शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

उमरेड येथे आणखी पाच दिवस कडकडीत बंदचा निर्णय

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 26, 2021 04:08 IST

लोकमत न्यूज नेटवर्क उमरेड : मागील बैठकीत १८ ते २५ एप्रिल दरम्यान वैद्यकीय सेवा वगळता अन्य दुकाने कडकडीत बंद ...

लोकमत न्यूज नेटवर्क

उमरेड : मागील बैठकीत १८ ते २५ एप्रिल दरम्यान वैद्यकीय सेवा वगळता अन्य दुकाने कडकडीत बंद पाळण्याचा निर्णय किराणा व्यापारी, कृषिसेवा केंद्र संचालक, भाजीपाला विक्रेते यांच्या पुढाकारातून घेण्यात आला होता. आता उद्या सोमवारपासून काय होणार, याकडे अनेकांचे लक्ष लागले होते.

रविवारी (दि. २५) या विषयावर सभेचे आयोजन केले गेले. पुन्हा पाच दिवस व्यापाऱ्यांनी सहकार्य करावे, असे आवाहन आमदार राजू पारवे, नगराध्यक्ष विजयलक्ष्मी भदोरिया यांनी केले. यावर व्यापाऱ्यांनी संमती दिल्यानंतर ३० एप्रिलपर्यंत कडकडीत बंदच्या निर्णयावर शिक्कामोर्तब झाले.

उमरेड पालिकेच्या स्व. रणधीरसिंह भदोरिया सभागृहात आयोजित सभेत कृषिउत्पन्न बाजार समितीचे सभापती रूपचंद कडू, तहसीलदार प्रमोद कदम, मुख्याधिकारी सुवर्णा दखणे, डॉ. अजितसिंग खंडाते, पोलीस उपनिरीक्षक राजेश पाटील यांची मंचावर उपस्थिती होती. येत्या पाच दिवसांत घरपोच किराणा साहित्य पोहचविण्याची आणि शहरात ठिकठिकाणी हातगाडीवर भाजीपाला विक्रीची मुभा देण्यात आली. व्यापाऱ्यांच्या पुढाकारातून बंदचा निर्णय झाल्यानंतर या आठवड्यात त्याचे सकारात्मक परिणाम दिसून आले. कोरोनाग्रस्तांच्या आकडेवारीतसुद्धा कमालीची घट दिसून आली, अशी माहिती तहसीलदार प्रमोद कदम यांनी दिली. नगरसेवक सतीश चौधरी, सुरेश चिचमलकर, जयसिंह गेडाम, विशाल देशमुख, हरिहर लांडे, दामोदर मुंधडा, अनिल गोविंदानी, उमेश वाघमारे, संजय मुंडले, पंकज फटिंग, दिलीप चव्हाण, अनिल येवले, वैभव भिसे, राहुल मने, मनीष शिंगणे आदींनीही आपआपली मते यावेळी व्यक्त केली.

केवळ किराणा व्यापाऱ्यांमुळेच कोरोना पसरत आहे का, असा सवाल उपस्थित करीत मधल्या कालखंडात लग्न समारंभांसाठी उसळलेल्या गर्दीवर प्रशासनाचे कोणतेही नियंत्रण नव्हते. प्रशासनाने कठोर भूमिका घेतली नाही. तेव्हा आपल्या अपयशाचे खापर आमच्यावर फोडू नका, अशा स्पष्ट शब्दांत अनिल गोविंदानी यांनी भूमिका मांडली. प्रशासनाने केवळ बंदचा निर्णय घेऊन कोरोनावर नियंत्रण ठेवता येणार नाही, तर आरोग्य यंत्रणासुद्धा अधिक सक्षम कराव्या लागतील, असेही विचार यावेळी व्यक्त झाले. दुकानासमोर उभे राहून व्यवसाय करणाऱ्यांवर कडक कारवाई करण्यात येईल. नियमावलीचा भंग केल्यास थेट गुन्हा दाखल केला जाईल, यावरही लक्ष केंद्रित केले गेले.

....

‘त्या’ नियमावर आश्चर्य

शासनाच्या नवीन नियमावलीनुसार, किराणा दुकाने सकाळी ७ ते ११ या वेळेत सुरू ठेवता येतील. ही वेळ केवळ पुणे, मुंबईसाठीच योग्य आहे. अन्य भागात ही वेळ योग्य नाही. शासनाच्या या नियमावर आश्चर्य व्यक्त करीत वेळेत बदल करण्याची मागणी यावेळी व्यापाऱ्यांनी केली. सकाळी १० ते दुपारी २ अशी वेळ निश्चित करावी, असे विचार यावेळी व्यापाऱ्यांनी मांडले.

....

टाकीत दूषित पाणी

उमरेड कोविड सेंटरमधील पाण्याच्या टाकीचा वापर सुमारे वर्षभरापासून झालेला नाही. यामुळे टाकीत गाळ साचला असून, पाणी दूषित असल्याच्या गंभीर बाबीकडे उमेश वाघमारे यांनी लक्ष वेधले. आरटीपीसीआर चाचणीच्या अहवालास होत असलेला विलंब ही समस्यासुद्धा यावेळी मांडण्यात आली.