठेवता येणार नाही, तर आरोग्य यंत्रणासुद्धा अधिक सक्षम कराव्या लागतील, असेही विचार यावेळी व्यक्त झाले. दुकानासमोर उभे राहून व्यवसाय करणाऱ्यांवर कडक कारवाई करण्यात येईल. नियमावलीचा भंग केल्यास थेट गुन्हा दाखल केला जाईल, यावरही लक्ष केंद्रित केले गेले.

....

‘त्या’ नियमावर आश्चर्य

शासनाच्या नवीन नियमावलीनुसार, किराणा दुकाने सकाळी ७ ते ११ या वेळेत सुरू ठेवता येतील. ही वेळ केवळ पुणे, मुंबईसाठीच योग्य आहे. अन्य भागात ही वेळ योग्य नाही. शासनाच्या या नियमावर आश्चर्य व्यक्त करीत वेळेत बदल करण्याची मागणी यावेळी व्यापाऱ्यांनी केली. सकाळी १० ते दुपारी २ अशी वेळ निश्चित करावी, असे विचार यावेळी व्यापाऱ्यांनी मांडले.

....

टाकीत दूषित पाणी

उमरेड कोविड सेंटरमधील पाण्याच्या टाकीचा वापर सुमारे वर्षभरापासून झालेला नाही. यामुळे टाकीत गाळ साचला असून, पाणी दूषित असल्याच्या गंभीर बाबीकडे उमेश वाघमारे यांनी लक्ष वेधले. आरटीपीसीआर चाचणीच्या अहवालास होत असलेला विलंब ही समस्यासुद्धा यावेळी मांडण्यात आली.