शहरं
Join us  
Trending Stories
1
जगातील सर्वात आनंदी देश धोक्यात! रशियन सैन्याने घेरले; युरोपमध्ये खळबळ, युक्रेननंतर..
2
अचानक बसला आग लागली, ५ जणांचा मृत्यू, काच फोडून चालक पळून गेला
3
४ दिवसांच्या संघर्षात भारत ठरला वरचढ, पाकिस्तानला मोठं नुकसान; न्यूयॉर्क टाईम्सचा रिपोर्ट
4
भाजप-संघातील घटक नाराज; म्हणे, ‘ऑपरेशन सिंदूर’नंतरचा युद्धविराम ही तर चूक, शत्रुत्व थांबले
5
पाकिस्ताननंतर बांगलादेशनं IMF कडे पसरले हात, बुडत्या अर्थव्यवस्थेचं कारण देत 'इतक्या' पैशांची मागणी
6
आजचे राशीभविष्य १५ मे २०२५: आर्थिक लाभ संभवतात, दुपारनंंतर मात्र अनेकांचे नशीब बदलेल...
7
शूरवीरांचा देश आहे, असा संदेश पाकला देणे आवश्यक होते; RSSचे सुनील अंबेकर यांचे प्रतिपादन
8
कर्नल सोफियांवर टीका भोवली, मंत्री विजय शाहवर FIR; हायकोर्टाने फटकारले, रात्री गुन्हा दाखल
9
न्या. भूषण गवई देशाचे ५२वे सरन्यायाधीश; अनेक महत्त्वपूर्ण निर्णय देणाऱ्या पीठांमध्ये सहभाग
10
अनामिक भीती वाटते, अस्थिर मन शांत होत नाही? कळकळीने स्वामींना हाक मारा, ‘ही’ प्रार्थना कराच
11
ब्रह्मोस अण्वस्त्रांच्या डेपोवर आदळले असते तर काय झाले असते? किती मोठा स्फोट झाला असता?
12
महिला राफेल उडवू शकतात, तर लष्करात त्यांची संख्या मर्यादित का? सुप्रीम कोर्टाचा सरकारला सवाल
13
गरिबांच्या सेवेमुळे माझ्या मुलाला हे पद मिळाले; सरन्यायाधीश गवई यांच्या मातोश्री भावुक
14
२१ दिवसांत ३१ माओवादी यमसदनी; छत्तीसगड-तेलंगणा सीमेवर कारवाईला मोठे यश
15
पाकने २१ दिवसांनी BSF जवानाला भारताच्या ताब्यात दिले; वडील म्हणाले, मुलाची गळाभेट घ्यायची आहे
16
डोनाल्ड ट्रम्प यांचा पाचव्यांदा दावा; म्हणाले, “होय, भारत-पाकमधील युद्ध अमेरिकेनेच संपविले”
17
२०२७ पासून मेट्रोचा मार्ग वेगाने विस्तारेल: मुख्यमंत्री; काशीगाव-दहिसरदरम्यान तांत्रिक चाचणी
18
शरद पवार गटाच्या बैठकीत स्थानिक निवडणुकांवर चर्चा; नेमके काय घडले, कोणता निर्णय झाला?
19
‘लाडक्या बहिणी’च्या नावे खाती उघडून सायबर भामट्यांना ३० हजारांत विक्री; तिघे अटकेत
20
‘सोडूनी सारी लाज, क्यूआर कोडने घेतली लाच’; दोन पोलिस अन् एका खबऱ्याला अटक, नेमके प्रकरण काय?

संकटातील शेतकऱ्यांना कर्ज माफी द्या

By admin | Updated: June 19, 2016 02:57 IST

राज्यातील शेतकरी हा संकटात सापडला असून, विविध समस्यांचा सामना करीत आहे. अशा स्थितीत त्याला आधाराची गरज आहे.

आम आदमी पार्टीचा धडक मोर्चा : जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन नागपूर : राज्यातील शेतकरी हा संकटात सापडला असून, विविध समस्यांचा सामना करीत आहे. अशा स्थितीत त्याला आधाराची गरज आहे. त्यामुळे राज्य सरकारने सर्व शेतकऱ्यांना कर्जमुक्त करून, प्रत्येकाला पुन्हा पीक कर्ज उपलब्ध द्या, अशा मागणीसह शनिवारी आम आदमी पार्टीच्यावतीने जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक मोर्चा काढण्यात आला. दुपारी २.३० वाजताच्या सुमारास आम आदमी पार्टीच्या सिव्हिल लाईन्स येथील कार्यालयातून हा मोर्चा काढण्यात आला होता. परंतु पोलीस प्रशासनातर्फे या मोर्चाला जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत जाण्याची परवानगी दिली नाही. त्यामुळे तो मोर्चा सिव्हिल लाईन्स परिसरातील मीठा निम दर्गा येथेच समाप्त करण्यात आला. दरम्यान आम आदमी पार्टीचे नेते सुभाष वारे यांच्या नेतृत्वात एका शिष्टमंडळाने जिल्हाधिकाऱ्यांची भेट घेऊन त्यांना मागण्यांचे निवेदन सादर केले. या निवेदनातून शेतकऱ्यांना संपूर्ण कर्जमाफी देण्यासह नव्याने पीक कर्ज उपलब्ध करून द्या, बियाणे व खताचा काळाबाजार थांबवा, सातवा वेतन आयोग लागू करण्याअगोदर स्वामिनाथन आयोगाच्या शिफारशी लागू करा, अशा मागण्यांकडे शासनाचे लक्ष्य वेधण्यात आले. या मोर्चात संपूर्ण जिल्ह्यातून आलेल्या शेकडो शेतकऱ्यांनी भाग घेतला होता. तसेच आम आदमी पार्टीचे नेते सुभाष वारे, विदर्भ संघटक डॉ. देवेंद्र वानखडे, विदर्भ सचिव जगजीत सिंग, बन्सीधर कोठीकर, अशोक मिश्रा, ईश्वर गजबे, प्रमोद लढ्ढा, सचिन शेंडे, गोरले, चंद्रशेखर, गणेश रेवतकर, सुनील दीक्षित, फझिल रशीद, प्रभाकर आवारी, सचिन पारधी, किरण वेलोर, प्रभात अग्रवाल, सत्विंदर सिंग, संजय जीवतोडे, सोनू ठाकूर, कविता सिंघल, शालिनी अरोरा, शंकर इंगोले, पीयूष आकरे, रजनी शुक्ला, मन्सूर शेख, वसंत घाटीबांधे, प्रशांत इलमे, राकेश दवे, नीलेश गोयल, सुनंदा खैरकर, मनोज सोनी, वंदना मेश्राम, वीणा भोयर, संदीप सिंग, कलिम खान, अजय बन्सपाल, भूषण ढाकुलकर, एम. झेड. काझी, आरिफ दोसानी व मुन्ना तिवारी यांनी भाग घेतला होता. (प्रतिनिधी)