शहरं
Join us  
Trending Stories
1
तामिळनाडूत सुपरस्टार विजयच्या रॅलीत चेंगराचेंगरी, महिला आणि मुलांसह 31 जणांचा मृत्यू, अनेक जखमी 
2
Mumbai Rain: मुंबईत उद्या अतिवृष्टीचा इशारा; कामाशिवाय घराबाहेर पडू नका, BMC च्या सूचना
3
"ठाकरेंना हात जोडून विनंती की...!" उद्धव ठाकरे यांच्या शेतकऱ्यांसंदर्भातील 'त्या' विधानावर गुलाबराव पाटलांची एका वाक्यात प्रतिक्रिया
4
शेतकऱ्यांना मदत कधीपर्यंत मिळणार? DCM एकनाथ शिंदेंनी दिली आनंदाची बातमी; बळीराजाची दिवाळी गोड होणार!
5
पनवेलकडे जात असताना बाईक बेलापूर खाडीत कोसळली; एकाचा शोध लागला, दुसरा तरुण बेपत्ता
6
Asia Cup Final 2025: भारत की पाकिस्तान, कोण जिंकणार? ग्रहांची साथ कुणाला? मोठी भविष्यवाणी...
7
प्रेरणादायी! सामान्य भाजी विक्रेत्याचे असामान्य दान; पूरग्रस्तांसाठी दिले १ लाख, माणुसकी जपली
8
विदर्भात 'या' जिल्ह्यांना मुसळधार पावसाचा फटका, पिकांचे अतोनात नुकसान ! अजून किती दिवस जोर राहणार कायम?
9
यावेळी बिहारमध्ये चार-चार दिवाळी उत्सव, किती जागा जिंकणार NDA? अमित शाह यांनी सेट केलं टार्गेट; राहुल-तेजस्वी यांच्यावरही बरसले
10
“आई कृपा कर, सरकारला बुद्धी दे!”; बाळासाहेब थोरातांचे मोहटादेवी चरणी साकडे, नुकसानीची पाहणी
11
“सोनू सूद पंजाबच्या मदतीला धावला, मराठी कलावंतांनी मराठवाड्याला मदत करावी”: अमोल मिटकरी
12
“भाजपाला प्रशासन चालवता येत नाही, CM सहायता फंडाबाबत फडणवीसांनी बोलू नये”; ठाकरेंचा पलटवार
13
महाराष्ट्रावर प्रचंड मोठे संकट असताना पंतप्रधान का फिरकले नाहीत? काँग्रेसचा सवाल
14
कंटाळा आला म्हणून मुलींनी मागवले ऑनलाइन जेवण; मद्यधुंद आईला राग अनावर, लेकींना बेदम मारहाण
15
३० सेकंदात रुग्णवाहिका तिथून निघून गेली; आरोपी गगनप्रीत कौरला जामीन मंजूर, कोर्टाने काय म्हटले?
16
१ ऑक्टोबरपासून लागू होणार ट्रेन तिकीट बुकींगचा नवा नियम, झटपट आटोपून घ्या हे काम, अन्यथा...
17
“पूरग्रस्तांचे संसार पुन्हा उभे करण्यासाठी सर्वस्व पणाला लावू”; अजित पवारांचा VCद्वारे संवाद
18
नवरात्रात सोनं खरेदी करणं झालं अवघड! सर्वकालीन उच्चांकी पातळीच्या अगदी जवळ जाऊन पोहोचलं; चेक करा 'लेटेस्ट रेट'
19
“PM केअर फंडात महाराष्ट्राचाही पैसा, ५० हजार कोटींची मदत जाहीर करावी”; उद्धव ठाकरेंची मागणी
20
“संकट आले तेव्हा आम्ही पंचांग काढून बसलो नाही, सरकारने सरसकट कर्जमाफी द्यावी”: उद्धव ठाकरे

अपमानित जावयाची आत्महत्या

By admin | Updated: September 26, 2016 03:08 IST

लग्नसमारंभात सासरच्या मंडळींनी पाहुण्यांसमोर अपमानास्पद वागणूक देऊन शिवीगाळ केल्यामुळे एका तरुणाने गळफास लावून आत्महत्या केली.

गळफास लावला : आरोपींविरुद्ध गुन्हा दाखलनागपूर : लग्नसमारंभात सासरच्या मंडळींनी पाहुण्यांसमोर अपमानास्पद वागणूक देऊन शिवीगाळ केल्यामुळे एका तरुणाने गळफास लावून आत्महत्या केली. संदीप रामदास तायडे(वय ३२, रा. पोलीस नगर, हिंगणा) असे मृताचे नाव आहे. संदीप हा एमआयडीसीत एका कंपनीत काम करीत होता. त्याचे अमरावतीच्या तरुणीसोबत लग्न झाले होते. पत्नी किरकोळ मुद्यावरून वाद करून माहेरी जात होती. त्यामुळे संदीप वैतागला होता. त्याने पत्नीची समजूत काढतानाच सासरच्या मंडळीकडे दाद मागण्याचे प्रयत्न केले होते. मात्र, सासरची मंडळी त्यालाच दोषी ठरवत होती. जुलै महिन्यात संदीपच्या साळीचे अमरावतीला लग्न होते. त्यासाठी तेथे तो गेला होता. ७ जुलैला त्याच्या सासुरवाडीतील मंडळींनी त्याचा भर पाहुण्यांसमोर पाणउतारा केला. त्याला टोचून बोलले. पत्नीनेही सोबत येण्यास नकार दिला. नातेवाईकांसमोर झालेला अपमान सहन न झाल्यामुळे गावाला परत आलेल्या संदीपने १७ सप्टेंबरला सकाळी ९.३० च्या सुमारास गळफास लावून आत्महत्या केली. तत्पूर्वी त्याने सुसाईड नोट लिहून ठेवली. त्यात त्याने सासरच्या मंडळींनी कशाप्रकारे अपमान करून मानसिक त्रास दिला ते लिहिले. या मजकुरावरून संदीपच्या आत्महत्येला आरोपी इंदिरा धंदर (रा. अमरावती), त्यांचा जावई गोवर्धन ना. कांबळे (रा. वडगाव अमरावती) त्याची पत्नी (संदीपची अक्कडसासू) संगीता गोवर्धन कांबळे , चंद्रकांत मोहोड (रा. वरुड, अमरावती), संगीता चंद्रकांत मोहोड, रामदास धंदर, मंगला रमेश धंदर (रा. नागपूर) आणि इंदू नामक एक महिला (रा. भिलाई राजनांदगाव, छत्तीसगड) जबाबदार असल्याचे स्पष्ट झाले. त्यामुळे संदीपची आई बेबी रामदास तायडे (वय ५०) यांनी एमआयडीसी पोलिसांकडे तक्रार नोंदवली.(प्रतिनिधी)